Monday 30 December 2019

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे पुण्यस्मरण



महाभारतात आदिपर्वाच्या प्रथमच अध्यायांत एक वचन आहे.

*इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् |*
*बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रतरिष्यति ||२०४||*

(भांडारकर प्रत)

ह्यावचनांत किंचितसा भेद करून नि महाभारतकारांची क्षमायाचना करून

*मईसाधनाभ्यां मराठेतिहासं समुपबृहंयेत ।*
*बिभेत्यल्पश्रुतादेतिहासो मामयं प्रतरिष्यति ।*
(मुक्त छंदांत केलेली रचना)

अर्थ - *मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाचे उपबृंहण करायचे असेल तर इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे कृत मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्यांनीच करायला हवं. नाही केल्यांस तो इतिहासपुरुष हे अल्पश्रुत लोक माझा विपर्यास करतील म्हणून घाबरतो.*

इतिहासाचार्य राजवाड्यांविषयी काही लिहिण्यांस सांप्रत तरी असमर्थ आहे म्हणून इतकंच. आजीवन अखंड केवळ इतिहासाचाच ध्यांस घेऊन त्याविषयीच जीवनसर्वस्व अर्पण केल्याचे उदाहरण इतिहासांत तरी अन्यत्र क्वचितच आढळेल.

*कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ।*

*ह्या भवभूतीच्या उक्तीप्रमाणेच ज्यांचे सख्य जीवनभर उन्हाळ्यांतील कडक उन, हिवाळ्यांतील कडाक्याची थंडी नि ग्रीष्मांतल्या सततच्या संततधारा ह्यांच्याशीच होते अशा पुरुषश्रेष्ठाचे आज पुण्यस्मरण.*

*ज्याप्रमाणे थोरल्या महाराजांनी नि त्यांच्या जीवलगांनी अवघी तीन तपे हलकल्लोळ करून महाराष्ट्रधर्माचे राज्य चोहीकडे करून पूर्वजांस अभिमानित केलं, तद्वतच आयुष्यांतली तीन तपेहून अधिक कालावधी इतिहासाचे हे उपबृंहण करण्यांस ह्या विश्वनाथाने प्रदीप्त प्रतिभा, अवर्णनीय नि:स्पृहता, अत्युदात्त निरपेक्षता नि अतुलनीय कष्टशीलता ह्या अंगभूत गुणांनी ह्या इतिहासपुरुषाची सेवा करून पूर्वजांस उपकृत केलं.*

*राजवाड्यांची बलदंड देहयष्टी*

शक्तीने पावती सुखे ।
शक्ती नसता विटंबना ।
समर्थ

यौवनावस्थेतच उत्तम व्यायाम करून बलदंड शरीर निर्माण करणारे राजवाडे आहाराच्या बाबतीत जसे वृकोदर भीमासमान आहारप्रेमी होते तद्वतच ह्याच इतिहाससंशोधनासारख्या दुर्घट नि वरपांगी नीरस वाटणाऱ्या कार्यांतही स्वत:च्या पोटावर बिबे ओढणारेही होते. ते सांगतात

*नेमाने पहाटे पाच वाजता मी उठत असेन व तालमीत जाऊन दोन तास उत्तम मेहनत करीत असे. बैठका,जोर, जोडी, मल्लखांब व कुस्ती अशी सुमारे दीड-दोन हजार मेहनत रोज होई, तो सात वाजत. नंतर शेर-दीड शेर दूध पिऊन अर्धा तास कॉलेजाभोवताली मैदानात व झाडाखाली सहल व विश्रांती होई. आठपासून नऊपर्यंतचा वेळ वर्तमानपत्र वाचण्यात जाई. पुढे एक तास नदीवर पोहणे होत असे. परत येऊन भोजन आटोपून खोलीकडे यावे, तो नेमके साडेअकरा वाजत.*

*चहासारख्या अग्निमांद्य वाढविणाऱ्या पदार्थाचा तिरस्कार* करणारे राजवाडे लिहितात

*अलीकडील लोकांच्या खिशात चहा घेण्यांस दोन आणे खुळखुळतात; परंतु तेवढ्याच पैशात अर्धा मूठ बदामगर, दोन चार खडीसाखरेचे खडे, १०।१२ काळी द्राक्षे असा माधवरावी मेवा घेता येईल. (माधवरावी म्हणजे न्यायमुर्ती माधव गोविंद रानडेे यांच्या खिशांत बदाम पिस्ते वगैरेच असायचे). मी हा मेवा घेतो म्हणूनच माझे दंड पीळदार व डोळे पाणीदार आहेत.*

*मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान*

वय वर्षे बारा ते सव्वीस (२६) पर्यंत राजवाडे केवळ इंग्रजीतच बोलत, लिहित नि वागत. पण पुढे ह्याचाच पश्चात्ताप त्यांना झाला नि ते पुढे मातृभाषेचे कट्टर अभिमानी बनले. एकेकाळी इंग्रजीच्या वेडाने झपाटलेले हेच राजवाडे पुढे मातृभाषेचे इतके अभिमानी बनले की पुढे त्यांनी मातृभाषेतच लिहायची शपथ घेतली. *माझ्या साहित्याचे आकलन करण्यांस लोकांना वीस वर्षे लागतील असे राजवाडे एकदा म्हणाले होते.* दुर्दैव हे की आजही इतकी दशके होऊनही त्यांचे साहित्य आम्हांस अभ्यासु वाटत नाही.

पत्रव्यवहार तर त्यांनी मोडी, मराठी किंवा संस्कृतमधूनच केला.

