Wednesday 28 December 2022

उरीं राष्ट्रभक्ती रविवत् ज्वलंत, न यें भीती चित्तीं जरीं ये कृतांत - श्रीभिडेगुरुजी

 





काल लव्ह जिहाद नि धर्मांतरणाच्या विरोधांत केज इथे सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदुधर्मरक्षण मोर्चा काढण्यांत आला होता तन्निमित्तची ही क्षणचित्रे. श्रीभवानी माता मंदिर ते श्रीछत्रपति शिवाजी महाराज‌ चौक हा दोन अडीच किमीचा मार्ग ! तीन चार सहस्त्रांच्या संख्येसमोर ऐन माध्यान्ही सूर्य डोक्यावर आला असताना अत्यंत कमी अशा वीसेक मिनीटांत विषय‌ मांडण्याचं सौभाग्य लाभलं. चित्रफीत उपलब्ध झाली की इथे पाठवतोच. त्याचा गोषवारा...

"सर्वप्रथम इतक्या बहुसंख्येने राष्ट्रप्रेमी, हिंदुसमाजप्रेमी, संविधानप्रेमी हिंदु समाज एकवटल्याहेतु सर्वांच्या चरणी नतमस्तक! आपण एक अब्ज ९६ कोटी इतकी वर्षे या पृथ्वीवर आर्य्य किंवा हिंदु किंवा भारतीय म्हणून विराजमान आहोत. भारत हा शब्द ऋग्वेदांतला आहे. आपल्या संविधानाचा आंरभही India that is Bharat असा आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकंच महिन्यापूर्वी आश्विनी उपाध्यायांच्या याचिकेत धर्मांतराच्या गंभीर विषयी सर्व राज्यांनी माहिती द्यावी असा आदेश दिला आहे,  धर्मांतर हे संविधानविरोधीच आहे, १४०० वर्षांपूर्वी कुणी मुसलमान नव्हता, २००० वर्षांपूर्वी कुणी ख्रिस्ती नव्हता, २५०० वर्षांपूर्वी पारशी नव्हता, सर्वधर्मसमान नाहीतंच, जर समान आहेत तर धर्मांतरणं व लव्ह जिहाद का, जर संविधानासमोर सर्वंच समान आहेत तर मग समाननागरी विधेयक का नको, वेगवेगळे कौटुंबिक निर्बंध का(फैमिली लॉ, पर्सनल लॉ), १९८५ मध्ये अखिल भारत हिंदुसभेच्या‌ वतीने लॉ कमिशनसमोर दाखल झालेले समाननागरी विधेयक, लोकसंख्या विस्फोटीचा प्रश्न सर्वांनाच डोकेदुखी ठरेल, Planting the Cross in Asia सगळा आशिया ख्रिस्तमय करण्याचं स्वप्न, इस्लाममय करण्याचे मुस्लिमांचे स्वप्न आणि आह्मीं हिंदु भोळसट आहोत सर्वधर्मसमभावाच्या गप्पा हाणतो, छत्रपति शिवरायांच्या चरित्राचे इस्लामीकरणाचं षड्यंत्र, माता-भगिनींचे सोशल मीडिया अकाऊंट्स तपासा, घरा-घरांमध्ये नित्योपासना हवीच, हिंदुंमध्ये सामुहिक उपासनाच नसल्याने संघटन होत नाही, निदान चहा प्यायला, गप्पा मारायला तरी एकत्र या, आर्थिक नाडी भक्कम करा, केवळ हिंदुंचा हिंदुंशीच व्यापार, चीन-पापस्तानाकडून कुरघोडी सुरुच, राज्यसभेत संविधान फाडलं जातं तरी सगळे गप्प, कारण फाडणारा हिंदु नाही त्यातही ब्राह्मण नाही, फाडणारा मुसलमान, आता संविधानाचा अपमान होत नाही, संविधानाचे खरे शत्रु कोण आहेत ओळखा, तुम्ही हिंदु-मुसलमान-ख्रिस्ती कुणीही असा, भारतीय ही आपली एकंच ओळख का होऊ शकत नाही, लैंड जिहादचा प्रश्न आहे, आपली विधीज्ञांची चमु(टीम) हवी, शिवाजी जन्माला यावेत ते शेजारच्या घरात हे किती दिवस, रक्त सळसळुद्या पण डोकं शांत ठेवा, आपण निदान मावळे तरी होऊयांत, या सगळ्याला रोखायचं असेल तर आपलं संघटन व निर्बंध(कायदा) व संविधान हीच आपल्या हातीं असलेली मोठी ताकद आहे, देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर हिंदु बहुसंख्य राहिले पाहिजेत...आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जागे व्हा...!"




