Monday 30 December 2019

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे पुण्यस्मरण



महाभारतात आदिपर्वाच्या प्रथमच अध्यायांत एक वचन आहे.

*इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् |*
*बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रतरिष्यति ||२०४||*

(भांडारकर प्रत)

ह्यावचनांत किंचितसा भेद करून नि महाभारतकारांची क्षमायाचना करून

*मईसाधनाभ्यां मराठेतिहासं समुपबृहंयेत ।*
*बिभेत्यल्पश्रुतादेतिहासो मामयं प्रतरिष्यति ।*
(मुक्त छंदांत केलेली रचना)

अर्थ - *मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाचे उपबृंहण करायचे असेल तर इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे कृत मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्यांनीच करायला हवं. नाही केल्यांस तो इतिहासपुरुष हे अल्पश्रुत लोक माझा विपर्यास करतील म्हणून घाबरतो.*

इतिहासाचार्य राजवाड्यांविषयी काही लिहिण्यांस सांप्रत तरी असमर्थ आहे म्हणून इतकंच. आजीवन अखंड केवळ इतिहासाचाच ध्यांस घेऊन त्याविषयीच जीवनसर्वस्व अर्पण केल्याचे उदाहरण इतिहासांत तरी अन्यत्र क्वचितच आढळेल.

*कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ।*

*ह्या भवभूतीच्या उक्तीप्रमाणेच ज्यांचे सख्य जीवनभर उन्हाळ्यांतील कडक उन, हिवाळ्यांतील कडाक्याची थंडी नि ग्रीष्मांतल्या सततच्या संततधारा ह्यांच्याशीच होते अशा पुरुषश्रेष्ठाचे आज पुण्यस्मरण.*

*ज्याप्रमाणे थोरल्या महाराजांनी नि त्यांच्या जीवलगांनी अवघी तीन तपे हलकल्लोळ करून महाराष्ट्रधर्माचे राज्य चोहीकडे करून पूर्वजांस अभिमानित केलं, तद्वतच आयुष्यांतली तीन तपेहून अधिक कालावधी इतिहासाचे हे उपबृंहण करण्यांस ह्या विश्वनाथाने प्रदीप्त प्रतिभा, अवर्णनीय नि:स्पृहता, अत्युदात्त निरपेक्षता नि अतुलनीय कष्टशीलता ह्या अंगभूत गुणांनी ह्या इतिहासपुरुषाची सेवा करून पूर्वजांस उपकृत केलं.*

*राजवाड्यांची बलदंड देहयष्टी*

शक्तीने पावती सुखे ।
शक्ती नसता विटंबना ।
समर्थ

यौवनावस्थेतच उत्तम व्यायाम करून बलदंड शरीर निर्माण करणारे राजवाडे आहाराच्या बाबतीत जसे वृकोदर भीमासमान आहारप्रेमी होते तद्वतच ह्याच इतिहाससंशोधनासारख्या दुर्घट नि वरपांगी नीरस वाटणाऱ्या कार्यांतही स्वत:च्या पोटावर बिबे ओढणारेही होते. ते सांगतात

*नेमाने पहाटे पाच वाजता मी उठत असेन व तालमीत जाऊन दोन तास उत्तम मेहनत करीत असे. बैठका,जोर, जोडी, मल्लखांब व कुस्ती अशी सुमारे दीड-दोन हजार मेहनत रोज होई, तो सात वाजत. नंतर शेर-दीड शेर दूध पिऊन अर्धा तास कॉलेजाभोवताली मैदानात व झाडाखाली सहल व विश्रांती होई. आठपासून नऊपर्यंतचा वेळ वर्तमानपत्र वाचण्यात जाई. पुढे एक तास नदीवर पोहणे होत असे. परत येऊन भोजन आटोपून खोलीकडे यावे, तो नेमके साडेअकरा वाजत.*

*चहासारख्या अग्निमांद्य वाढविणाऱ्या पदार्थाचा तिरस्कार* करणारे राजवाडे लिहितात

*अलीकडील लोकांच्या खिशात चहा घेण्यांस दोन आणे खुळखुळतात; परंतु तेवढ्याच पैशात अर्धा मूठ बदामगर, दोन चार खडीसाखरेचे खडे, १०।१२ काळी द्राक्षे असा माधवरावी मेवा घेता येईल. (माधवरावी म्हणजे न्यायमुर्ती माधव गोविंद रानडेे यांच्या खिशांत बदाम पिस्ते वगैरेच असायचे). मी हा मेवा घेतो म्हणूनच माझे दंड पीळदार व डोळे पाणीदार आहेत.*

*मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान*

वय वर्षे बारा ते सव्वीस (२६) पर्यंत राजवाडे केवळ इंग्रजीतच बोलत, लिहित नि वागत. पण पुढे ह्याचाच पश्चात्ताप त्यांना झाला नि ते पुढे मातृभाषेचे कट्टर अभिमानी बनले. एकेकाळी इंग्रजीच्या वेडाने झपाटलेले हेच राजवाडे पुढे मातृभाषेचे इतके अभिमानी बनले की पुढे त्यांनी मातृभाषेतच लिहायची शपथ घेतली. *माझ्या साहित्याचे आकलन करण्यांस लोकांना वीस वर्षे लागतील असे राजवाडे एकदा म्हणाले होते.* दुर्दैव हे की आजही इतकी दशके होऊनही त्यांचे साहित्य आम्हांस अभ्यासु वाटत नाही.

पत्रव्यवहार तर त्यांनी मोडी, मराठी किंवा संस्कृतमधूनच केला.

*स्वभाषा, स्वभूमी नि स्वजन ह्यांना वाहिलेले नि:स्पृह जीवन*

साने गुरुजी राजवाड्यांच्या ह्या मातृभाषाप्रेमाविषयी लिहितात की

*ज्ञानेश्वरांसारख्या वागीश्वरांनी आपल्या अमृतासमान ओव्या कोळशाने खांबावर लिहिल्या; दासोपंतांनी निंबाचा पाला खाऊन लक्षावधी ग्रंथ लिहून ठेवला; या प्राचीन वाग्वीरांप्रमाणेच नि:स्वार्थ होऊन ज्यावेळी आम्ही लिहावयांस लागूं, त्यावेळेस मराठी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही.*

इंग्रजी पोषाखाचा धिक्कार करणारे राजवाडे एकदा म्हणाले होते की

*पंचा घालून प्रयोगशाळेत प्रयोगाचे काम केले तर ऑक्सिजन निर्माण होणार नाही काय ?*

*कामिनी कांचनाचा त्यागच हे महत्कार्य घडवु शकतो*

राजवाड्यांच्या जीवनचरित्राचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यभर ह्या दोन गोष्टींपासूनची त्यांची परावृत्तता. व्यसनांपासूनची त्यांची परावृत्तताही. कधीकधी विड्या ओढायचे पण त्यांनी स्वत:च सांगितल्याप्रमाणे कैक महिने ते त्यापासून राहु शकत असत. ह्यावरूनच व्यसनाधीतना नव्हती हे लक्ष्यी येते.

*बहुविषयांचा धांडोळा*

*इतिहास, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राजनीति शास्त्र, तर्कशास्त्र, तर्कज्ञान व मानसशास्त्र* ह्याविषयांचे राजवाड्यांनी ह्या यौवनावस्थेत महाविद्यालयीन जीवनांत नि पुढे अध्ययन केलं.

*मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्याची प्रस्तावना*

असे क्वचितच ग्रंथ किंवा ग्रंथमाला असतात की ज्यांची *प्रस्तावना मुखोद्गत* करावीशी अशी असते. त्यात *सावरकरांच्या जोसेफ मैझिनीसारखीच किंवा वै. सोनोमामा दांडेकरांच्या श्रीज्ञानेश्वरीची किंवा वै. शंकरमहालाज खंदारकरांची श्रीगाथाभाष्याची किंवा स्वामी वरदानंद भारतींची सार्थमनुस्मृतीभाष्याची. त्यापेक्षाही दिव्य नि तितक्याच ज्वलज्जहाल शब्दांची पर्जन्यवृष्टी करणारी राजवाड्यांची 'मराठ्यांच्या इतिहासांची साधने' ह्या बावीस खंडात्मक ग्रंथमालेची प्रस्तावना* ही प्रत्येकांने वाचावयांसच हवीच. ही प्रस्तावनाच खरंतर एका स्वतंत्र लेखमालेचा विषय व्हावा अशी आहे. अर्थात इतिहासाचार्यांच्या इतिहाससंशोधनाच्या आरंभीच्या १० वर्षांच्या अथक परिश्रमाचे नि साधनेचे ते एक *स्वादुरसो मधुपेयो* ह्या अथर्ववेदवचनाप्रमाणेच असे एक फल आहे. जिज्ञासूंनी ही प्रस्तावना वाचावींच अशीच आहे.

*१२७ पृष्ठांच्या द्वादशप्रकरणात्मक* अश्या ह्या प्रस्तावनेत इतिहासाचार्यांनी पानिपतच्या पराभवाची आजपर्यंत (त्याकाळपर्यंत) सांगितलेल्या अष्टादश अर्थात अठरा कारणांची मांडणी करून त्याचे सप्रमाण व बिनतोड खंडनही त्यात केले आहे. ही प्रस्तावना आमच्या गतेतिहासाकडे सताड अर्थात उघड्या नेत्रांनी पाहण्यांची एक प्रेरणाही आम्हांस देते.

*अवघ्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यांत इतिहास संशोधनाचे अद्वितीय नि भावी पिढींस मार्गदर्शक असे कार्य करणाऱ्या ह्या इतिहासाचार्याने जे काही विलक्षण कार्य केलंय, त्यावरूनच इतिहासाचार्य ही पदवी त्यांच्यापश्चात अद्याप कुणांसही प्राप्त झाली नाही हे लक्षणीय सत्य आहे.*

राजवाड्यांच्या एकुण ग्रंथसंपदेविषयी लिहिण्यांस सांप्रत असमर्थ आहे कारण जितकं वाचलं तितकंच लिहिलंय. भविष्यांत कैक वर्षांनी अवश्य ग्रंथपरिचय लिहीनच.

*अखेर तो महाराष्ट्रेतिहास पोरका झाला*

आजच्या दिवशीच इसवीसन १९२६ मध्ये धुळ्यांत ह्या महापुरुषाने अखेरचा श्वांस घेतला. सानेंच्या भाषेत

*आशेचा मेरु उन्मळला, कर्तव्यनिष्ठेचा सागर आटला, उत्साहाचा सूर्य अस्तंगत झाला, महाराष्ट्र सरस्वती अनाथ झाली, महाराष्ट्रेतिहास पोरका झाला.*

अशा ह्या भीष्मासमान थोर पुरुषांस आज त्यांच्या पुण्यस्मरणी विनम्र अभिवादन !

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#इतिहासाचार्य_विश्वनाथ_काशिनाथ_राजवाडे_पुण्यस्मरण_मराठ्यांच्या_इतिहासाची_साधने_महाराष्ट्रेतिहास

Tuesday 24 December 2019

Planting the Cross In Asia – संपूर्ण आशिया ख्रिस्तमय करणे !



"With the Church throughout the world, the Church in Asia will cross the threshold of the Third Christian Millennium marvelling at all that God has worked from those beginnings until now, and strong in the knowledge that "just as in the first millennium the Cross was planted on the soil of Europe, and in the second on that of the Americas and Africa, we can pray that in the Third Christian Millennium a great harvest of faith will be reaped in this vast and vital continent".

१९९९ मध्ये पोप जोन पॉल द्वितीय भारत भेटीस आला असताना त्याने उच्चारलेले हे वाक्य – “प्रथम सहस्त्रकांत आम्ही संपूर्ण युरोप ख्रिस्ती केला, द्वितीय मध्ये अमेरिका आणि आफ्रिका आणि तृतीय मध्ये आता संपूर्ण आशिया हे आमचे ध्येय !”

संदर्भ -

 http://w2.vatican.va/content/john-paul-ii/en/apost_exhortations/documents/hf_jp-ii_exh_06111999_ecclesia-in-asia.html

ह्या दुव्यावर पाहू शकता! हे ख्रिस्त्यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.

ह्या पोपला भारतात आमंत्रण देणार्या दोन व्यक्ती कोण असतील हो उत्तर - सोनिया तर आहेच पण ज्यांची आज जयंती आहे असा देशाचा भूतपूर्व पंतप्रधान. अटल बिहारी वाजपेयी.

सर्वधर्मसमभावाच्या भोंगळ आत्मघातकी नि षंढ मानसिकतेच्या गप्पा ठोकणार्या आम्हा हिंदूंना वास्तवतेचे भान असणे ही दूरचीच गोष्ट ! अर्थात हे षड्यंत्र म्हणजे ख्रिस्त्यांनी हिंदुस्थानात पाउल टाकण्यापासून हे सर्व उद्योग उघड उघड आहेत. कसे ते पाहुयंत !

An Account of the Inquisition at Goa हा १८१९ मधला ग्रंथ ज्यामध्ये ख्रिस्त्यांनी त्यांच्या पाशवी पंथाच्या प्रचारासाठी केलेले हिंदूंचे अनन्वित अत्याचार, सरसकट कत्तली, माता भगिनींचे बलात्कार, बलात्काराने केलेली सर्व धर्मांतरे ह्याचा इतिहास जिज्ञासू वाचू शकतात. अनंत काका प्रियोळकर ह्या लेखकानेही ह्याच गोवा ईन्क्विजिशनवर स्वतंत्र अभ्यसनीय ग्रंथ लिहिलाय.

अगदी शिवकालातही धर्मांतरे सुरु होतीच म्हणूनच की काय पुण्यश्लोक श्रीशिवप्रभूंनी चार ख्रिस्ती पाद्र्यांची धर्मांतर करू नका म्हणून ऐकले नाही म्हणून उडविलेली मुंडकी हा इतिहास आम्ही मराठे तरी विसरलेलो नाही आहोत. अर्थात आज महाराजांना सेक्युलर दाखवायचे धंदे सुरूच आहेत म्हणा. असो तो वेगळा विषय !

आता ब्रिटीशांचा इतिहास पाहुयांत

केवळ साम्राज्य विस्तार हाच ब्रिटीशांचा राज्याचा हेतू नसून मूळ ध्येय ख्रिस्ताचेच अनुसरण हेच होते. ह्या सर्व कार्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या योजना !

भारतीय इतिहासाचे विकृतीकरण

The most effective way to destroy people is to deny and obliterate their own understanding of their history.

Goerge Owell

*Cambridge History Of India ह्या सहा खंडाच्या ग्रंथातून केलेले भारतीय इतिहासाचे विकृतीकरण !*

*आर्य आक्रमण सिद्धांत ह्याचेच अपत्य !*

*मेक्सम्युलर, मोनियर विल्यम्स, जेम्स मिल, विल्यम जोन्स, मोरटाईम व्हीलर* आदि लोकांनी मांडलेला हा थोतांड सिद्धांत आजही दुर्दैवाने पाठ्यपुस्तकातून शिकविला जातो ह्यापेक्षा दुर्दैव काय?

भारतीय इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशी केलेली बालिश विभागणी व त्यांची आमच्याच इतिहासकारांनी ओढलोली री !

