Tuesday 13 September 2022

राष्ट्रीय हिन्दी दिवस पर कुछ चिन्तन...

 



गत कई वर्षोंसे मुख्यरुपसे वैदिक साहित्यका अध्ययन मूलतः संस्कृत एवं हिंदीभाषामें सौभाग्यप्राप्त विषय रहा है। एक समय था मातृभाषा मराठी होनेके कारण जिसकालमें पुणेके सिम्बायोसिस कला एवं वाणिज्य महाविद्यालयमें प्रवेश पश्चात् महाविद्यालयीन अमराठी सहाध्यायीयोंसह हिंदीमें वार्तालाप करनें हम कठिनाईयाँ अनुभव करतें थे। सौभाग्यसे चन्द्रप्रकाश द्विवेदीजीकी चाणक्य नामक धारावाहिकका अवलोकन प्राप्त हुआ उस समयसे हिंदी भाषाके प्रति रुचि निर्माण एवं वृद्धिंगत हुई। हम ऋणी है उस ऋषिश्रेष्ठ यतिवर महर्षि दयानन्द के एवं उनसे स्थापित आर्यसमाज एवं उनके विद्वानोंके जिन्होनें हिन्दीभाषा को पाश्चात्य भाषाओंसे मुक्त कर संस्कृतनिष्ठ मूलस्वरुपता प्रदान करनेका महत्कार्य किया।


आर्यसमाज का हिंदी भाषाको योगदान यह एक स्वतन्त्र विषय है जिसपर किसी एक विदुषीने आचार्यपदप्राप्त हेतु प्रबन्ध का निर्माण किया है। विस्तारसे इस विषयपर भविष्यमें यदि संभव हो तो लेखन करेंगे। *स्वयं स्वातन्त्र्यवीर सावरकरजीने महर्षि के कार्य का गौरव* करते समय लिखा है की 


 "महर्षि दयानन्द द्वारा लिखित सत्यार्थ प्रकाश में जिस हिन्दी के दर्शन हमें प्राप्त हैं, वहीं हिन्दी हमें स्वीकार है। यह सरल, अनावश्यक विदेशी शब्दों से अलिप्त होकर भी अत्यन्त अर्थ वाहक तथा प्रवाही है। महर्षि दयानन्द ही सर्वप्रथम नेता थे, जिन्होंने 'हिन्दुस्तान के अखिल हिन्दुओं की राष्ट्र भाषा हिन्दी है ऐसा उद्घोष व प्रयास किया था."


(सन्दर्भ-वीर वाणी पृष्ठ ६४)


इसका प्रत्यय महर्षीकें ग्रन्थोंका अध्ययन करनेपश्चात् सहजतासे प्राप्त है। उनके पश्चात भारतेन्दु हरिश्चन्द्र, महावीरप्रसाद द्विवेदी, जयशंकरप्रसाद, सुमित्रानन्दन पन्त आदि विद्वानोंको हिन्दी भाषा के विकास एवं वृद्धिकें विषयमें अधिकारी कहना आवश्यक है । 


यहाँ यह कह देना कोई अत्युक्ती नहीं होगी प्रथम वार हम महर्षीके एवं सावरकरजीके कथन से असहमती प्रकट करते है । हम तो संस्कृतभाषा कोही राष्ट्रभाषा का सम्मान प्राप्त करना इच्छुक है, नाकी हिन्दी अथवा अन्य कोई भाषाको । अस्तु वह स्वतन्त्र विषय है । संस्कृतही राष्ट्रभाषा होना आवश्यक है यह डॉ. भीमराव अम्बेडकरजीका भी मन्तव्य था ।