खरंतर वेळ फारंच कमी लाभल्याने फार संक्षेपांत मला हा विषय मांडावा लागला. पण तरीही केजच्या समस्त हिंदु जनतेचे आभार व विशेषत: आमच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी बांधवांचे ज्यांच्या प्रेरणेने व हेतुने हे सर्व आयोजित झालं. अन्य हिंदुत्वनिष्ठ‌ संघटनांचेही तितकेच आभार व अभिनंदन...! विशेषत: आमचे धारकरी बंधु श्री शाहुराजे गुंड व सर्व धारकरी बंधु यांचे अभिनंदन व ऋणी आहे. 

हिंदुंनो रात्र वैऱ्याची आहे, जागे व्हा...! लव्ह जिहाद हे फार मोठ्ठं संकट हिंदुपुढे आहे. धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे...


संपूर्ण कार्यक्रमाची संक्षिप्त चित्रफीत जोडली आहे.‌ माझ्या चिंतनाची करतोच. आमचे बंधु ⁨शिवम जवंजाळ⁩ यांचे विशेष आभार..! 


भवदीय...


#धर्मांतरण_लव्हजिहाद_इस्लाम_ख्रिस्ती_सर्वोच्चन्यायालय_संविधान_हिंदुधर्मरक्षण_उपासना_काश्मीर_पाकिस्तान

Saturday 24 December 2022

हुकलेले गुरु नि हुकलेली शिष्य परंपरा...








ज्या‌ देशांत वेदविद्यायुक्त जितेंद्रिय योगसाधनारत पुरुष जन्माला येत नाहीत नि नेतृत्व धारण करत नाहीत, तिथे नेहमी दुराचारी, पाखंडी, धूर्त नि ठग लोकांकडून सामान्य जनतेंस फसविलें जाते...


इति महर्षि‌ दयानंद सरस्वति


आमच्याकडे वस्त्रांची लक्षावधी वर्षांची नि जगप्रसिद्ध परंपरा असताना आमच्यातले कथित गुरु जेंव्हा स्वत:ला किंवा आमच्या देवीदेवतांना ख्रिस्त्यांचे पोशाख चढवतात, त्यावेळी गत सहस्त्रावधी वर्षे आह्मीं का परदास्यतेच्या शृंखलात बद्ध होतो ह्याची जाणीव होते. अर्थात हिंदुसमाजाची मुख्य समस्या हीच आहे की आमचे मूलभूत सिद्धांत पक्के नाहीत.‌ आह्मांला आमच्या स्वधर्माचेच ज्ञान जिथे नाही, तिथे परधर्माविषयी किंवा पैशाचपंथांविषयी यथार्थता कशी असणार? जिथे अध्यात्मिक गुरु म्हणविणारे लोकंच वैचारिक दृष्ट्या इतके हुकलेले आहेत, तिथे त्यांचा शिष्य परिवार कसा असेल ह्याची‌ कल्पनाच न केलेली बरी. हिंदुंना हिंदुच शत्रु आहेत, वेगळ्या शत्रुंची आवश्यकता काय???

