Wednesday 28 December 2022

उरीं राष्ट्रभक्ती रविवत् ज्वलंत, न यें भीती चित्तीं जरीं ये कृतांत - श्रीभिडेगुरुजी

 





काल लव्ह जिहाद नि धर्मांतरणाच्या विरोधांत केज इथे सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदुधर्मरक्षण मोर्चा काढण्यांत आला होता तन्निमित्तची ही क्षणचित्रे. श्रीभवानी माता मंदिर ते श्रीछत्रपति शिवाजी महाराज‌ चौक हा दोन अडीच किमीचा मार्ग ! तीन चार सहस्त्रांच्या संख्येसमोर ऐन माध्यान्ही सूर्य डोक्यावर आला असताना अत्यंत कमी अशा वीसेक मिनीटांत विषय‌ मांडण्याचं सौभाग्य लाभलं. चित्रफीत उपलब्ध झाली की इथे पाठवतोच. त्याचा गोषवारा...

"सर्वप्रथम इतक्या बहुसंख्येने राष्ट्रप्रेमी, हिंदुसमाजप्रेमी, संविधानप्रेमी हिंदु समाज एकवटल्याहेतु सर्वांच्या चरणी नतमस्तक! आपण एक अब्ज ९६ कोटी इतकी वर्षे या पृथ्वीवर आर्य्य किंवा हिंदु किंवा भारतीय म्हणून विराजमान आहोत. भारत हा शब्द ऋग्वेदांतला आहे. आपल्या संविधानाचा आंरभही India that is Bharat असा आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकंच महिन्यापूर्वी आश्विनी उपाध्यायांच्या याचिकेत धर्मांतराच्या गंभीर विषयी सर्व राज्यांनी माहिती द्यावी असा आदेश दिला आहे,  धर्मांतर हे संविधानविरोधीच आहे, १४०० वर्षांपूर्वी कुणी मुसलमान नव्हता, २००० वर्षांपूर्वी कुणी ख्रिस्ती नव्हता, २५०० वर्षांपूर्वी पारशी नव्हता, सर्वधर्मसमान नाहीतंच, जर समान आहेत तर धर्मांतरणं व लव्ह जिहाद का, जर संविधानासमोर सर्वंच समान आहेत तर मग समाननागरी विधेयक का नको, वेगवेगळे कौटुंबिक निर्बंध का(फैमिली लॉ, पर्सनल लॉ), १९८५ मध्ये अखिल भारत हिंदुसभेच्या‌ वतीने लॉ कमिशनसमोर दाखल झालेले समाननागरी विधेयक, लोकसंख्या विस्फोटीचा प्रश्न सर्वांनाच डोकेदुखी ठरेल, Planting the Cross in Asia सगळा आशिया ख्रिस्तमय करण्याचं स्वप्न, इस्लाममय करण्याचे मुस्लिमांचे स्वप्न आणि आह्मीं हिंदु भोळसट आहोत सर्वधर्मसमभावाच्या गप्पा हाणतो, छत्रपति शिवरायांच्या चरित्राचे इस्लामीकरणाचं षड्यंत्र, माता-भगिनींचे सोशल मीडिया अकाऊंट्स तपासा, घरा-घरांमध्ये नित्योपासना हवीच, हिंदुंमध्ये सामुहिक उपासनाच नसल्याने संघटन होत नाही, निदान चहा प्यायला, गप्पा मारायला तरी एकत्र या, आर्थिक नाडी भक्कम करा, केवळ हिंदुंचा हिंदुंशीच व्यापार, चीन-पापस्तानाकडून कुरघोडी सुरुच, राज्यसभेत संविधान फाडलं जातं तरी सगळे गप्प, कारण फाडणारा हिंदु नाही त्यातही ब्राह्मण नाही, फाडणारा मुसलमान, आता संविधानाचा अपमान होत नाही, संविधानाचे खरे शत्रु कोण आहेत ओळखा, तुम्ही हिंदु-मुसलमान-ख्रिस्ती कुणीही असा, भारतीय ही आपली एकंच ओळख का होऊ शकत नाही, लैंड जिहादचा प्रश्न आहे, आपली विधीज्ञांची चमु(टीम) हवी, शिवाजी जन्माला यावेत ते शेजारच्या घरात हे किती दिवस, रक्त सळसळुद्या पण डोकं शांत ठेवा, आपण निदान मावळे तरी होऊयांत, या सगळ्याला रोखायचं असेल तर आपलं संघटन व निर्बंध(कायदा) व संविधान हीच आपल्या हातीं असलेली मोठी ताकद आहे, देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर हिंदु बहुसंख्य राहिले पाहिजेत...आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जागे व्हा...!"