हिन्दी का स्वरुप एवं विकास


पण्डित भगवद्दत्त, रिसर्च स्कॉलर, बीए, उनके "भाषा का इतिहास" इस अभ्यासपूर्ण ग्रन्थमें यह प्रतिपादन करते है की हिन्दीभाषा के ६५% शब्द मूलरुपसे साक्षात संस्कृत अथवा उसके अपभ्रंश रुपसे है। इसकी लिपी देवनागरी जिसमें ५२ अक्षर है, जिसमें १४ स्वर एवं ३८ व्यञ्जन है। गुरु ग्रन्थसाहिब में इस भाषा का नाम बावनी ऐसा लिखा है, हिन्दी नाम पश्चात् का है। इसमें संस्कृत के स्वर स्पष्टरुपसे दर्शित होते है इस कारण हिन्दी का संस्कृतसे घनिष्ट सम्बन्ध स्पष्ट है। यद्यपि हिन्दी भाषापर सबसे अधिक प्रभाव संस्कृत का है तथापि प्राकृत, अपभ्रंश, अवधी, ब्रज, फारसी, तुर्की, अरबी आदि भाषायोंकाभी है। विक्रम संवत १००० से इस भाषा का विनियोग होता आ रहा है। विक्रम संवत १२०० सें इसके साहित्यिक भाषा के प्रमाण प्राप्त होते है। गत दो शताब्दीयोमें इस भाषामें उत्तम परिमार्जन हुआ जिसका श्रेय उपरोक्त विद्वानोंको जाता है।


प्रयास तो यह होना आवश्यक है की हिन्दीभाषामें हुए इन विदेशी एवं भ्रष्ट भाषाओंके आक्रमण को नष्ट कर हिन्दी भाषामें अधिकतम् अधिक संस्कृतोद्भव शब्दोंकाही प्रयोग किया जाएँ। संस्कृतनिष्ठ हिन्दीकाही प्रचार एवं प्रसार हो। 


आज हिन्दीभाषा दिन के उपलक्ष्यमें हम यह दृढ संकल्प करेें की इस भाषा को पुन: उसका गौरव प्रदान करें तथा स्वयं इस भाषा कें संरक्षणमें कृतबद्ध होवें।


हिंदीभाषा भारतवर्ष की सर्वाधिक जनसंख्याकी भाषा होनेके कारण एवं उसका अस्मद् मराठीभाषा के प्रति सहसम्बन्ध के कारण हिंदीभाषामें संवाद करना तथा लेखन करना सौभाग्य का विषय है। जितना संभव हो विशुद्ध संस्कृतनिष्ठ हिंदी का आग्रहही श्रेय है। इसहेतु संस्कृतभाषा का अध्ययनभी हिंदीसह आवश्यक है।


हिंदीभाषा दिनके उपलक्ष्यमें इस राष्ट्रकी सांस्कृतिक एकात्मताहेतु इस भाषा को परकीय भाषाओसें मुक्त करनेका संकल्प हम करें।सांप्रत आङ्ग्ल भाषाके प्रति हो रहा अनाठायी अट्टाहास भारतीय भाषाओंके ह्रास का प्रमुख कारण है। यद्यपि आङ्ग्लभाषाका अध्ययन आवश्यक है, तथापि स्वकीय मातृभाषा एवं संस्कृत तथा तज्जन्य भारतीय भाषाओंके संरक्षण, संवर्धन तथा प्रचार-प्रसार का दायित्व एक भारतीय होनेके कारण प्रत्येक व्यक्तीकें स्कन्धोंपर है।


राष्ट्रीय एकात्मता दृढ करनेहेतु हम संकल्पबद्ध होवें।


भविष्यकालमें इस भाषा की सेवा करनेकी सन्धि ईश्वर हमें प्रदान करें यह प्रार्थना है।


आप सर्व भारतीयोंको हिंदी भाषा दिवस की हार्दिक शुभकामनाएँ।


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#हिंदीभाषादिवस_संस्कृत_अपभ्रंश_सावरकर_हिन्दुमहासभा_आर्यसमाज_राष्ट्रीयएकात्मता_राजभाषा

