Wednesday 19 July 2017

मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिना ! जगद्गुरु तुकोबाराय



मार्क्सवादी, साम्यवादी, समाजवादी ह्यांचे एक ठरलेलं असतं. ह्यांचा इतिहासच आहे हा. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यासाठी आयुष्य दिलं, त्यांची (कु)विचारसरणी व कार्य वाढविलं, त्यांच्याच पाठीत नंतर सुरा खुपसायचा. कसा? तर त्यांनी भविष्यात जर कधी हिंदु धर्म, वेद, गीता किंवा तत्सम कोणत्याही ग्रंथांची किंवा हिंदुधर्मपरंपरांची स्तुती केली किंवा तिचे आचरण केलं तर लगेचच त्यांस आंग्ल भाषेत डिसओन (disown) करायचं. म्हणजे त्यांची हकालपट्टी करायची. मग भले त्या मनुष्याने आयुष्यभर कितीही निष्ठेने ह्या विषवल्लीची सेवा केली का असेना.

खरंतर जगभरात ९.८ कोटी लोकांचे सरसकट अकारण हत्याकांड करणार्या मार्क्सवाद्यांकडून किंवा साम्यवाद्यांकडून आणखी काय अपेक्षा करायची म्हणा??? जिज्ञासूंनी "दि ब्लैक बुक ओफ कम्युनिझम" हा ग्रंथ वाचावा. आंतरजालावर (इंटरनेटवर) प्राप्त होईल.

एकीकडे आम्ही धर्म व ईश्वर नाकारतो म्हणणार्यांनी मार्क्सलाच देव बनविला. माझ्या आधीच्याच एका लेखांत म्हटल्याप्रमाणे मार्क्स हा मुळातच ईश्वरनिष्ठ व ख्रिस्तीपंथाचा प्रसारक होता. जिज्ञासूंनी त्याचा १८५७ वरचा ग्रंथ वाचावा.

मार्क्सचा प्रचंड भारतद्वेष व हिंदुधर्मद्वेष

१८५७चे स्वातंत्र्यसमर ब्रिटीशांना चिरडून टाकण्यासाठी प्रोत्साहित करणारा व भारतात पाववाल्या ख्रिस्ताचा प्रचार करण्यासाठी उद्युक्त करणारा मार्क्स ह्या लोकांचा आदर्श असतो ह्यातच सर्व काही आले.

मार्क्सवाद्यांनी, साम्यवाद्यांनी, समाजवाद्यांनी भारतातल्या महापुरुषांविषयी काय उद्गार काढले आहेत ते आपण पाहुयांत. त्यांनी महापुरुषांना घातलेल्या शिव्या

गांधींजीविषयी- a senile Old man

साम्यवादीच असलेल्या नेहरुंविषयी - a running dog of Imperialism

थोड्या समाजवादी असलेल्या सुभाष बाबूंविषयी - a traitor, a stooge, a goonda, a puppet, an agent of Hitler and Tojo, agent of Foreign Invaders etc.

समाजवादी जयप्रकाशजींविषयी - as above.

आश्चर्याची गोष्ट ही की उपरोक्त एकही हिंदुत्वनिष्ठ गटांतला नाही सावरकरांसारखा किंवा टिळकांसारखा. त्यांची तर गोष्टच नको.

ज्या नेहरुंनी आयुष्यभर मार्क्सवाद व साम्यवादाची पाठराखण केली त्यांनाच चीनच्या आक्रमणानंतरची साम्यवाद्यांनी केलेली शिवीगाळ जगजाहीर आहे. चीनशी हातमिळवणी करून मार्क्सवाद्यांनी केलेला देशद्रोह जगजाहीर आहे. त्या आक्रमणात जणु चीनचा काही दोषच नाही असे सर्व तत्कालीन मार्क्सवादी व साम्यवादी बोलत होते. आश्चर्य म्हणजे एका पाश्चिमात्य पत्रकारांस नेहरु ह्या आक्रमणानंतर काय बोलले होते हे वाचल्यावर नेहरुंची हतप्रभता लक्षात येते. आयुष्यभर गांधींना मानणारे नेहरु शेवटी त्यांस

गांधी - an awful old hypocrite

अशा शेलक्या विशेषणांत संभावना करतात ह्यातच त्यांना त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता व हतप्रभता व अपराधीपण झाल्याचे दिसून येतं. स्वत:विषयी
You are meeting a failed Statesman

आता कॉ. डांगेंचे पाहुयांत.