हिंदूंची त्यांच्याच स्व-धर्माविषयीची श्रध्दा आणि निष्ठा नष्ट करणे

*The Chief obstacle to spread the chiristianity in India is that these people are proud of their traditions and religion.*

Monier Williams – 2nd May, 1887 – Missionary Congress Oxford Lecture.

हे वाक्य फार सुचक आहे म्हणूनच ह्या कामासाठी मेक्सम्युलर नावाच्या मनुष्याची योजना. त्याने मरेपर्यंत संस्कृत न येताही व भारतात कधीच न येता तरीही केलेला वेदांचा ३० वर्षांचा अभ्यास आणि केलेली विकृत भाषांतरे ५० खंडात प्रकाशित ! जिज्ञासूंनी आमचा टिळकांवरील लेख वाचावा. उघडपणे हा मनुष्य आपण ख्रिस्त प्रचासाराठी हे काम करतो आहोत असे म्हणत असून देखील आमच्या विद्वान लोकांना अद्याप त्याचे सत्यस्वरूप कळत नाही ह्यापेक्षा दुर्दैव ते काय ? रामकृष्ण मठ आणि भाजपही अद्याप त्याची जयंती साजरी करते ! आणखी काय दुर्दैव ? नंतर तो खूप भारतभक्त झाला ही गोष्ट वेगळी पण आधीचे काय ???

अपवाद केवळ महर्षी दयानंदांचा ज्यांनी ह्याला पुरता नागवा केला होता जिवंतपणीच !त्यांची जितकी स्तुती करता येईल तेवढी थोडीच ! त्यावर कधीतरी सविस्तर लिहूच !

*इथल्या शिक्षण पद्धतीचा विध्वंस*

गांधीजींनी ज्यांस "रमणीय वृक्ष" म्हणून गौरविले, ती आमची मुळची भारतीय गुरुकुल शिक्षण पध्दती जी अठराव्या शतकांत सर्वव्यापक आणि सर्व सर्वसमावेशक अशी होती, ती नष्ट करून त्यांची मेकौले प्रणीत शिक्षा पद्धती लागू करणे आणि दुर्दैवाने स्वतंत्रता प्राप्तीपश्चात ७० वर्षे झाली तरीही आम्ही तीच सुरु ठेवणे !

*फोडा आणि राज्य करा*

आर्याक्रमण सिद्धांतातून निर्माण केलेली विषवल्ली आज इतकी विस्तारली आहे की मूलनिवासी मंचाच्या नावाखाली ब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्य हे तीन्ही विदेशी हा प्रचार सुरुय ! ब्रिटिशांना आणखी काय हवे होते ???

*ब्राह्मणी अत्याचाराची भंपक नि तथ्यहीन कल्पना आणि ख्रिस्त्यांचे ब्राह्मणद्वेषाचे बीज*

बव्हतांश ख्रिस्ती मिशनर्यांचे ग्रंथ वाचले की एक गोष्ट लक्षात येते ती हीच की इथले ब्राह्मण संपविल्याशिवाय ख्रिस्तविजय संभव नाही. *Abbe Dubois हा मिशनरी त्याच्या ग्रंथांमध्ये ब्राह्मणांविषयी जी गरळ ओकतो ती पाहिली की गेली दोनशे वर्षे ब्राह्मण द्वेष जो सुरु आहे त्याचे मुळ लक्षात येते.* तो म्हणतो

*And there is no stronghold of evil so impregnable as the Brahmins. 1820.*

आता *Reverend Norman Macloid* हा त्याचाच सहकारीही हेच लिहितो की 

*“The Brahmin is therefore well worth looking at! We have more to do with him than with the Czar of all the Russians. The battle we have to fight with him is not against guns or rifles, not against flesh and blood.”*

बरं हीच गोष्ट मैक्सम्युलर, मोनियर विल्यम्सही ठामपणे मांडतो की इथला पुरोहित वर्ग नष्ट केल्याशिवाय आपला ख्रिस्तविजय संभव नाही.

*मुस्लिमांनी आणि ख्रिस्त्यांनी केलेल्या अत्याचाराचे बिल ब्राह्मणांवर फाडून हे सर्व मोकळे झाले आहेत.*

*एकीकडे भट भिक्षुक म्हणायचे आणि दुसरीकडे हा ३-४ प्रतिशत समाज शेष ९५ लोकांवर अत्याचार करतो ही हास्यास्पद कल्पना आमच्या लक्षात येत नाही ह्यापेक्षा शोकांतिका कोणती ? आणि ह्यासाठी पुढे जोती फुलेंसारखी माणसे पेरणे. पुढे नेहरूप्रणीत मार्क्सवादी साम्यवादी इतिहासकारांकडून हेतपुरस्सर केले  गेलेले इतिहासाचे विकृतीकरण ब्रिटीश गेल्यावरही सुरु राहतेच.*

बौद्धांवर मुस्लिमांनी केलेले अत्याचार लपवून ते ब्राह्मणांनी केले असा धादांत खोटा प्रचार केला जातो. वस्तुत: सर्व मुस्लीम भाष्यकार प्रामाणिकपणे उच्चरवाने उद्घोषित करतात की आम्ही कसा हिंदू आणि बौद्ध मंदिरांचा किंवा स्तुपांचा विध्वंस केला आणि इथल्या हिंदू आणि बौद्धांची कत्तल केली. पण इथले नेहरूप्रणीत मार्क्सवादी इतिहासकार मात्र ह्याला ब्राह्मणी अत्याचाराची संज्ञा देऊन बुद्धिभेद करतात आणि आमचे लोकही नंदी बैलासारखे मुंड्या हलवितात. *ज्यांना संदर्भ पहायचे असतील त्यांनी Elliot and Dawson ह्यांनी १८६७ ते १८८७ ह्या काळात लंडन येथून संपादित केलेले आठ खंड जे “History of India – as told by its own Historians” नावाने प्रकाशित आहेत. द्वितीय खंडापासून सर्व मुस्लीम अशा अरबी, फारसी इतिहासकारांच्या तत्कालीन ग्रंथांची भाषांतरे आहेत. आंतरजालांवर सर्व काही उपलब्ध आहे. मूस्लिम इतिहासकार स्वत: अत्याचाराची टिमकी मिरविताना आम्हाला मात्र त्यात सहस्त्रोवर्षांचा तथाकथित ब्राह्मणी अत्याचार दिसतो. ह्यापेक्षा वाईट काय???*

दुर्दैवाने अगदी मंडल आयोगापर्यंत हा द्वेष तसाच खदखदत राहतो. त्याच्या पुढेही आजही तेच सुरुय भीमा कोरेगाव च्या माध्यमातून ! कारण वर स्पष्ट आहे.

*हिंदू धर्म हा ब्राह्मणी धर्म आहे असे सतत विष पेरणे*

उपरोक्त सर्व ख्रिस्ती लेखकांच्या ग्रंथात नेहमी हीच रटाळ पोपटपंची वाचायला मिळते त्यामुळे ब्राह्मणेतरांनी आमचा ख्रिस्ती पंथ स्वीकारावा हीच त्यांची भूमिका दिसून येते. बौद्ध विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष अकारण इतिहासांत पेटविणे हे कार्य जितकं ब्रिटीशांनी केलं, तितकंच नेहरुप्रणीत मार्क्सवादी साम्यवादी इतिहासकारांनीही केलं.

*पण काही बोलायचे नाही, कारण भावना दुखावतात !*

ख्रिस्ती मिशनर्यांनी संन्याशाचे रूप घेऊन आश्रम स्थापिणे आणि धर्मांतरे करणे

उपरोक्त एबे दुबोईस हा त्याच्या ग्रंथात स्पष्ट लिहितो की आम्ही कसे ब्राह्मणाचे किंवा संन्याशाचे वेष धारण करून ख्रिस्ती मिशनरी भारतात कार्यरत ठेवले आणि हिंदूंना बाटविले. हे कार्य आता आणखी कसे सहज आणि कुणालाही न कळता करता येईल ह्याविषयी तो सविस्तर लिहितो. दुर्दैवाने हे आजही सुरु आहे ! ईशावास्य उपनिषद ह्याचे येशू ख्रिस्ताशी संबंध जोडून ख्रिस्ती प्रचार करताहेत. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी *सीता राम गोएल ह्या नामवंत इतिहासकाराचा “Catholic Ashrams – Sannyasins Or Swindlers” हा २६३* पृष्ठांचा ग्रंथ वाचावा.

सर, रावबहाद्दूर सारखे तुकडे फेकून इथल्या विद्वानांना कायमचे अंकित करणे हाही मार्ग ! आणखीही अनेक मार्गांनी ख्रिस्त्यांनी पंथप्रचारासाठी केलेल्या युक्त्या प्रयुक्त्या आपणांस अभ्यासता येतील.विस्तारभयास्तव जास्ती लिहित नाही.

काहींना असे वाटेल की उपरोक्त लेखांत ब्राह्मणांचीच टिमकी वाजविण्याचा आमचा हेतु आहे. तर असे मूळीच नाही. जे आहे ते ससंदर्भ आम्ही मांडलंय.

आता ह्या सर्वांत दोष आम्हा हिंदुंचाही भरपूर आहेच आहे तो कसा ते पाहुयांत.

सद्गुणविकृती हा एक मोठा दोष !

स्वधर्माचे पुरेसे काय थोडंही ज्ञान नसणे हा दोष !

वेदांचा प्रचार, त्याचा तेजस्वी जीवनवाद, त्याची विजीगीषु वृत्ती हिचा त्याग !

सर्वधर्मसमान आहेत हाही एक महत्वाचा दोष !

सर्व मार्ग व उपासनापद्धती एकाच ईश्वराप्रती जातात ही भोंगळ शिकवण !

वस्तुत:

ओम इन्द्रं वर्धन्तो अप्तुरः कृण्वन्तो विश्वमार्यम् ! अपघ्नन्तो अराव्णः !
ऋग्वेद – ९.६३.५

किंवा

एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः !
स्वंस्वं चरित्रन शिक्षेरन पृथिव्यां सर्वमानवाः !

मनुस्मृति

सर्व विश्वाला आर्य अर्थात सुसंस्कृत करण्याची आज्ञा देणारा आमचा ऋग्वेद आणि आमची प्रक्षेपविरहित विशुद्ध अशी मूळची मनुस्मृती आम्ही पायदळी तुडविली आणि भोंगळ सद्गुण विकृतेच्यापायी जगावर राज्य करायचे सोडून आम्ही कुणावरच कधी आक्रमण केले नाही असा डांगोरा पीटत राहिलो. शुद्धीकरणाचे उपाय कधी अवलंबिले नाहीत. आजही आम्ही ते करण्यास उत्सुक नाही. काही अपवाद वगळता.

आमचे शंकराचार्य तर निवांत आहेत !

हे सर्व कार्य खरे तर त्यांचे ! पण भगवद्गीतेची परीक्षा घेऊन २१ सहस्त्रांचे पारितोषिक देण्यापलीकडे किंवा वेदपाठशाळा चालविण्यापलीकडे ह्यांची मती जात नाही ही शोकांतिका ! कुठे तो ऋग्वेद आणि कुठे आम्ही ???

ज्यांना अद्यापही भ्रमात राहायचे आहे त्यांनी खुशाल राहावे ! शेवटी

नोलुकोप्यवलोकते दिवा किं सूर्यस्य दूषणम् !

संदर्भ ग्रंथांची सूची

१.     An Account of the Inquisition at Goa (1819)
२.     सत्यार्थ प्रकाश आणि ऋग्वेदादिभाष्यभूमिका – महर्षी दयानंद सरस्वती
३.     महर्षी दयानंद के पत्र और विज्ञापन
४.     Life and Letters of Right Frederic Max-muller -  Two Volumes
५.     The myth of Sainth Thomas and Mylapoore Temple – Sita Ram Geol – Voice of India
६.     The History of India as told by its Own Historians -  Eight Volumes – Elliot and Dawson (1867-1887)
७.     Letters on the State of Christianity in India by Abbe Dubois -  London, 1823
८.     Description of the People of India – Abbe Dobuis
९. Sanskrit English Dictionary - Monier Williams - Preface 
१०. Catholic Ashrams - Sannyasins Or Swindlers - Voice Of India

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#सर्वधर्मसमभाव_नाताळ_धर्मांतर_सद्गुणविकृती_ख्रिस्तमयआशिया_शुद्धीकरण_Christianity_Churchanity

Monday 16 December 2019

#माफीवीर_गांधींची_ब्रिटीशनिष्ठा_लेखांक_द्वितीय



गांधींची ब्रिटीशनिष्ठेची शपथ....

गांधीचं समग्र वाङ्मय भारत सरकारने इंग्रजीभाषेत १०० खंडांमध्ये प्रकाशित केलंय ज्याचा आरंभ सप्टेंबर १९५६ मध्ये झाला नि २ ओक्टोबर, १९९४ ला ते प्रकाशन पूर्ण झालं. हे सर्व शंभर खंड मूळ इंग्रजीत, हिंदीत नि मराठीतही प्रकाशित आहेत. अन्य भाषांतही आहेत. www.gandhiheritageportal.org ह्या संकेतस्थळांवर समग्र उपलब्ध आहेत. असो...

तर आता गांधींची ब्रिटीशनिष्ठा पाहुयांत. गांधीजी इंग्लंडमध्ये असताना ब्रिटीशांविषयी आपली निष्ठा दाखवण्याचा एकही प्रयत्न सोडत नव्हते. अशी ढीगभर उदाहरणे आहेत पण काही पाहुयांत...

१६ जुन, १९०६ रोजी गांधींनी ब्रिटीशनिष्ठेची घेतलेली शपथ वाचुयांत 

गांधींची स्वाक्षरी आहे खाली. गांधी शपथ अशी घेतात...

"हम नीचे हस्ताक्षर करनेवालें, गम्भीरता और ईमानदारीके साथ घोषणा करते है कि हम महामहिम सम्राट एडवर्ड सप्तम, उनकें उत्तराधिकारियों और वारिसोंके प्रति वफादार रहेंगे और सच्ची निष्ठा रखेंगे। तथा नेटाल उपनिवेशके सक्रिय नागरिक सेनाकीं अतिरिक्त सूचीमें डोलीवाहककीं हैसियतसे वफादारीकें साथ तबतक सेवा करेंगे जबतक हम कानूनन उसकी सदस्यतासें पृथक् न हो जायें। हमारीं सेवाकी शर्ते ये होंगी कि हममेसें प्रत्येक व्यक्तिकों भोजन, वर्दी, सामग्री तथा १ शिलिंग ६ पेंस प्रतिदिन मिलेगा।"

स्वाक्षरी 
मो. क गांधी, यु एम शेलत, एच आई जोशी, एस बी मेढ, खान मुहम्मद....वगैरे वगैरे



गांधींचे शब्द पहा कसे निष्ठादर्शक आहेत. अहाहाहाहाहा!

ह्यावर आता गांधींना माफीवीर ब्रिटीशनिष्ठ कुणी म्हणणार आहे का???

