Wednesday 10 May 2017

महात्मा गौतम बुद्ध जयंतीनिमित्त त्याच्या हिॅदुत्वाचं चिंतन!



एक असत्य सहस्त्रवेळा सांगितलं की ते सत्य वाटायला लागतं - इति गोबेल्स, मार्क्सवादी साम्यवादी, सेक्युलर, पुरोगामी, सर्धर्मसमभावी, बामसेफी, ब्रिगेडी तंत्र

गेली दीड दोन शतके ब्रिटीशप्रणित व मार्क्सवादी साम्यवादी दृष्टीकोनातून हिॅदुस्थानच्या इतिहासासंबंधित असा काही भ्रम हेतुपुरस्सर पसरविण्या येतो की 
१. बुद्धाने हिॅदु धर्म सोडून नवीन धर्म संस्थापिला
२. बुद्धाने वैदिक धर्माच्या विषमतेला कंटाळून त्याला विरोध करून आपल्या नवीन धर्माची संस्थापना करून फार मोठी सामाजिक क्रांती केली. जैनांनीही ही अशीच क्रांती केली असाही प्रवाह आहे.
३. बुद्धाने व जैनांनीच अनादिकाळापासून असेलेली अस्पृश्यता नष्ट केली व बहुजन समाजास ब्राह्मणांच्या दास्यातून मुक्त केले. 
४. बुद्धाचा जन्म अडीच सहस्त्र वर्षापूर्वीचा ! 
५. बुद्धाने वेद व यज्ञ संस्थेच्या विरोधातच बंड पुकारले व यज्ञ बंद पाडले. 
६. बुद्धाने ब्राह्मणांचं परंपरागत श्रेष्ठत्व नष्ट केलं किंवा तो ब्राह्मणद्वेष्टा होता.
७. बुद्धाने यज्ञातील पशुहिॅसेस विरोध केला व यज्ञ बंद पाडले
८. बुद्धाने सर्वांस समान अधिकार दिले व ब्राह्मणशाही नष्ट केली.
९. बुद्ध हे डुकराचे मांस खाऊन मेला काय???

आता ह्या थोतांड असलेल्या आक्षेपांचं थोडक्यात निराकरण आपण करुयात. कारण आज बुद्ध जयंती असल्याबद्दल ह्या महान हिॅदुश्रेष्ठास योग्य न्याय देणं हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो म्हणूनच हा लेखनप्रपंच ! 

आम्ही पुनश्च एकदा सांगु इच्छितो की आम्हांस बुद्धाबद्दल नितांत आदरच आहे परंतु त्यांच्याबद्दल पसरविल्या जाणार्या कपोलकल्पित कल्पनांना आमचा विरोध आहे व त्यांचं निकाकरण करणं हीच आम्ही त्याला एक श्रद्धांजली समजतो. असो

पहिला आक्षेपाचं खंडण

बुद्धाने हिॅदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिॅदुच होता व मेलाही हिॅदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिॅदुच असेल. ह्याबबातीत उपराष्ट्रपती व एक विद्वान डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात


बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिॅदुच म्हणून जगला व मेला.

भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇

Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He was restating with a new emphasis the ancient ideals of Indo-aryan civilization. 
 अर्थ - बुद्धाला आपण नवा धर्म संस्थापित आहोत असं कुठेही वाटलं नाही. तो हिॅदु म्हणूनच जन्माला आला, वाढला व मेलाही हिॅदु म्हणूनच. त्याने इण्डो-आर्यन संस्कृतीची प्राचीन तत्वे नव्या उत्साहात पुनरुज्जीवित केली.

Dr Radhakrishnan in his Foreward to "2500 years of Buddhism", page no.68

Govt. Of India, Publication Division

ह्याचा अर्थ काय? स्पष्ट आहे. 

आता काहीजण आक्षेप घेतील तर आम्ही एकच प्रश्न विचारतो की त्यांनी बुद्धाने नवीन धर्म संस्थापिल्याचे एकतरी वाक्य आणून दाखवावं.


दुसर्या आक्षेपांचे खंडण 

म्हणे बुद्धाने व जैनांनी वैदिक धर्माच्या विषमतवादी धोरणांस कंटाळून वेगळा धर्म संस्थापून फार मोठी वेगळी सामाजिक क्रांती केली.