या अध्यात्मिक गुरुंविषयी आमच्या मनात कोणताही अनादर नाही. पण ख्रिस्त्यांचे पोशाख ह्यांनी स्वत: का घालावेत? हे समर्थनीय कसं ठरु शकतं???

आधी रामकृृष्ण मठ, त्यानंतर महायोगी अरविंदांचा पाँडेचरी आश्रम(मी स्वत: २५ डिसेंबरलाच पाहिला आहे), नुकताच रा स्व संघ हे नि असले तथाकथित गुरु नि या‌ सर्व बव्हतांश हिंदुसंघटना म्हणविणाऱ्या २५ डिसेंबर किंवा ईद, मोहर्रम आला की यांना काय सर्वधर्मसमभावाच्या उकळ्या फुटतात कळत नाही. 

ते आमच्याकडे यावेत, ते आमच्याकडे यावेत हे म्हणत आह्मीं कधी त्यांच्याकडे जाऊन सुंता करून घेऊ ह्याचेही भान हिंदुंना राहणार की नाही ह्याची भीती वाटते. अर्थात बोलायची सोयंच‌ राहिली नाही. गोळवलकर गुरुजींना कुणीतरी मुसलमान येऊन मला हिंदु व्हायचं आहे असे म्हणाल्यावर त्यांनी त्याला 'तु हिंदु न होता एक सच्चा मुसलमान बनुन दाखव' असे म्हणणं हे उदाहरण आमचं हिंदुत्व कुठल्या थराला गेलं आहे ह्याचे द्योतक आहे.त्यांनी समाननागरी विधेयकालाही विरोध केला होता हे माहिती असावं हिंदुंना...!  पण त्यांच्याविरोधांत बोलायचं नाही...

पण शूssक बोलायचं नाही... आमच्या नेतृत्वावर शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला??? 


स्वधर्माभिमान तर ह्यांच्यात नाहीच पण त्यातून जी विजीगीषु वृत्ती निर्माण व्हायला तीच नसल्याने हिंदु समाज अशांनाच नेतृत्व मानत असल्याने त्याच्या अस्तित्वाविषयी अंत:करण संदेहाने भरून येतं.

तुम्ही आमच्या शिबीरात या, नुसती‌ सुदर्शन क्रिया केली तर कुंडलिनी आपोआप जागृत होते असे म्हणणारे ह्यांचे अनुयायी पाहता भगवान महर्षि श्रीपतंजलींना योगदर्शन रचून पश्चात्तापाचीच भावना निर्माण व्हायला हवी यात काय संदेह???कुंडलिनी जागृती इतकी सोप्पी कधीपासून झाली???

कलियुगांत गुरुंच्या नावाने ठग निर्माण होतील हे वचन प्रत्यही प्रत्ययांस येणारं आहे. खरंतर आमच्याकडे श्रीज्ञानोबा- श्रीतुकोबा-श्रीनामदेवराय-श्रीचोखोबा-श्रीरामदास या‌ आत्मसाक्षात्कारी संतांची व भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांसारखी इतकी उज्जल नि उदात्त गुरुपरंपरा असताना आमच्या लोकांना हे असले गुरु करावेसे वाटतात यासारखी शोकांतिका काय??? योगेश्वर भगवान श्रीकष्ण, भगवान श्रीरामचंद्रांसारखे मर्यादा पुरुषोत्तम जिथे जन्मांस आले, तिथे ही अवस्था???


पतन आणखी काय असु शकतं एखाद्या राष्ट्राचं नि धर्माचं...??? 


पण आता शिष्यवर्ग एकतर धमक्या द्यायला अंगावर येणार किंवा काहीतरी गोड समर्थन करणार या कृतीचं...! धन्य...