*स्वभाषा, स्वभूमी नि स्वजन ह्यांना वाहिलेले नि:स्पृह जीवन*

साने गुरुजी राजवाड्यांच्या ह्या मातृभाषाप्रेमाविषयी लिहितात की

*ज्ञानेश्वरांसारख्या वागीश्वरांनी आपल्या अमृतासमान ओव्या कोळशाने खांबावर लिहिल्या; दासोपंतांनी निंबाचा पाला खाऊन लक्षावधी ग्रंथ लिहून ठेवला; या प्राचीन वाग्वीरांप्रमाणेच नि:स्वार्थ होऊन ज्यावेळी आम्ही लिहावयांस लागूं, त्यावेळेस मराठी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही.*

इंग्रजी पोषाखाचा धिक्कार करणारे राजवाडे एकदा म्हणाले होते की

*पंचा घालून प्रयोगशाळेत प्रयोगाचे काम केले तर ऑक्सिजन निर्माण होणार नाही काय ?*

*कामिनी कांचनाचा त्यागच हे महत्कार्य घडवु शकतो*

राजवाड्यांच्या जीवनचरित्राचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यभर ह्या दोन गोष्टींपासूनची त्यांची परावृत्तता. व्यसनांपासूनची त्यांची परावृत्तताही. कधीकधी विड्या ओढायचे पण त्यांनी स्वत:च सांगितल्याप्रमाणे कैक महिने ते त्यापासून राहु शकत असत. ह्यावरूनच व्यसनाधीतना नव्हती हे लक्ष्यी येते.

*बहुविषयांचा धांडोळा*

*इतिहास, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राजनीति शास्त्र, तर्कशास्त्र, तर्कज्ञान व मानसशास्त्र* ह्याविषयांचे राजवाड्यांनी ह्या यौवनावस्थेत महाविद्यालयीन जीवनांत नि पुढे अध्ययन केलं.

*मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्याची प्रस्तावना*

असे क्वचितच ग्रंथ किंवा ग्रंथमाला असतात की ज्यांची *प्रस्तावना मुखोद्गत* करावीशी अशी असते. त्यात *सावरकरांच्या जोसेफ मैझिनीसारखीच किंवा वै. सोनोमामा दांडेकरांच्या श्रीज्ञानेश्वरीची किंवा वै. शंकरमहालाज खंदारकरांची श्रीगाथाभाष्याची किंवा स्वामी वरदानंद भारतींची सार्थमनुस्मृतीभाष्याची. त्यापेक्षाही दिव्य नि तितक्याच ज्वलज्जहाल शब्दांची पर्जन्यवृष्टी करणारी राजवाड्यांची 'मराठ्यांच्या इतिहासांची साधने' ह्या बावीस खंडात्मक ग्रंथमालेची प्रस्तावना* ही प्रत्येकांने वाचावयांसच हवीच. ही प्रस्तावनाच खरंतर एका स्वतंत्र लेखमालेचा विषय व्हावा अशी आहे. अर्थात इतिहासाचार्यांच्या इतिहाससंशोधनाच्या आरंभीच्या १० वर्षांच्या अथक परिश्रमाचे नि साधनेचे ते एक *स्वादुरसो मधुपेयो* ह्या अथर्ववेदवचनाप्रमाणेच असे एक फल आहे. जिज्ञासूंनी ही प्रस्तावना वाचावींच अशीच आहे.

*१२७ पृष्ठांच्या द्वादशप्रकरणात्मक* अश्या ह्या प्रस्तावनेत इतिहासाचार्यांनी पानिपतच्या पराभवाची आजपर्यंत (त्याकाळपर्यंत) सांगितलेल्या अष्टादश अर्थात अठरा कारणांची मांडणी करून त्याचे सप्रमाण व बिनतोड खंडनही त्यात केले आहे. ही प्रस्तावना आमच्या गतेतिहासाकडे सताड अर्थात उघड्या नेत्रांनी पाहण्यांची एक प्रेरणाही आम्हांस देते.

*अवघ्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यांत इतिहास संशोधनाचे अद्वितीय नि भावी पिढींस मार्गदर्शक असे कार्य करणाऱ्या ह्या इतिहासाचार्याने जे काही विलक्षण कार्य केलंय, त्यावरूनच इतिहासाचार्य ही पदवी त्यांच्यापश्चात अद्याप कुणांसही प्राप्त झाली नाही हे लक्षणीय सत्य आहे.*

राजवाड्यांच्या एकुण ग्रंथसंपदेविषयी लिहिण्यांस सांप्रत असमर्थ आहे कारण जितकं वाचलं तितकंच लिहिलंय. भविष्यांत कैक वर्षांनी अवश्य ग्रंथपरिचय लिहीनच.

*अखेर तो महाराष्ट्रेतिहास पोरका झाला*

आजच्या दिवशीच इसवीसन १९२६ मध्ये धुळ्यांत ह्या महापुरुषाने अखेरचा श्वांस घेतला. सानेंच्या भाषेत

*आशेचा मेरु उन्मळला, कर्तव्यनिष्ठेचा सागर आटला, उत्साहाचा सूर्य अस्तंगत झाला, महाराष्ट्र सरस्वती अनाथ झाली, महाराष्ट्रेतिहास पोरका झाला.*

अशा ह्या भीष्मासमान थोर पुरुषांस आज त्यांच्या पुण्यस्मरणी विनम्र अभिवादन !

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#इतिहासाचार्य_विश्वनाथ_काशिनाथ_राजवाडे_पुण्यस्मरण_मराठ्यांच्या_इतिहासाची_साधने_महाराष्ट्रेतिहास

Tuesday 24 December 2019

Planting the Cross In Asia – संपूर्ण आशिया ख्रिस्तमय करणे !



"With the Church throughout the world, the Church in Asia will cross the threshold of the Third Christian Millennium marvelling at all that God has worked from those beginnings until now, and strong in the knowledge that "just as in the first millennium the Cross was planted on the soil of Europe, and in the second on that of the Americas and Africa, we can pray that in the Third Christian Millennium a great harvest of faith will be reaped in this vast and vital continent".

१९९९ मध्ये पोप जोन पॉल द्वितीय भारत भेटीस आला असताना त्याने उच्चारलेले हे वाक्य – “प्रथम सहस्त्रकांत आम्ही संपूर्ण युरोप ख्रिस्ती केला, द्वितीय मध्ये अमेरिका आणि आफ्रिका आणि तृतीय मध्ये आता संपूर्ण आशिया हे आमचे ध्येय !”

संदर्भ -

 http://w2.vatican.va/content/john-paul-ii/en/apost_exhortations/documents/hf_jp-ii_exh_06111999_ecclesia-in-asia.html

ह्या दुव्यावर पाहू शकता! हे ख्रिस्त्यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.

ह्या पोपला भारतात आमंत्रण देणार्या दोन व्यक्ती कोण असतील हो उत्तर - सोनिया तर आहेच पण ज्यांची आज जयंती आहे असा देशाचा भूतपूर्व पंतप्रधान. अटल बिहारी वाजपेयी.