संदर्भ - सम्पूर्ण गांधी हिन्दी वाङ्मय - खण्ड पंचम - पृष्ठाङ्क ३६६ - भारत सरकार 

ह्याचा धागा (लिंक)

https://www.gandhiheritageportal.org/cwmg_volume_thumbview/NQ==#page/400/mode/2up

ही शपथ मूळ इंग्रजीत आहे ती अशी

247. PLEDGE OF ALLEGIANCE

We, the undersigned, solemnly and sincerely declare that we will be faithful and bear true allegiance to His Majesty King Edward the Seventh, His Heirs and Successors, and that we will faithfully serve in the supernumerary list of the Active Militia Force of the Colony of Natal as Stretcher-Bearers, until we shall lawfully cease to be members thereof, and the terms of the service are that we should each receive Rations, Uniform, Equipment and 1s. 6d. per day.

M. K. GANDHI, U. M. SEHLAT, H. I. JOSHI, S.B. MEDH, KHAN MAHOMED,M AHOMED SHAIKH, DADA MIAN, POOTI
NAIKEN, APPA SAMY, KUNJEE, SHAIKH
MADAR, MAHOMED, ALWAR, MUTHUSAMY, COOPOOSAMY, AJODHYASING, KISTAMA, ALI BHAILAL, JAMALUDIN.

Indian Opinion, 16-6-1906



इंडियन ओपिनियनचा संदर्भ इथे आहे.

http://gandhimuseum.org/MGM/mgmimages/1906_June16_PageNo-395.jpg



आम्ही तीन संदर्भ जोडले आहेत. एक हिंदी समग्र वाङ्मय खंड पाच, इंग्रजी समग्र वाङ्मय खंड पाच व इंडियन ओपिनियनचा अंक...

गांधींनी ब्रिटीशनिष्ठेची शपथ कशी घेतली नि ती आयुष्यभर कशी निभावली हे तर सर्वांनाच ज्ञात आहे. पुढील लेखमालेंत हे सर्व येतंच राहील...

अलम्।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#माफीवीर_गांधी_ब्रिटीशनिष्ठा_शपथ_राजाएडवर्ड

Saturday 14 December 2019

माफीवीर गांधींची ब्रिटीशनिष्ठा - लेखांक प्रथम




ह्या शीर्षकाखाली लेखमालाच किंवा ग्रंथंच लिहिता येईल इतके संदर्भ आहेत, पण तूर्तास इतकंच.

ब्रिटीशांचा राजा किंग एडवर्डच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त गांधींची स्तुतीसुमने नि अपार निष्ठा...

शनिवार, नोव्हेंबर ११, १९०५ - इंडियन ओपिनियन

Long Live the King Edward...ह्या शीर्षकाने गांधींनी ब्रिटीशांच्या राजाविषयी व्यक्त केलेली निष्ठा पहा...संपूर्ण लेख वाचाच पण शेवटची काही वाक्ये तर वाचा...

इति कथित स्वयंघोषित महात्मा(???) गांधी...

गांधींनी वापरलेले शब्द

Earnest Prayer of British Indians, Humblest subjects, loyalty and devotion...

अहाहाहा काय निष्ठाय गांधींची ब्रिटीशांप्रती....!

निम्नलिखित गांधींच्या अधिकृत संकेतस्थळांवरंच हा लेख संदर्भांस प्राप्त होईल...

http://gandhimuseum.org/MGM/mgmimages/1905_Nov11_PageNo-761.jpg

माफीवीर गांधींचे कौतुक करणार का आता कोण ???

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#गांधीजींची_ब्रिटीशनिष्ठा_ब्रिटीशप्रेम_किंगएडवर्ड_वाढदिवस_राजनिष्ठा_माफीवीरगांधी

द्वैमित्रिः - अष्टाध्यायी - व्याकरणकार महर्षि भगवान श्रीपाणिनी...



भगवान महर्षि श्रीपाणिनींचे स्मरण झालं आज...

महर्षि पाणिनींनी त्यांच्या व्याकरणामध्ये द्विगोर्लुगनपत्ये (४।१।८८) नावाचे एक सूत्र अष्टाध्यायीमध्ये सांगितलं आहे. त्यावरील सूत्रभाष्यामध्ये इञ हा प्रत्यय लागून द्विग् वरून द्वैमित्रि असा शब्द निष्पन्न झाला आहे. त्याचा अर्थ आहे

'द्वयोः मित्रयोः अपत्यं पुमान् द्वैमित्रिः' द्विगोर्लुगनपत्ये। अपत्यार्थे विहितस्य तद्धितप्रत्ययस्य विषये अपि अस्य सूत्रस्य प्रसक्तिः न विद्यते । यथा, "द्वयोः मित्रयोः अपत्यम्" इत्यत्र अत इञ् ४|१|९५ इत्यनेन इञ्-प्रत्ययं कृत्वा "द्वैमित्रि" इति प्रातिपदिकं सिद्ध्यति ।*

संक्षेपांत सांगायचं तर ज्याचे पितृत्व दोन व्यक्तींकडे जात असेल म्हणजे दोन जवळच्या मित्रांपैकी कुणातरी एकाचं हे मूल आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती असेल, तर त्या संततीला महर्षि भगवान श्रीपाणिनींनी 'द्वैमित्रि' असा शब्द दिला आहे. अशा व्यभिचारजन्य संततीस ही संज्ञा आहे.

काही लोक असे आहेत की ज्यांच्याविषयी हा द्वैमित्रि शब्दही न्यून पडावा. आमच्यांमध्ये दुर्दैवाने भगवान श्रीपाणिनींची योग्यता कालत्रयीही संभव नसल्याने आणि आम्हांस व्याकरणांतलं वंही कळंत नसल्याने अशांसाठी आणखी एखादा शब्द शोधण्याचा मोह आवरता येत नसला तरी लेखणींस विराम. असं चिंतन शिष्टाचारांस धरून नाही हे आम्हांस ज्ञात असलं तरी काहीवेळा मर्यादा ओलांडाव्यांच लागतात.

असो. काहींना हे अगदी यथार्थपणे लागु होतं इतकंच आजच्यापूरतं...ते कोण हे सूज्ञांस सांगणे न लगें।

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#भगवानमहर्षि_श्रीपाणिनि_व्याकरण_द्वैमित्रि_पितृत्व_व्यभिचार_संतती

Sunday 8 December 2019

गेयं गीतानामसहस्त्रं...।






इयत्ता नववीत आमच्या प्रशालेचे मराठीचे शिक्षक गुरुवर्य श्रीनंदकुमार कुलकर्णी सरांनी आम्हा विद्यार्थ्यांना नवव्या अध्यायाचा पाठ अध्यापन केला. तेंव्हापासून अद्यापपावेतो नवव्या अध्यायाचे पठण हा नित्यक्रम आहेच. हा अध्याय माझा तरी अत्यंत प्रिय आहे. गीतेविषयीची जी काही भावना आहे, ती अशी आहे.

दहावी झाल्यावर प्रभुपादांचे गीताभाष्य अक्षरशः संपवलं होते. त्यातली श्रीयोगेश्वराची चित्रं इतकी भावली की त्यावरंच ध्यानधारणा आरंभ केली. नवव्या अध्याच्या पठणाने जी शांती अंतःकरणांस लाभत आलेली आहे, तिचं शब्दांत वर्णन करणं केवळ असंभव आहे.

मधील काळांत आर्ष वेदभाष्यामुळे नि आर्ष अशा वैदिक साहित्याच्या अध्ययनाने वेदंच सर्वोच्च प्रमाण हा सिद्धांत अंतसात् रुढ झाल्याने यद्यपि श्रीकृष्णांस ईश्वर मानण्यांस अंतःकरण संदेही आहे, तथापि गीतेविषयीचा पूज्यभाव काही न्यून होण्यासारखा नाही.

वेदांकडे अक्षम्य दुर्लक्ष्य...

गीता कितीही श्रेष्ठ असली नि ती वेदांचा सार असली तरी ती वेदांइतकी पूज्य कधीच होऊ शकत नाही. दुर्दैवाने संप्रदायाभिनिवेशाने हिंदु समाजाची इतकी हानी केली आहे की गीतेलाच सर्वोच्च प्रमाण मानून हिंदुसमाजाने वेदांकडे दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य अपराध मधील काळांत केलेला आहे की ज्यामुळेच हिंदु समाजाचे पतन झालंय. आणि आणखीच दुर्भाग्याची गोष्ट तर ही की श्रीमत्स्वामी श्रीविवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे हिंदु समाजाने गीतेचा तेजस्वी असा विश्वदिग्विजयाचा जीवनसंदेश त्यागून अध्यात्माच्या नावाखाली तिची असत्य व्याख्या करून पलायनवाद स्वीकारून स्वतःची अपरिमित हानी करून घेतली आहे. तो संदर्भ सहसंलग्न आहेच.


गीतेचे अध्ययन महत्वाचं आहेच. पण वेदांपेक्षा गीतेला श्रेष्ठ मानणार्या लोकांच्या बुद्धीची जितकी कीव करावी तितकी न्यूनंच आहे. अस्तु।

गीता सर्व शास्त्रांचे सार आहे हे विधान कितीही मोहक असलं तरी गीतेंस वेदांइतकी योग्यता खचितंच नाही. अगदी भामतीकारांनीच सांगितल्याप्रमाणे

भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णापाटव आदि दोषांपासून मूक्त असलेला एकंच ग्रंथ आहे नि तो म्हणजे वेदंच. गीता ही कितीही वेदानुकूल असली तरी ती वेदांचे स्थान घेऊच शकत नाही. तसं स्थान तिला देणार्यांनी आयुष्यांत वेद कधीच उघडून न पाहिल्याने किंवा पाहूनही संप्रदायाभिनिवेशाने तसा भ्रम होणं स्वाभाविकंय. अस्तु।

गीता आम्हांसही वंदनीय आहेच पण हे सर्व लिहिण्याचा हेतु इतकाच की ती वेदांइतकी पूज्य नाहीच होऊ शकत नाही. ज्यांना ती तशी मानायची असेल त्यांनी आनंदाने मानावी.
अद्वैतवाद, द्वैतवाद, त्रैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद द्वैताद्वैतवाद हा वादाचा विषय आहे. ह्यातलं अंतिम काय हे शोधण्यासाठी वेद हा अंतिम मार्ग आहे, गीता नव्हे. जर गीतेंत एकंच मार्ग असता तर इतके संप्रदाय निर्माण झालेच नसते. ह्यात दोष गीतेचा नसून तिच्याकडे त्या दृष्टीने पाहणार्यांचा आहे असे आम्हांस वाटते. तरीही वेदांची अंतःसाक्षीच महत्वाची आहे.

गीतेंस दोष देण्याचा आमचा हेतु मूळीच नाही. जर असता तर आम्ही प्रत्यही गीतेचा पाठ केलाच नसता. पण गीतेच्या नावाने वेदांकडे दुर्लक्ष करण्याच्या घातुक मानसिकतेकडे लक्ष वेधणे हा हेतु आहे.

श्रीकृष्ण ईश्वर नाही तर मग यदा यदा हि धर्मस्यचं काय ??

हा श्लोक तो ईश्वर असल्याचे निदर्शक नसून धर्मसंस्थापनेसाठी पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा वैदिक सिद्धांतंच प्रस्थापित करणारा एक ऋषि किंवा महात्मा आहे हे सिद्ध करतो. कारण जो अजन्मा आहे, त्याला जन्म घेण्याचे कारण मूळातंच नाही. हा वदतो व्याघात ठरेल...

महाभारताच्या अध्ययनाशिवाय गीता आकळणं असंभव आहे.
श्रीमन्महाभारत ही गीतेची पार्श्वभूमी आहे. त्याच्या अध्ययनाशिवाय गीताध्ययन असंभव आहे कारण शेवटी गीतेतल्या पात्रांची ओळख ही महाभारतातंच होते.

अस्तु। गीतेचं पठण वेदांसह नित्य आवश्यक आहेच. दोन्ही ग्रंथ नित्य पठणीय आहेतंच ह्यात संदेहंच नाही.

मोक्षदा एकादशी....

मोक्ष अर्थात मूक्ती शब्दाचा रुढ अर्थ जो आहे नि वैदिक सिद्धांतानुसार जो मूल अर्थ आहे, त्याविषयी स्वतंत्रपणे विवेचन करणं आवश्यक असल्याने मुक्ति से पुनरावृत्ती इतकंच सांगून लेखणींस विराम देतो...

गीतेविषयी इतकंच काहीसं...

गीता जयंती अर्थात मोक्षदा एकादशीच्या निमित्त सर्वांस शुभेच्छा!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#श्रीमद्भगवद्गीताजयंती_मोक्षदाएकादशी_वेद_भगवानश्रीकृष्ण_महाभारत

Friday 6 December 2019

पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता। उभाभ्यां यस्य सम्भूतिः तस्य नोच्चलते मनः।



ज्येष्ठ बंधुच्या वनवासांत त्याला छायेप्रमाणे सहभाग देऊन चतुर्दश वर्षे ब्रह्मचर्य पालन करणारा *श्रीलक्ष्मण...*

स्वतःस आधी यौवराज्याभिषेक प्राप्त होऊनही पित्याच्या विवाहासाठी त्या राजसुखावर प्रहार करून आजीवन अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्याची घनघोर नि भीष्म प्रतिज्ञा करणारे *उर्ध्वरेतस गंगापुत्र देवव्रत उपाख्य श्रीभीष्माचार्य...*

स्वपत्नी एकंच अशी श्रीरुख्मिणीसह विवाहापश्चातही द्वादश वर्षे नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून पश्चातंच प्रद्युम्नांस जन्म देणारे *पूर्ण पुरुषोत्तम योगेश्वर भगवान श्रीकृष्ण...*

एका याज्ञसेनी अग्निशिखा महासती कृष्णेच्या अर्थात श्रीद्रौपदीच्या अपमानासाठी महाभारत युद्ध घडवणार्या नि शत्रुची मांडी चिणून ह्रदयाची शकलं करून ते अरिशोणित प्राशन करणारा *महाबली महापराक्रमी महाभारताचा नायक असा श्रीभीम...*

आजीवन अखंड ब्रह्मचारी नि ब्रह्मचर्याचे सर्वोत्तम आदर्श बुद्धिमतां वरिष्ठम् असे *उर्ध्वरेतस् श्रीहनुमंतराय...*

शापादपि शरादपि असे भगवान *श्रीभार्गवराम अर्थात श्रीपरशुराम...*

अखिल विश्वासाठी पसायदान मागणारे, मातृवत् आळंदीवल्लभ असलेले, वयाच्या अवघ्या बाविशीतंच संजीवन समाधी घेणारे *कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबाराय*

म्हणोनिं आम्हीं रामदास असं म्हणून आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन करून म्लेंच्छांच्या विरोधांत राष्ट्रीयत्वाचं बीज पेरणारे *राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदास...*

मा अभिः नि कृण्वन्तो विश्वमार्यम् म्हणत अवघ्या आर्यावर्तांस नि अखिल विश्वासंच वेदांकडे वळविणारे कडकडीत ब्रह्मचर्य पालन केलेलं नि समाधी अवस्था प्राप्त केलेलं सर्वोत्कृष्ट *वेदभाष्यकार ऋषि श्रेष्ठ महर्षि श्रीदयानंद*

उत्तिष्ठत् जाग्रत् हा उपनिषदांचा तेजोमयी संदेश उद्घोष करून सर्व विश्वभर वैदिक धर्माचा डिंडिम वाजविणारे *विश्वदिग्विजयी श्रीमत् स्वामी विवेकानंद...*

महर्षि दयानंदांचा सत्यार्थ प्रकाश वाचून आजीवन अखंड ब्रह्मचर्याची दीक्षा घेऊन अवघं जीवन राष्ट्रस्वातंत्र्याच्या कार्यांत अर्पण करणारं *श्रीरामप्रसाद बिस्मिल...*

विद्यमान अशी पंतप्रधान *श्री नरेंद्र मोदी नि परमादरणीय श्रीसंभाजीराव भिडे गुरुजींसारखी नैष्ठिक ब्रह्मचर्याश्रमी नि उर्ध्वरेतस* अशी व्यक्तित्वं...