गेल्या दोन दशकांत अनेक सत्पुरुषांचे व त्यातल्या त्यात गत दोन शतकांतल्या महापुरुषांचे चरित्र व साहित्य अभ्यासल्यावर एकंच गोष्ट लक्षात आली ती ही की ज्यांना वैदिक धर्माच्या मूलभूत सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान नाही असे बव्हतांश महापुरुष (मागच्या दोन शतकांतले) हे इस्लाम नि ख्रिश्चनिटीचं यथार्थ आकलन करण्यांत पूर्णत: अपयशी ठरले आहेत. सर्वधर्मसमान आहेत ही विषाची घुट्टी(गुटी) जी हिंदुंना बाळकडु म्हणून सतत पाजण्यांत येते, ती त्यांच्या पेशीपेशीत, नसानसांत अशी काही जाऊन बसते‌ की कितीही नैतिक प्रगती केली तरी ह्या लोकांना त्याची सत्यासत्यता कळत नाही. केवळ तीन चार महापुरुष आहेत ज्यांचा अपवाद आहे की ज्यांनी या दोन्ही समस्यांचे यथार्थ आकलन केलं इतकंच नव्हे तर त्यावर वस्तुनिष्ठ समाधानही सुचवलं. त्यामध्ये अग्रगण नाव महर्षि दयानंदांचे येतं ज्यांनी सर्वप्रथम वैदिक धर्माची विशुद्ध मांडणी करत दुसरीकडे इस्लाम नि ख्रिश्चनिटीची तर्कशुद्घ नि वस्तुनिष्ठ पोलखोल आपल्या सत्यार्थ प्रकाश या अजरामर ग्रंथामध्ये नि अनेक ख्रिस्ती मिशनरी नि मौलवींच्या शास्त्रार्थांमधून केली. त्यांच्या आर्यसमाजी परंपरेतले स्वामी श्रद्धानंद, लजपतरायांसारखे सिंहपुरुष व पश्चात् केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर हेच एकमेव ठरले. आंबेडकरांनीही ही चिकीत्सा केली पण दुसरीकडे आपल्या वैदिक हिंदु धर्माला सुरुंग लावून फोडण्याची भाषा केली. सावरकरांनीही बुद्धिवादाच्या जोरावर सर्वधर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत अशीही विधानं केली, जी अत्यंत अनावश्यक होती. 


भले भले अध्यात्मिक गुरु म्हणविणारे लोक जर असे वागत असतील तर ह्यांची कथित अध्यात्म परंपरा तरी चूक आहे, ह्यांची‌ साधनापद्धती तरी चूक आहे हेच लक्षात आलं पाहिजे किंवा हे लोक लोकैषणेसाठी हे करत असावेत इतकंच सत्य आहे.


त्यामुळे या‌ सर्वांमध्ये केवळ महर्षि दयानंद हेच काय ते वेगळे उठून दिसतात. वाईट ह्याचे की दयानंदांचे सिद्धांत आपल्या प्रचलित सनातन धर्माला जणु काळ आहेत असे समजुन काही सनातन्यांनी इस्लामचे व ख्रिश्चनिटीच्या संस्थापकांची भलामण केली व महर्षींची यथेच्छ निंदा केली. (शास्त्रार्थ पंचक - माधवाचार्य शास्त्री) म्हणजे दयानंद शत्रु पण इस्लामचे नि ख्रिश्चनिटीचं संस्थापक मात्र महात्मा...! रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेली महात्मा येशु व ख्रिस्त ही पुस्तके जिज्ञासूंनी वाचलेलीच असतील. बंगाली लोकांचे इस्लाम प्रेम नवीन नव्हेच म्हणा. मी विवेकानंद समग्र वाचले आहेत.


त्यामुळे अनेक जण आह्मांस विचारतात की आह्मीं सारखे दयानंद दयानंद का करतो तर त्याचे हेच कारण आहे. ज्यादिवशी हिंदु समाज सत्यार्थ प्रकाश हा अमर ग्रंथ समजून घेईल, तो सुदिन असेल...! हिंदुना स्वधर्माचं ज्ञान घेणं जितंक आवश्यक आहे त्याहीपेक्षा अन्य पैैशाचपंथीयांचेही आहे. तुलनात्मक धर्मशास्त्राध्ययन ही काळाची अत्यंत आवश्यकता आहे.



भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#ख्रिश्चनिटी_नाताळ_ख्रिसमस_इस्लाम_सर्वधर्मसमभावाचे_वेड_धर्मचिकीत्सा_संतपरंपरा_अध्यात्म

Thursday 22 December 2022

अस्तित्वात नसलेल्या ख्रिस्ताचा ख्रिसमस???

 





*The Jesus that never existed...*


जो येशु ख्रिस्त कधी अस्तित्वातंच नव्हता त्याची जयंती? आयुष्यांत कधी बायबल वाचलंय का? छे छे! अहो वाचन वगैरे कोण करणार?


*येशु ख्रिस्ताच्या अस्तित्वाचा जिथे एकही ठोस पुरावा ख्रिस्ती‌ साहित्यात नाही, तिथे इथे हिंदुस्तानात नाताळ साजरा केला जाणार...*


*पहिल्या तीन शतकांत ख्रिसमस हा कथित सण स्वत: ख्रिस्ती लोक साजरा करत नव्हते. पण मूर्ख हिंदु समाज तो उत्साहाने पाळतो. १६व्या शतकांत उदयांस आलेला प्युरिटन्स नावाचा ख्रिस्त्यांमधलाच एक समुह ज्याने इंग्लंडमध्ये ख्रिसमसला बेकायदेशीर(Illegal) घोषित केलं होते. सुरुवातीला तीन-चार शतकांमध्ये चर्चमध्येही तथाकथित ख्रिस्ताचा जन्म साजरा केलाच जात नव्हता. २५ डिसेंबर हा दिवस कसा ठरवला गेला याची‌ कथा पण मजेशीर आहे पण विस्तारभयास्तव देत नाही.*






*गोव्यामध्ये हिंदुंवर अनन्वित अत्याचार...*


*जर सर्वधर्मसमान आहेत तर हे ख्रिस्ती लोक आपल्या हिंदुंना ख्रिस्ती का करतात? इतका साधा प्रश्न आपल्याला का पडत नाही?*



*ज्या‌ ख्रिस्त्यांनी आपल्या हिंदु पूर्वजांच्या मुंडक्यांचे मनोऱ्याचे मनोरे गोव्यात इन्क्विजिशनच्या नावाने रचले, त्या ख्रिस्ताचा नाताळ आमचे बावळट हिंदु साजरा करतात. स्वधर्माभिमान? छे! ज्यांनी आपल्या इतिहासाची वाट लावली, आपल्यात कलह निर्माण केला, वाट्टेल तसा घाणेरडा इतिहास लिहून आपला बुद्धिभेद केला, त्यांचे सण साजरे करायचे?आर्याक्रमण सिद्धांत त्यांनीच मांडला, जातीयवादही त्यांनीच पेरला, ख्रिस्ताच्या प्रचारासाठी पद्धतशीर विषाची पेरणी त्यांनीच केली. पण आपल्याला हे कुठे माहिती आहे? अहो खरा इतिहास कोण वाचणार म्हणा? ट्रेंड फॉलो करायला नको का फोटोशुटिंगसाठी...? खोटा इतिहास तर भटा-बामणांनी लिहिला. हे ख्रिस्ती‌ तर आमचे देवदुत म्हणणारे होतेच की...*


*ख्रिस्ती ब्रिटीश भारतात यायच्या आधी आपण जगाच्या व्यापारापैकी एकतृतीयांश वाटा असलेला इतके श्रीमंत होतो. आपली अर्थव्यवस्था आपला व्यापार इतका समृद्ध होता. पण ब्रिटीशांनी हे ओळखलं व आपली बारा बलुतेदारांवर आधारित असलेली गावगाड्याची अर्थव्यवस्था त्यांनीच पद्धतशीर नष्ट केली. हे आपल्याला माहिती तरी आहे???*