हा विचार किती तथ्यहीन व तर्कदृष्ट व वास्तवांस सोडून आहे हे आता पाहु.

बुद्ध हा स्वत:च विषमता वादी अर्थात वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमानी होता - हे घ्या पुरावे

न बोधिसत्ता हीनकुलेषु उपद्यन्ते

म्हणजे बौधिसत्व हे हीन कुळात कधीच जन्म घेत नाही.

ह्याचा अर्थ काय? ह्याला वर्णवर्चस्वाचा अभिमानच म्हणणार ना??? बुद्धाच्या शाक्य कुळात भावा बहिणींची लग्ने होत होती ! स्वत: बुद्ध अंबष्ठसुतात अंबष्ठ ब्राह्नणाला सांगतो की "आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणींशी लग्न करतो !"

गौतम बुद्ध हा कुळाचे वंशाचे शुद्धत्व राखणारा आहे म्हणजेच तो जातीवादी होता ! अशा जातीवादी बुद्धाला आंबेडकर शरण का गेले हेच कळत नाही. हे बुद्धाचे रिडल्स आंबेडकरांना का दिसले नाही???

गौतमाचा पुर्वज औक्काक राजा ! त्याच्या मुलामुलींनी भाऊ बहीण असून आपसांत लग्न केली ! म्हणजेच वंशाचे व कुळाचे शुद्धत्व राखले ! ह्यावरून बुद्धाने फार मोठी सामाजिक क्रांती केली ह्याचा पुरावा काय???

थोडक्यात आंबेडकरांचा बुद्ध हा मुळ बुद्धापेक्षा वेगळा आहे

हे तत्कालीन महाबोधी मासिकाने व बौद्ध पंडितांनी वेळोवेळी आंबेडकरांच्या धम्मांतराबद्दल मांडलेले मत आहे. आंबेडकरांनी श्रीरामाला शिव्या घातल्या पण स्वत: बुद्ध हा श्रीरामचंद्राबद्दल काय म्हणतो ते पहा
जातककथा स्पष्ट सांगते की बुद्ध हा रामाचाच अवतार आहे ! दशरथ जातक सांगते की स्वत: गौतम बुद्ध म्हणतात की, " शुद्धोधन म्हणजे दशरथ, कौसल्या म्हणजे महामाया, सीता म्हणजे यशोधरा व राम म्हणजे मी स्वत: गौतम ! 


तिसर्या आक्षेपाला उत्तर

म्हणे अस्पृश्यता ही वैदिक धर्मप्रणितच होती व ती बुद्धांनी व जैनांनी नष्ट करून फार मोठे उपकार केले.

एकतर ह्या सिद्धांताला एकही तत्कालीन पुरावा नाहीये. जो बुद्ध स्वत: वंशश्रेष्ठत्व राखतो, तो अस्पृश्यता नष्ट करीलच कसा??? व अस्पृश्यता त्याच्या आधी होती ह्याचा एकही पुरावा नाहीये. आता खालील पुरावे घ्या.

जातीव्यवस्था नि अस्पृश्यता हिॅदुस्थानात कशी आली ह्यासंदर्भात अनेकांनी अनेक तर्कवितर्क करून वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. 

पण आंबेडकर व महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या मतानुसार हिॅदुस्थानात ह्या कुप्रथा ह्या बौद्ध व जैनकाळातच निर्माण झाल्या !

आंबेडकरांनी तर पहिल्या खंडात (इंग्रजी) स्पष्ट सांगितलंय की अस्पृश्यता किॅवा जातीव्यवस्था ही ब्राह्नणांनी निर्माण केली असा जो आपला समज आहे तो चुकीचा आहे. वस्तुत: ही गोष्ट त्यांच्या क्षमतेबाहेरची आहे असं ते म्हणतात ( Brahmins are to be blamed for many things but as far as creation of untouchability is concerned, such creation of Untouchability or Casteism was a work beyond the mettle of the Brahmins.)