खरंतर वेळ फारंच कमी लाभल्याने फार संक्षेपांत मला हा विषय मांडावा लागला. पण तरीही केजच्या समस्त हिंदु जनतेचे आभार व विशेषत: आमच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी बांधवांचे ज्यांच्या प्रेरणेने व हेतुने हे सर्व आयोजित झालं. अन्य हिंदुत्वनिष्ठ‌ संघटनांचेही तितकेच आभार व अभिनंदन...! विशेषत: आमचे धारकरी बंधु श्री शाहुराजे गुंड व सर्व धारकरी बंधु यांचे अभिनंदन व ऋणी आहे. 

हिंदुंनो रात्र वैऱ्याची आहे, जागे व्हा...! लव्ह जिहाद हे फार मोठ्ठं संकट हिंदुपुढे आहे. धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे...


संपूर्ण कार्यक्रमाची संक्षिप्त चित्रफीत जोडली आहे.‌ माझ्या चिंतनाची करतोच. आमचे बंधु ⁨शिवम जवंजाळ⁩ यांचे विशेष आभार..! 


भवदीय...


#धर्मांतरण_लव्हजिहाद_इस्लाम_ख्रिस्ती_सर्वोच्चन्यायालय_संविधान_हिंदुधर्मरक्षण_उपासना_काश्मीर_पाकिस्तान

Saturday 24 December 2022

हुकलेले गुरु नि हुकलेली शिष्य परंपरा...








ज्या‌ देशांत वेदविद्यायुक्त जितेंद्रिय योगसाधनारत पुरुष जन्माला येत नाहीत नि नेतृत्व धारण करत नाहीत, तिथे नेहमी दुराचारी, पाखंडी, धूर्त नि ठग लोकांकडून सामान्य जनतेंस फसविलें जाते...


इति महर्षि‌ दयानंद सरस्वति


आमच्याकडे वस्त्रांची लक्षावधी वर्षांची नि जगप्रसिद्ध परंपरा असताना आमच्यातले कथित गुरु जेंव्हा स्वत:ला किंवा आमच्या देवीदेवतांना ख्रिस्त्यांचे पोशाख चढवतात, त्यावेळी गत सहस्त्रावधी वर्षे आह्मीं का परदास्यतेच्या शृंखलात बद्ध होतो ह्याची जाणीव होते. अर्थात हिंदुसमाजाची मुख्य समस्या हीच आहे की आमचे मूलभूत सिद्धांत पक्के नाहीत.‌ आह्मांला आमच्या स्वधर्माचेच ज्ञान जिथे नाही, तिथे परधर्माविषयी किंवा पैशाचपंथांविषयी यथार्थता कशी असणार? जिथे अध्यात्मिक गुरु म्हणविणारे लोकंच वैचारिक दृष्ट्या इतके हुकलेले आहेत, तिथे त्यांचा शिष्य परिवार कसा असेल ह्याची‌ कल्पनाच न केलेली बरी. हिंदुंना हिंदुच शत्रु आहेत, वेगळ्या शत्रुंची आवश्यकता काय???

या अध्यात्मिक गुरुंविषयी आमच्या मनात कोणताही अनादर नाही. पण ख्रिस्त्यांचे पोशाख ह्यांनी स्वत: का घालावेत? हे समर्थनीय कसं ठरु शकतं???

आधी रामकृृष्ण मठ, त्यानंतर महायोगी अरविंदांचा पाँडेचरी आश्रम(मी स्वत: २५ डिसेंबरलाच पाहिला आहे), नुकताच रा स्व संघ हे नि असले तथाकथित गुरु नि या‌ सर्व बव्हतांश हिंदुसंघटना म्हणविणाऱ्या २५ डिसेंबर किंवा ईद, मोहर्रम आला की यांना काय सर्वधर्मसमभावाच्या उकळ्या फुटतात कळत नाही. 

ते आमच्याकडे यावेत, ते आमच्याकडे यावेत हे म्हणत आह्मीं कधी त्यांच्याकडे जाऊन सुंता करून घेऊ ह्याचेही भान हिंदुंना राहणार की नाही ह्याची भीती वाटते. अर्थात बोलायची सोयंच‌ राहिली नाही. गोळवलकर गुरुजींना कुणीतरी मुसलमान येऊन मला हिंदु व्हायचं आहे असे म्हणाल्यावर त्यांनी त्याला 'तु हिंदु न होता एक सच्चा मुसलमान बनुन दाखव' असे म्हणणं हे उदाहरण आमचं हिंदुत्व कुठल्या थराला गेलं आहे ह्याचे द्योतक आहे.त्यांनी समाननागरी विधेयकालाही विरोध केला होता हे माहिती असावं हिंदुंना...!  पण त्यांच्याविरोधांत बोलायचं नाही...

