Sunday 12 December 2021

धर्मवीर डॉक्टर मुंजे यांचं आज जन्म दिनांकाने स्मरण

 


एक कुशल नेत्र विशारद, सशस्त्र क्रांतिकारक, निष्ठावंत हिंदुमहासभाई, हिंदूंना शस्त्र सामर्थ्याचे महत्त्व वेळोवेळी पटवून देणारा एक दूरदृष्टीचा योद्धा, सैनिकी शिक्षणाचा जणूकाही प्रवर्तक म्हणता येईल अशी योग्यता असलेला सत्पुरुष, राजा-मुंजे करारामधून पापस्तानचं षड्यंत्र फार पूर्वीच हाणून पाडणारा व पूर्वास्पृश्य बांधवांचा उद्धारकर्ता आणि हिंदू समाज समाजाचा संघटन कर्ता, अखंड हिंदुराष्ट्राचा एक द्रष्टा पुरस्कर्ता...


*राजा-मुंजे करार*


एम सी राजा आणि धर्मवीर डॉक्टर मुंजे या दोघांमध्ये फेब्रुवारी १९३२ यामध्ये जो महत्त्वाचा करार झाला जो हिंदुस्थानच्या सामाजिक उद्धरणासाठी होता, विशेषतः पूर्वास्पृश्य बांधवांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. हा करार गांधी आणि आंबेडकर यांच्या पुणेकराराच्या आधी झालेला असूनही आंबेडकरांनी याकडे दुर्लक्ष केलं हे अत्यंत दुर्दैवी आहे 


*स्वतंत्र मतदार संघ की संयुक्त मतदारसंघ???*


एमसी राजा यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन या संस्थेने संयुक्त मतदार संघाची म्हणजे (जॉईंट इलेक्टोरेट्स) ची मागणी केली होती. पण आंबेडकर मात्र स्वतंत्र मतदार (सेपरेट इलेक्टोरेट्स) संघाचे पुरस्कर्ते होते. आरंभी ते तसे नव्हते. 


*Communal Award - कम्युनल एवॉर्ड - जातीय निवाडा*


ऑगस्ट १९३२ मध्ये ब्रिटिशांनी हिंदू समाजामध्ये भांडण लावण्यासाठी व मुस्लिमांना अधिक लाभ देण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे सेपरेट एलेक्टोरेट्स ची घोषणा केली, याला कम्युनल अवॉर्ड (जातीय निवाडा) असे म्हटले जातं. यातून पूर्वास्पृश्य बांधवांना स्वतंत्र मतदारसंघ तर प्राप्त होणार होतेच पण त्याबरोबर दुहेरी मतदान सुद्धा प्राप्त होणार होतं. आंबेडकरांना हा करार त्यांच्या व्यक्तिगत लाभासाठी महत्त्वाचा वाटत असला तरी हा करार हिंदू समाज फोडणारा होता इतकेच नव्हे तर पूर्वास्पृश्य बांधवांसाठी देखील घातक होता. म्हणूनच या अत्यंत घातक कराराचे वर्णन करताना बॉम्बे क्रॉनिकलने १८ ऑगस्ट १९३२ मध्ये म्हटलेलं आहे की 'या कम्युनल एवॉर्डमुळे भारताची राष्ट्रीय एकात्मता ही अल्पसंख्यांक वादा पुरती मर्यादित झाली, संकुचित झाली.' ब्रिटिशांना हेच तर साध्य करायचं होतं. गांधींनी तातडीने या स्वतंत्र मतदार संघाला कम्युनस एवॉर्डला विरोध करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि हा करार मोडून काढला. गांधींनी त्यांच्या आयुष्यात केलेलं हे एक चांगलं कार्य म्हणावे लागेल.


इथे प्रश्न असा निर्माण होतो की आंबेडकर जे पूर्वी स्वतंत्र मतदारसंघांच्या विरोधात होते व संयुक्त मतदार संघाचे समर्थक होते, ते आज अचानक त्याचे विरोधक कसे झाले ? ? ?