महर्षी विठ्ठल रामजी शिॅदेंनी तर "अस्पृश्यतेचा प्रश्न" ह्या त्यांच्या निबंधात तर स्पष्ट पुराव्यासहित प्रतिपादन केलंय की बौद्धांनी व जैनांनीच नंतर
ह्या कुप्रथा निर्माण केल्या.

अस्पृश्यता ही वेदप्रणीत नाहीच नाही.

त्यामुळे आधी हे सर्व होते व बुद्धाने येऊन हे सर्व झुगारून देऊन फार मोठी समाजिक क्रांती केली हा तथ्यहीन सिद्धांत आहे. थोडक्यात बुद्धाने सामाजिक क्रांती केली हे केवळ थोतांड असून खरं तर त्यानेच जातीव्यवस्था निर्माण केली असा आरोप करायलाही जागा आहे. कारण तो वंशश्रेष्ठत्वाचा अभिमानी आहे. 

आता ह्याबाबतीत डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन पुन्हा त्यांच्या  "Indian Philosophy" ह्या त्यांच्या द्विखंडात्मक ग्रंथात ते म्हणतात. 
की बुद्धाने व जैनांनी कोणतीही सामाजिक क्रांती केलीच नाही ! घ्या पुरावे ' 👇


The Myth of Buddha's Social revolution

Actually Buddha did not create any kind of social revolution. 

"We cannot say that Buddha abolished caste, for the religion of buddha is an aristocratic one. We cannot say that Buddha effected any Social revolution. Even Birth in a Bramhin family, Buddha allows it to be a reward for the merit.

The still very prevalent notion that Buddhism and Jainism were reformatory movements, and that more especially they represented the revolt against the tyranny of caste, is quite erroneous. 

Buddha was not social reformer."

अर्थ - आपण असं नाही म्हणु शकत की बुद्धाने ज्ञातीव्यवस्था नष्ट केली, कारण बुद्धाचा पंथ हा स्वत:च वंशाभिमानी आहे. त्यामुळे बुद्धाने फार मोठी सामाजिक क्रांती केली असं आपण म्हणूच शकत नाही. कारण बुद्ध हा ब्राह्नण कुलात जन्म घेणं हेदेखील एक गुणश्रेष्ठत्वाचे प्रतीक मानतो. 

बुद्ध व जैन चळवळी ह्या ज्ञातीव्यवस्थेच्या छळाविरुद्ध झालेल्या आहेत ही आजपर्यंत असलेली समजूतच पूर्ण चुकीची आहे. कारण बुद्धाने कोणतीही सामाजिक क्रांती केली नाही. 

Dr Radhakrishnan - Indian Philosophy Volume 1  - pg no. 437-441


अर्थात इथे एक गोष्ट जाता जाता सांगायला हवी की आंबेडकरांनी ह्या संदर्भात अनेक कोलांट्या उड्या मारल्या आहेत. प्रसिद्ध अभ्यासक शेषराव मोरे सरांचं पण हेच मत आहे की बुद्धाला श्रेष्ठ ठरविण्यासाठी आंबेडकरांनी फार फिरवफिरवी केली आहे. असो तो स्वतंत्र विषय कधीतरी लिहु.


चौथ्या आक्षेपाचं खंडण

पाश्चिमात्य इतिहासकारांनी विशेषत: ब्रिटीशांनी अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जे काही भारताबद्दल इतिहासलेखन केलं, त्यात भारताचा इतिहास हा दीड ते दोन सहस्त्र वर्षांनी पुढे आणण्याचं एक घोर पातक त्यांनी केलं. बुद्धाचा काळच ह्या लोकांनी १५०० ते १८०० वर्षे पुढे आणला ! त्यामुळे आदि शंकराचार्यांचा काळही तेराशे वर्षे अकारण पुढे आला जो आज चुकीचा असा इ स ७८८ ते ८२० असा मानला जातो ! 
पण पु ना ओक व इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी ह्या दोन सत्यनिष्ठ व प्रथितयश इतिहासकारांनी मात्र ह्या थोतांडांना उघड्यावर पाडुन वास्तव मांडलं. पण लोक त्यांना मानायला तयारच नाहीत कारण डोक्यावर अजुनही मार्क्सवादाचा पगडा आहे. ओकांच्याही पुढे जाऊन कुलकर्णींनी त्यांच्या भीष्म नावाने प्रकाशित केलेल्या अष्टादश खंडात्मक इतिहासविवेचनातून हिॅदुस्थानचा इतिहास हा संदर्भासहित व पुराव्यासहित मांडला. त्यात त्यांनी बुद्धाचा व आदि शंकराचार्यांचा काळही हे दोघेही वास्तव स्वरुपात कित्येक वर्षे मागे नेले.