पण शूssक बोलायचं नाही... आमच्या नेतृत्वावर शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला??? 


स्वधर्माभिमान तर ह्यांच्यात नाहीच पण त्यातून जी विजीगीषु वृत्ती निर्माण व्हायला तीच नसल्याने हिंदु समाज अशांनाच नेतृत्व मानत असल्याने त्याच्या अस्तित्वाविषयी अंत:करण संदेहाने भरून येतं.

तुम्ही आमच्या शिबीरात या, नुसती‌ सुदर्शन क्रिया केली तर कुंडलिनी आपोआप जागृत होते असे म्हणणारे ह्यांचे अनुयायी पाहता भगवान महर्षि श्रीपतंजलींना योगदर्शन रचून पश्चात्तापाचीच भावना निर्माण व्हायला हवी यात काय संदेह???कुंडलिनी जागृती इतकी सोप्पी कधीपासून झाली???

कलियुगांत गुरुंच्या नावाने ठग निर्माण होतील हे वचन प्रत्यही प्रत्ययांस येणारं आहे. खरंतर आमच्याकडे श्रीज्ञानोबा- श्रीतुकोबा-श्रीनामदेवराय-श्रीचोखोबा-श्रीरामदास या‌ आत्मसाक्षात्कारी संतांची व भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांसारखी इतकी उज्जल नि उदात्त गुरुपरंपरा असताना आमच्या लोकांना हे असले गुरु करावेसे वाटतात यासारखी शोकांतिका काय??? योगेश्वर भगवान श्रीकष्ण, भगवान श्रीरामचंद्रांसारखे मर्यादा पुरुषोत्तम जिथे जन्मांस आले, तिथे ही अवस्था???


पतन आणखी काय असु शकतं एखाद्या राष्ट्राचं नि धर्माचं...??? 


पण आता शिष्यवर्ग एकतर धमक्या द्यायला अंगावर येणार किंवा काहीतरी गोड समर्थन करणार या कृतीचं...! धन्य...


गेल्या दोन दशकांत अनेक सत्पुरुषांचे व त्यातल्या त्यात गत दोन शतकांतल्या महापुरुषांचे चरित्र व साहित्य अभ्यासल्यावर एकंच गोष्ट लक्षात आली ती ही की ज्यांना वैदिक धर्माच्या मूलभूत सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान नाही असे बव्हतांश महापुरुष (मागच्या दोन शतकांतले) हे इस्लाम नि ख्रिश्चनिटीचं यथार्थ आकलन करण्यांत पूर्णत: अपयशी ठरले आहेत. सर्वधर्मसमान आहेत ही विषाची घुट्टी(गुटी) जी हिंदुंना बाळकडु म्हणून सतत पाजण्यांत येते, ती त्यांच्या पेशीपेशीत, नसानसांत अशी काही जाऊन बसते‌ की कितीही नैतिक प्रगती केली तरी ह्या लोकांना त्याची सत्यासत्यता कळत नाही. केवळ तीन चार महापुरुष आहेत ज्यांचा अपवाद आहे की ज्यांनी या दोन्ही समस्यांचे यथार्थ आकलन केलं इतकंच नव्हे तर त्यावर वस्तुनिष्ठ समाधानही सुचवलं. त्यामध्ये अग्रगण नाव महर्षि दयानंदांचे येतं ज्यांनी सर्वप्रथम वैदिक धर्माची विशुद्ध मांडणी करत दुसरीकडे इस्लाम नि ख्रिश्चनिटीची तर्कशुद्घ नि वस्तुनिष्ठ पोलखोल आपल्या सत्यार्थ प्रकाश या अजरामर ग्रंथामध्ये नि अनेक ख्रिस्ती मिशनरी नि मौलवींच्या शास्त्रार्थांमधून केली. त्यांच्या आर्यसमाजी परंपरेतले स्वामी श्रद्धानंद, लजपतरायांसारखे सिंहपुरुष व पश्चात् केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर हेच एकमेव ठरले. आंबेडकरांनीही ही चिकीत्सा केली पण दुसरीकडे आपल्या वैदिक हिंदु धर्माला सुरुंग लावून फोडण्याची भाषा केली. सावरकरांनीही बुद्धिवादाच्या जोरावर सर्वधर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत अशीही विधानं केली, जी अत्यंत अनावश्यक होती. 