आंबेडकरांच्या या बदललेल्या भूमिकेसंबंधी चर्मकार समाजाचे श्री पा ना राजभोज यांनी व्यक्त केलेले मत अत्यंत चिंतनीय आहे. ७ जुन, १९३२ या दिवशी व्हाईसरॉयच्या खाजगी सचिवाला लिहिलेल्या पत्रामध्ये ते लिहितात


*"काही महिन्यांपूर्वीच डॉक्टर आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला होता पण तेच आंबेडकर आता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करत आहेत हे अत्यंत चिंताजनक आहे. पूर्वास्पृश्य बांधवांच्या उद्धारासाठीच चाललेले सर्व प्रयत्न हे ते आम्ही हिंदूच आहोत याच भावनेने आहेत आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये आणि अन्य हिंदूंमध्ये असलेले जे काही वाद-विवाद आहेत, तो आमचा अंतर्गत विषय आहे. आंबेडकरांनी ज्या स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली आहे ती जर यशस्वी झाली तर या दोघांच्या एकत्रीकरणाचे सर्व प्रयत्न हे व्यर्थ ठरतील."*


याच उपरोक्त राजांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनच्या सहाय्यक सचिवांनी जीके थावरे यांनी जे विधान केलं होतं,ते महत्त्वाचं आहे मार्च १९३२


*"उपरोक्त कम्युनल अवॉर्ड म्हणजेच अल्पसंख्यांक कायदा हा मुस्लिमांसाठी जास्त लाभदायक ठरेल व यातून आमच्या पूर्वास्पृश्य बांधवांचा (डिप्रेस्ड क्लासेसचा) काहीही लाभ होणार नाही कारण यातून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मुसलमानांना १७७ जागा मिळतील आणि आमच्या पूर्वास्पृश्य बांधवांना केवळ ५९."*


*२४ सप्टेंबर १९३२ चा पुणे करार*


आजचे आंबेडकरवादी बांधव गांधींना कितीही शिव्या घालतात, पण या पुणेकराराने आंबेडकरी जनतेचा म्हणजेच पूर्वास्पृश्य बांधवांचा खरतर सर्वात मोठा लाभंच झाला कारण उपरोक्त कम्युनल अवॉर्डमुळे पूर्वास्पृश्य बांधवांना केवळ ७१ जागा मिळणार होत्या ज्याया पुणे करारामुळे १४८ पर्यंत गेल्या. हा पुणे करार मुंजेंच्या करारानंतर चा होता


*आश्चर्य म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजा नि धर्मवीर डॉक्टर मुंजे यांच्या उपरोक्त आधीच्या कराराचे वर्णन 'Less troublesome and more straigthforward' असे केलं होते, तरीही त्यांनी तो नाकारावा.*


हे असं का घडलं ह्यावर कधीतरी स्वतंत्र चिंतन करु...


आज धर्मवीर डॉक्टर मुंजे यांच्या जयंतीनिमित्त एका अत्यंत महत्त्वाच्या कार्याचं चिंतन करणे आवश्यक वाटले म्हणून हा लेखन प्रपंच !आमच्या अखिल भारत हिंदू महासभेने या कम्युनल एवॉर्डला विरोध केला होता हे येथे जाताजाता सांगणे आवश्यक आहे. अखिल भारत हिंदू महासभेच्या ध्येय धोरणांमध्ये अस्पृश्यतेचे पूर्ण उच्चाटन हे अत्यंत महत्त्वपूर्ण विधेय आहे यावर आम्ही मागे लिहिले आहे.


*ज्यांना धर्मवीर डॉक्टर मुंजे समजून घ्यायचे आहेत त्यांनी महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास आणि त्यांची पत्नी वीणा हरदास यांनी लिहिलेले दोन खंड जुन्या आवृत्तीचे वाचावेत नवीन आवृत्तीचे नको. का नको ते कधीतरी सांगेन.*


जाता जाता महत्वाचं


*प्रस्तुत लेखक हा वेदप्रामाण्यवादी आहे म्हणूनंच तो अस्पृश्यतेला अत्यंत विकृत नि वेदविरुद्ध प्रथा मानणारा असल्यामुळे हिंदू धर्मशास्त्रामध्ये तिचं अस्तित्व पूर्ण नाकारतोच नाकारतो. कारण आमचा हिंदू धर्मशास्त्राचा काहीतरी अभ्यास आहे हे सर्वांस ज्ञात आहे. मुळात ही अस्पृश्यता नेमकी कधी निर्माण झाली हा स्वतंत्र चिंतनाचा विषय असल्यामुळे इथेच लेखणीस विराम देऊ....!*


धर्मवीर डॉक्टर मुंजे यांच्या चरणी विनम्र अभिवादन


#अस्पृश्यता_धर्मवीर_डॉ_मुंजे_हिंदुमहासभा_सशस्त्र_हिंदूंचे_सैनिकीकरण_आंबेडकर_गांधी_पुणेकरार_पाकिस्तान

No comments:

Post a Comment