किती नि कशी कशी नावं घ्यायची???

ह्या राष्ट्रांस ब्रह्मचर्याची दीक्षा देणारी अगणित नि तितकीच तेजस्वी व्यक्तिमत्वं जन्मांस आली नि स्वकर्तृत्वाने त्यांनी दिगदिगांतरांत आपली कीर्ती प्रसृत केली.

त्याच ह्या राष्ट्रांत आज दिवसाढवळ्या माताभगिनींवर अत्याचार होतात, बलात्कार होतात.

कारण...

कारण आम्ही आमचे हे आदर्श विसरलो...

हिंदुंना ह्या इतिहासाचा झालेला विसर हेच ह्या पतनाचे कारण आहे...!

यद्यपि हे अत्याचार करणारे बव्हतांश अहिंदु असले तरीही हिंदुही ह्यातंच आहेतंच काही.

*वयाची पहिली पंचविशी नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून पश्चातची पंचविशी गार्हस्थ्य ब्रह्मचर्य पालन करणार्या इतिहासकालीन भारतीयांना आपल्या ह्या आदर्शांचा झालेला विसर हेच आमच्या पतनाचे कारण नव्हे काय???*

*शारीरिक सुखोपभोग आवश्यक आहेतंच. पण त्यातही संयम नि स्वस्त्री सोडून परदारेविषयी मातृभाव हे आम्ही विसरलो...*

आणि म्हणूनंच आमचं हे पतन...

ह्यांस आळा घालायचा असेल तर उपरोक्त शीर्षक आचरावं लागेल. यद्यपि उपरोक्त वचन श्रीलक्ष्मणाच्या मुखातलं नि उत्तरकांड ह्या श्रीवाल्मीकि रामायणांतल्या प्रक्षिप्त भागांतलं असलं तरी ते चिंतनीय आहे.

*ब्रह्मचर्याचा आदर्श माता-पित्यांनी पाळला तरंच येणारी पिढी संयमी उत्पन्न होईल. पण आज ब्रह्मचर्य हा शब्द तर अक्षरशः विनोद झालाय. अस्तु।*


*या देवी सर्वभूतेषु म्हणून केवळ नवरात्रातंच आवर्तने करायची की आजीवन ते व्रत पालन करायचं???*

चाणक्याच्या भाषेंत

*जन्ममरणके बन्धनोसें मुक्त होनेकी अपेक्षा करनेहारे भारतीय क्या इस स्वैराचार का स्वीकार करेंगे??? कदापि नहीं।*

कृपया विचार व्हावा ही नम्रतेची विनंती...!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#ब्रह्मचर्य_इंद्रियसंयम_बलात्कार_स्त्रीसुरक्षा_भारतीय_जीवनादर्श

Monday 25 November 2019

नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ।




काल कार्तिक वद्य त्रयोदशी ! काल कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्रीज्ञानेश्वर महाराज ह्यांचा संजीवन समाधी सोहळा ! कार्तिक मास किती श्रेष्ठ ! कारण ह्याच मासात भक्तशिरोमणी संतश्रेष्ठ श्रीनामदेवरायांचीही जयंती व तीही कार्तिक शुद्ध एकादशीला ! श्रीनामदेवरायांचे चरित्र ते स्वत:च वर्णिताना म्हणतात

*माझें जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणें। लिहिलें त्याची खुण सारु ऐका । १।*
अधिक ब्याण्णव गणित अकराशतें । उगवता आदित्य रोहिणीसीं ।२।*
*शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार । प्रभव संवत्सर शालिवाहन शके ।३।*
*प्रसवली माता मज मळमूत्री । तेंव्हा जिव्हेवरी लिहीलें देवें ।४।*
*शत कोटी अभंग करील प्रतिज्ञा। नाम मंत्र खुणा वाचुनी पाहे ।५।*
*ऐंशी वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण । नामसंकीर्तन नामया वृद्धि ।६।*

साक्षात परमात्मा श्रीपंढरीशाला घास खाऊ घालणार्या श्रीनामदेवरायांचे चरित्र म्यां पामराने कसे नि काय वर्णावे??? आमचे भाग्य केवळ एवढेच की आमचे घर श्रीनामदेवरायांच्या मंदिराला चिकटूनच!

*जन्मोजन्मीं आम्ही बहु पुण्य केलें | म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ||१||*
*जन्मोनी संसारीं जाहलों त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगीं ||२||*
*आणिका दैवता नेघे माझे चित्त | गोड गाता गीत विठोबाचें ||३||*
*भ्रमर मकरंदा मधाशी ती माशी | तैसें या देवासी मन माझे ||४||*
*भानुदास म्हणे मज पंढरीसी न्या रे | सुखें मिरवा रे विठोबासी ||५|*

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांच्या सख्यत्वांस प्राप्त झालेले श्रीनामदेवराय, श्रीमहाराजांस संजीवन समाधीस नेणारे श्रीनामदेवराय ही ओळख पुरेशी नाही का? परमेश्वराशी प्रत्यक्ष संवाद असुनही श्रीज्ञानोबारायांच्या व श्रीगोरोबाकाकांच्या परिक्षेने गुरुप्राप्तींस निघालेले श्रीनामदेवराय श्रीविसोबांस पाहतात व योग्यतेने भारावून जातात. त्या आत्मस्थित श्रीगुरुंस शरण गेल्यावर श्रीविसोबा जो उपदेश करतात, तो काय बहारीचा आहे रहा !

*जरी म्हणसी देव देखिला ।तरी हा बोल भला नव्हे नाम्या ।१।*
*जोंवरी मी माझें न तुटे । तंव आत्माराम कैसेनि भेटे ।२ ।*
*खेंचर साह्याने मी काहीं नेणें । जीवा या जींव ईतुले मी जाणे ।३।*

एक अभंग तर कळता कळेना !

*दश चत्वार कराचा नव आननाचा । त्रिविंश नयनाचा द्विपुच्छ द्वैश्रृंगाचा ह्मणवी ईश तो तो सरोज शयनाचा ।१।*
*नाशापुट षोडश अठराचा ।करणीं नवांश शिरसीचा ।दहा पदें ही त्याला ।२।*
*कोण असाजी कथाजी सरसाचा । आंगुलांचा भुजा मुळु वदनाचा । उधानू नेत्राचा स्वामि माझा ।३।*
*पोकु वेडावले सेली बोभावले । अन्य थकित झाले । वर्णवेना ।४।*
*केवळ काठीं मुगुट धूर्जेटी । पाय तळवटी चरण ज्याचे ।५।*
*ढकार वदनाचा आला वर्णावया । जिव्हा चिरोनियां झाल्या दोन । ६।*
*अवारु जोडोनी करितो विनवणी । खेचर विसा चरणी विनटला ।७।*

हे दोघेही समकालीन !

*ह्या दोन पुरुषश्रेष्ठांनी त्या बाराव्या शतकात अध्यात्माचा आणि भक्तीचा डांगोरा कसा नि किती पिटविला असेल ह्याची केवळ कल्पनाच आपण करू शकतो ! इतर समकालीन संतांनीही ह्याच भक्तिरसात ह्या महाराष्ट्राला अक्षरशः न्हाउ घातले !*

आनंदगिरींच्या “गीताभाष्यात”एक सुंदर श्लोक आहे.

*आचार्याः सन्ति कुत्राप्यतिविमलधियो वेदशास्त्रागमानां ।* *दुष्प्रापस्तावदास्ते त्रिजगति नितरामात्मतत्वोपदेष्टाः ।*
*एवं सत्यर्जुनस्याद्भुतविकलवती वर्ण्यते किन्तु भाग्यं ।*
*यस्याचार्यस्य हेतोः स्वयमुपनिषदामर्थे आविर्भैभूव ।।६॥*
आनंदगिरी - गीताभाष्य

ज्याच्या कल्याणासाठी, ज्याच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष उपनिषदांचा अर्थच ज्याच्या समोर श्रीकृष्ण रूपाने प्रकट झाला, त्या अर्जुनाचे भाग्य काय वर्णावे ? तद्वतच ह्याच अर्जुनास केलेल्या उपदेशावर आपल्या अलौकिक आत्मप्रतिभेने “भावार्थ दीपिका” लिहिणाऱ्या श्रीज्ञानोबारायांचे भाग्य आज काय वर्णावे ?

*ते हे गोष्टी रम्य । अमृतधाराधर्म्य ।*
*करिती प्रतीति गम्य । ऐकोनि जे ॥*
ज्ञानेश्वरी - १२.२३० 

परमेश्वराचे चरित्र हे गावे तर संतांनीच. संत चरित्रे गावीत तीही संतांनीच ! कारण आमची शब्दप्रतिभा इथे अगदीच थिटी पडते.

*आमुते करावया गोठी । ते झालीच नाही वाग्सृष्टि ।*
*आम्हालागी दिठी । ते दिठीच नोहे ॥*
(अमृतानुभव)

परंतु योग्यता नसतानाही आम्ही संतचरित्रे गातो कारण

*तेणेंसी आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ।*
*परि तयाचें चरित्र । ऐकती जे ॥*
 ज्ञा. १२.२२६ ॥

*तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।*
*जे भक्तचरित्रातें । प्रशंसती ॥*
 ज्ञा. १२.२२७ ॥

श्रीज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा
ह्या सोहळ्याचे वर्णन केले ते श्रीनामदेवरायांनी ! त्यांचा अधिकार अर्थातच मोठा !  ज्ञानोबाराय समाधी घेणार ह्या विचारानेच सर्व महाराष्ट्र आळंदीत लोटला. अनेक संत आणि सत्पुरुष, ज्ञानी, योगी, सर्व सर्व आळंदीत लोटले. आणि का लोटू नये? अवघ्या बावीस वर्षातला एक श्रीज्ञानदेव समाधी घेतो आणि तेही संजीवन समाधी ?

*संतभक्त येऊनी थोर थोर । हरिनामाचा केला गजर ।*
*अहोरात्र दिवस चार । आळंदीक्षेत्र गजबजलें ॥ १ ॥*
*एकादशीसी गजर । नामदेवें केली कथा सुंदर ।*
*द्वादशीसी दोन प्रहर- । पर्यंत घडलें पारणें ॥ २ ॥*
*तेचि रात्री प्रासादिक । हरिदास कान्हु पाठक ।*
*कीर्तन करिती परम भाविक । श्रोते कथेसी रंगले ॥ ३ ॥*

आणि शेवटी तो दिवस उजाडला ! कार्तिक वद्य त्रयोदशी ! श्रीज्ञानोबारायांच्या समाधीस प्रत्यक्ष परमात्मा श्रीपंढरीश जगन्माता प्रकट झाला. होणारच ! निर्गुण निराकार अविनाशी परब्रह्म आपल्या ह्या परमभक्त श्रीज्ञानोबांसाठी सगुण साकार झाले ! इथे तर्क काहीच काम देत नाहीत. संशय तर नाहीच नाही. ज्ञानोबाराय स्वतःच म्हणतात

*म्हणउनि संशायाहुनि थोर ।*
*आणिक नाहीं पाप थोर ।*
*हा विनाशाची वागुर ।*
*प्राणियांची ।*

ज्ञानेश्वरी - ४.२०३ 

म्हणूनच श्रीतुकोबाराय म्हणतात

तुका म्हणे नाशी ।कुतर्क्याचे कपाळी ।
टाका तार्किकाचा संग । पांडुरंग नित्य स्मरा हो ।

मध्यान्ही सूर्य आला असताना श्रीपरमेश्वराच्या आज्ञेने श्रीज्ञानोबाराय आणि साक्षात परमात्मा श्रीपंढरीशाने त्यांस केशराचा मळवट आणि तोच सर्व शरीरास लाऊन त्यांस समाधीकडे नेले. गळ्यात तुळशीचा हार घातलेले ज्ञानोबाराय आत्मसुखात मग्न होते परंतु इतर सर्व मात्र ह्या महायोग्याच्या विरहाने व्याकूळ झाले होते. केवढे ते वय ? अवघे बावीस ? इतकेच काय तर योगाभ्यासाने ज्यांचे नेत्रकमळ, करद्वय, चरणद्वय आणि सर्वांगच योगतेजाने प्रफुल्लित झाले होते, ती दिव्य मूर्ती आता इथून पुढे नेत्रांस दृश्यमान होणारच नव्हती.

*देव निवृत्ति यांनी धरिले दोन्‍ही कर । जातो ज्ञानेश्‍वर समाधीसी ॥१॥*
*नदीचिया माशा घातले माजवण । तैसे जनवन कालवले ॥२॥*
*दाहीदिशा धुंद उदयास्‍तविण । तैसेचि गगन कालवले ॥३॥*
*जाऊनि ज्ञानेश्‍वर बैसले आसनावरी । पुढा ज्ञानेश्‍वरी ठेवियेली ॥४॥*
*ज्ञानदेव म्‍हणे सुखी केले देवा ।  पादपद्मी ठेवानिरंतर ॥५॥*
*तीन वेळा जेव्‍हा जोडिले करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेव ॥६॥*
*भीममुद्रा डोळा निरंजनी लीन । जालें ब्रम्‍हपूर्ण ज्ञानदेव ॥७॥*
*नामा म्‍हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्‍थ ॥८॥*

*शक १२१५, कार्तिक वद्य १३,  दुर्मुखनाम संवत्सर - आळंदी*

जगत्कलाण्यासाठी जीवन कृतार्थ केलेले सत्पुरुष आत्मस्थित परमात्म्याशी एकरूप असल्याने जन्म-मृत्यू बंधनाच्याही पलीकडे गेलेले असतात.