सर्वधर्मसमभावाच्या भोंगळ आत्मघातकी नि षंढ मानसिकतेच्या गप्पा ठोकणार्या आम्हा हिंदूंना वास्तवतेचे भान असणे ही दूरचीच गोष्ट ! अर्थात हे षड्यंत्र म्हणजे ख्रिस्त्यांनी हिंदुस्थानात पाउल टाकण्यापासून हे सर्व उद्योग उघड उघड आहेत. कसे ते पाहुयंत !

An Account of the Inquisition at Goa हा १८१९ मधला ग्रंथ ज्यामध्ये ख्रिस्त्यांनी त्यांच्या पाशवी पंथाच्या प्रचारासाठी केलेले हिंदूंचे अनन्वित अत्याचार, सरसकट कत्तली, माता भगिनींचे बलात्कार, बलात्काराने केलेली सर्व धर्मांतरे ह्याचा इतिहास जिज्ञासू वाचू शकतात. अनंत काका प्रियोळकर ह्या लेखकानेही ह्याच गोवा ईन्क्विजिशनवर स्वतंत्र अभ्यसनीय ग्रंथ लिहिलाय.

अगदी शिवकालातही धर्मांतरे सुरु होतीच म्हणूनच की काय पुण्यश्लोक श्रीशिवप्रभूंनी चार ख्रिस्ती पाद्र्यांची धर्मांतर करू नका म्हणून ऐकले नाही म्हणून उडविलेली मुंडकी हा इतिहास आम्ही मराठे तरी विसरलेलो नाही आहोत. अर्थात आज महाराजांना सेक्युलर दाखवायचे धंदे सुरूच आहेत म्हणा. असो तो वेगळा विषय !

आता ब्रिटीशांचा इतिहास पाहुयांत

केवळ साम्राज्य विस्तार हाच ब्रिटीशांचा राज्याचा हेतू नसून मूळ ध्येय ख्रिस्ताचेच अनुसरण हेच होते. ह्या सर्व कार्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या योजना !

भारतीय इतिहासाचे विकृतीकरण

The most effective way to destroy people is to deny and obliterate their own understanding of their history.

Goerge Owell

*Cambridge History Of India ह्या सहा खंडाच्या ग्रंथातून केलेले भारतीय इतिहासाचे विकृतीकरण !*

*आर्य आक्रमण सिद्धांत ह्याचेच अपत्य !*

*मेक्सम्युलर, मोनियर विल्यम्स, जेम्स मिल, विल्यम जोन्स, मोरटाईम व्हीलर* आदि लोकांनी मांडलेला हा थोतांड सिद्धांत आजही दुर्दैवाने पाठ्यपुस्तकातून शिकविला जातो ह्यापेक्षा दुर्दैव काय?

भारतीय इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशी केलेली बालिश विभागणी व त्यांची आमच्याच इतिहासकारांनी ओढलोली री !

हिंदूंची त्यांच्याच स्व-धर्माविषयीची श्रध्दा आणि निष्ठा नष्ट करणे

*The Chief obstacle to spread the chiristianity in India is that these people are proud of their traditions and religion.*

Monier Williams – 2nd May, 1887 – Missionary Congress Oxford Lecture.

हे वाक्य फार सुचक आहे म्हणूनच ह्या कामासाठी मेक्सम्युलर नावाच्या मनुष्याची योजना. त्याने मरेपर्यंत संस्कृत न येताही व भारतात कधीच न येता तरीही केलेला वेदांचा ३० वर्षांचा अभ्यास आणि केलेली विकृत भाषांतरे ५० खंडात प्रकाशित ! जिज्ञासूंनी आमचा टिळकांवरील लेख वाचावा. उघडपणे हा मनुष्य आपण ख्रिस्त प्रचासाराठी हे काम करतो आहोत असे म्हणत असून देखील आमच्या विद्वान लोकांना अद्याप त्याचे सत्यस्वरूप कळत नाही ह्यापेक्षा दुर्दैव ते काय ? रामकृष्ण मठ आणि भाजपही अद्याप त्याची जयंती साजरी करते ! आणखी काय दुर्दैव ? नंतर तो खूप भारतभक्त झाला ही गोष्ट वेगळी पण आधीचे काय ???

अपवाद केवळ महर्षी दयानंदांचा ज्यांनी ह्याला पुरता नागवा केला होता जिवंतपणीच !त्यांची जितकी स्तुती करता येईल तेवढी थोडीच ! त्यावर कधीतरी सविस्तर लिहूच !

*इथल्या शिक्षण पद्धतीचा विध्वंस*

गांधीजींनी ज्यांस "रमणीय वृक्ष" म्हणून गौरविले, ती आमची मुळची भारतीय गुरुकुल शिक्षण पध्दती जी अठराव्या शतकांत सर्वव्यापक आणि सर्व सर्वसमावेशक अशी होती, ती नष्ट करून त्यांची मेकौले प्रणीत शिक्षा पद्धती लागू करणे आणि दुर्दैवाने स्वतंत्रता प्राप्तीपश्चात ७० वर्षे झाली तरीही आम्ही तीच सुरु ठेवणे !

*फोडा आणि राज्य करा*

आर्याक्रमण सिद्धांतातून निर्माण केलेली विषवल्ली आज इतकी विस्तारली आहे की मूलनिवासी मंचाच्या नावाखाली ब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्य हे तीन्ही विदेशी हा प्रचार सुरुय ! ब्रिटिशांना आणखी काय हवे होते ???