डांगे हे भारतीय साम्यवादी पक्षाचे संस्थापक ! त्यांनी लिहिलेला
India - From Primitive Communism to Slavery
हा ग्रंथ मार्क्सवाद्यांना अगदी प्रमाण असतो. ग्रंथाची समीक्षा बाळशास्त्री हरदासांनी त्यांच्या "वेदांतील राष्ट्र दर्शन" ह्या पुण्यपत्तनीच्या व्याख्यानमालेत केली आहे. ग्रंथरुपाने तो द्विखंडात मामाराव दातेंनी प्रकाशितही केलाय. स्कैन्ड स्वरुपांत तो डिजिटल वर उपलब्ध ही आहे. प्रथम खंडात आहे समीक्षा.

इतिहासाचार्य  रावाड्यांच्या शेवटच्या अतिशय विकृत अशा " भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" ह्या ग्रंथाची प्रस्तावनाच त्यांची आहे. मुळात हा ग्रंथच अपूर्ण आहे. त्याची सविस्तर समीक्षा आम्ही योग्यवेळी करुच. पण आश्चर्य म्हणजे हिंदुद्वेष्टे लाल पावटे किंवा विद्रोही वगैरे सर्व लोक राजवाड्यांचाच हाच ग्रंथ नेहमी पुढे करतात. इतर साहित्य मात्र सोयीस्कर डोळेझाक. ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला म्हणून बोंबा मारायच्या पण सोयीस्कर राजवाडे उचलायचे. ह्यालाच आजच्या भाषेत पू-रोगामित्व म्हणतात. असो तर ह्याच डांग्यांची नवा काळच्या खाडिलकरांनीही एक आठवण सांगितलीय की त्यांचे लेखन वाचून पूर्वीचे भारतीय मार्क्सवादी पक्षाचे संस्थापक असे कॉ. श्रीपाद अमृत डांगे एकेदिवशी त्यांना बोलावून म्हणाले की तु फार छान लिहितोस. तुला आणखी एक सांगतो.

वैदिक षड्दर्शनांपैकी सांख्यदर्शनातच आजच्या आधुनिक अणुध्वमचे रहस्य आहे. वैदिक विज्ञान श्रेष्ठ आहे.
इति डांगे खाडिलकरांना उद्देश्युन

आणखीही असे काही प्रसंग घडल्यावर लगेचच लाल पावट्यांनी त्यांना बहिष्कृत केलं...कारण त्यांनी सगळ्यांच्या बाबतीत हेच केलंय व करतात व करतही राहतील.
.

प्रा. नरहर कुरुंदकर

आचार्य म्हणण्याइतके ते योग्यतेचे वाटत नाहीत. कारणमीमांसा कधीतरी स्पष्ट करेन. पण आयुष्यभर स्वत:ला मार्क्सवादी म्हणविणारे कुरुंदकर ह्याच द्वेषाला बळी पडले. पुढे कुरुंदकरांना पण तेच भोगावं लागलं. मुलाची सोवळ्यात मुंज लावल्याने त्या लाल पावट्यांनी त्यांनाही नेहमीप्रमाणे झिडकारलं.

जे आधी स्वत: साम्यवादी होते त्यांनाही त्यांनी तेच केलंय. डांग्यांच्या बाबतीतही तेच. नेहरुंच्याही तेच. कुरुंदकरांच्याही तेच

सीता राम गोयलांनी म्हणूनच "नेताजी अँड द सीपी आय" नावाने ग्रंथ लिहिलाय. त्यात सुभाषबाबूंना साम्यवाद्यांनी किती यथेच्छ शिव्या दिल्यात ते लिहिलंय.

पाकिस्तानच्या मदतीला सुईणीसारखे धाऊन जाणारे हे लाल पावटे. म्हणूनच एक साम्यवादी असणारे पण नंतर त्यांस वैतागलेले ख्वाजा अहमद अब्बास त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात

Who killed India? India was killed by the Communist Party of India which provided the Muslim separatists with an ideological basis for Irrational and Anti- national demand for Pakistan. Phrases like homeland,  nationalities, self-determination., etc were  all the ammunitions supplied by the Communists to the legion of Pakistan.

Page no. 281 - I am not an Island - An Experiment in autobiography by Khwaja Ahmed Abbas
1977 - New Delhi
संदर्भ - Gandhi's Assassination - Prof. Makkhan Lal - India First Foundation, New Delhi

मार्क्सवाद्यांचा पाकिस्तानच्या निर्मितीला असलेला पाठिंबा तर जगजाहीर आहे.