Monday 12 September 2022

आप्तस्तु यथार्थवक्ता|



*संप्रदायपूर्वक अध्ययन म्हणजे गुरुमुखातून अध्ययन का महत्वाचं आहे???*


कायंय की शास्त्रवचनांवर, ऋषीमुनींच्या वचनांवर आप्त म्हणून दृढ श्रद्धा ठेवण्यासाठी आपल्याही अंत:करणाची तितकी साधनेने सिद्धता व्हावी लागते. अहंकार तसाही आपल्याला हे करु देतंच नाही. आमच्या वेदोक्त धर्माविषयी आमच्या प्राचीन ऋषिमुनींनी जे काही सिद्धांत मांडून ठेवलेले आहेत ते आधी अभ्यासण्याची नि ते‌ समजून-उमजून घेऊन प्रसंगी अत्यंत डोळसपणे नि तर्कशुद्धपणे त्यांची चिकीत्साही करून योग्यवेळी आपल्या साधनेने आपल्याला त्यांची यथार्थता‌ पटायला लागते ही गोष्ट सहजसाध्य नसते. ती योग्यता यायला वेळंच लागतो. मूळात आपल्या शास्त्रामध्ये कुठल्याही गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवायला सांगितलेलाच नाहीये. अरे जिथे गुरुलाही गुरु मानण्यापूर्वी तपासून घ्यायला सांगितलंय व गुरु केल्यावरही त्याच्याकडून आपण सत्शास्त्रांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक ब्रह्मचर्य्यपूर्वक अध्ययन केल्यापश्चात् समजा तो गुरुच शास्त्रविरुद्ध आचरण करु लागला तर‌ त्यालाही त्याची‌ चूक निदर्शनांस आणून देण्याची आज्ञा जिथे‌ सांगितली आहे (उन्मार्गगामिनं श्रेष्ठं अपि वेदान्त पारगं| स्कन्दपुराण) अशा आपल्या प्राणप्रिय वैदिक हिंदु धर्मामध्ये शब्दप्रामाण्यवादांस अतिरेक आहे व बुद्धिप्रामाण्यवादांस नाकारलं आहे असे समजणं हे किती आततायीपणाचे आहे हे सूज्ञाच्या लक्ष्यीं आल्याशिवाय राहणार नाही.


वेद कधी प्रकट झाले, वेदांचा काळ कोणता, वेदांची लिपी कोणती, वेदांची भाषा‌ कोणती, आपला इतिहास नेमका‌ कधीपासूनचा या सर्व प्रश्नांची उत्तरे जिज्ञासुला जेंव्हा पडायला लागतात, तेंव्हा तो आपल्या आपल्या परीने ह्याचे‌ समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. भारतीय इतिहासाचीच‌ नव्हे तर विश्व इतिहासाची चिकीत्सा करताना, जिज्ञासा शमविताना मनुष्याला वेदांकडे वळावेच लागते. हे वेद समजून घ्यायचे असतील तर वर म्हटल्याप्रमाणे संप्रदायपूर्वक म्हणजे गुरुमुखातून अध्ययन आवश्यक आहे. ते‌ केल्याशिवाय वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान होणं असंभव आहे. आता हे असंच का ह्याचे साधं उत्तर हे आहे की ज्या ज्या शास्त्राचे किंवा ज्ञानशाखेचं आपण अध्ययन करतो, त्यात्या ज्ञानशाखेची जी अभ्यासपद्धती आहे तिचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणूनंच भगवान महर्षि पतंजलींनी 


*ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदोऽध्येयो ज्ञेयश्च इति। पातंजल महाभाष्य - पस्पशाह्निकम्*


ब्रह्म म्हणजे वेद जाणण्याची इच्छा करणाऱ्याने असे का असे न विचारता म्हणजेच निष्कारण सहा वेदांगांसहित वेदाध्ययन करावं. 


ही सहा वेदांगे कोणती ह्यांवर आह्मीं आमच्या दोन वर्षांपूर्वीच्या वेद परिचय‌ नामक फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत परिचयात्मक विस्तारपूर्वक विवेचन केलं आहे. तिथे पहावे. छंद, कल्प, शिक्षा, निरुक्त, ज्योतिष आणि व्याकरण..!


हे एवढं कोण करणार???


करत नाही म्हणूनंच आपली शास्त्रवचनांवर श्रद्धा बसत नाही. आपल्या पूर्वजांची‌ वचने आपल्याला थोतांड वाटायला लागतात. ह्याबाबतीतलं मार्गदर्शक एक द्रष्टव्य उदाहरण म्हणजे आदरणीय लोकमान्यांचे..! 