शंकराचार्यांचे जन्मवर्ष सामान्यत: इ स ७८८ धरण्याच येते जे चुक असून एकही शंकराचार्यांची गादी किॅवा पीठाधीशांचे संदर्भ हे मानत नाहीत. विशेष म्हणजे ह्या सर्व पीठाधीशांकडे ज्या काही आचार्यांच्या जन्मतिथ्या आहेत, त्यात सर्वत्र त्यांची जन्मवर्ष हे ई. सन पूर्वीचंच आहे 
संदर्भ - भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका - पु ना ओक

म्हणूनच आचार्यांचा काळ १२९७ वर्षे मागे म्हणजेच इस पूर्व ५०९ हाच योग्य जन्मकाल आहे !

हे इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णींचे मत ग्राह्य व योग्य व वस्तुनिष्ठतेस धरून आहे. 

आता हे पाश्चिमात्यांनी असं का केलं?

साहजिकय की पाश्चिमात्यांना त्यांच्या येशु ख्रिस्तांच्या अवतरणपूर्वी सर्व जग हे अंधारातच आहे असं वाटत होतं. त्यामुळे त्या अट्टाहासापायीच त्यांनी भारतीय इतिहासलेखन करताना ह्या दोन महापुरुषांवर हा अन्याय केला. आणि इतकंच नव्हे तर ह्याच इतिहासकारांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रसिद्ध "फोडा आणि राज्य करा"
ह्या नीतीसाठीच हे केलं हे उघड आहे. बुद्धाला व जैनांना वेगळा पाडलं की आपोआप हिंदुसमाज विभाजित होतो हे षडयंत्र होतं. असो.

पाचव्या आक्षेपाच खंडण

बुद्ध हा यज्ञ व वेद विरोधी होता असा एक खोडसाळ प्रचार केला जातो, जो कितपत सत्य आहे आता आपण पाहु. खरंतर ह्यासाठी एक स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करता येईल असा हा विषय आहे. तरीही थोडक्यात पाहु.

त्रिपीटककारांनी स्पष्टपणे बुद्धाचा वेद व यज्ञावरचा विश्वास प्रकट केलाय. 

बुद्ध स्वत:स वेदगु व वेदांतगु म्हणतो

(संदर्भ - कल्लनिद्गेश्य २.४.१८ व २.४.२८, 
 महानिद्देस्स १.९.८१ व १.१५.१८२, सिघनिक्काय)

सम्युत्त निकाय हे पाच वेदांचा उल्लेख करतो. आता पाचवा वेद म्हणजे महाभारत किॅवा इतिहास असेल हे स्पष्ट आहे. कारण महाभारताला पंचम वेद म्हणण्याची परंपरा आहे. 

टिन्नम् वेदनम् परगु असं शैल ब्राह्मण मझ्झिम निकाय मध्ये स्पष्ट म्हणतो. इथे वेदनम् हा शब्द स्पष्ट आहे.

उज्जय सुत्त, सम्युत्त निकाय व सहावग्गसुत्त हे ३.९ मध्ये स्पष्टपणे बुद्धाच्या दृष्टिकोनातुन खरा यज्ञ कोणता व खोटा कोणता हे स्पष्ट करतं. 
"एतम् यन्नं महाफ्फलो, एतं यजेत मेधावी, एतं हि यजमानसेवा सेयं होति " असे उल्लेख स्पष्ट आहेत.

 अग्निहोत्राचा उल्लेख

अंगुत्तरनिकाय, सम्युक्त निकाय, मझ्झिमनिकाय ह्यामध्ये अग्निहोत्र करा असा उल्लेख निषाद व रथाकारास आहे. 