*छत्रपति शिवरायांनी धर्मांतर करणाऱ्या चार ख्रिस्ती मिशनऱ्यांची मुंडकी छाटली होती हे अनेकांना माहिती असेलंच. हाँ हे पुरोगामी महाराष्ट्रांत‌ कधी सांगितलंच जाणार नाही. तथाकथित शिवव्याख्यातेही सांगणार नाहीत. कारण सेक्युलर शिवराय मांडायचे आहेत ना!अहो असं काय करता? आमचा राजा कुठल्या धर्माविरुद्ध नव्हता. फक्त भटा-बामणांच्या विरोधांत होता...!*


*Planting the Cross in Asia...*


एकदा गुगलवर हे पाच शब्द शोधून पहा काय येतं. सगळा आशिया ख्रिस्तमय करायचं त्यांचे स्वप्न ते उघड उघड बोलताहेत. मागे ह्यावर सविस्तर लेख लिहिलाच आहे. 


*पहिल्या एक सहस्त्रकांत आह्मीं अख्खा‌ युरोप ख्रिस्तमय केला.‌पुढील एक सहस्त्रकांत अख्खा अमेरिका खंड ख्रिस्तमय केला. आता येत्या सहस्त्रकांत म्हणजे २००१ पासून ३००० मध्ये अख्खा आशिया ख्रिस्तमय करायची त्यांची जाहीर घोषणा आहे.*


१९९९ साली पोप जॉन पॉल भारतात आला होता त्यावेळी  अटल बिहारींचे सरकार होते. त्या पोपने सरळ घोषणा केली की आह्मांला येत्या सहस्त्रकांत अख्खा आशिया ख्रिस्तमय करायचा आहे. टाईम्स नावाचे वृत्तपत्रांत आलं होते हे. गुगल करून पहा वर्तमानपत्र मिळतील त्यावेळची...


पण आह्मांला काय? 


*आह्मीं सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार...! इतिहासातून काही शिकणार तर नाहीच.*


*आह्मीं आमच्या-आमच्यातंच भांडून एकमेकांची माथी फोडणार. कुणीतरी आमच्याआमच्यात विष पेरणार व आह्मीं शत्रुला सोडून स्वकीयांनाच शत्रु समजणार व कोरेगांव भीमा घडविणार.*


हिंदुंनो, जागे व्हा, इस्लामचं संकट जितकं उघड उघड आहे, तितकंच ख्रिस्त्यांचे स्वीट पॉईजन सारखं आहे. हा ख्रिस्ती वणवा एकेदिवशी देशाला गिळून टाकेल. धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे हे वेळीच ओळखा.


*सर्वधर्मसमान नाहीयेत. भोळ्या भ्रमांत जगु नका...*


आयुष्यांत एकदा तरी बायबल कुरआन वाचून काढा, काही पाप लागत नाही. मग कळेल सर्वधर्मसमान खरंच आहेत का...!


*ते सगळ्या जगाला ख्रिस्तमय व इस्लाममय करायला बसलेत. आणि आपण बसलोय सर्वधर्मसमभावाचे गोडवे गात...!*


जागे व्हा...! जागे व्हा...! जागे व्हा...!


भवदीय


#ख्रिस्तीधर्मांतर_येशुख्रिस्त_नाताळ_बायबल_गोवा_अत्याचार_राष्ट्रांतर

Tuesday 25 October 2022

महर्षि दयानंदांचे विस्मरण - नव्हे नव्हें राष्ट्राचे मरण...!