*ब्राह्मणी अत्याचाराची भंपक नि तथ्यहीन कल्पना आणि ख्रिस्त्यांचे ब्राह्मणद्वेषाचे बीज*

बव्हतांश ख्रिस्ती मिशनर्यांचे ग्रंथ वाचले की एक गोष्ट लक्षात येते ती हीच की इथले ब्राह्मण संपविल्याशिवाय ख्रिस्तविजय संभव नाही. *Abbe Dubois हा मिशनरी त्याच्या ग्रंथांमध्ये ब्राह्मणांविषयी जी गरळ ओकतो ती पाहिली की गेली दोनशे वर्षे ब्राह्मण द्वेष जो सुरु आहे त्याचे मुळ लक्षात येते.* तो म्हणतो

*And there is no stronghold of evil so impregnable as the Brahmins. 1820.*

आता *Reverend Norman Macloid* हा त्याचाच सहकारीही हेच लिहितो की 

*“The Brahmin is therefore well worth looking at! We have more to do with him than with the Czar of all the Russians. The battle we have to fight with him is not against guns or rifles, not against flesh and blood.”*

बरं हीच गोष्ट मैक्सम्युलर, मोनियर विल्यम्सही ठामपणे मांडतो की इथला पुरोहित वर्ग नष्ट केल्याशिवाय आपला ख्रिस्तविजय संभव नाही.

*मुस्लिमांनी आणि ख्रिस्त्यांनी केलेल्या अत्याचाराचे बिल ब्राह्मणांवर फाडून हे सर्व मोकळे झाले आहेत.*

*एकीकडे भट भिक्षुक म्हणायचे आणि दुसरीकडे हा ३-४ प्रतिशत समाज शेष ९५ लोकांवर अत्याचार करतो ही हास्यास्पद कल्पना आमच्या लक्षात येत नाही ह्यापेक्षा शोकांतिका कोणती ? आणि ह्यासाठी पुढे जोती फुलेंसारखी माणसे पेरणे. पुढे नेहरूप्रणीत मार्क्सवादी साम्यवादी इतिहासकारांकडून हेतपुरस्सर केले  गेलेले इतिहासाचे विकृतीकरण ब्रिटीश गेल्यावरही सुरु राहतेच.*

बौद्धांवर मुस्लिमांनी केलेले अत्याचार लपवून ते ब्राह्मणांनी केले असा धादांत खोटा प्रचार केला जातो. वस्तुत: सर्व मुस्लीम भाष्यकार प्रामाणिकपणे उच्चरवाने उद्घोषित करतात की आम्ही कसा हिंदू आणि बौद्ध मंदिरांचा किंवा स्तुपांचा विध्वंस केला आणि इथल्या हिंदू आणि बौद्धांची कत्तल केली. पण इथले नेहरूप्रणीत मार्क्सवादी इतिहासकार मात्र ह्याला ब्राह्मणी अत्याचाराची संज्ञा देऊन बुद्धिभेद करतात आणि आमचे लोकही नंदी बैलासारखे मुंड्या हलवितात. *ज्यांना संदर्भ पहायचे असतील त्यांनी Elliot and Dawson ह्यांनी १८६७ ते १८८७ ह्या काळात लंडन येथून संपादित केलेले आठ खंड जे “History of India – as told by its own Historians” नावाने प्रकाशित आहेत. द्वितीय खंडापासून सर्व मुस्लीम अशा अरबी, फारसी इतिहासकारांच्या तत्कालीन ग्रंथांची भाषांतरे आहेत. आंतरजालांवर सर्व काही उपलब्ध आहे. मूस्लिम इतिहासकार स्वत: अत्याचाराची टिमकी मिरविताना आम्हाला मात्र त्यात सहस्त्रोवर्षांचा तथाकथित ब्राह्मणी अत्याचार दिसतो. ह्यापेक्षा वाईट काय???*

दुर्दैवाने अगदी मंडल आयोगापर्यंत हा द्वेष तसाच खदखदत राहतो. त्याच्या पुढेही आजही तेच सुरुय भीमा कोरेगाव च्या माध्यमातून ! कारण वर स्पष्ट आहे.

*हिंदू धर्म हा ब्राह्मणी धर्म आहे असे सतत विष पेरणे*

उपरोक्त सर्व ख्रिस्ती लेखकांच्या ग्रंथात नेहमी हीच रटाळ पोपटपंची वाचायला मिळते त्यामुळे ब्राह्मणेतरांनी आमचा ख्रिस्ती पंथ स्वीकारावा हीच त्यांची भूमिका दिसून येते. बौद्ध विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष अकारण इतिहासांत पेटविणे हे कार्य जितकं ब्रिटीशांनी केलं, तितकंच नेहरुप्रणीत मार्क्सवादी साम्यवादी इतिहासकारांनीही केलं.

*पण काही बोलायचे नाही, कारण भावना दुखावतात !*

ख्रिस्ती मिशनर्यांनी संन्याशाचे रूप घेऊन आश्रम स्थापिणे आणि धर्मांतरे करणे

उपरोक्त एबे दुबोईस हा त्याच्या ग्रंथात स्पष्ट लिहितो की आम्ही कसे ब्राह्मणाचे किंवा संन्याशाचे वेष धारण करून ख्रिस्ती मिशनरी भारतात कार्यरत ठेवले आणि हिंदूंना बाटविले. हे कार्य आता आणखी कसे सहज आणि कुणालाही न कळता करता येईल ह्याविषयी तो सविस्तर लिहितो. दुर्दैवाने हे आजही सुरु आहे ! ईशावास्य उपनिषद ह्याचे येशू ख्रिस्ताशी संबंध जोडून ख्रिस्ती प्रचार करताहेत. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी *सीता राम गोएल ह्या नामवंत इतिहासकाराचा “Catholic Ashrams – Sannyasins Or Swindlers” हा २६३* पृष्ठांचा ग्रंथ वाचावा.

सर, रावबहाद्दूर सारखे तुकडे फेकून इथल्या विद्वानांना कायमचे अंकित करणे हाही मार्ग ! आणखीही अनेक मार्गांनी ख्रिस्त्यांनी पंथप्रचारासाठी केलेल्या युक्त्या प्रयुक्त्या आपणांस अभ्यासता येतील.विस्तारभयास्तव जास्ती लिहित नाही.

काहींना असे वाटेल की उपरोक्त लेखांत ब्राह्मणांचीच टिमकी वाजविण्याचा आमचा हेतु आहे. तर असे मूळीच नाही. जे आहे ते ससंदर्भ आम्ही मांडलंय.

आता ह्या सर्वांत दोष आम्हा हिंदुंचाही भरपूर आहेच आहे तो कसा ते पाहुयांत.

सद्गुणविकृती हा एक मोठा दोष !

स्वधर्माचे पुरेसे काय थोडंही ज्ञान नसणे हा दोष !

