Monday 3 April 2017

ब्रह्मचर्याचा अनुपम नि सर्वोकृष्ट आदर्श – पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण


मूर्खस्य पञ्चचिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा !
क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः !
श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर शंका घेणार्या मुर्खांनी आधी आपली लायकी पहावी !!! अर्थात ज्यांची अंतःकरणे आधीच वासनेने बरबटली आहेत त्यांना कावीळ झाल्याप्रमाणे जग पिवळेच दिसणार. पुराणांतल्या काही विकृत कथांनीही ह्यात भर घातलेलीच आहे म्हणा ! पण ज्यांनी आयुष्यात कधीच महाभारत वाचले नाही त्यांचासाठी हा लेखनप्रपंच !!!

श्रीकृष्णाच्या ब्रह्मचर्याचा आदर्श !!!
महाभारताच्या जितक्या प्रती आज उपलब्ध आहेत त्यापैकी १९६६ ह्या वर्षी आदरणीय राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या करकमलांनी प्रकाशित झालेली भांडारकर इथली सुखटणकर, बेलवलकर आदि विद्वानांनी संपादित केलेली चिकीत्सक अशी संशोधित प्रत आज सर्वमान्य आहे. सुदैवाने ही प्रत आज आंतरजालावर उपलब्धही आहे. जिज्ञासूंनी इथे ती अभ्यासावी http://sanskritdocuments.org/…/mahabh…/mahabharata-bori.html
श्रीकृष्णाच्या रासलीला वगैरे कथांनी भ्रमित होऊन अनेक लोक त्यांच्या चरित्रावर आक्षेप घेऊन मोकळे होतात. आणि स्वतःला अभ्यासक म्हणविणारेही केवळ पुराणांवर विश्वास ठेऊन श्रीकृष्ण चरित्राचे अध्ययन करतात. वास्तविक पाहता कृष्णचरित्राच्या अध्ययनात महाभारताचा अभ्यास केवळ आवश्यकच नाही तर अपरिहार्यही आहे. श्रीमद्भागवतामध्ये रासक्रीडेच्या प्रसंगातच त्यांना “साक्षातमन्मथमन्मथः” असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात कामविकाराचा लवलेशही असणे भागवतानुसार तर संभवत नाही. पण आता महाभारतानुसार पहायचे म्हटले तर सौप्तिक पर्वाततरी श्रीकृष्णाचे ब्रह्मचर्य त्यांच्याच मुखातून स्पष्टपणे सिद्ध झाले आहे. तो पूर्ण प्रसंग खालीलप्रमाणे
अश्वत्थाम्याने पांडववधाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर त्याचे ब्रह्मशिरास्त्र पांडवांचा शेवटचा गर्भ असा उत्तरेचा त्याच्यावर ते सोडले. त्याआधी श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याचा हा अविचार पाहून युधिष्ठिराला भीमाचे संरक्षण करण्यांस सांगितले. त्यावेळी श्रीकृष्णांनी युधिष्ठीराला अश्वत्थाम्याने मला एकदा माझे सुदर्शन चक्र मागितल्याची कथा सांगितली. आपले ब्रह्मशिरास्त्र श्रीकृष्णांनी घेऊन त्यांचे सुदर्शन आपल्यांस द्यावे अशी गळ त्याने घातली पण त्याला ते जागचे हलविताही येईना. तेंव्हा श्रीकृष्णांनी त्याला उत्तर देताना म्हटले की
“अरे माझ्या प्रिय अशा गांडीवधरी अर्जुनाने देखील कधी मला ते मागितले नाही.”
पुढे आपल्या नैष्ठिक ब्रह्मचार्याचे उदाहरण देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात
ब्रह्मचर्यं महद्घोरं चीर्त्वा द्वादशवार्षिकम् |
हिमवत्पार्श्वमभ्येत्य यो मया तपसार्चितः ||२९||
समानव्रतचारिण्यां रुक्मिण्यां योऽन्वजायत |
सनत्कुमारस्तेजस्वी प्रद्युम्नो नाम मे सुतः ||३०||
महाभारत – सौप्तिक पर्व – अध्याय १२
अर्थ - विवाहानंतर हिमालयात जाऊन द्वादश वर्षे मी घोर असे ब्रह्मचर्याचे तप करून आणि माझ्या बरोबर माझ्या पत्नीने म्हणजे रुख्मिणीने देखील तसेच समान ब्रह्मचर्य व्रत आचरून आम्हा दोघांस ह्या तपःसामर्थ्याने सनत्कुमारांसारखा तेजस्वी असा प्रद्युम्न नामक पुत्र प्राप्त झाला.
अशा प्रद्युम्नाने देखील मला कधी माझे सुदर्शन मागितले नाही ? आणि तु मागतो आहेस ???"""
थोडक्यात विवाहानंतरही जे भगवान द्वादश वर्षे पत्नीसह ब्रह्मचर्याचे अतिघोर आणि उत्कृष्ट पालन करतात, त्या श्रीकृष्णासारख्या चारित्र्यसंपन्न पुरुषांवर स्त्रीलंपटपणाचा आरोप करणारे लोक काय लायकीचे आहेत हे आपण सर्व सुज्ञ आता निश्चितच जाणते व्हाल ! सांप्रतकाली विवाहाच्या आधीही ब्रह्मचर्य पालन करण्याची कल्पनाही न करणारे लोक स्वतः किती लायकीचे आहेत ह्याचा विचार करतील का ??? आचरण तर दूरच राहिले!!!