भले भले अध्यात्मिक गुरु म्हणविणारे लोक जर असे वागत असतील तर ह्यांची कथित अध्यात्म परंपरा तरी चूक आहे, ह्यांची‌ साधनापद्धती तरी चूक आहे हेच लक्षात आलं पाहिजे किंवा हे लोक लोकैषणेसाठी हे करत असावेत इतकंच सत्य आहे.


त्यामुळे या‌ सर्वांमध्ये केवळ महर्षि दयानंद हेच काय ते वेगळे उठून दिसतात. वाईट ह्याचे की दयानंदांचे सिद्धांत आपल्या प्रचलित सनातन धर्माला जणु काळ आहेत असे समजुन काही सनातन्यांनी इस्लामचे व ख्रिश्चनिटीच्या संस्थापकांची भलामण केली व महर्षींची यथेच्छ निंदा केली. (शास्त्रार्थ पंचक - माधवाचार्य शास्त्री) म्हणजे दयानंद शत्रु पण इस्लामचे नि ख्रिश्चनिटीचं संस्थापक मात्र महात्मा...! रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेली महात्मा येशु व ख्रिस्त ही पुस्तके जिज्ञासूंनी वाचलेलीच असतील. बंगाली लोकांचे इस्लाम प्रेम नवीन नव्हेच म्हणा. मी विवेकानंद समग्र वाचले आहेत.


त्यामुळे अनेक जण आह्मांस विचारतात की आह्मीं सारखे दयानंद दयानंद का करतो तर त्याचे हेच कारण आहे. ज्यादिवशी हिंदु समाज सत्यार्थ प्रकाश हा अमर ग्रंथ समजून घेईल, तो सुदिन असेल...! हिंदुना स्वधर्माचं ज्ञान घेणं जितंक आवश्यक आहे त्याहीपेक्षा अन्य पैैशाचपंथीयांचेही आहे. तुलनात्मक धर्मशास्त्राध्ययन ही काळाची अत्यंत आवश्यकता आहे.



भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#ख्रिश्चनिटी_नाताळ_ख्रिसमस_इस्लाम_सर्वधर्मसमभावाचे_वेड_धर्मचिकीत्सा_संतपरंपरा_अध्यात्म

Thursday 22 December 2022

अस्तित्वात नसलेल्या ख्रिस्ताचा ख्रिसमस???

 





*The Jesus that never existed...*


जो येशु ख्रिस्त कधी अस्तित्वातंच नव्हता त्याची जयंती? आयुष्यांत कधी बायबल वाचलंय का? छे छे! अहो वाचन वगैरे कोण करणार?


*येशु ख्रिस्ताच्या अस्तित्वाचा जिथे एकही ठोस पुरावा ख्रिस्ती‌ साहित्यात नाही, तिथे इथे हिंदुस्तानात नाताळ साजरा केला जाणार...*


*पहिल्या तीन शतकांत ख्रिसमस हा कथित सण स्वत: ख्रिस्ती लोक साजरा करत नव्हते. पण मूर्ख हिंदु समाज तो उत्साहाने पाळतो. १६व्या शतकांत उदयांस आलेला प्युरिटन्स नावाचा ख्रिस्त्यांमधलाच एक समुह ज्याने इंग्लंडमध्ये ख्रिसमसला बेकायदेशीर(Illegal) घोषित केलं होते. सुरुवातीला तीन-चार शतकांमध्ये चर्चमध्येही तथाकथित ख्रिस्ताचा जन्म साजरा केलाच जात नव्हता. २५ डिसेंबर हा दिवस कसा ठरवला गेला याची‌ कथा पण मजेशीर आहे पण विस्तारभयास्तव देत नाही.*






*गोव्यामध्ये हिंदुंवर अनन्वित अत्याचार...*


*जर सर्वधर्मसमान आहेत तर हे ख्रिस्ती लोक आपल्या हिंदुंना ख्रिस्ती का करतात? इतका साधा प्रश्न आपल्याला का पडत नाही?*