वेदांचा प्रचार, त्याचा तेजस्वी जीवनवाद, त्याची विजीगीषु वृत्ती हिचा त्याग !

सर्वधर्मसमान आहेत हाही एक महत्वाचा दोष !

सर्व मार्ग व उपासनापद्धती एकाच ईश्वराप्रती जातात ही भोंगळ शिकवण !

वस्तुत:

ओम इन्द्रं वर्धन्तो अप्तुरः कृण्वन्तो विश्वमार्यम् ! अपघ्नन्तो अराव्णः !
ऋग्वेद – ९.६३.५

किंवा

एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः !
स्वंस्वं चरित्रन शिक्षेरन पृथिव्यां सर्वमानवाः !

मनुस्मृति

सर्व विश्वाला आर्य अर्थात सुसंस्कृत करण्याची आज्ञा देणारा आमचा ऋग्वेद आणि आमची प्रक्षेपविरहित विशुद्ध अशी मूळची मनुस्मृती आम्ही पायदळी तुडविली आणि भोंगळ सद्गुण विकृतेच्यापायी जगावर राज्य करायचे सोडून आम्ही कुणावरच कधी आक्रमण केले नाही असा डांगोरा पीटत राहिलो. शुद्धीकरणाचे उपाय कधी अवलंबिले नाहीत. आजही आम्ही ते करण्यास उत्सुक नाही. काही अपवाद वगळता.

आमचे शंकराचार्य तर निवांत आहेत !

हे सर्व कार्य खरे तर त्यांचे ! पण भगवद्गीतेची परीक्षा घेऊन २१ सहस्त्रांचे पारितोषिक देण्यापलीकडे किंवा वेदपाठशाळा चालविण्यापलीकडे ह्यांची मती जात नाही ही शोकांतिका ! कुठे तो ऋग्वेद आणि कुठे आम्ही ???

ज्यांना अद्यापही भ्रमात राहायचे आहे त्यांनी खुशाल राहावे ! शेवटी

नोलुकोप्यवलोकते दिवा किं सूर्यस्य दूषणम् !

संदर्भ ग्रंथांची सूची

१.     An Account of the Inquisition at Goa (1819)
२.     सत्यार्थ प्रकाश आणि ऋग्वेदादिभाष्यभूमिका – महर्षी दयानंद सरस्वती
३.     महर्षी दयानंद के पत्र और विज्ञापन
४.     Life and Letters of Right Frederic Max-muller -  Two Volumes
५.     The myth of Sainth Thomas and Mylapoore Temple – Sita Ram Geol – Voice of India
६.     The History of India as told by its Own Historians -  Eight Volumes – Elliot and Dawson (1867-1887)
७.     Letters on the State of Christianity in India by Abbe Dubois -  London, 1823
८.     Description of the People of India – Abbe Dobuis
९. Sanskrit English Dictionary - Monier Williams - Preface 
१०. Catholic Ashrams - Sannyasins Or Swindlers - Voice Of India

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#सर्वधर्मसमभाव_नाताळ_धर्मांतर_सद्गुणविकृती_ख्रिस्तमयआशिया_शुद्धीकरण_Christianity_Churchanity

Monday 16 December 2019

#माफीवीर_गांधींची_ब्रिटीशनिष्ठा_लेखांक_द्वितीय



गांधींची ब्रिटीशनिष्ठेची शपथ....

गांधीचं समग्र वाङ्मय भारत सरकारने इंग्रजीभाषेत १०० खंडांमध्ये प्रकाशित केलंय ज्याचा आरंभ सप्टेंबर १९५६ मध्ये झाला नि २ ओक्टोबर, १९९४ ला ते प्रकाशन पूर्ण झालं. हे सर्व शंभर खंड मूळ इंग्रजीत, हिंदीत नि मराठीतही प्रकाशित आहेत. अन्य भाषांतही आहेत. www.gandhiheritageportal.org ह्या संकेतस्थळांवर समग्र उपलब्ध आहेत. असो...

तर आता गांधींची ब्रिटीशनिष्ठा पाहुयांत. गांधीजी इंग्लंडमध्ये असताना ब्रिटीशांविषयी आपली निष्ठा दाखवण्याचा एकही प्रयत्न सोडत नव्हते. अशी ढीगभर उदाहरणे आहेत पण काही पाहुयांत...

१६ जुन, १९०६ रोजी गांधींनी ब्रिटीशनिष्ठेची घेतलेली शपथ वाचुयांत 

गांधींची स्वाक्षरी आहे खाली. गांधी शपथ अशी घेतात...

"हम नीचे हस्ताक्षर करनेवालें, गम्भीरता और ईमानदारीके साथ घोषणा करते है कि हम महामहिम सम्राट एडवर्ड सप्तम, उनकें उत्तराधिकारियों और वारिसोंके प्रति वफादार रहेंगे और सच्ची निष्ठा रखेंगे। तथा नेटाल उपनिवेशके सक्रिय नागरिक सेनाकीं अतिरिक्त सूचीमें डोलीवाहककीं हैसियतसे वफादारीकें साथ तबतक सेवा करेंगे जबतक हम कानूनन उसकी सदस्यतासें पृथक् न हो जायें। हमारीं सेवाकी शर्ते ये होंगी कि हममेसें प्रत्येक व्यक्तिकों भोजन, वर्दी, सामग्री तथा १ शिलिंग ६ पेंस प्रतिदिन मिलेगा।"

स्वाक्षरी 
मो. क गांधी, यु एम शेलत, एच आई जोशी, एस बी मेढ, खान मुहम्मद....वगैरे वगैरे



गांधींचे शब्द पहा कसे निष्ठादर्शक आहेत. अहाहाहाहाहा!

ह्यावर आता गांधींना माफीवीर ब्रिटीशनिष्ठ कुणी म्हणणार आहे का???

संदर्भ - सम्पूर्ण गांधी हिन्दी वाङ्मय - खण्ड पंचम - पृष्ठाङ्क ३६६ - भारत सरकार 

ह्याचा धागा (लिंक)

https://www.gandhiheritageportal.org/cwmg_volume_thumbview/NQ==#page/400/mode/2up

ही शपथ मूळ इंग्रजीत आहे ती अशी

247. PLEDGE OF ALLEGIANCE

We, the undersigned, solemnly and sincerely declare that we will be faithful and bear true allegiance to His Majesty King Edward the Seventh, His Heirs and Successors, and that we will faithfully serve in the supernumerary list of the Active Militia Force of the Colony of Natal as Stretcher-Bearers, until we shall lawfully cease to be members thereof, and the terms of the service are that we should each receive Rations, Uniform, Equipment and 1s. 6d. per day.