 




आज आश्विन वद्य अमावस्या! आज‌ दीपावली! हिंदुंचा सर्वोच्च सण...! आज सुदैवाने सूर्यग्रहण होतं. दोन शतकांपूर्वी असेच ग्रहण ह्या भारतमातेला लागलं होते. एकेकाळी विश्वगुरुच्या पदांवर आरुढ असलेला हा आर्य्यावर्त, हा भारतदेश, हे प्राचीन हिंदुराष्ट्र आठशे वर्षांच्या म्लेंच्छांच्या परदास्यतेमध्ये गुंतल्यावर पुण्यश्लोक शिवाजी नि महाराणा प्रतापांसारख्या क्षत्रियोत्तमांनी त्याच्या‌‌ विमुक्ततेसाठी, अवनी मंडळ निर्यावनी करण्यासाठी आपल्या खड्गाच्या धारेने क्षातत्रेजाचं विजयी प्रदर्शन करूनही पुन्हा ब्रिटीश दस्युंच्या पारतंत्र्यात ते बद्ध झालं. याची कारणमीमांसा हा स्वतंत्र विषय‌ असला तरी वैदिक धर्माला आलेली ग्लानी हे प्रमुख कारण कुणीच नाकारणार नाही. वेदांचा झालेला दु:स्वास, अनार्ष ग्रंथांचा अनाचार, अस्पृश्यता, स्त्रियांचे ८व्या वर्षी विवाह, विधवास्त्रियांची पुनर्विवाहबंदीमुळे झालेली दु:स्थिती, सतीचप्रथेचा काहीसा आचार, जन्मजात वर्णव्यवस्थेने निर्माण केलेली जातीव्यवस्था नि त्यातून दुर्दैवाने पुढे निर्माण झालेली विषमता, चातुर्वर्ण्याचे झालेलं कर्महीनपतन, विशेषत: ब्राह्मण नि क्षत्रियांची झालेली कर्मच्युती या नि अशा कैक कारणांनी इतिहासामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रचलित विभिन्न संप्रदायांच्या बाह्य आवडंबराने हिंदुसमाज जेव्हा प्रवंचित आणि प्रपीडित होत होता, अशावेळी हिंदूंसाठी त्यांचा विशुद्ध वैदिक धर्म हा आपल्या दिव्य आभेचा प्रसार करून जनसाधारणाच्या अभ्युदय आणि नि:श्रेयसाचे साधन रूप बनणे आवश्यक होता. वेद आचरणांत आणणं आह्मीं जवळजवळ सोडूनंच दिले होते, केवळ कंठस्थ करत होतो, ते आह्मांस पुन्हा आचरणप्राप्त करून देणं आवश्यक होतं...


भारतदेश हा गुरुपरंपरा प्रमाण मानणारा! योगेश्वर भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी मथुरेच्या पाठशाळेमध्ये एक अंध दंडी संन्यासी भारतदेशाची ही अवनतावस्था पाहून व्यथित होत होता. ८१वर्षांच्या आजीवन अखंड ब्रह्मचर्याच्या साधनेने नि वेदाध्ययनाने परिप्लुत नि तप:पूत झालेला तो अनार्षग्रंथांच्या जंजालामध्ये फसलेल्या हिंदू समाजाला आर्षग्रंथांच्या उद्धाराने उद्दीपित करू इच्छित होता. परंतु स्वतः जर्जर, वयोवृद्ध आणि चक्षुहीन असल्यामुळे हे दिव्य कार्य करणे त्या सत्पुरुषाला संभव नव्हते. त्याच्या पाठशाळेमध्ये तसे अनेक छात्र येऊन गेले परंतु आपल्या गुरुच्या आदर्शांना आणि मान्यतांना चरितार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून एकमात्र ध्येयाने प्रेरित होऊन या वसुंधरेवर एका नवीन वैचारिक क्रांतीचा सूत्रपात करण्याची योग्यता त्याच्या केवळ एकाच सत्शिष्यामध्ये मध्ये होती. तो गुरु म्हणजे दंडी स्वामी विरजानंद सरस्वति आणि तो सत्शिष्य म्हणजे महर्षी दयानंद सरस्वती! आज त्याच महर्षि दयानंदांचे पुण्यस्मरण...!