*ज्या‌ ख्रिस्त्यांनी आपल्या हिंदु पूर्वजांच्या मुंडक्यांचे मनोऱ्याचे मनोरे गोव्यात इन्क्विजिशनच्या नावाने रचले, त्या ख्रिस्ताचा नाताळ आमचे बावळट हिंदु साजरा करतात. स्वधर्माभिमान? छे! ज्यांनी आपल्या इतिहासाची वाट लावली, आपल्यात कलह निर्माण केला, वाट्टेल तसा घाणेरडा इतिहास लिहून आपला बुद्धिभेद केला, त्यांचे सण साजरे करायचे?आर्याक्रमण सिद्धांत त्यांनीच मांडला, जातीयवादही त्यांनीच पेरला, ख्रिस्ताच्या प्रचारासाठी पद्धतशीर विषाची पेरणी त्यांनीच केली. पण आपल्याला हे कुठे माहिती आहे? अहो खरा इतिहास कोण वाचणार म्हणा? ट्रेंड फॉलो करायला नको का फोटोशुटिंगसाठी...? खोटा इतिहास तर भटा-बामणांनी लिहिला. हे ख्रिस्ती‌ तर आमचे देवदुत म्हणणारे होतेच की...*


*ख्रिस्ती ब्रिटीश भारतात यायच्या आधी आपण जगाच्या व्यापारापैकी एकतृतीयांश वाटा असलेला इतके श्रीमंत होतो. आपली अर्थव्यवस्था आपला व्यापार इतका समृद्ध होता. पण ब्रिटीशांनी हे ओळखलं व आपली बारा बलुतेदारांवर आधारित असलेली गावगाड्याची अर्थव्यवस्था त्यांनीच पद्धतशीर नष्ट केली. हे आपल्याला माहिती तरी आहे???*


*छत्रपति शिवरायांनी धर्मांतर करणाऱ्या चार ख्रिस्ती मिशनऱ्यांची मुंडकी छाटली होती हे अनेकांना माहिती असेलंच. हाँ हे पुरोगामी महाराष्ट्रांत‌ कधी सांगितलंच जाणार नाही. तथाकथित शिवव्याख्यातेही सांगणार नाहीत. कारण सेक्युलर शिवराय मांडायचे आहेत ना!अहो असं काय करता? आमचा राजा कुठल्या धर्माविरुद्ध नव्हता. फक्त भटा-बामणांच्या विरोधांत होता...!*


*Planting the Cross in Asia...*


एकदा गुगलवर हे पाच शब्द शोधून पहा काय येतं. सगळा आशिया ख्रिस्तमय करायचं त्यांचे स्वप्न ते उघड उघड बोलताहेत. मागे ह्यावर सविस्तर लेख लिहिलाच आहे. 


*पहिल्या एक सहस्त्रकांत आह्मीं अख्खा‌ युरोप ख्रिस्तमय केला.‌पुढील एक सहस्त्रकांत अख्खा अमेरिका खंड ख्रिस्तमय केला. आता येत्या सहस्त्रकांत म्हणजे २००१ पासून ३००० मध्ये अख्खा आशिया ख्रिस्तमय करायची त्यांची जाहीर घोषणा आहे.*


१९९९ साली पोप जॉन पॉल भारतात आला होता त्यावेळी  अटल बिहारींचे सरकार होते. त्या पोपने सरळ घोषणा केली की आह्मांला येत्या सहस्त्रकांत अख्खा आशिया ख्रिस्तमय करायचा आहे. टाईम्स नावाचे वृत्तपत्रांत आलं होते हे. गुगल करून पहा वर्तमानपत्र मिळतील त्यावेळची...


पण आह्मांला काय? 


*आह्मीं सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार...! इतिहासातून काही शिकणार तर नाहीच.*


*आह्मीं आमच्या-आमच्यातंच भांडून एकमेकांची माथी फोडणार. कुणीतरी आमच्याआमच्यात विष पेरणार व आह्मीं शत्रुला सोडून स्वकीयांनाच शत्रु समजणार व कोरेगांव भीमा घडविणार.*


हिंदुंनो, जागे व्हा, इस्लामचं संकट जितकं उघड उघड आहे, तितकंच ख्रिस्त्यांचे स्वीट पॉईजन सारखं आहे. हा ख्रिस्ती वणवा एकेदिवशी देशाला गिळून टाकेल. धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे हे वेळीच ओळखा.


*सर्वधर्मसमान नाहीयेत. भोळ्या भ्रमांत जगु नका...*


आयुष्यांत एकदा तरी बायबल कुरआन वाचून काढा, काही पाप लागत नाही. मग कळेल सर्वधर्मसमान खरंच आहेत का...!


*ते सगळ्या जगाला ख्रिस्तमय व इस्लाममय करायला बसलेत. आणि आपण बसलोय सर्वधर्मसमभावाचे गोडवे गात...!*


जागे व्हा...! जागे व्हा...! जागे व्हा...!


भवदीय


#ख्रिस्तीधर्मांतर_येशुख्रिस्त_नाताळ_बायबल_गोवा_अत्याचार_राष्ट्रांतर