आता समाजवाद्यांचे पाहुयांत



गांधीवाद मार्क्सवादाची सांगड घालणार्या सत्याग्रही समाजवादाचे मूल लेखक व प्रवर्तक हे शंदा जावडेकर पण त्यांचे पुरस्कर्ते आचार्य(???) भागवतांचे समग्र साहित्य महाराष्ट्र राज्य साहित्य नि सांस्कृतिक महामंडळाने प्रकाशित केलंय तीन खंडात. संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. ते गांधींचे नि:स्सीम भक्त. एकीकडे समाजवादाच्या गप्पा ठोकणारे हे लोक सर्व हिंदुंच्या सहभोजनांना मात्र विरोध करायचे. ब्राह्मणांच्या पंगती वेगळ्या असाव्यांत ह्या विचाराचे ते आग्रही होते. गांधीजींनी साबरमती आश्रमाची नियमावली करताना तर सहभोजन करुच नये अशी आरंभी स्पष्टपणे आश्रमात नियमावली ठेवली होती. ते म्हणतात

"हा आश्रम वर्णाश्रम धर्मपूर्ण मानणारा आहे. जातीभेदामुळे नुकसान झालेले नाही, उलट फायदाच पुष्कळ झालेला आहे. एकत्र बसून जेवल्याने मातृभाव यत्किंचितही वाढत नसतो. भोजनही दुस-या अनेक दैनिक व्यवहारांप्रमाणेच, एकांतातच झाले पाहिजे."

संदर्भ - अवंतिकबाई गोखले लिखित " महात्मा गांधी" मुंबई, १९१८ - पृष्ठ क्रमांक ९२

 शं दा जावडेकर हे त्यांच्या एका ग्रंथात "गांधी व टिळक" मध्ये सावरकरांवर यथेच्छ तोंडसुख घेताना टिळकांची स्तुती करताना त्यांचे तथाकथित मुस्लीमप्रेम दर्शविण्याचा अट्टाहास दाखवितात. टिळकांचा लखनऊ करार व त्यांचे

"उद्या ब्रिटीश गेल्यावर येणारे मुस्लिमांचे राज्य हे मी १००% स्वदेशी मानतो."

हे टिळकांच्या कुठल्यातरी एका भाषणांच्या खंडातले वाक्य उद्धृत करून टिळकांची स्तुती करताना सावरकरांना त्यांच्या हिंदुत्वनिष्ठेसाठी शिव्यांची लाखोली वाहतात.

ह्याला म्हणतात समाजवाद ! आणखी काय लिहावं ? राम मनोहर लोहियांचे उदाहरण ही बोलकं आहे. (संदर्भ - ज्ञानयुक्त क्रांतियोद्धा - ज द जोगळेकर)

दुर्दैव हे की हे सर्व दिसत असूनही हे लोक साम्यवाद, समाजवाद, मार्क्सवादाकडे का वळतात हे कळत नाही. थोडक्यात काय तर थोडं आपल्याविरोधात गेलं की लगेचच त्यांस बहिष्कृत करायचं. तरीही लोक साम्यवाद, समाजवादाच्या नादी कसे काय लागतात कुणास ठाऊक ???

गोडगोड शब्द बोलायचे, समता, स्वातंत्र्य, न्याय, वगैरे गप्पा हाणायच्या, पण वास्तवात मात्र विरोधात गोले की लगेचच बहिष्कृत करायचं. शोषण, शोषित, शोषक, वगैरे मार्क्सवादी विचारसरणीच्या तथाकथित क्लास स्ट्रगल अर्थात तथाकथित वर्गसंघर्षाच्या खोट्याच कथा तरुणांच्या माथी मारायच्या व माथी भडकवायची.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच मार्क्सवाद्यांची केलेली निर्भ्रर्त्सना जगजाहीर आहे. अर्थात दुर्दैवाने आता बाबासाहेबांनाच मार्क्सवादी ठरविण्याचा अट्टाहास सुरु आहे ही गोष्ट लपून राहिलेली नाही. कम्युनिस्टांपासून सावध राहा असे टाहो फोडून बाबासाहेब समाजबांधवांस समजावून सांगत असताना त्यांनाच त्याच (कु)विचारसरणीत गोंदविण्याचा प्रयत्न किती निंदनीय आहे हे वेगळं सांगायला नकोच. सविस्तर ह्यावर कधीतरी लिहीनच. तूर्तास लेखणींस विराम !

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

©तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com