Thursday 28 April 2022

श्रीमंत थोरल्या बाजीरावांस...

 



शतकोटी अभंग‌ लिहिण्याची आमच्या भक्तशिरोमणी श्रीनामदेवरायांची‌ प्रतिज्ञा ज्याप्रमाणे जगद्गुरु श्रीतुकोबारायांनी पूर्ण केली, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक श्रीशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करत व दिल्लींद्रपदलिप्सव: अशा श्रीशंभुछत्रपतींच्या देहावसानाचा प्रतिशोध घेत दिल्ली जिंकून त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत स्वराज्यमंदिरांवर हिंदुपतपातशाहीचा कळस चढविला...!


बाजीरावांच्या पुण्यवंतपणाचे दर्शन तत्कालीन अन्य मराठे‌ सरदारांच्या पत्रांतून आपणांस घडल्यावर संदेहांस जागा उरत नाही.‌ मागे ह्यावर लिहिलंय.


कान्होजी आंग्रे त्यांच्याबद्दल एक पत्रात लिहितात👇🏻👇🏻👇🏻


*"आपणापेक्षा इष्टमित्र सुह्रदसंबंधी दुसरे कोण आहेत?"*

(पेशवे दप्तर - खंड ३०- पृष्ठ ४१)


सेखोजी आंग्रे म्हणतात 👇🏻👇🏻👇🏻


*"हा मनसुबा आपणच कबुल करावा. शिरोपस्थाई आपणच व्हावे. आपले पदरी आम्हासारिखे असता अगाध काय आहे? येवढे महद्यश संपादिले त्याचे कलशारोपण आपणच करावे."*


(पेशवे दप्तर - खंड ३ - पृष्ठ ४३)


*"आपण ज्या पाण्यात बुडा म्हणाल त्या पाण्यात बुडावयांस सिद्ध आहो."*

(पेशवे दप्तर - खंड ३३ - पृष्ठ ४३)


सर जदुनाथ सरकार म्हणतात 👇🏻👇🏻👇🏻


*"In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao Ballal was unequalled for the daring and originality of his genius and the volume and the value of his achievements. He was truly a carlylean Hero as King-or rather as 'Man of Action'. If Sir Robert Walpole created the unchallengeable position of of the Prime Minister in the unwritten constitution of England, Bajirao created the same institution in the Maratha Raj at exactly the same time."*


Foreward to Peshwa Bajirao I and Maratha Expansion by V S Dighe - 1994.


इतिहासाचार्य वि का राजवाड्यांनी श्रीमंतांच्या सर्व मोहिमांची अगदी‌ संक्षेपांत जी माहिती‌ दिलीय, ती आह्मीं सोबत जोडली आहे. ती वाचल्यांवर या अपराजित अशा रणधुरंधर पेशव्याच्या दिव्य पराक्रमाची साक्षी अंत:करणांस‌ पटेल...! थोरले बाजीराव हे शब्दश: वाऱ्याप्रमाणे दौड करून विद्युल्लतेप्रमाणे सर्व हिंदुस्थानभर आपल्या खड्गाचे पाते‌ तळपून हिंदुत्वशत्रुंचा आळीपाळीने परामर्श कसे घेत होते हे ह्यांवरून लक्ष्यीं येईल...!






*शत्रु सावध होण्यापूर्वीच अत्यंत द्रुतगतीने दिवसरात्र कुच करून त्याच्यावर अचानक आक्रमण करून त्याचे नुकसान करावयाचें आणि तो‌सावध होऊन आपलीं संघटना करु लागण्यांपूर्वीच तिथून निसटावयाचेें परतावयाचें, नंतर चपळाईनें त्याच्या छावणीभोवतीं फिरून त्याचीं रसद मारावयाचीं व त्याच्या उजव्या डाव्या बाजुचें लचकें तोडून त्यांस‌ जर्जर करावयाचें व अशा छाप्यांनी तो धैर्यहीन होऊन मागें हटला म्हणजे पुन्हा त्याच्यावर उघड आक्रमण करून त्याचा घुव्वा उडवायचा...!*


संदर्भ - ना के बेहरे लिखित पहिलें बाजीराव पेशवे


बाजीरावांच्या युद्धनीतीची संक्षेपांत‌ मांडणी ही म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही...! 


बाजीराव गेल्यावर श्रीशाहुमहाराज लिहितात


*"बाजीसारखा शिष्य गेला, याउपर या मुलुखातून जावे किंवा प्राण सोडावा."*


चिमाजी अप्पांस लिहिलेलं पत्र


हिंदुस्थानच्या इतिहासातल्या एकमेव अपराजित योद्ध्यांस पुण्यतिथीनिमित्त कोटी अभिवादन...!


भवदीय...!


पाखण्ड खण्डिणी

pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीमंतथोरलेबाजीरावपेशवे_हिंदुपदपातशाही_हिंदवीस्वराज्य_साम्राज्य_रणधुरंधर_अपराजितयोद्धा

No comments:

Post a Comment