*यदविद्याविलासेन प्रपञ्चोयं प्रतीयते ।*
*तदविद्याविनाशे तु केवलं ब्रह्म जृम्भते ।*

अर्थ - *ज्या अविद्येच्या विलासाने(प्रभावाने) हा प्रपंच प्रतीत होतो, त्या अविद्येचा विनाश झाला असता केवळ ब्रह्मच अवशिष्ट राहते !*

अशा आत्मोपलब्धी श्रीज्ञानोबारायांना संजीवन समाधी घ्यावीशी वाटणार नाहीतर काय ? अर्थात त्यांच्या समाधीने इतरांवर मात्र विरहाचा डोंगरच कोसळला. स्वतः नामदेवरायांची अवस्था काय झाली असेल? म्हणूनच त्यांच्या समाधीवर २५० हून अधिक अभंग रचताना नामदेवराय उद्गारतात 

*ज्ञानदेवासाठी होतसे कासावीस नामदेव*

*मग प्रश्‍न आदरिला । नामा फुंदो जो लागला ।कागा ज्ञानेदवा गेला । मज सांडुनिया ॥१॥*
*कैसा होय तुझा दास । कैसा पाहो तुझी वास ।ज्ञानाकारणे कासावीस । जीव माझा होतसे ॥२॥*
*देव म्हणे नामयासी । तू झणी कासावीस होती ।तू रे तयाते नेणसी । ते कैसे आईक पा ॥३॥*
*ज्ञानदेव ज्ञानसागरु । ज्ञानदेव ज्ञानागरू ।ज्ञानदेव भवसिंधुतारू । प्रत्यक्ष रूपे पै असे ॥४॥*
*ज्ञानदेवी ज्ञानगम्य । ज्ञानदेवी ज्ञानधर्म्य ।ज्ञानदेवी ज्ञाननेम । सर्वथैव पै असे ॥५॥*
*ज्ञानदेवी हाचि देव । ज्ञानदेवी धरीयला भाव ।ज्ञान होईल जीवा सर्व । यासी संदेह नाही ॥६॥*
*ज्ञानदेवी धरीता ध्यान । ध्याता होय समाधान ।जीवी शीवी परिपुर्ण । एके रात्री किर्तन केलीया ॥७॥*
*झणे तू व्याकूळ होसी चित्ते । मनी आठवी गा माते ।नामस्मरणे एकाचित्ते । रामकृष्ण गोविंद ॥८॥*
*नामा म्हणे तू समर्थ होसी । अर्जुनी प्रीती करिसी ।हे सांगीतले व्यासी । एकादशाध्यायी ॥९॥*
*तैस पावे तू विश्वेशा । विश्वरुपा जगन्निवासा ।मी होतसे कासाविसा । ज्ञानदेवाकारणे ॥१०॥*
*तरी तू गा युगानयुगी असशी भक्ताचिंया संगी ।आम्ही विनटलो पांडुरंगी । रंगारंगी विठ्ठली ॥११॥*
*एक वेळ माझा शोक । दुरी जाय हरे विख ।ते करी निर्विशेष । नामा येतसे काकुळती ॥१२॥*

*आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर ।नाहीं आता थार विश्रांतीसी  ।*

श्रीज्ञानोबारायानंतर त्यांच्या इतर भावंडांनी पण समाधी घेतली. नामदेवरायांनी ह्या सर्वांचे वर्णन करताना म्हटले

*गेले दिगंबर ईश्वरविभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥ १ ॥*
*वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानीं । आतां ऐसे कोणी होणें नाहीं ॥ २ ॥*
*सांगतील ज्ञान म्हणतील खूण' । नयेची साधन निवृत्तीचें ॥ ३ ॥*
*परब्रह्म डोळां दाऊं ऐसे म्हणती' । कोणा न ये युक्ति ज्ञानोबाची ॥ ४ ॥*
*करतील अर्थ, सांगतील परमार्थ' । न ये पा एकांत सोपानाचा ॥ ५ ॥*
*नामा म्हणे देवा सांगूनियां कांही । न ये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥ ६ ॥*
*पूर्वी अनंत भक्त जाहले । पुढेंही भविष्य बोलिलें । परी निवृत्ति-ज्ञानदेवें सोडविलें । अपार जीवजंतु ॥ ७ ॥*
*ऐसे ज्ञानेश्वर माहात्म्य अगाध । कथा ऐकतां होईल बाध । तैसाचि उपजेल परमानंद । पातकें हरतील सर्वथा ॥ ८ ॥*

आता कोण उरलेच नाही आम्हांस उपदेश करायला ? आम्ही ऐकायचे तरी कुणाचे ?
काय लिहावे ? शब्दच संपले !

ह्या संजीवन समाधी दिनानिमित्त कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्रीज्ञानोबारायांस आणि भक्तशिरोमणी संतश्रेष्ठ श्रीनामदेवरायांस आणि इतर सर्व संतांस विनम्र प्रणाम !!!

शिरसाष्टांग दंडवत ।

#पाखण्ड_खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#संतश्रेष्ठ_श्रीज्ञानोबाराय_संजीवन_समाधीसोहळा_श्रीनामदेवराय_आळंदी

Wednesday 20 November 2019

जिहादी टिपुचा मराठाद्वेष - त्याच्याच हस्ताक्षरांतला...





क्रुरकर्मा इस्लामी जिहादी धर्मांध मूसलमान असा टिपु सुलतान सर्व हिंदुंचा आणि त्यातल्या त्यात आम्हां मराठ्यांचा किती द्वेष करायचा ह्याचे त्याच्याच हस्ताक्षरातलं समकालीन प्रमाण उपलब्ध आहे. मराठा ही जात नसून ती एक विजीगीषु वृत्ती आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. टिपुला जी स्वप्नं पडायची, ती तो उठल्यानंतर लगेचच शब्दबद्ध करायचा. टिपुच्या अशाच स्वहस्ताक्षरातल्या शब्दबद्ध स्वप्नांचं एक हस्तलिखित मे १७९९ मध्ये टिपुच्या मुन्शी असलेल्या हबीबुल्लाह नामक व्यक्तीच्या समोरंच सापडलं होते. हे हस्तलिखित ईस्ट इंडिया कंपनीत रुजु असलेल्या कर्नल किर्कपैट्रिक (Colonel Kirkpatrick) नामक एका अधिकार्यांस प्राप्त झालं होतं, ज्यात टिपुची ३७ स्वप्नं असून त्याला त्यानेच लिहिलेली प्रस्तावनाही आहे.* ह्या किर्कपैट्रिकने टिपुंवर आणखी विस्तारपूर्वक ग्रंथनिर्मिती स्वतंत्रपणे केलीच आहे त्यावर पुढे येऊच. पण तत्पूर्वी...ह्यात टिपुने पहिलंच स्वप्न मराठ्यांविषयी लिहिलं असून तेराव्या स्वप्नांत मराठ्यांची आत्यंतिक निंदा करताना अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. एकुण नऊ वेळा त्याने मराठा शब्दाचा उल्लेख सर्व स्वप्नांमध्ये केला आहे.




*टिपुचे तेरावं स्वप्न*

टिपुने मराठ्यांना पुरुषांच्या पोषाखातली स्त्री असे निंदाव्यंजक शब्द वापरले आहेत. सोबत टिपुचं ते पूर्ण स्वप्न व त्याचा पाकिस्तानच्या कराची विद्यापीठातल्या महमुद हुसैन ह्या लेखकाचा अनुवाद जोडला आहे. *हा ग्रंथ पाकिस्तान ऐतिहासिक संस्थेची प्रकाशने क्रमांक ७ (Pakistan Historical Society Publications no.7) ह्या नावाने प्रकाशित असून ह्याची स्कैन्ड प्रत Dreams of Tipu Sultan ह्या नावाने* निम्नलिखित संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 

https://archive.org/details/dreamsoftipusult00tipprich





*ह्यावरूनंच टिपुची आम्हां मराठ्यांविषयीची मानसिकता काय नि कशी नि किती द्वेषाची होती हे लक्ष्यीं येते. जो मनुष्य स्वप्नांतही इतका द्वेष करतो, तो प्रत्यक्षांत काय करत असेल ह्याची कल्पना केलेलीच बरी.. सांप्रत काही बांडगुळं टिपुचं गुणगान गाताना दिसतात, त्यांच्यासाठी हा लेखनप्रपंच...*

*टिपु हा जिहादीच होता व हिंदुंचा आत्यंतिक द्वेष्टाच होता ह्यावर त्याची स्वतःची पत्रं, त्याने केलेल्या मंदिरांचा विध्वंस, लाखो हिंदुंचे बलात्काराने केलेलं धर्मांतरण आदि सर्व समकालीन संदर्भ उपलब्ध आहेतंच.* सविस्तर लेखन अनेक इतिहासकारांनी केलंच आहे.

सविस्तर पुढे येऊच...

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#टिपुसुलतान_इस्लामीजिहाद_स्वप्न_मराठाद्वेष_हिंदुद्वेष_धर्मांतरण_मंदिरविध्वंस

आज थोरल्या श्रीमाधवराव पेशव्यांचे पुण्यस्मरण - कार्तिक वद्य अष्टमी



गत वर्षी देवदेवेश्वर संस्थान पर्वतीवतीने मृत्युंजयेश्वर मंदिर, पुणे येथे थोरल्या श्रीमाधवरावांवर व्याख्यान देण्याचा योग आला होता. हिंदवी स्वराज्याची पानपताने विस्कटलेली पुन्हा सुव्यवस्थित करण्याचे अलौकिक कार्य ज्या पेशव्याच्या हातून घडलं त्याचे आज पुण्यस्मरण...

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा लोकोत्तर पुरुषही ज्याच्यावर सर्व पेशव्यांत थोर पेशवे कोण हा लेख लिहितो ह्यावरून ह्या पेशव्याची योग्यता लक्ष्यीं येते.

*अवघ्या २७ वर्षांच्या आयुर्मानात ह्या पेशव्याने जे काही अभूतपूर्व कर्तृत्व संपादन केलंय, ते केवळ विलक्षण आहे. उत्तर हिंदची मोहिम असेल किंवा कर्नाटकची स्वारी असेल किंवा निजाम-हैदर सारख्यांचा किंवा रोहिल्यांचा निःपात असेल, ह्या पेशव्याने आपल्या चार पिढ्यांच्या स्वराज्यवृद्धीचा संकल्प पूर्ण करून हिंदवी स्वराज्याचा अंमल संपूर्ण हिंदुस्थानभर जो प्रस्थापित केला, तो अत्यंत चिंतनीय आहे. पानपतांवर मराठी राज्याचा अवतार संपला असा शत्रुमित्रांचा झालेला भ्रम श्रीमाधवरावांनी आपल्या पराक्रमाने मोडून काढला हे त्यांचे कर्तृत्व अत्यंत प्रशंसनीय आहे.*

*भेलसा येथे स्वतंत्र तोफ कार्यालयाची निर्मिती*

वेदकाळापासून हिंदुंना तोफनिर्मितीचे ज्ञान होते ह्याविषयी अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. तोप किंवा तोफ हा शब्दंच मूळात संस्कृत धातु तुप् तुफ् ह्या पीडार्थक धातुंपासून निष्पन्न होतो. पंडित शिवपूजनसिंह कुशवाह ह्या आर्यसमाजी विद्वानाने ह्यावर एक स्वतंत्र ग्रंथही निर्माण केला आहे. महर्षि दयानंदांनीही त्यांच्या वेदभाष्यांत ह्याचा निर्देश केला आहे. विस्तारभयास्तव ह्यावर पुढे लिहुच. पण श्रीमाधवरावांचे हे कृत्य द्रष्टेपणाचे होते हे निश्चितंच...

*सर्वांना एकत्र बांधणारा पेशवा...*

पानपतानंतर स्वकीयांमध्ये झालेल्या दुहींस नष्ट करून सर्वांची एकमोट बांधणारा पेशवा म्हणून श्रीमाधवरावांची नोंद करावी लागेल. *शिंदे-होळकरांना दौलतीचे स्तंभ असे गौरवून किंवा नागपूरकर भोसल्यांनाही आपल्याकडे वळवून आणून श्रीमाधवरावांनी हिंदुपतपातशाहीची पुनर्संस्थापना केली हे त्यांचे यश काही अल्प नव्हते. अंतर्गत बंडाळी मोडण्याचे अत्यंत दुष्कर कार्य त्यांना अत्यंत अल्पायुष्यांत करावं लागलं म्हणूनंच विशेष आहे.निजामअलीसारखा मराठ्यांचा कट्टर वैरी श्रीमाधवरावांच्या पराक्रमाने दिपून मराठ्यांचा मित्र बनला. शहाआलम बादशाह हा एवढा बट्टेबाज पण तोही श्रीमाधवरावांच्या कर्तृत्वांवर विसंबून इंग्रजांना सोडून मराठ्यांच्या आश्रयांस आला.*

युद्धकलेंत काय किंवा हिशेबव्यवहारांत काय श्रीमाधवरावांनी आपले तेज सर्वत्र दाखवून दिले. *हरएक प्रकारचे कपट, दुष्टावा, वक्रगामीपणा, यांचे जे पीक महाराष्ट्रांत थैमान घालत होते, त्याचे संपूर्ण उच्चाटन करून न्यायनीतीचे, निष्पक्षपातीपणाचे, सार्वजनिक हिताचे असे एक नवीनंच वातावरण ह्या पेशव्याने राष्ट्रांत उत्पन्न केले.*

*व्यक्तिमत्व*

*निर्मल वर्तन, कर्तव्यनिष्ठा, धाक व लौकिकांतील पूज्यभाव* हे गुण माधवरावांच्या अंगी होते. माधवराव धर्मनिष्ठ होते. चारित्र्यसंपन्न तर होतेच. *बाळाजी विश्वनाथाचे राजकारणी धोरण, बाजीराव पेशव्याची लष्करी धडाडी नि नानासाहेबाची प्रजापालनदक्षता* हे तीन्ही गुण थोरल्या श्रीमाधवरावांत अंगभूत होते.

*श्रीमाधवराव जीवित असते तर इंग्रज भारतावर राज्यंच करु शकले नसते...*

ह्या विधानांत कोणतीही अत्युक्ती नाही. दुर्दैवाने अल्पायुष्य हा आम्हा हिंदुंना शाप आहे की काय कळंत नाही. पुण्यश्लोक श्रीशिवप्रभु असतील, धर्मवीर श्रीशंभुछत्रपती असतील, थोरले श्रीबाजीराव असतील किंवा हे थोरले श्रीमाधवराव असतील. ह्या चौघांना अत्यंत अल्पायुष्य लाभलं. सर्वात न्यून तर ह्याच पेशव्यांस. *अंतिम आयुष्यांत श्रीमाधवरावांनी ब्रिटीशांच्या विरोधांत मोहिम हाती घेतलीच होती हे कागदपत्रांवरून लक्ष्यीं येतंच. सर्व मराठेमंडळी एकवटली असून नजीबखान-अब्दालीसारखे शत्रुही नाहीसे होऊन, दिल्लीचा बादशाहाही अनुकूल होऊन सर्व राष्ट्राच्या परमोच्च बिंदुस प्राप्ती होणार अशी सुचिन्हे दिसू लागताच काळाने ह्या पेशव्यांस वयाच्या २७व्या वर्षी ग्रासावे ही नियतीची क्रूर योजनाच म्हणावी लागेल.*

पण ह्याचे कारण पहायचं तर नियतींस दोष न देता तो आमचाच सर्वस्वी आहे हे सूज्ञांस कळेल. *आमची सामुहिक उपासना न्यून पडते हे त्रिवार सत्य आहे.* हे कुणांस पटो न पटो.

*अंतिम संदेश*

ज्येष्ठ इतिहासकार सरदेसायांनी पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या खालोखाल ह्या पेशव्याची योग्यता वर्णिताना जे विधान केलंय ते रियासतीत वाचण्यासारखं आहे. अंतिम क्षणी श्रीशिवप्रभुंनी जो संदेश दिला, तोच संदेश थोरल्या श्रीमाधवरावांनी दिला, जो हिंदुंना अत्यंत बोधनीय आहे.तो संदेश होता...