*लोकमान्यांनी १८९४ मध्ये ओरायन लिहून व पुढे १८९९ मध्ये आर्क्टिक होम लिहून वेदांचा‌ काळ काही सहस्त्रवर्षे‌ मागे नेण्याचा त्यांच्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांचा हेतु शुद्ध होता पण पद्धत का योग्य नव्हती ते पाहुयांत.‌ खरंतर आह्मीं ह्यावर मागे विस्तारपूर्वक हिंदीतून लिहिलं आहे. असो. पुढे‌ ते १९०० मध्ये वाराणसीला परमपूज्य श्रीदक्षिणामूर्ती स्वामी नामक एका सत्पुरुषाला भेटायला गेले, तेंव्हा वेदकालनिर्णय‌ व एकुणंच‌ वैदिक सिद्धांताविषयी त्यांचा स्वामीजींशी संवाद म्हणा शास्त्रार्थ म्हणा झाला. त्यात स्वामींना लोकमान्यांनी वेदांचा काल, त्याची भाषा,‌ त्याची लिपी, त्याचा शब्दनिर्णय, उत्पत्ती वगैरे ज्या काही शंका विचारल्या, त्या‌ सर्वांचे समाधान स्वामींनी करूनही शेवटी लोकमान्य म्हणतें झाले की*


लोकमान्य - *आपण म्हणता त्याप्रमाणें वेदांचें अनादि अपौरुषेयत्व बुद्धींस पटत नाहीं*


स्वामीजी - *संप्रदायपूर्वक शास्त्राध्ययन नाही, हेंच त्याचें कारण*


समग्र लोकमान्य टिळक - खंड ६वा 


हा संवाद काही संक्षेपांत आह्मीं हिंदीमध्ये अनुवादित‌ केला होता. संपूर्ण मूळ मराठी संवाद पुन्हा इथे जोडला आहे...









सांगण्याचं‌ तात्पर्य काय? लोकमान्यांची निंदा करणं? मूळीच नाही. 


मग???


राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्यांसारख्या लोकोत्तर पुरुषाला जर‌ स्वामी असा उपदेश करत असतील‌ तर आपल्यासारख्या अज्ञानी मनुष्याने काय चिंता वहावी? आपण वेदांकडे वळण्यापूर्वी काय करावं?? वेद समजून घेण्यासाठी काय करावं???


गुरुमुखातून अर्थात संप्रदायपूर्वक सहा वेदांगांसहित वेदाध्ययन करावं. पण हे करण्यासाठी न्यूनतम बारा पंधरा वर्षांचा तरी कालावधी लागेल. खरंतर जास्तीच लागेल पण त्यातही न्यूनतम धरलाय. पण मग हे आज संभवंच नसेल तर काय करावं? तर ज्यांनी हे‌ केलंय त्यांनी वेदांविषयी काय लिहून ठेवलंय ते‌ वाचावं. आता असे आप्त नेमके कोण आहेत, त्यांची व्याख्या काय हे पुढे पाहुयांत...!


क्रमश:...


लवकरंच...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#वेदकालनिर्णय_वेदाध्ययन_भाषा_लिपी_उत्पत्ती_संस्कृत_लोकमान्यटिळक

Thursday 1 September 2022

ऋषि॒: स यो मनु॑र्हितो॒| ऋग्वेद - १०|२६|५

 


*ऋषि॒: स यो मनु॑र्हितो॒|*

ऋग्वेद - १०|२६|५


*जो मनुष्याचे हित करतो, तो ऋषि...!*


आज ऋषिपंचमी...! आपला हिंदुधर्म हा जसा ईश्वरप्रणीत आहे, तसा तो ऋषिप्रणीतही आहे. ऋषि कुणांस म्हणावं? शास्त्रकारांनी अनेक व्याख्या दिल्या आहेत.


*ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।*

व्याकरण महाभाष्य


*आजीवन अखंड ब्रह्मचर्य्य पालन करून सहा वेदाङ्गांसहित वेदांचे नि आर्ष ग्रंथांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक अध्ययन करून, पश्चात् योगसाधनेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून, ईश्वरसाक्षात्कार करून वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान झालेला, अविप्लुत ब्रह्मचर्यावस्था प्राप्त असलेला किंवा विवाह करूनही पुढे ही अवस्था प्राप्त केलेला एखादा ऋषि जेंव्हा वेदार्थप्रतिपादनांस तत्पर होतो, तेंव्हा 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः।' ह्या निरुक्तकारांच्या वचनांस तो ऋषि म्हणून सिद्ध होतो.*


*ऋषी हा शब्द व्याकरणानुसार तुदादि धातू पासून ईन् प्रत्यय लागून निर्माण होतो. “ऋषति गच्छति, प्राप्नोति, जानाति वा स ऋषिः - गतीचे ज्ञान, गमन आणि प्राप्ती” हे तीन अर्थ होतात. निरुक्तकारांनी “ऋषिर्दर्शनात्” ह्या शब्दाने मंत्राच्या अर्थाचा किंवा गुढार्थ ह्याचा द्रष्टा किंवा प्राप्तकर्ता, साक्षात्कार कर्ता असे अर्थ प्रतिपादून किंवा “साक्षात्कृतधर्मा”हाच सिद्धांत सांगितला आहे. महर्षी दयानंदांनी “मंत्रद्रष्टा” ह्याबरोबरच “ईश्वर” असाही अर्थ सांगितला आहे. सायणाचार्य “अतीन्द्रियार्थद्रष्टा” असा अर्थ लावतात. यजुर्वेदाचे भाष्यकार उव्वट हे “मन्त्रव्याख्याता” अशी उपमा देतात. मेधातिथी ह्यांनी 'वेद आणि त्याचा अर्थद्रष्टा' दोघांनाही ऋषि मानले आहे.*


*जो स्वत: आत्मज्ञानी होऊन वेदार्थ प्रतिपादन तर करतोच पण सृृष्टीनिर्मितीचं रहस्यही उलगडतो, तोच खरा ऋषी...! जो अभ्युदय‌ नि नि:श्रेयसाचे परममंगल दान देतो तोच ऋषि...! जो पदार्थविद्येचंही दान देतो तो ऋषि...!*


आपला धर्म ऋषिप्रणीत आहे असे आह्मीं वर का म्हटलं?


*कारण सर्व प्राचीन शास्त्रकारांचे मत हे आहे की वेद हे मानवसृष्ट्यारंभी अग्नि, वायु आदित्य आणि अंगिरा या चार ऋषींच्या अंत:करणांत प्रकट झाले. नि तिथून अष्टधा विकतीने सुरक्षित होत कानामात्राचाही भेद न होता अद्यापवावेतो‌ आहेत व भविष्यांतही राहतील. जगातली ही एकमेव ईश्वरीय वाणी, एकमेवाद्वितीय अशी जी ईश्वराने त्या चार ऋषींना दिली, तीच पुढे आपणांस अन्य ऋषींच्या मंत्रव्याख्यानानेही प्राप्त होत राहिली म्हणून हा ऋषिप्रणीत धर्म...! वेद अनेक ऋषींच्या अंत:करणांत प्रकट झालेले नसून केवळ चार ऋषींच्या अंत:करणांत आरंभी प्रकट झाले. ह्यावर कैकवेळा लिहिलंय, पुनरुक्ती नको.*


महाभारतकाळापर्यंत तरी हा धर्म ऋषिप्रणीत होता म्हणूनंच त‌ो विशुद्ध होता. दुर्देवाने महाभारतसमयीच ऋषींचा ह्रास सुरु झाल्याने सहा वेदांगांपैकी एक निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्य आता आह्मांस मार्गदर्शक कोण ठरणार म्हणून चिंता व्यक्त करताना दिसतात.


*को न: ऋषिर्भविष्यति|*


आता आमचा ऋषि कोण?


देव उत्तर देतात


*तेभ्य: एतं तर्कं ऋषिं प्रायच्छन्|*


आता तर्क हाच आमचा ऋषि....!