M. K. GANDHI, U. M. SEHLAT, H. I. JOSHI, S.B. MEDH, KHAN MAHOMED,M AHOMED SHAIKH, DADA MIAN, POOTI
NAIKEN, APPA SAMY, KUNJEE, SHAIKH
MADAR, MAHOMED, ALWAR, MUTHUSAMY, COOPOOSAMY, AJODHYASING, KISTAMA, ALI BHAILAL, JAMALUDIN.

Indian Opinion, 16-6-1906



इंडियन ओपिनियनचा संदर्भ इथे आहे.

http://gandhimuseum.org/MGM/mgmimages/1906_June16_PageNo-395.jpg



आम्ही तीन संदर्भ जोडले आहेत. एक हिंदी समग्र वाङ्मय खंड पाच, इंग्रजी समग्र वाङ्मय खंड पाच व इंडियन ओपिनियनचा अंक...

गांधींनी ब्रिटीशनिष्ठेची शपथ कशी घेतली नि ती आयुष्यभर कशी निभावली हे तर सर्वांनाच ज्ञात आहे. पुढील लेखमालेंत हे सर्व येतंच राहील...

अलम्।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#माफीवीर_गांधी_ब्रिटीशनिष्ठा_शपथ_राजाएडवर्ड

Saturday 14 December 2019

माफीवीर गांधींची ब्रिटीशनिष्ठा - लेखांक प्रथम




ह्या शीर्षकाखाली लेखमालाच किंवा ग्रंथंच लिहिता येईल इतके संदर्भ आहेत, पण तूर्तास इतकंच.

ब्रिटीशांचा राजा किंग एडवर्डच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त गांधींची स्तुतीसुमने नि अपार निष्ठा...

शनिवार, नोव्हेंबर ११, १९०५ - इंडियन ओपिनियन

Long Live the King Edward...ह्या शीर्षकाने गांधींनी ब्रिटीशांच्या राजाविषयी व्यक्त केलेली निष्ठा पहा...संपूर्ण लेख वाचाच पण शेवटची काही वाक्ये तर वाचा...

इति कथित स्वयंघोषित महात्मा(???) गांधी...

गांधींनी वापरलेले शब्द

Earnest Prayer of British Indians, Humblest subjects, loyalty and devotion...

अहाहाहा काय निष्ठाय गांधींची ब्रिटीशांप्रती....!

निम्नलिखित गांधींच्या अधिकृत संकेतस्थळांवरंच हा लेख संदर्भांस प्राप्त होईल...

http://gandhimuseum.org/MGM/mgmimages/1905_Nov11_PageNo-761.jpg

माफीवीर गांधींचे कौतुक करणार का आता कोण ???

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#गांधीजींची_ब्रिटीशनिष्ठा_ब्रिटीशप्रेम_किंगएडवर्ड_वाढदिवस_राजनिष्ठा_माफीवीरगांधी

द्वैमित्रिः - अष्टाध्यायी - व्याकरणकार महर्षि भगवान श्रीपाणिनी...



भगवान महर्षि श्रीपाणिनींचे स्मरण झालं आज...

महर्षि पाणिनींनी त्यांच्या व्याकरणामध्ये द्विगोर्लुगनपत्ये (४।१।८८) नावाचे एक सूत्र अष्टाध्यायीमध्ये सांगितलं आहे. त्यावरील सूत्रभाष्यामध्ये इञ हा प्रत्यय लागून द्विग् वरून द्वैमित्रि असा शब्द निष्पन्न झाला आहे. त्याचा अर्थ आहे

'द्वयोः मित्रयोः अपत्यं पुमान् द्वैमित्रिः' द्विगोर्लुगनपत्ये। अपत्यार्थे विहितस्य तद्धितप्रत्ययस्य विषये अपि अस्य सूत्रस्य प्रसक्तिः न विद्यते । यथा, "द्वयोः मित्रयोः अपत्यम्" इत्यत्र अत इञ् ४|१|९५ इत्यनेन इञ्-प्रत्ययं कृत्वा "द्वैमित्रि" इति प्रातिपदिकं सिद्ध्यति ।*

संक्षेपांत सांगायचं तर ज्याचे पितृत्व दोन व्यक्तींकडे जात असेल म्हणजे दोन जवळच्या मित्रांपैकी कुणातरी एकाचं हे मूल आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती असेल, तर त्या संततीला महर्षि भगवान श्रीपाणिनींनी 'द्वैमित्रि' असा शब्द दिला आहे. अशा व्यभिचारजन्य संततीस ही संज्ञा आहे.

काही लोक असे आहेत की ज्यांच्याविषयी हा द्वैमित्रि शब्दही न्यून पडावा. आमच्यांमध्ये दुर्दैवाने भगवान श्रीपाणिनींची योग्यता कालत्रयीही संभव नसल्याने आणि आम्हांस व्याकरणांतलं वंही कळंत नसल्याने अशांसाठी आणखी एखादा शब्द शोधण्याचा मोह आवरता येत नसला तरी लेखणींस विराम. असं चिंतन शिष्टाचारांस धरून नाही हे आम्हांस ज्ञात असलं तरी काहीवेळा मर्यादा ओलांडाव्यांच लागतात.

असो. काहींना हे अगदी यथार्थपणे लागु होतं इतकंच आजच्यापूरतं...ते कोण हे सूज्ञांस सांगणे न लगें।

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#भगवानमहर्षि_श्रीपाणिनि_व्याकरण_द्वैमित्रि_पितृत्व_व्यभिचार_संतती

Sunday 8 December 2019

गेयं गीतानामसहस्त्रं...।






इयत्ता नववीत आमच्या प्रशालेचे मराठीचे शिक्षक गुरुवर्य श्रीनंदकुमार कुलकर्णी सरांनी आम्हा विद्यार्थ्यांना नवव्या अध्यायाचा पाठ अध्यापन केला. तेंव्हापासून अद्यापपावेतो नवव्या अध्यायाचे पठण हा नित्यक्रम आहेच. हा अध्याय माझा तरी अत्यंत प्रिय आहे. गीतेविषयीची जी काही भावना आहे, ती अशी आहे.