*काशी नि प्रयाग मुक्त करा...*

लेखणींस विराम देताना थोरल्या श्रीमाधवरावांविषयी प्रसृत असलेल्या एका आख्यायिकेचं चिंतन करण्याचा मोह टाळता येत नाही. एका संस्कृत सुभाषितांत तो अनुभव आहे

*वृष्टिर्विना पंकमहो विचित्रं स्थलद्वये तिष्ठति सार्वकालं।*
*दानांवुभिर्माधवरायमन्दिरे विप्रस्य बाष्पैः खलु रामशास्त्रिणां।*

ह्या थोर पेशव्यांस पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#श्रीमंत_थोरले_श्रीमाधवराव_पेशवे_पुण्यस्मरण_कार्तिकवद्यअष्टमी_पानिपत_हिंदुपदपातशाही_इंग्रज_निजाम_सावरकर

Tuesday 19 November 2019

स्व. माननीय श्रीएकनाथजी रानडेंचं आज पुण्यस्मरण...



*एक जीवन, एक ध्येय्य!!!*

साम्यवादी विचारधारेच्या राष्ट्रद्रोही मानसिकतेने ग्रस्त नेतृत्वामुळे चीनच्या युद्धापश्चात् भारतवर्षांस आलेल्या आत्मग्लानीमुळे ती पाहून एक आजीवन अखंड ब्रह्मचारी असा युवक, ज्याने रा स्व. संघाच्या माध्यमांतून अवघं जीवन *राष्ट्राय स्वाहा, इदं न मम।* म्हणून समर्पित केले होते, तो राष्ट्राच्या ह्या अवनतीमुळे अंतर्मुख झाला. ह्या परिस्थितींत राष्ट्रांस पुन्हा एका योद्ध्या संन्याशाच्या तेजस्वी अशा पुनरुत्थानाच्या संदेशाची आवश्यकता होती. नुकतीच विश्वदिग्विजयी श्रीमत्स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी साजरी झाली होती.  त्यासाठीच काही मास स्वतःला एकांतवासांत नेऊन समग्र विवेकानंद साहित्याचे पुनःअध्ययन करून एका योद्ध्या युवकाने *'The Rousing Call to a Hindu Nation'* नावाचा विवेकानंदांच्या आव्हानात्मक विचारांचा एक ग्रंथ सिद्ध केला. हा ग्रंथ मराठीत *'हिंदुतेजा, जाग रे!'* नावाने प्रकाशितही आहेच. पण तेवढ्यावरंच त्या युवकाचं समाधान होणार नव्हतं. एका ग्रंथाचे निर्माण तर झालं होते पण त्या संदेशाचे पालन करणारी युवा पिढी निर्माण करणार कोण ह्याच तत्वचिंतनात तो मग्न होता. विवेकानंदांना अपेक्षित तेजस्वी नि राष्ट्रसमर्पित युवक-युवती निर्माण करायच्या कुठून?

आणि ह्यातंच सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा पण दक्षिणसमुद्रातून होणार्या संभाव्य आक्रमणाची शंका लक्ष्यीं येऊन तत्कालीन राष्ट्रसूत्रधारांनी, ज्यात आदरणीय गोळवलकर गुरुजींसारखे लोकही होते, त्यांच्याच आज्ञेने सुदूर दक्षिणेतल्या भारतमातेच्या चरणकमलांचं संवाहन करणार्या त्रिसागरातल्या शिलेवर स्मारक उभारण्याची संकल्पना आली.

*परिव्राजक अवस्थेत सर्व हिंदुस्थान पादाक्रांत करणार्या भावी विश्वदिग्विजयी स्वामीजींच्या अंतिम निवासांत ज्या कन्याकुमारीच्या शिलेवर त्यांचे तीन रात्र (२५-२७ डिसेंबर, १८९२) ध्यान घडलं नि ज्यातून त्यांचा एक पुनर्जन्मंच जणु झाला, त्याच शिलेवर त्यांचेच भव्य स्मारक उभारण्याचे ध्येय्य ह्या युवकाने निश्चित केलं. त्याच शिलेवर जगज्जननी श्रीपार्वती मातेने भगवान श्रीशंकराच्या प्राप्तीसाठी उग्र तपश्चरण केलं होते. तीच पवित्र शिला विवेकानंदांसाठीही जीवनाचे ध्येय्य दर्शविणारी ठरली होती.*

त्रिपादसागरांनी वेष्टित त्या पवित्रशिलेवर स्वामीजींच्या स्मारकाची सर्व सिद्धता करण्यांस हाच युवक योग्य ठरला. आणि प्रत्यक्ष कार्यांस आरंभ केला.

*कथा शिलास्मारकाची...*

योद्ध्या संन्याशाच्या त्या स्मारकाच्या निर्माणाची कथा ज्या ह्या महापुरुषाच्या करकमलांतून सिद्धांस गेली, तींस अभ्यासायचे असेल तर जिज्ञासूंनी उपरोक्त शीर्षक असलेला ग्रंथ अवश्य अभ्यासावांच. विस्तारभयास्तव लिहीत नाही. त्याच्या लेखिका आहेत विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती नि राष्ट्रीय उपाध्यक्षा पद्मश्री सुश्री निवेदिता भिडे दीदी... दीदी आमच्या मित्रसूचीत आहेत हे आमचं भाग्य आहे.

आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांना ह्यासाठीची रोमांचित करणारी प्रक्रिया ज्ञात असेलंच. त्याकाळी एक एक रुपया भारतीयांकडून गोळा करून हे दिव्य स्मारक उभारण्यांत आलं. अनेकजण आज जीवित आहेत हा साक्षात्कार करणारी...

*विवेकानंद केंद्राची संकल्पना...*

केवळ दगटा विटांचे स्मारक पुरेसं नसून जीवित स्मारकं अर्थात मनुष्यनिर्माणाचे कार्य करण्यासाठी स्वामीजींना अपेक्षित असलेले युवक निर्माणाच्या प्रक्रियेत पुढे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ह्या संस्थेच्या स्थापनेची संकल्पना माननीय एकनाथजींच्या अंतःकरणांत आली नि तींस त्यांनी मूर्तस्वरुपही दिली. गेली आठ वर्षे विवेकानंद केंद्राशी व्यक्तिशः संपर्कात असल्याने केंद्राशी घनिष्ठ संबंध आहेच. केंद्राच्या स्थापनेचा इतिहासही केंद्राच्या वतीने प्रकाशित आहेच.

*मनुष्य निर्माण नि राष्ट्रपुनरुत्थान* हे केंद्राचे ब्रीदवाक्य असून गेली चाळीस वर्षे केंद्र त्याहेतुने कार्यरत आहे.
आरंभीच्या शब्दांप्रमाणे एक जीवन, एक ध्येय्य जगलेल्या माननीय श्रीएकनाथजींविषयी माझ्या अल्पबुद्धींस जे सूचलं ते लिहिण्याचा एक प्रयत्न आहे. माननीय एकनाथजींच्या चरित्रचिंतनासाठी उपरोक्त लेखिका दीदींचेच एकनाथजी हे चरित्र चिंतनीय आहे. तद्वतंच आमचे बंधु नि पत्रकार नि वर्गमित्र मित्र श्री सागर सुरवसे ह्यांनी माननीय एकनाथजींचे लिहिलेलं एक चरित्रही अवश्य अभ्यसनीय आहे.

एकनाथजींच्या ग्रंथसंपदेविषयी भविष्यांत कधीतरी लिहुच...

सांप्रत अन्य कार्यामुळे नि अध्ययनामुळे केंद्राच्या कार्यांत पूर्वीसारखा वेळ आम्ही देऊ शकत नाही ह्याची आम्हांस खंत आहे.

पण सर्वांना एक विनंती की उपरोक्त चार ग्रंथ प्रत्येकाने अभ्यासावेतंच असे आहेत.

*माननीय एकथानजींच्या हातून निर्माण झालेल्या विवेकानंद शिलास्मारकाच्या निर्माणाची कथा संक्षेपांत निम्नलिखित चित्रफीतींत आपणांस अभ्यासावयांस प्राप्त होईल.*

*https://youtu.be/eVR-l6T8WZ0*

माननीय श्रीएकनाथजींस विनम्र अभिवादन नि आदरांजली...!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#स्वएकनाथजी_रानडे_पुण्यस्मरण_विवेकानंद_शिलास्मारक_कन्याकुमारी_विवेकानंदकेंद्र

Friday 15 November 2019

न भीतो मरणादस्मि केवलं दूषितं यश: ।



शुद्रकाच्या "मृच्छकटिक" नाटकांत चारुदत्त वसंतसेनेच्या अपहरणाच्या असत्य आरोपांवर प्रत्युत्तर देताना उपरोक्त श्लोक उच्चारतो. तो म्हणतो

*"वसंतसेनेचा धनाचा अपहरणाचा व हत्येचा आरोप मला असह्य आहे. तो मिथ्या कलंक आहे. अरे मरणाचे ते काय? मला फाशी द्याल ! तोही अपराध मी वास्तविक केलेला नाही. पण हा अपहरणाचा कलंक कसला??? मला दु:ख ते आहे की जीवनांत जे काही सत्व, जे कांही तत्व मी सांभाळले, त्या तत्वावरच हा प्रहार आहे. न भीतो मरणादस्मि केवलं दुषितं यश: ।  मला मरणाची भीती नाही पण माझ्या यशास दोष लागेल किंवा माझी अकारण अपकीर्ती द्वेषापोटी होईल ह्याची आहे."*

आजही हे वाक्य पंडित नथुरामजींच्या त्या गांधीवधाच्या कृत्यांस किती समर्पक आहे हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. ही तुलना अर्थातच सर्वथैव व यथार्थ आहे.  वसंतसेनेला मारले या आरोपावरून चारुदत्तावर अभियोग भरला गेला होता. सुविद्य श्रोते शुद्रकाच्या मृच्छकटिकांत जाऊन पोहोचले ते हसत हसतच. कारण धारा तीनशे दोनचा उल्लेख पंडित नथुरामजींनी चारुदत्ताच्या संदर्भात केला होता.

पंडितजी म्हणाले

*"मी अनेक सभा घेतल्या आहेत, गाजविल्या आहेत. माझ्या गळ्यांत फुलांचे हार मी घेतले आहेत. तितक्यांच सहजतेने फाशीचा दोरही मी स्वीकारीन! या देशावर माझे प्रेम केले आहे. मानवजातीवर प्रेम केले आहे. त्या अत्युत्कट भावनेंतूनच मी हत्या केली आहे. अपेक्षा एकच आहे. माझ्या देशभक्तींला कोणी कलंक लावू नये ! पण तो लावला गेलाच तर चारुदत्ताच्या पुढे एक पाऊल टाकून मला म्हणायचे आहे."*

*"देशभक्ती पापच असेल तर ते पाप मी केले आहे ! गळफास आणि ते पापही मी अंगावर वागवीन. देशभक्तीच्या पापापासून दूर राहा, असे, माझ्या जीवनाचे प्रलोभन दाखवूनही कोणी सांगितले तरी मी विचलित होणार नाही !"*

चारुदत्ताच्या काळात हसत हसत गेलेले ते श्रोते आता रडु लागले ! त्यांचे डोळे गळु लागले, मन आक्रंदु लागले. असहायतेची वेदना प्रत्येकाच्या मनावर वावरत होती. त्यांना वाटले, आम्ही एक नरबळी (नरमेधांत हिंसा नसते बरंका. ती पौराणिकांनी उठविलेली हूल आहे, लिहु कधीतरी सविस्तर त्यावर) करणार आहोत ! या देशभक्ताला आम्ही पापाखाली गाडणार आहोत !

"सुख-दु:खे समे कृत्वा लभालाभौ जयाजयौ" ह्या स्थितप्रज्ञाच्या मनोनिग्रहाने नथुरामजींनी आपले भाषण पुढे ठेवले. म्हणूनच सिमला न्यायपीठावरील एक न्यायमूर्ती जीडी खोसला पंडित नथुरामजींच्या निवेदनाचे परीक्षण करताना म्हणतात.

*"न्यायालयातील श्रौतृवर्गाला जर न्यायदानाचे काम दिले असते तर प्रचंड बहुमताने त्यांनी नथुरामला निर्दोष घोषित केले असते."*

१९ मे, १९४८ - पंडितजींचा ३९ वा वाढदिवस

*न्यायमूर्ती भंडारींची कन्या पंडितजींना भेटावयांस आली होती.*

कुणी काहीही म्हणेना पण पंडितजींच्या त्या कृत्याची यथार्थता केवळ ह्याच स्त्रीला आकळली. *स्त्रियांना पुरुषापेक्षा बुद्धी कैकपट जास्तीच असते हे चाणक्यवचनही सार्थच आहे.* म्हणूनच ती त्यांच्या आसनांवर गुलाब वाहते झाली. ती नथुरामजींना भेटताच म्हणाली,

*"आम्हा लोकांसाठी तुम्ही प्राण ओवाळून टाकीत आहात याची मला जाणीव आहे. आम्हा सगळ्यांना जाणीव आहे."*

एवढे बोलून ती थांबली व गहिवरली. तेवढ्यांत पंडितजी उद्गारले

*"आपल्याला जाणीव आहे हे माझ्या जिवंतपणीच मला कळते आहे यातच सर्व काही पावले."*

ती मुलगी पंडितजींच्या अभिवक्तव्याला प्रतिदिनी येत असे. जे एका मूलीला कळलं, ते आम्हाला अद्याप कळलेलं नाहीये. असो.

*गांधीवधाचे नागडे सत्य (नेकेड ट्रुथ)*

गोळ्या तीन की चार???

पंडितजी न्यायालयीन वक्तव्यांत म्हणतात

*"Since I was doubtful about the number of bullets, I did not want Gandhiji's legal autopsy to be carried out at Your Honour's table. I also declined to examine the Doctor. So the benefit of doubt may go to the Prosecution and the sentence to me."*

ह्याला स्थितप्रज्ञता नाहीतर काय म्हणायचे???

अर्थात सरकारने पण गांधीजींची हेतुपुरस्सर शवविच्छेदनाची मागणी केली नाही कारण चौथी गोळी कुणी मारली हे कळु नये म्हणूनच. त्यामुळे संशयाची जागा नेहरु, पटेल व तत्कालीन सरकारवर होती व आहे हे स्पष्ट आहेत. गांधीवाद्यांनी कितीही नाकरले तरी हे नागडे सत्य(Naked Truth) आहे.

*गांधीवध हा गांधीजींच्या ५५ कोटींच्या हेकेखोरीचाच परिणाम आहे - इति सरदार वल्लभभाई पटेल*

पटेलांनी हे वाक्य राजाजींना सांगितले आहे व ते राजाजींनी त्यांच्या *"Gandhiji's Teaching and Philosophy"* ह्या ग्रंथात लिहिले आहे ते खालीलप्रमाणे

*"When on 30th January, 1948, Gandhiji was assassinated by Godse, Sardar Vallabhbhai Patel felt that the conspiracy to kill Gandhiji was due to Hindu anger against him on account of this advise of his to pay a huge sum of money to the Pakistan Government when it was organising and carrying out a wicked military campaign against us."*

Page no. 25-26

ह्याचा आणखी पुरावा
*कपुर कमिटी अहवाल - खंड १*

*पटेलांची आमच्या हिंदुमहासभेला व त्याचेच अपत्य असलेल्या संघाला क्लीन चीट* 👇

पटेल नेहरुंना लिहिलेल्या २७ फेब्रुवारी, १९४८ च्या पत्रात म्हणतात.