गौतम बुद्ध हा यज्ञ च्या ऐवजी "यन्न" हा पालीभाषेतला शब्द वापरतो फक्त एवढाच फरक.   अनेक ठिकाणी बुद्धाने यज्ञसंस्थेचे कौतुक केल्याची उदाहरणे आहेत व ती विश्वासार्ह आहेत. अगदी धम्मपदाची किंवा सुत्तनिपात किंवा तत्सम ग्रंथांची उदाहरणे नक्कीच अभ्यसनीय आहेत. त्यामुळे बुद्धाला यज्ञद्वेष्टा ठरविणं अशक्य आहे. ह्याविषयांवर स्वतंत्रपणे मी लेख लिहीनच तूर्तास तरी एवढंच सांगतो की जिज्ञासुंनी श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी लिखित "Dharma and Vedic Foundations" हा ग्रंथाच्या शेवटचा भाग वाचावा ज्यात म्हणजे  VIII Chapter हा Buddha's love for Cow and yajnya" असा विषय आहे जो पृष्ठ क्रमांक ३४७ ते ३५६ वर विस्तारलेला आहे.


सहाव्या आक्षेपाचं खंडण

बुद्धाला ब्राह्नणद्वेष्टा ठरविणार्यांनी खालील गोष्टी पहाव्यात. 

आपला धम्म म्हणजे ब्राह्मणधर्मच आहे हे त्रिपिटकात शेकडो वेळा सांगितलेलं आहे.

१) संयुकातनिकाय-महावग्ग

"भिख्खू हो! ब्राह्मण्य म्हणजे काय आणि ब्राह्मणफल म्हणजे काय ते तुम्हास उपदेशितो."

२) खुद्दकनिकाय- उद्दालकजातक.

(नर कशाने) ब्राह्मण होतो , कसा केवली होतो. ' असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ' अग्निचयन करणारा , जलसिंचन करणारा , यज्ञासाठी यूप उभारणारा असा ब्राह्मण क्षेमी होतो आणि तो धर्माच्या ठायी प्रतिष्ठित समजावा (ध्म्मे ठित)

३) थेरगाथा- सुनीतथेर.

तपाने, ब्रह्मचर्याने , संयमाने , दमाने , ह्याने (माणूस) ब्राह्मण होतो. हेच उत्तम ब्राह्मण्य.

४) खुद्दकनिकाय मोरजातक.

जे ब्राह्मण सर्वधर्माच्या बाबतीत वेदज्ञ (वेदगू) असतात त्यांना मी नमितो , ते माझे रक्षण करोत .

५) अपण्णकजातक -

त्याचे शरीर ब्रह्मतेजाने झळकत होते. ब्रह्मस्वराने त्याने धर्म कथा सांगितली.

६) खुद्दकनिकाय - महावग्ग - अजपालकथा.

जो ब्राह्मण पापवृत्ती सोडून , निरहंकारी होवून ,संयत होवून ब्रह्मचर्य आचरितो (असा) वेदज्ञान (वेदांतगू) ब्राह्मण त्यानेच 'ब्रह्म ' वाद सांगावा.

७) खुद्दकनिकाय- महावग्ग बोधिकथा -

जेंव्हा प्रयत्नशील , ध्यानी ब्राह्मणासाठी प्रकटतात अस्तित्वधर्म (गौतमाला बोधी प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मुखातून   उमटलेल्या पहिल्या काही उद्गारात ' ब्राह्मणाचा ' उल्लेख आहे.) आणि हा श्लोक तीन वेळा पुनरुक्त आहे.

८) अंगुत्तरनिकाय -

परीव्राजकांनो! ही चार ब्राह्मणसत्ये , ती मी स्वत: जाणून , साक्षात पाहून उपदेशिली.

९) धम्मपदामध्ये एक संपूर्ण प्रकरण (वग्ग)
ब्राह्मणस्तुतिमय आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ते प्रकाशित केलंय. संकेतस्थळांवर ते आहे. 