दहावी झाल्यावर प्रभुपादांचे गीताभाष्य अक्षरशः संपवलं होते. त्यातली श्रीयोगेश्वराची चित्रं इतकी भावली की त्यावरंच ध्यानधारणा आरंभ केली. नवव्या अध्याच्या पठणाने जी शांती अंतःकरणांस लाभत आलेली आहे, तिचं शब्दांत वर्णन करणं केवळ असंभव आहे.

मधील काळांत आर्ष वेदभाष्यामुळे नि आर्ष अशा वैदिक साहित्याच्या अध्ययनाने वेदंच सर्वोच्च प्रमाण हा सिद्धांत अंतसात् रुढ झाल्याने यद्यपि श्रीकृष्णांस ईश्वर मानण्यांस अंतःकरण संदेही आहे, तथापि गीतेविषयीचा पूज्यभाव काही न्यून होण्यासारखा नाही.

वेदांकडे अक्षम्य दुर्लक्ष्य...

गीता कितीही श्रेष्ठ असली नि ती वेदांचा सार असली तरी ती वेदांइतकी पूज्य कधीच होऊ शकत नाही. दुर्दैवाने संप्रदायाभिनिवेशाने हिंदु समाजाची इतकी हानी केली आहे की गीतेलाच सर्वोच्च प्रमाण मानून हिंदुसमाजाने वेदांकडे दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य अपराध मधील काळांत केलेला आहे की ज्यामुळेच हिंदु समाजाचे पतन झालंय. आणि आणखीच दुर्भाग्याची गोष्ट तर ही की श्रीमत्स्वामी श्रीविवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे हिंदु समाजाने गीतेचा तेजस्वी असा विश्वदिग्विजयाचा जीवनसंदेश त्यागून अध्यात्माच्या नावाखाली तिची असत्य व्याख्या करून पलायनवाद स्वीकारून स्वतःची अपरिमित हानी करून घेतली आहे. तो संदर्भ सहसंलग्न आहेच.


गीतेचे अध्ययन महत्वाचं आहेच. पण वेदांपेक्षा गीतेला श्रेष्ठ मानणार्या लोकांच्या बुद्धीची जितकी कीव करावी तितकी न्यूनंच आहे. अस्तु।

गीता सर्व शास्त्रांचे सार आहे हे विधान कितीही मोहक असलं तरी गीतेंस वेदांइतकी योग्यता खचितंच नाही. अगदी भामतीकारांनीच सांगितल्याप्रमाणे

भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णापाटव आदि दोषांपासून मूक्त असलेला एकंच ग्रंथ आहे नि तो म्हणजे वेदंच. गीता ही कितीही वेदानुकूल असली तरी ती वेदांचे स्थान घेऊच शकत नाही. तसं स्थान तिला देणार्यांनी आयुष्यांत वेद कधीच उघडून न पाहिल्याने किंवा पाहूनही संप्रदायाभिनिवेशाने तसा भ्रम होणं स्वाभाविकंय. अस्तु।

गीता आम्हांसही वंदनीय आहेच पण हे सर्व लिहिण्याचा हेतु इतकाच की ती वेदांइतकी पूज्य नाहीच होऊ शकत नाही. ज्यांना ती तशी मानायची असेल त्यांनी आनंदाने मानावी.
अद्वैतवाद, द्वैतवाद, त्रैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद द्वैताद्वैतवाद हा वादाचा विषय आहे. ह्यातलं अंतिम काय हे शोधण्यासाठी वेद हा अंतिम मार्ग आहे, गीता नव्हे. जर गीतेंत एकंच मार्ग असता तर इतके संप्रदाय निर्माण झालेच नसते. ह्यात दोष गीतेचा नसून तिच्याकडे त्या दृष्टीने पाहणार्यांचा आहे असे आम्हांस वाटते. तरीही वेदांची अंतःसाक्षीच महत्वाची आहे.

गीतेंस दोष देण्याचा आमचा हेतु मूळीच नाही. जर असता तर आम्ही प्रत्यही गीतेचा पाठ केलाच नसता. पण गीतेच्या नावाने वेदांकडे दुर्लक्ष करण्याच्या घातुक मानसिकतेकडे लक्ष वेधणे हा हेतु आहे.

श्रीकृष्ण ईश्वर नाही तर मग यदा यदा हि धर्मस्यचं काय ??

हा श्लोक तो ईश्वर असल्याचे निदर्शक नसून धर्मसंस्थापनेसाठी पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा वैदिक सिद्धांतंच प्रस्थापित करणारा एक ऋषि किंवा महात्मा आहे हे सिद्ध करतो. कारण जो अजन्मा आहे, त्याला जन्म घेण्याचे कारण मूळातंच नाही. हा वदतो व्याघात ठरेल...

महाभारताच्या अध्ययनाशिवाय गीता आकळणं असंभव आहे.
श्रीमन्महाभारत ही गीतेची पार्श्वभूमी आहे. त्याच्या अध्ययनाशिवाय गीताध्ययन असंभव आहे कारण शेवटी गीतेतल्या पात्रांची ओळख ही महाभारतातंच होते.

अस्तु। गीतेचं पठण वेदांसह नित्य आवश्यक आहेच. दोन्ही ग्रंथ नित्य पठणीय आहेतंच ह्यात संदेहंच नाही.

मोक्षदा एकादशी....

मोक्ष अर्थात मूक्ती शब्दाचा रुढ अर्थ जो आहे नि वैदिक सिद्धांतानुसार जो मूल अर्थ आहे, त्याविषयी स्वतंत्रपणे विवेचन करणं आवश्यक असल्याने मुक्ति से पुनरावृत्ती इतकंच सांगून लेखणींस विराम देतो...

गीतेविषयी इतकंच काहीसं...