*"But beyond this, I do not think it is possible, on the evidence which has come before us, to implicate any other members of the RSS or the Hindu Mahasabha."*

संदर्भ - Sardar Patel's correspondence Volume VI- page no. 56-58 - Ahmedabad

आमच्या प्राणप्रिय हिंदुसभेच्या नावाने २४ तास कंठशोष करणार्यांनी कृपा करून हे पटेलांचे नेहरुंना लिहिलेले पत्र लक्षात घ्यावे. पटेलांनी संघाला काँग्रेस मध्ये येण्याचे आवाहन गांधीहत्येपूर्वीच केलं होते. हिंदुसभेला नाही ही गोष्ट महत्वाची आहे. त्यांचे साहसही होणार नाही ही गोष्ट वेगळी.

६ जानेवारी, १९४८ च्या लखनौ मधल्या एका सभेत पटेलांनी

*"I invite the RSS to join the congress... I realise that they are not actuated by selfish motives but the situation warrants that they should strengthen the hands of the Government."*

संदर्भ - Speeches of Sardar Patel - 1947-50, Publications Division, Government of India, Page no. 56

अर्थात गुरुजींनी हे धुडकावून लावले. गुरुजींचे ते कृत्य योग्यच होते. असो.

*काही षंढ मानसिकतेचे स्वयंघोषित हिंदुत्ववादी मात्र नथुरामजींच्या त्या कृत्याचा धिक्कार करतात. त्यात उजवे समाजवादी आघाडीवर आहेत ही गोष्ट वेगळी सांगायला नको. असों सविस्तर कधीतरी तो विषय घेऊ !*

पण एवढे मात्र खरे की

गांधीहत्येनंतर ब्राह्मणांची सरसकट कत्तल करणार्या व किलोकिलोने जानवी मारणार्या गांधीवाद्यांनी कितीही अहिंसेचा टेंभा मिरवला व पंडितजींना शिव्या घातल्या, तरीही आमच्या ह्रदयांत त्यांचे म्हणजे पंडितजींचे स्थान कायम परमवंदनीयच राहील. त्या आधुनिक दधीचीप्रमाणेच, ज्याने आपल्या अस्थी देवासूरसंग्रामासाठीच अर्पण केल्या होत्या.

माझ्या आजोबांचे घर तर गांधीवाद्यांनी त्याकाळीच जाळले होतेच. शेतीही गेलीच. प्राणप्रिय सिंधु नदी अखंड हिंदुस्थानात यायची ही प्रतिज्ञा आम्ही पूर्ण करण्यांस कटिबद्ध आहोत. आम्हांसा कुणी वेडे म्हणो किंवा अन्य काही !!! कारण वेड लागल्यांशिवाय इतिहास घडतच नाही व वेडी माणसेंच इतिहास निर्माण करतात.

*ज्यांना सावरकर व गांधी ही दोन टोके एकाचवेळी प्रमाण वाटतात, अशा वैचारिक गोंधळ झालेल्या कुणीतरी लिहिलेली मोठी-मोठी पुस्तके वाचून अखंड हिंदुराष्ट्र नाकारणार्यांची कीव करावीशी वाटते. असो.*

सांप्रत हा भ्रम सतत प्रसृत केला जातोय की

*म्हणे गांधी आपल्या मरणाने मरत होते तर त्यांना मारून का मोठ्ठं केल? किंवा गांधीहत्येने हिंदुत्ववादी चळवळ चाळीस वर्षे मागे गेली. इति इति*

ह्यावर सविस्तर काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे द्यावीत सर्वांनी. येत्या काही दिवसांत ती विचारेन.

ज्यांना गांधीच समजले नाहीत, त्यांना गांधीवाद व नथुरामही समजणार नाहीत. त्यातून आजची प्रा. शेषराव मोरेंसारखी मंडळीही त्यांच्या पद्धतीने फाळणीची मीमांसा केल्यामुळे ते ग्रंथ वाचले की मनुष्य फाळणी योग्य मानतो. मूळ विषय आहे गांधीवाद. अनेकांचा भ्रम आहे की नथुरामजींनी केवळ फाळणी डोळ्यांसोमर ठेऊन ते कृत्य केलं. पण हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. एकमेव कारण नाहीये.

प्रश्न गांधीवाद अभ्यासणे हा आहे, त्यानंतर गांधीहत्या किंवा वध योग्य की अयोग्य ह्याचा विचार  करता येईल. त्यानंतर मग संघाच्या मताप्रमाणे हिंदुत्ववादी चळवळीचे झालेले तथाकथित नुकसान ह्याची सविस्तर मीमांसा करता येईल.शेष संघवाल्यांविषयी बोलायचं तर मी आधीही दोन तीनदा लिहिलं होतं की

*"पतत्वेष कायो" म्हणून प्रत्यही भगव्या ध्वजासमोर नित्यप्रार्थना करणारे संघवाले किंवा तत्सम लोक एकीकडे अखंड हिंदुराष्ट्राची स्वप्ने पाहतात, त्याविषयी उत्सव करतात, पण ह्याच अखंड हिंदुराष्ट्रासाठी "ददाम्येष कायो" म्हणून प्रत्यक्ष देह त्यागणारे पंडित नथुरामजी व आपल्या अस्थी सिंधुसाठी तशाच अविसर्जित ठेऊन आपला आत्मा तसाच ठेवणारे पंडित नथुरामजी ह्याच लोकांना माथेफिरु वाटतात.*

त्यामुळे आधी गांधीवाद व त्यानंतर नथुरामजींचे कृत्य ह्याची चिकीत्सा हवी. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे व मूळ वाक्य एका तत्कालीन मूस्लीम पुढार्याचेच असल्याप्रमाणे

*ज्यादिवशी पहिल्या मूसलमालाने ह्या देशांवर पाय ठेविला, त्यांच दिवशी इथली पाकिस्तानची भेदाची बीजे रोविली गेली.*

* पंडित नथुरामजी व डॉ. आंबेडकर*

देशाला स्वातंत्र्य मिळाले ते सावरकरांच्या, सुभाष बाबुंच्या सैनिकीकरणामुळे. माऊंटबैटनचे अंतिम वाक्य सूचक आहे. *पण नथुरामजींना माथेफिरु म्हणणार्यांनी त्यांनी केलेलं हिंदुसंघटन व त्यांनी तात्यारावांच्या आदेशानुसार केलेले शस्त्रसंपन्नतेचे व सैनिकाकरणाचे प्रसाराचे कार्य हे पाहून स्वत: आंबेडकरही भारावले होते. म्हणूनच ते गांधीहत्येचे समर्थक होते व नथुरामजींचे विधीज्ञपत्र घ्यावयांस उत्सुक होते. ही गोष्ट सिंधुताईंना आंबेडकरांच्या स्वीय सचिवांनीच सांगितलीय.*
अर्थात ही गोष्ट आता अनेकांना मान्यही होणार नाही. सविस्तर संदर्भ मी देईनच. कारण

*नामूलं लिख्यते किंचित् नानपेक्षिपतमुच्यते !*

बाकी गांधींजींच्या एकुणच व्यक्तिमत्वाविषयी तत्कालीन सर्व राष्ट्रपुरुषांनी व अगदी काँग्रेसच्या नेत्यांनीही केलेली *औरंग्याचा द्वितीय अवतार* ही वाक्ये वाचली की शंकेस वाव राहत नाही. मग ते ना भा खरे असोत अन्यथा डॉ. मुंजे अथवा पुण्याचे संत शंकरमहाराज असोत.

आधी नास्तिक व पूर्ण ब्रिटीशनिष्ठ वरवरपाहता वाटणारे किंवा तत्समच आचार विचार असणारे पण नंतर कट्टर सशस्त्र क्रांतिकारक व  कारावासातल्या श्रीकृष्णाच्या साक्षात्कारानंतर पुदुच्चैरीत(पाँडेचरी) पूर्ण चाळीस वर्षे साधना करून महायोगी बनलेले महर्षि अरविंदही गांधीजींविषयी काय लिहितात ते पाहणं आवश्यक आहे. 👇

*Many educated Indians consider Gandhi a spiritual man. Yes, because the Europeans call him spiritual. But what he preaches is not Indian spirituality but something derived from Russian Christianity, nonviolence, suffering, etc. The gospel of suffering that he is preaching has its roots in Russia as nowhere else in Europe -  other Christian Nations don't believe in it.*

*परमवंदनीय अमर हुतात्मा पंडित नथुरामजी गोडसे अमर रहे !*
*हिंदुराष्ट्र अजेय व अखंड हो !!*
*जय माँ भारती !!!*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#पंडितनथुराम_गांधीवध_अखंडहिंदुस्थान_छद्महिंदुत्व

Thursday 14 November 2019

मी एक अत्यंत अपयशी राज्यकर्ता - इति जवाहरलाल नेहरु...


*You have before you a statesman who has failed...- Jawaharlal Nehru*

संदर्भ - *Times of India dated 12.10.1992 - Dr. Giesla Bonn*

चीनच्या युद्धापश्चात नेहरुंना अपयशानी ग्रासल्यामुळे अंतिम दिवसांत त्यांच्या तोंडून पडलेले उद्गार त्यांच्या पराभूत मानसिकतेचे प्रदर्शक आहेत. *जिएस्ला बॉन ह्या जर्मन लेखकाने लिहिलेल्या Indian Challenge ह्या ग्रंथामध्ये २७मे, १९६४ च्या नेहरुंच्या मृत्युपूर्वी काही दिवस आधी भेट दिल्याची एक स्मृती सांगितलीय.* त्यांना दिलेल्या अभिव्यक्तीमध्ये(मुलाखत) नेहरुंनी प्रामाणिकपणे मी अपयशी राज्यकर्ता आहे असे मान्य केलंय. ते लेखक लिहितात...

*"I found the once energetic Prime Minister walk with a slow, halting gait.*

नेहरुंना पक्षाघात अर्थात अर्धांगवायु झाला होता हे लिहिताना ते म्हणतात

*"The Paralysis was very evident. He walked as if he was on the age of precipice. His shoulders were bent as if under a heavy burden. But his eyes were clear."*

*"You have before you a statesman who has failed."*

*गांधी एक विक्षिप्त नि ढोंगी म्हातारा - इति नेहरु*

*Gandhi - an awful Old Hypocrite - Nehru*

*१९५९ मध्ये लेस्टर पीअर्सन (Lester Pearson) ह्या कैनेडियन* राज्यकर्त्याशी संवाद करताना नेहरु

ज्या नेहरुंनी आयुष्यभर गांधींवर स्तुतीसुमने उधळली, पंतप्रधानपदासाठी त्यांना ब्लैकमेलही केलं, त्याच गांधींची संभावना नेहरुंनी उपरोक्त शब्दांत केलीय.

संदर्भ - *Gandhi and Nehru by Dr. S C Gangal, Director of Gandhian Studies, JNU*

*Indian Express dated 29.03.1993*

उपरोक्त सर्व संदर्भ टाईम्स ऑफ इंडिया नि इंडियन एक्स्प्रेस ह्या नामांकित वृत्तपत्रांतले आहेत.

अस्तु।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#नेहरु_अपयशीराज्यकर्ता_बालदिन_गांधीनिंदा_चीनयुद्ध_TimesofIndia_IndianExpress_JNU

Saturday 9 November 2019

संकल्प श्रीवाल्मीकि रामायणाच्या अध्ययनाचा!






*यावत्स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महितले।*
*तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति।*
बालकांड - २।३६-३७

आज श्रीराममंदिराचा निर्णय झाला. आपल्या सर्व हिंदुंची मनोकामना पूर्ण झाली. त्या आनंदाने एक श्रीरामभक्त म्हणून नि हिंदु म्हणून श्रीरामचंद्राचे प्रामाणिक चरित्र असे महर्षि श्रीवाल्मीकिरचित रामायण अभ्यासण्याचा संकल्प आपण सर्व हिंदुंनी करण्यांस कोणताही प्रत्यवाय नाही.

रामायण वाचावे तर महर्षि श्रीवाल्मीकिंचेच ह्यात संदेहच नाही. अन्य कुणाचेही रामायण वाल्मीकिंच्या अनुकूल तितकेच प्रमाण मानावं हाही एक शास्त्रमान्य सिद्धांत आहे. त्यामुळे वाल्मीकि रामायणाचा अभ्यास म्हणजे नेमकं काय ह्याचा विचार करणे प्रस्तुत लेखाचा विषय आहे.

श्रीवाल्मीकि रामायणाची रचना

*चतुर्विंशति सहस्त्राणि श्लोकानामुक्तवान् ऋषिः।*
*ततः सर्गशतान् पञ्च षट् काण्डानि तथोत्तरम्।*
बालकाण्ड - ४।२

ह्या श्लोकानुसार रामायणांत २४,००० श्लोक असायला हवेत व पाचशे सर्ग व सहा काण्ड हवेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड अशी सहा कांड रचना हवी.

पण पण पण...

सांप्रत रामायणाच्या कुठल्याही प्रतीत सात कांड आढळतात, २५,००० हून अधिक श्लोक आढळतात व ६५८च्या समीप सर्ग आढळतात.

ह्यावरूनंच वाल्मीकि रामायणांत मधील काळांत प्रचंड प्रक्षेप झालेले आहेत हे सिद्ध आहे. अर्थात ज्याला सत्य स्वीकारायची मानसिकता आहे, त्यालाच हे कळेल.

*व्याकरणशास्त्र दृष्ट्या रामायणाची समीक्षा*

महर्षि वाल्मीकिंनी अनुष्टुप छंदामध्ये रामायणाची रचना केलीय. सांप्रतच्या रामायणाच्या कोणत्याही प्रतींत शेकडो श्लोक असे आहेत की जे अनुष्टुप छंदाचे नियमंच पाळत नाहीत. असे सर्व श्लोक प्रक्षिप्त समजावेत असे ज्यांची जन्मशताब्दी ह्यावर्षी आहे असे नागपूरचे महामहोपाध्याय श्रीबाळशास्त्री हरदास त्यांच्या 'रामायण नि महाभारतकालीन राज्यव्यवस्था' ह्या ग्रंथांत म्हणतात. त्यांची ही भूमिका अत्यंत मान्य होण्यासारखी आहे.

ह्यात उत्तरकांडही सातवे कांड म्हणून जोडलं गेलंय. उपरोक्त श्लोकातल्या उत्तर शब्दावरून उत्तरकांडाचा बोध घेणं व्याकरणशास्त्रांसही धरून होत नाही. ह्यावरूनंच मूळ वाल्मीकि रामायणांत सहाच कांड अर्थात युद्धकांड इथपर्यंतंच रामायण होते हे सिद्ध होते. एरवी प्रक्षेप शब्द उच्चारला की ईंगळी डसल्याचा अनुभव करणार्या काही सनातनी विद्वानांनी मात्र हा उपरोक्त श्लोकही प्रक्षेप ठरविण्याचा अट्टाहास केला आहे. उत्तरकांड प्रक्षिप्त आहे की नाही ह्यावर अत्यंत विस्ताराने चिंतन अपेक्षित आहे. हे एका लेखाचं किंवा लेखमालेचं किंवा एका ग्रंथाचंही काम नाही. ह्यावर खंडच्या खंड लिहिता येतील इतका विस्ताराचा विषय असल्याने आणि त्यासाठी काळही तितकाच हवा असल्याने भविष्यांसाठी हा विषय इथेच सोडतो...