मनुलाही हेवा वाटेल अशा शब्दात गौतमाने ब्राह्मणांचा आणि ब्राह्मण्याचा गौरव केला आहे. ह्या प्रकरणात एक्केचाळीस श्लोक आहेत. त्यातील अनेक श्लोकात ' तमहं ब्रुमि ब्राह्मणं' ' त्यास मी म्हणे ब्राह्मण ' हे पालुपद येते. गौतमबुद्धाला प्रिय असलेला हा ब्राह्मणम्हणजे भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ , गुणातीत ,भक्त, योगी , संन्यासी , कर्मयोगी , सात्विक वगैरे. ह्या संपूर्ण ब्राह्मणवग्गांच निरुपण स्वतंत्र शोधलेखाचा विषय आहे.ह्या आदर्श ब्राह्मणाला गौतमाने स्नातक , वृषभ (नेता) प्रवर , वीर ,महर्षी , अर्हत , सुगत आणि बुद्धसुद्धा ह्या संज्ञा वापरून गौरविले आहे. ह्या सर्व संज्ञा तीपिटक-ग्रंथात अनेकवार बुद्धाला स्वत:ला लावलेल्या आढळतात.

धम्मपदातील ३८९ वा श्लोक नोंद घेण्यासारखा आहे.

'ब्राह्मणांचे वाईट करू नका , आपल्यावर हल्ला करणाऱ्यावरही ब्राह्मणाने धावून जाऊ नये. जो ब्राह्मणावर प्रहार करील त्याचा धिक्कार असो. '

१०) खुद्दकनिकाय- भूरिदत्तजातक.

ब्राह्मण १) अध्ययन करणारा.
            २) भिक्षचर्य आचरणारा.
            ३) आहुताग्नी असतो. ह्या तीन गोष्टींमुळे ब्राह्मण हा अवध्य ठरतो.

११) खुद्दक- निमिजातक.

जे अत्यंत पापी लोक श्रमणाला किंवा ब्राह्मणाला इजा करतात किंवा आणतात, ते भीषणकर्मे लोक पाप प्रसवून,  खाली डोके (अश्या अवस्थेत) (उकळत्या) लोहकुंभीत पडतात.

१२) मजिझ्म- जे धम्म श्रमणकरणीय ,ब्राह्मणकरणीय , ते स्वीकारून आम्ही आचरु.

१३) मजिझ्म - ह्या भिक्खुला , अरे भिक्खु हो! श्रमण म्हणतात, ब्राह्मण म्हणतात.

चांगल्या अर्थाने गौतमाला ब्राह्मण्याने झपाटलेलं होतं. ( obsessed) आता आजच्या बुद्धिस्टांना हे पटणार आहे काय?

की ह्यालाही बामणी कावा म्हणूनच तुम्ही ठोकरणार आहात??? स्वत:च्या सोयीनुसार??? 

हे वाचल्यावर बुद्ध हा मनुपेक्षा ब्राह्नणवादी जास्ती आहे हे का लक्षात येत नाही लोकांच्या???


सातव्या आक्षेपाचं खंडण

बुद्धाने यज्ञातील पशुहिॅसेस विरोध केला व यज्ञ बंद पाडले असा एक खोटा सिद्धांत मांडला जातो, जो थोतांड आहे. कारण वर आपण पाहिलेच आहे की बुद्ध हा यज्ञसंस्थेचा किती स्तुतीपाठक होता. जो वेदांना मानतो तो यज्ञाला मानणार हे जगजाहीर आहे. 

फक्त प्रश्न आहे यज्ञातील मांसाहाराचा किंवा पशुहत्येचा

त्याबाबतीतही केवळ गृह्यसुत्रांचा संदर्भ देऊन काही लोकांनी गोहत्या वेदप्रणीतच आहे असा सोयीचा निष्कर्ष काढला आहे व तोच मुळात तर्कहीन व आधारहीन आहे. खरंतर ह्यावर आम्ही स्वतंत्रपणे ग्रंथनिर्मिती करतच आहोत व त्यात ह्याबद्दल पूर्ण भूमिका मांडूच. तूर्तास तरी एक सांगणं आवश्यक आहे की जर बुद्ध हा मांसांच्या विरोधात होता तर मग तो स्वत: मांस खात होता हे का? त्याचा मृत्यु डुकराच्या मांसखाल्याने झाला असा एक प्रचार आहे व अनेक बौद्ध इतिहासकार हे मानतात पण हे व्यक्तिश: मला पटत नाही. त्यावर मी स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच. पण तूर्तास तरी हे सांगु इच्छितो की त्याकाळी वेदांना न जाणणार्या वामपंथी लोकांनी कदाचित यज्ञात प्राणीहत्या सुरु केलीही असेल व बुद्धाने ती बंद केली असेल. पण म्हणुन तो यज्ञद्वेष्टा होता हे मात्र चुकीचं आहे हे वेगळं सांगायला नको.