गीता जयंती अर्थात मोक्षदा एकादशीच्या निमित्त सर्वांस शुभेच्छा!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#श्रीमद्भगवद्गीताजयंती_मोक्षदाएकादशी_वेद_भगवानश्रीकृष्ण_महाभारत

Friday 6 December 2019

पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता। उभाभ्यां यस्य सम्भूतिः तस्य नोच्चलते मनः।



ज्येष्ठ बंधुच्या वनवासांत त्याला छायेप्रमाणे सहभाग देऊन चतुर्दश वर्षे ब्रह्मचर्य पालन करणारा *श्रीलक्ष्मण...*

स्वतःस आधी यौवराज्याभिषेक प्राप्त होऊनही पित्याच्या विवाहासाठी त्या राजसुखावर प्रहार करून आजीवन अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्याची घनघोर नि भीष्म प्रतिज्ञा करणारे *उर्ध्वरेतस गंगापुत्र देवव्रत उपाख्य श्रीभीष्माचार्य...*

स्वपत्नी एकंच अशी श्रीरुख्मिणीसह विवाहापश्चातही द्वादश वर्षे नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून पश्चातंच प्रद्युम्नांस जन्म देणारे *पूर्ण पुरुषोत्तम योगेश्वर भगवान श्रीकृष्ण...*

एका याज्ञसेनी अग्निशिखा महासती कृष्णेच्या अर्थात श्रीद्रौपदीच्या अपमानासाठी महाभारत युद्ध घडवणार्या नि शत्रुची मांडी चिणून ह्रदयाची शकलं करून ते अरिशोणित प्राशन करणारा *महाबली महापराक्रमी महाभारताचा नायक असा श्रीभीम...*

आजीवन अखंड ब्रह्मचारी नि ब्रह्मचर्याचे सर्वोत्तम आदर्श बुद्धिमतां वरिष्ठम् असे *उर्ध्वरेतस् श्रीहनुमंतराय...*

शापादपि शरादपि असे भगवान *श्रीभार्गवराम अर्थात श्रीपरशुराम...*

अखिल विश्वासाठी पसायदान मागणारे, मातृवत् आळंदीवल्लभ असलेले, वयाच्या अवघ्या बाविशीतंच संजीवन समाधी घेणारे *कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबाराय*

म्हणोनिं आम्हीं रामदास असं म्हणून आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन करून म्लेंच्छांच्या विरोधांत राष्ट्रीयत्वाचं बीज पेरणारे *राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदास...*

मा अभिः नि कृण्वन्तो विश्वमार्यम् म्हणत अवघ्या आर्यावर्तांस नि अखिल विश्वासंच वेदांकडे वळविणारे कडकडीत ब्रह्मचर्य पालन केलेलं नि समाधी अवस्था प्राप्त केलेलं सर्वोत्कृष्ट *वेदभाष्यकार ऋषि श्रेष्ठ महर्षि श्रीदयानंद*

उत्तिष्ठत् जाग्रत् हा उपनिषदांचा तेजोमयी संदेश उद्घोष करून सर्व विश्वभर वैदिक धर्माचा डिंडिम वाजविणारे *विश्वदिग्विजयी श्रीमत् स्वामी विवेकानंद...*

महर्षि दयानंदांचा सत्यार्थ प्रकाश वाचून आजीवन अखंड ब्रह्मचर्याची दीक्षा घेऊन अवघं जीवन राष्ट्रस्वातंत्र्याच्या कार्यांत अर्पण करणारं *श्रीरामप्रसाद बिस्मिल...*

विद्यमान अशी पंतप्रधान *श्री नरेंद्र मोदी नि परमादरणीय श्रीसंभाजीराव भिडे गुरुजींसारखी नैष्ठिक ब्रह्मचर्याश्रमी नि उर्ध्वरेतस* अशी व्यक्तित्वं...

किती नि कशी कशी नावं घ्यायची???

ह्या राष्ट्रांस ब्रह्मचर्याची दीक्षा देणारी अगणित नि तितकीच तेजस्वी व्यक्तिमत्वं जन्मांस आली नि स्वकर्तृत्वाने त्यांनी दिगदिगांतरांत आपली कीर्ती प्रसृत केली.

त्याच ह्या राष्ट्रांत आज दिवसाढवळ्या माताभगिनींवर अत्याचार होतात, बलात्कार होतात.

कारण...

कारण आम्ही आमचे हे आदर्श विसरलो...

हिंदुंना ह्या इतिहासाचा झालेला विसर हेच ह्या पतनाचे कारण आहे...!

यद्यपि हे अत्याचार करणारे बव्हतांश अहिंदु असले तरीही हिंदुही ह्यातंच आहेतंच काही.

*वयाची पहिली पंचविशी नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून पश्चातची पंचविशी गार्हस्थ्य ब्रह्मचर्य पालन करणार्या इतिहासकालीन भारतीयांना आपल्या ह्या आदर्शांचा झालेला विसर हेच आमच्या पतनाचे कारण नव्हे काय???*

*शारीरिक सुखोपभोग आवश्यक आहेतंच. पण त्यातही संयम नि स्वस्त्री सोडून परदारेविषयी मातृभाव हे आम्ही विसरलो...*

आणि म्हणूनंच आमचं हे पतन...

ह्यांस आळा घालायचा असेल तर उपरोक्त शीर्षक आचरावं लागेल. यद्यपि उपरोक्त वचन श्रीलक्ष्मणाच्या मुखातलं नि उत्तरकांड ह्या श्रीवाल्मीकि रामायणांतल्या प्रक्षिप्त भागांतलं असलं तरी ते चिंतनीय आहे.

*ब्रह्मचर्याचा आदर्श माता-पित्यांनी पाळला तरंच येणारी पिढी संयमी उत्पन्न होईल. पण आज ब्रह्मचर्य हा शब्द तर अक्षरशः विनोद झालाय. अस्तु।*


*या देवी सर्वभूतेषु म्हणून केवळ नवरात्रातंच आवर्तने करायची की आजीवन ते व्रत पालन करायचं???*

चाणक्याच्या भाषेंत

*जन्ममरणके बन्धनोसें मुक्त होनेकी अपेक्षा करनेहारे भारतीय क्या इस स्वैराचार का स्वीकार करेंगे??? कदापि नहीं।*

कृपया विचार व्हावा ही नम्रतेची विनंती...!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#ब्रह्मचर्य_इंद्रियसंयम_बलात्कार_स्त्रीसुरक्षा_भारतीय_जीवनादर्श