आमचं सत्यासत्यतेच्या निर्णयाचं, प्रमाणत्वाचे सगळं न्यायशास्त्र ज्या तर्कावर अवलंबून आहे नि 'यस्तर्केणानुसन्धत्ते स वेद धर्म नेतर:' (जो तर्काने जाणता येतो, तोच खरा धर्म जाण, अन्य नाही) असे प्रत्यक्ष श्रीमनुमहाराजांचे वचन आहे, त्या तर्कालाच आह्मीं इतकं विसरलो, तो इतका आह्मांस त्याज्य झाला की ब्रह्मससूत्रांतल्या 'तर्काsप्रतिष्ठानात्' ह्या‌ सूत्राचा अत्यंत विपरीत अर्थ‌ काढत‌ बसलो व आमच्या वैदिक धर्मामध्ये अत्यंत ग्लानीस आरंभ झाली. अनेक वेदविरुद्ध प्रथा, शास्त्रविरुद्ध अशी कर्मकांड, अनेक कुप्रथा, रुढीपरंपरा निर्माण झाल्या नि आमचा घात झाला...!


आमच्या प्राणप्रिय अशा आर्ष‌ म्हणजे ऋषिप्रणीत साहित्याकडेही पाठ फिरवून आह्मीं अनार्ष साहित्याला डोक्यावर घेतलं नि आमचा घात झाला...! आमच्या वैदिक धर्माच्या पतनाचा हा आरंभ होता. महाभारतकालानंतरच्या अडीच सहस्त्रवर्षांंच्या ह्या‌संघर्षापश्चात् भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी त्यांच्या अलौकिक पुरुषार्थाने नि अपार वेदनिष्ठेने वैदिक धर्मांस पुन्हा आर्षदृष्टी प्रदान करण्याचा दिव्य प्रयत्न केला नि त्यात ते यशस्वीही झाले. पण पुढच्या पिढींनी त्यांचे ते‌ कार्य व तो‌ संदेशही विस्मृतीत टाकला व पुढे ब्रिटीशांपर्यंत ह्या भरतभूमींवर आक्रमणे होत राहिली.‌ सहा सोनेरी पाने आपण पाहतोच. संतांचेही कार्य आहेच. यद्यपि पुन्हा त्याच आर्षधर्माचा उद्धार करण्यासाठी महर्षि देव दयानंदांचा जन्म झाला नि त्यांनी हिंदुंना पुन्हा 'वेदांकडे वळा' म्हणत आर्षधर्मोपदेशकाचे कार्य केलं. पण त्यांनाही आह्मीं विस्मृतीत टाकलं...!


*आज ऋषिपंचमीनिमित्त विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप ह्या‌ सप्तव्याह्रतींचे जसं चिंतन आवश्यक आहेच, त्याबरोबरंच पराशर, व्यास, वाल्मीक्यादि महर्षींचेही स्मरण आवश्यक आहे. षड्वेदांगकार ऋषि व षड्दर्शनकार ऋषींचेही चिंतन, स्मरण, पूजन आवश्यक आहेच. सर्वांचेच नामोल्लेख इथे विस्तारभयास्तव संभव नाहीत त्याविषयी क्षमा...! आपला हिंदु धर्म ह्या सर्व ज्ञात अज्ञात ऋषींचाच संपन्न वारसा आहे, जो आपल्याला पुढे न्यायचा आहे...! त्यासाठी आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत साहित्याचे अध्ययन हेच आपलं कर्तव्य आहे तरंच ती खरी ऋषिपंचमी होईल...!*


*आपलं भाग्य हे आहे की आपण आपलं कुल गोत्र सांगतानाही एखाद्या ऋषीशीच ते जोडतो...! ह्यापेक्षा आणखी गौरवाची गोष्ट काय???*


या ऋषिप्रणीत वैदिक धर्मांस व त्याच्या या सर्व ऋषि नामक प्रणेत्यांस कोटी अभिवादन...!


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

pakhandkhandinee.blogspot.com


#ऋषिपंचमी_ऋषिस्मरण_पूजन_मंत्रद्रष्टा_वेद_शंकराचार्य_दयानंद