आठव्या आक्षेपाचं खंडण

बुद्धाने सर्वांस समान अधिकार दिले व ब्राह्नणशाही नष्ट केली हा आक्षेप किती तथ्यहीन आहे ते पाहु. एकतर बुद्ध हा वंशश्रेष्ठत्व राखतो त्यामुळे तो समरसता आणतो व सर्वांना समान लेखतो ही गोष्टच चुकीची आहे. दुसरं असं की त्याने सर्वांना समान अधिकार दिले हेही खोटं आहे कारण ते अधिकार हिॅदुधर्मात सर्वांना आधीपासूनच होते. मुळात हा अधिकारवादच नंतरच्या काळात निर्माण झालाय. जर तसं नसतं तर मग बुद्धाने उच्यकुळातच जन्म घेणं का पसंत केलं असतं??? 
जर सर्व समान आहेत, हे बुद्धाचे मत असतं तर मग हे का घडतं??


मुळात वैदिक धर्म हा समता प्रणितच आहे

ज्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला असेल त्यांना हे माहिती असेल की वेदांतले अनेक ऋषी हे ब्राह्नण नाहीयेत. कारण जन्माने मनुष्य शुद्र म्हणजे संस्कारहीन असून तो कर्मामे ब्राह्मण बनतो हा वेदप्रणित हिॅदुधर्माचा अकाट्य सिद्धांत आहे. हाँ ही गोष्ट खरी की लोकांनी हे विसरून जाऊन नंतरच्या काळात जन्माधिष्ठित व्यवस्था निर्माण केली असेल पण त्याचा दोष वेदांना द्यायचा संबंधच कुठे येतो??? हा कुठला न्याय??

सगळी उपनिषदे ही क्षत्रियांनी रचलीयेत. काही तर स्त्रियांनी रचली असताना बुद्धाने स्त्रियांवर फार मोठे उपकार केले हा डांगोरा पिटण्यात काय हशील???

मुळात बुद्दाच्या नंतर त्याच्या संघातच किती स्वैराचार माजला हे जिज्ञासुंनी अभ्यासावे व खरेतर ते जगजाहीर आहे. तरीही लोक हे हेतुपुरस्सर विसरून वैदिक हिॅदु धर्माला शिव्या घालतात व बुद्धाला फार मोठा समाजसुधारक मानतात व बंडखोर मानतात, हे अज्ञानाचेच लक्षण नव्हे काय???



पाश्चिमात्यांनी केलेली इतिहासमीमांसा

फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा अवलंब करून पाश्चिमात्यांनी हेतुपुरस्सर इतिहासाची मीमांसा करताना
buddhism and Brahminism 
किंवा 
buddhism and Hinduism 
किंवा 
Hinduism and Brahminism असा हेतुपुरस्सर बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जो किती चुकीचा होता हे माझ्या वरील समग्र विवेचनावरून लक्षात येईल. तेंव्हा एतद्देशीयांनी तर ह्या असल्या भूलथापांना बळी पडून आपला घात करून घेऊ नये व बुद्धाला विनाकारण वेगळा समजू नये.

आता महत्वाची शंका व त्याचं उत्तर

जर हे सर्व खरं असेल तर कुमारील भट्ट व आदि शंकराचार्यांसारख्यांनी आपलं अख्खं आयुष्य ह्या बौद्ध व जैन मत खंडणासाठी व वैदिक धर्म पुनर्संस्थापनेसाठी का खर्चिलं???