वाल्मीकि रामायणाचे भारतात सांप्रत चार पाठ प्रचलित आहेत. पश्चिमोत्तर शाखा, वंग शाखा गोरेशियाचे संस्करण (Gorresio's edition), दाक्षिणात्य संस्करण (कुम्भकोणम् संस्करण) आणि उत्तर भारताचे (काश्मीरि) संस्करण. यात दाक्षिणात्य तथा औदिच्य संस्करण एकजुळते असून अगदी नाममात्राचाही फरक नाही. पश्चिम-पूर्व संस्करणामध्ये अध्यायांचे अंतर व श्लोकांचेही आहे पण त्यावर कोणतीही संस्कृत टीका मिळत नाही. वंग शाखेवर केवळ एकमात्र (लोकनाथ रचित मनोरमा) टीका मिळते. म्हणून दाक्षिणात्य संस्करणाचाच (म्हणजे औदिच्य) सर्वत्र प्रचार आणि प्रामाण्य मानलं जातं. ते मानावं की नाही हा विषय वादाचा आहे.

*श्रीवाल्मीकि रामायणावरील आतापर्यंतचं प्रमुख संस्कृत भाष्य किंवा संस्कृत टीका*

वाल्मीकि रामायणावर ज्या तीन प्रमुख संस्कृत टीका आजपर्यंत झाल्या आहेत त्यात.

१. राम ह्या भाष्यकाराने केलेली तिलक टीका
२. शिवसहाय ह्याने केलेली रामायण शिरोमणी
३. गोविंदराज ह्याची भूषण ही टीका

ह्यापेक्षा अधिक आहेतंच पण मूळ अध्ययनाच्या दृष्टीने प्रमाण मानाव्यांत अशातल्या ह्या तीन प्रमुख आहेत.

गत काही वर्षांत श्रीमद्वाल्मीकि रामायणाच्या ह्या अध्ययनाच्या दृष्टीने आमच्या पाहण्यात आलेले काही निम्नलिखित ग्रंथ

१. वाल्मीकि रामायणावरील उपरोक्त तीन संस्कृत टीका
२. १९६० मध्ये बडौद्याच्या सयाजीराव गायकवाड प्राच्यविद्या संशोधन केंद्राने २००हून अधिक अशा विविध भाषांतल्या नि विविध लिपींतल्या प्रतींचे चिकीत्सक अध्ययन करून प्रकाशित केलेली वाल्मीकि रामायणाची सप्तखंडात्मक चिकीत्सक प्रत - संपादक - जी एच भट्ट (Critical Edition of Valmiki Ramayana)
३. गौरेशियाचे अर्थात वंगशाखीय वाल्मीकि रामायण
४. पश्चिमोत्तर वाल्मीकि रामायण - पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कॉलर व विश्वबंधु व राम लभय्या ह्यांनी दयानंद एंग्लो-वैदिक महाविद्यालयीन मालिकेतून प्रकाशित केलेलं (North-Western Recension)
५. गीताप्रेस गोरखपूरने प्रकाशित केलेली वाल्मीकि रामायणाची द्विखंडात्मक संस्कृत हिंदी प्रत
६. वेदमहर्षि श्रीपाद दामोदर सातवळेकर ह्यांनी दहा खंडात प्रकाशित केलेली संस्कृत मराठी प्रत - समालोचना सहित
७. वैदिक विद्वान वाईचे कृष्णशास्त्री लेले उपाख्य महाराष्ट्रीय नावाचे ह्यांनी केलेले संस्कृत मराठी भाषांतर व समालोचनाचे खंड
८. चतुर्वेदी द्वारिकाप्रसाद शर्मा कृत वाल्मीकि रामायण समग्र संस्कृत हिंदी भाष्य
९. विदर्भ मराठवाडा बुक एंड कंपनीने प्रकाशित केलेलं पंचखंडात्मक संस्कृत मराठी भाष्य व समालोचना

उपरोक्त सर्व साहित्य सुदैवाने पीडीएफही आहे. त्यातलं शेवटचं विदर्भचे मात्र टंकलिखित आहे.

उपरोक्त सूची आमच्या अल्पाध्ययनांस प्राप्त झालेली आहे. ह्यापेक्षाही अधिक चिकीत्सक नि अभ्यसनीय प्रती कुणाच्या पाहण्यांत असतील तर त्या आमच्या निदर्शनांस आणून द्याव्यांत ही नम्रतेची विनंती.

आम्ही चिकीत्सक अभ्यासाच्या दृष्टीनेच हा लेख लिहिला असून हिंदुंनी निदान एक तरी प्रत अभ्यासासाठी उद्युक्त व्हावं हीच प्रामाणिक इच्छा आहे.

संभव झाल्यांस रामायणाच्या दोन सर्गांचे तरी प्रत्यही अध्ययन करावं. ज्याने वर्षभरांत संपूर्ण रामायण अर्थासहित अभ्यासून पूर्ण होईल.

हा संकल्प ज्यांना घ्यायचाय त्यांनी अवश्य घ्यावा.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्राच्या चरणी कृतानेक साष्टांग दंडवत!

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#वाल्मीकिरामायण_अध्ययन_प्रक्षेपानुसंधान_श्रीराममंदिर_सातवळेकर_संस्कृत_गीताप्रेस_वैदिकधर्म

Wednesday 9 October 2019

धर्मजिज्ञासेंत वेदंच सर्वोच्च प्रमाण


*धर्मजिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः।*
मनुमहाराज

धर्मजिज्ञासेमध्ये श्रुती अर्थात वेद(च) प्रमाण आहे...

हा लेख केवळ नि केवळ धर्मजिज्ञासा ह्याविषयी काय प्रमाण मानावं येविषयीं आहे.

कुणी काय प्रमाण मानावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय पण आमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आम्ही वेदांच्या चार संहिताच सर्वोच्च नि एकमेव प्रमाण मानतो. त्यात यजुर्वेदाचा केवळ शुक्ल यजुर्वेदंच. कृष्ण मूळीच नाही.

आम्ही आमची सैद्धांतिक प्रमाण विचारधारा स्पष्ट करताहोत.
आम्हांस वेद अर्थात श्रुतीच आयुष्यांत सर्वोच्च नि एकमेव प्रमाण आहे.

वेद हे मानवसृष्ट्यारंभी ईश्वराने मनुष्यांस प्रदत्त ईश्वरीय ज्ञान आहे जे संहितारुपी आहे. आमच्या ऋषिमूनींवर आमचा पूर्ण विश्वांस आहे.

ह्या वेदांना आकळणं कठीणांत कठीण असल्याने ह्या अष्टधा विकृतीने संरक्षित अशा अपौरुषेय चतुर्वेदांवर आमच्या प्राचीन ऋषीमूनींनी जे आर्ष ग्रंथ निर्माण केले, त्यामध्ये वेदांवरील व्याख्यानरुपी ग्रंथ असे ब्राह्मणग्रंथ की जे पौरुषेय साहित्य आहे, भले सनातनी परंपरेत त्यांस अपौरुषेय वेद मानण्याची परंपरा असेलही, त्याचं खंडनही झालंच आहे, पण असो. ह्याच ब्राह्मणग्रंथांचा भाग असलेली अशी एकादशोपनिषदे, आरण्यके आदि आर्ष ग्रंथ. तसेच कल्पसाहित्य अर्थात सर्व सूत्र ग्रंथ, सर्वानुक्रमणिका, प्रातिशाख्य ग्रंथ वगैरे वगैरे वैदिक साहित्याशी संबंधित विचार...

ह्यातंच पुढे आली ती षड्वेदाङ्गे नि त्यावरील आर्षग्रंथ, षड्दर्शने नि त्यावरील उपलब्ध व्यास-शबप-वात्सायनादिंची आर्ष भाष्ये...

ह्यात कालक्रमाच्या दृष्टीने मागे-पुढे झाले असेल तर क्षमस्व...

असा एकुण वैदिक साहित्याचा विस्तार आहे.

अन्य सर्व ग्रंथ आर्ष अर्थात ऋषिमूनिकृत की ते जे नि जितके वेदानुकूल आहेत, तितकेच ते आम्हांस प्रमाण आहेत. मग ते कुणाचेही असोत. कुणाचेही. कुणाचेही...!

चार वेद हे स्वतः प्रमाण आहेत हे सर्वच शास्त्रकारांचे मत असल्याने त्यांविषयी काही संदेहंच नाही. त्यामुळे त्यांना इतर प्रमाणांची आवश्यकताच नाही.

अन्य सर्व ग्रंथ हे परतः प्रमाण असल्याने ते वेदानुकूल तितकेच प्रमाण आहेत.

धर्मशास्त्राध्यनाच्या दृष्टीने ही ग्रंथमाला आम्हांस प्रमाण आहे व्यक्तिशः. व्यक्तिशः हा शब्द महत्वाचा आहे.

सुदैवाने ह्या सर्वांचं आमचं अध्ययन गेल्या सहा-सात वर्षांत झालेलं असल्याने नि ते आयुष्यभर अगदी आमरण सुरुच राहणार असल्याने वेदांविषयी आमची निष्ठा ही अशी आहे. ह्यात कालत्रयीही परिवर्तन होणार नाही.

ह्याचा अर्थ धर्मशास्त्रासंबंधी किंवा अध्यात्मासंबंधी उपरोक्त साहित्य सोडून अन्य कोणत्याही ग्रंथांचा आम्ही धिक्कार करतो किंवा त्यांस नाकारतो असे मूळीच नाही. त्या अन्यसर्व ग्रंथांमध्ये किंवा साहित्यामध्ये जे जे वेदानुकूल किंवा वैदिक सिद्धांतांच्या अनुकूल असेल, तितकं आम्ही ग्राह्य समजतो. नाही ते त्याज्य समजतो...!

मग त्या स्मृत्या असोत, रामायण-महाभारतासारखे ग्रंथराज असोत किंवा अगदी पुराणादि साहित्य असो...

हे सर्व वेदानुकूल नि वैदिक सिद्धांतानुकूल तेवढेच आम्हांस ग्राह्य आहे.

ही आमची भूमिका आमरण अशीच राहील...

ह्याची कारणमीमांसा आम्ही पूर्वीही स्पष्ट केलीय तरीही पुनश्च सांगतो...

महाभारतकालापर्यंत तरी हे राष्ट्र वेदांनाच सर्वोच्च प्रमाण मानत होते. महाभारतकाली आज जे परस्परविरोधी संप्रदाय विद्यमान आहेत, त्यातल्या एकाचाही लवलेश आपल्याला दिसत नाही. म्हणजेच महाभारतकालापश्चातंच वेदांचा त्याग झाल्याने हे सर्व विविध संप्रदाय नि विचारधारा उगम पावल्याहेत हे लक्ष्यीं येतं. जर आपण पुन्हा वेदांकडे वळलो तर आपल्यातले सर्व मतभेद नष्ट होऊन एकवाक्यता येईल...
पण दुर्भाग्य असे आहे की कुणालाच हे नकोय...अस्तु।

काही जण शंका घेतील की अशाने हिंदु धर्म अब्राहमिक पैशाच पंथांसारखा एकग्रंथी होईल...

अशांना आम्ही विचारु इच्छितो की वेद हे सर्व मानवजातीसाठीच नव्हे तर विश्वासाठी कल्याणप्रद आहेत. वेदांची तुलना अन्य टुकार ग्रंथांशी करणे ह्यासारखा अविवेक नाही. हिंदुंनी प्रत्येकाचे आपलं वेगळं मत मांडल्याने इतिहासापासून आजपर्यंत काय गोंधळ उडालाय हे आम्ही वेगळं सांगायची आवश्यकता नाही.

आणि हाच न्याय भारतीय राज्यघटनेला लावला तर कसे होईल???

आम्ही भारतीय राज्यघटनाही इतर विषयांत प्रमाण मानतोच पण धर्म जिज्ञासेंत ती काहीच मार्गदर्शक नाही. नाहीच...
आणि हो..स्वयंघोषित कथित अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या बुद्धिवाद्यांनी तर इकडे येऊही नये.

आम्ही केवळ आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे सांगितलं. तुम्हीही हेच मानावं असा आमचा अट्टाहास तर मूळीच नाही. प्रत्येकाचे विचारस्वातंत्र्य...

केवल एकंच विनंती की उपरोक्त साहित्य स्वतः मूळात न अभ्यासता आम्हाला कुणी शिकवायला येऊ नये...यायचंच असेल तर सप्रमाण नि ससंदर्भ या...स्वागतंच आहे...!

हे प्रथम आणि अंतिम...ह्यांस कुणी आमचा अहंकार समजला तरी चालेल... !

यदि वेदाः प्रमाणं स्युः जीवेयं।
श्रीकुमारिलभट्टपाद

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#वेदप्रामाण्य_धर्मजिज्ञासा_उपनिषदेआरण्यके_रामायण_महाभारत_राज्यघटना

Tuesday 8 October 2019

*बलात्कारी आणि स्त्रीद्वेष्ट्या रावणाचे सत्यस्वरुप*



रावण नेमका कोण होता ते पाहुयांत.

स्त्रियांचे अपहरण करणारा नि ऋषिमूनींची हत्या करणारा रावण👇🏻

बालकांड - सोळावा सर्ग - श्लोक ७वा



यज्ञ नष्ट करणारा रावण👇🏻

बालकांड - विसावा सर्ग - १८-१९वा श्लोक



रावण सीतेला मारण्यासाठी तिच्यावर तलवार घेऊन गेला👇🏻
रावणाचे सीतेला अभद्र नि अर्वाच्य शब्द बोलणं👇🏻

युद्धकांड ९२वा सर्ग - ३४ ते ४० वा श्लोक आणि ४४ ते ४८वे श्लोक


ब्राह्मणांचा आत्यंतिक हत्याकांड करणारा रावण👇🏻

अरण्यकांड ३२वा सर्ग - २०-२१वा श्लोक


रावणाने अनेक स्त्रिया उचलून आणणे👇🏻

अरण्यकांड - सर्ग ४७, श्लोक २८


रावणाने सीतेचे बलात्काराने नि क्रूरपणे अपहरण करणं👇🏻

अरण्यकांड ४९वा सर्ग - १५-२०वा श्लोक



रावणाने आपल्या सूनेवर रंभेवर केलेला बलात्कार👇🏻

उत्तरकांड २६ वा सर्ग - २८-२९वा श्लोक, ४२-४३वा श्लोक




रावणाने अनेक स्त्रियांचे अपहरण करणं 👇🏻

उत्तरकांड - २५वा सर्ग - १४-१७ श्लोक




रावणाने आपल्या बहिणींस म्हणजे शूर्पणखेंस विधवा केलं. तिच्या नवर्याचा तरवारीने वध केला.

उत्तरकांड २३वा सर्ग - १८वा श्लोक


असा हा रावण होता.


*संलग्न चित्रे आहे त्यात सर्व संदर्भ पहावेत ही विनंती.*

संदर्भ - गीताप्रेस गोरखपूरचे वाल्मीकि रामायण भाष्य

पाखण्ड खण्डिणी 
Pakhandkhandinee.blogspot.com

#बलात्कारीरावणाचेसत्यस्वरुप_दसरा_विजयादशमी_रावणदहन_रामायण