अश्वमेधिक पर्वातले श्रीकृष्णांचे आणखी एक ब्रह्मचर्याचे उदाहरण
अश्वत्थाम्याने ते ब्रह्मशिरास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडले तेंव्हा जन्माला येणारे मुल जे पुढे परीक्षित नावाने ओळखले गेले ते मृत म्हणूनच जन्माला आले ! तेंव्हा पांडवांचा हा वंश खुंटणार की काय ह्या भीतीने सर्व पांडवपक्षातल्या स्त्रिया विलाप करित असताना द्रौपदी मात्र श्रीकृष्णांच्या आगमनाची वाट पाहत बसली. भगवान तिथे येताच ती त्यांस म्हणाली
“यादवश्रेष्ठ कृष्णा, तु दिलेले वचन पूर्ण करशील ना? तु पराक्रमी, धर्मवेत्ता सत्यप्रतिज्ञ आहेस. त्रिभुवन सारे मृत झाले तरी त्याला जीवित करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. मग भाच्याच्या मुलाला जीवित करण्याचे तुला काय कठीण आहे? तुझे सामर्थ्य ज्ञात असल्यानेच तुझ्यापुढे हे हात जोडून मी मागणे मागत आहे.”
पुढे उत्तरेनेही श्रीकृष्णांची करुणा भाकल्यावर त्यांनी तिला अभय देताना म्हटले.
न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेतद्भविष्यति |
एष सञ्जीवयाम्येनं पश्यतां सर्वदेहिनाम् ||१८||
नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन |
न च युद्धे परावृत्तस्तथा सञ्जीवतामयम् ||१९||
यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ |
तथा मृतः शिशुरयं जीवतामभिमन्युजः ||२२||
महाभारत भांडारकर प्रत – अश्वमेधिक पर्व - अध्याय ६८
अर्थ - “उत्तरे, माझे भाषण अन्यथा कधी होणार नाही; ते सत्यच होईल... मी आजवर कधी थट्टेनेही असत्य भाषण केले नाही, ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन केले आहे, कधी युद्धांत पाठ दाखविली नाही. तरी त्या पुण्याने हा बालक जीवित होवो ! सत्य आणि धर्म जर माझ्या ठायीं असतील तर हा अभिमन्यूपुत्र जीवित होवो !!!”
इथे ब्रह्मचर्य व्रताचे पालन आणि सत्यनिष्ठा हे शब्द सर्व काही सूचित करणारे आहेत. त्यामुळे आणखी काही पुरावे द्यायची आवश्यकता मला तरी वाटत नाही ! वाचक सुज्ञ आहेत !!!


आता ब्रह्मचर्य म्हणजे काय ???
माझ्या हनुमान जयंतीच्या लेखातही मी ब्रह्मचर्य ही संकल्पना स्पष्ट अर्थासहित शब्दबद्ध केली आहे. पुनश्च एकदा स्पष्ट करतो. ब्रह्मचर्य हे दोन प्रकारचे असते
१. उपकुर्वाण ब्रह्मचर्य – आजीवन अखंड ब्रम्हचारी राहणे आणि अष्ट म्हणजे आठ प्रकारच्या मैथूनांपासून सदैव दूर राहून आपले चित्त सदैव सत्कर्मात आणि सद्विचारात मग्न ठेवणे. आता जे आठ प्रकारचे मैथुन कोणते?
 अष्टप्रकार मैथुन-(दक्षस्मृति अ० ७ श्लोणक ३१-३२ ।)
‘श्रवणं स्मरणं चैव दर्शनं भाषणं तथा ।
गुह्यवार्ता हास्यरती स्पर्शनं चाष्टमैथुनम्’ ॥

२. गार्हस्थ्य ब्रह्मचर्य – विवाह करून देखील केवळ स्वस्त्रीशीच व तेही केवळ रतीकाल प्राप्त झाल्यावर केवळ दोन रात्रीच रत होणे. केवळ दोन रात्री कोणत्या ह्यांचे सविस्तर वर्णन महाभारतातच भीष्माचार्यांच्या मुखातून धर्मराज युधिष्ठीर ह्यांनी श्रवण केले आहेत जे शांतिपर्वात आहे ! जिज्ञासूंनी ते वाचावे किंवा मनुस्मृती वाचावी किंवा महर्षी दयानंदांचा ‘संस्कार विधी: हा ग्रंथ वाचावा ही नम्रतेची विनंती !!!

हा ब्रह्मचर्याचा तसाही वरवरचा अर्थ आहे ! मुल अर्थ फार व्यापक आहे. पण विस्तारभयास्तव इथे देत नाही.
आपल्या सभोवतालची जनावरे देखील केवळ रतीकालातच स्त्रीगमन करतात आणि आम्ही मनुष्य मात्र??? बोलायलाच नको !!! 


मग आता पुराणांतल्या कथांचे काय ???
मी वरच सांगितले आहे की मला महाभारत प्रमाण आहे, पुराणे नाहीत ! ह्याचा अर्थ आम्ही पुराणे पूर्णतःच नाकारतो असे नसून ती जितकी उपरोक्त महाभारत वचनांस अनुकूल आहेत तितकीच स्वीकारतो !!! तरीही ज्यांना पुराणातल्या कथांवरून श्रीकृष्ण चंद्रांवर आक्षेप घ्यायचे आहेत त्यांनी पुराणांत वर्णिलेल्या त्यांच्या चमत्काराच्या सर्वच कथा मान्य करायला हव्यात ! अन्यथा केवळ आपल्याया सोयीचे तेवढे उचलणे ही पुरोगामी हिंदुद्वेष्टी आणि शी-क्युलर उचलेगिरी थांबवावी !!! एवढे सांगणे पुरेसे आहे!!!

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्येषु !!!
© तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

1 comment:

  1. आपल्या या सुंदर आणि समृद्ध लेखाबद्दल धन्यवाद

    ReplyDelete