ह्याचं उत्तर

बुद्धाच्या नंतरच्या काळात त्यांच्या अनुयायांनी बुद्धाच्या संदेशाचा चुकीचाच प्रचार केला. जो आजही केला जातो हे वरील माझ्या सविस्तर विवेचनावरून लक्षात येईल. त्यामुळे मुळचा बौद्ध पंथ जो वैदिकच होता, त्याला अनुयायांनी अकारण वैदिकद्वेष्टा बनविलं व त्यानंतर हिॅदुस्थानात वेदद्वेष सुरु झाला. व खोट्या बौद्धमतांचं प्रसार व्हायला लागला. त्यामुळेच ह्या खोट्या बौद्धमताचे खंडण करण्यासाठीच कुमारील भट्ट व आदि शंकराचार्यांनी जीवाचं रान केलं हा इतिहास आहे. आणि त्यामुळेच खोटं बौद्ध नष्ट करून खर्या बुद्धमताचा प्रचार त्यांनी केला म्हणूनच की काय शंकराचार्यांना "प्रच्छन्न बुद्ध" ही संज्ञा प्राप्त झाली.
आणि त्यातही शंकराचार्यांच्या वेळी हिॅदुस्थानात नक्की बौद्ध मत किती अस्तित्वात होतं हाही एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णींनी हा विषय स्वतंत्रपणे मांडलाय जिज्ञासूंनी तो अभ्यासावा. 

नवव्या आक्षेपाचं खंडण

बुद्ध डुकराचे मांस खाऊन मेले नाहीतच हे माझं स्पष्ट मत आहे.

खरंतर हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे कारण ह्यात अनेक संस्कृत विषयांचा अभ्यास असल्याने मी स्वतंत्रपणे केंव्हातरी माझी भूमिका मांडेनच. तूर्तास तरी एवढंच सांगु इच्छितो की वैदिक संस्कृत व आताची लौकिक संस्कृत ह्यात फरक आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. तो न कळल्यामुळेच बुद्धाच्या मृत्युचा संबंध "सूकरं मद्दवं खादयित्वा" ह्यातल्या सूकरं मद्दवं ह्या शब्दावरून डुकरांचं मांस असा सोयीस्कर अर्थ लोक काढतात जो चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ह्यावर मी स्वतंत्र पणे कधीतरी लिहीन. माझ्याकडे पुरावे आहेत. तूर्तास तरी मला बुद्धावरचा हा आरोप मान्य नाहीये.

हिॅदुमहासभेने केलेला अलौकिक प्रयोग

१९३५ साली हिॅदुमहासभेने बौद्ध भिक्षु उत्तमा ह्यांना हिंदुसभेचे अध्यक्ष केलं होतं हे अनेकांना माहितीही नसेल. बौद्ध भिक्षु उत्तमा हे अभ्यासु वृत्तीचे व नामांकित बौद्ध होते व त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे हिॅदु व बौद्ध एकच आहेत ठासून सांगितलं होतं. जिज्ञासूंनी हिॅदुमहासभेचा इतिहास वाचावा. असो. पुढे अनेक वर्षे ते हिॅदु सभेचे उपाध्यक्षही होते. पुढे जाऊन त्यांनी ब्रह्मदेशाच्या निर्मितीला कडाडून विरोध केला होता. ते वाचावं ही विनंती आहे.

आता हा सर्व लेखनप्रपंच कशासाठी??? हा अट्टाहास कशासाठी???

हिॅदुस्थानातले नवबौद्ध हे अकारण स्वत:ला हिॅदुद्वेष्टा बनवितात किंवा बनविले जातात. कारण त्यांचा ह्या विषयांतला अभ्यास कमी असल्याने व त्यांच्या मनावर गोबेल्स तंत्राने पकड घेतल्याने ते हिॅदुद्वेषी ठरतात व हे थांबावं हाच उद्देश्य आहे म्हणूनच हा प्रामाणिक लेखनप्रपंच ! 


नवबौद्धांनी स्वत:ला वेगळं न समजता आपण हिॅदुच आहोत हे ठरवून ह्या हिंदुराष्ट्राच्या निर्मितीस आपलं योगदान द्यावं हीच विनंती ! 

आजच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त त्या महात्म्यास माझे विनम्र प्रणाम व आदरांजली !!!

©तुकाराम चिंचणीकर




No comments:

Post a Comment