वेद हाच हिंदुंचा एकमेव उद्धाराचा मार्ग आहे हिंदुंना सतत निक्षून सांगणाऱ्या एका सत्पुरुषाची ह्या भरतभूमीला आवश्यकता होतीच होती. धर्मशोधन, शास्त्रसुधार नि प्रचलित विकृतींना ध्वस्त करण्याची प्रचंड इच्छा धुमायित अग्नीप्रमाणे ज्याच्या अंत:करणांत घनीभूत होत होती, जी योग्य संधी प्राप्त होताच प्रचंड हुताशनाच्या रुपाने प्रज्वलित होऊन तींमध्ये अज्ञान, अंधविश्वास नि जडतेचा विशाल स्तुप जळून भस्म होणं आवश्यक होतं, असे अंत:करण असलेली एकंच व्यक्ती होती महर्षि दयानंद सरस्वती! धर्माचे मंडन नि अधर्माचे खंडन करण्यासाठी शेकडो वर्षे प्रचलित असलेल्या मिथ्या धारणांच्या खंडनासाठी ज्याची जिव्हा सदैव काळपुरुषाप्रमाणे ज्वालाग्राही होती, तो कालजिव्ह होता वेदऋषि दयानंद! हे 'कालजिव्ह' नाव गुरुनेच त्यांना दिलं होतं...!


आज महर्षि दयानंदांचे‌ स्मरण का व कशासाठी???


स्वातंत्र्यपूर्वकाळात इतके महापुरुष‌ जन्माला आलेले असताना ह्या एका संन्याशाचे स्मरण कशाला? तेही दीपावलीच्या मुहूर्तावर??? त्यासाठी महर्षि दयानंदांच्या आधीची परिस्थिती पहायला हवी...


म्हणे वेद हे केवळ द्विजांसाठीच आहेत किंवा कलियुगांत केवळ शुद्रंच आहेत, अन्य वर्ण नाहीत(कलौ शुद्रौ सम्भव:), स्त्री-शुद्रांनी वेद ऐकु नयेत,उच्चारुही नयेत, वेद शंखासुराने पळवले, व्यासांनीच एका वेदांचे‌ चार विभाग केले म्हणे, वेद हे केवळ कर्मकांडासाठीच आहेत, त्यांचे अन्य कोणतंही प्रयोजन नाही, खरं ज्ञान उपनिषदांमध्येच आहे, षट्दर्शने परस्परविरोधी आहेत म्हणे, मीमांसक ईश्वर मानत नाहीत, केवळ कर्म प्रधान मानतात, नैय्यायिकही तसेच‌ काहीतरी मानतात, सांख्य व योग निरीश्वरवादी आहेत, उत्तरमीमांसाच आधीच्या दर्शनापेक्षा श्रेष्ठ असून तींत आधीच्या सर्वमतांचे खंडन आहे वगैरे‌ वगैरे, वेदांमध्ये विविध अवतारांचे वर्णन आहे, वेदांमध्ये नद्यांची, पर्वतांची वर्णने आहेत, वेदांमध्ये आपला भारतवर्षीच इतिहास आहे म्हणे, आर्य इकडून तिकडे गेल्याचे संदर्भ आहेत म्हणे, वेद काही शेकडो‌ किंवा सहस्त्रो वर्षांपूर्वी रचले गेलेत, तेही क्रमाक्रमाने, वेदांची‌ रचना ऋषींनी केली आहे म्हणें, वेदांमध्ये गायीसहित अनेक निर्दोष नि निष्पाप पशुंची हिंसा व मांसभक्षण आहे‌ वगैरे, कलिवर्ज्याचे प्रकरण, ज्यानुसार ही सर्व पशुहिंसा आज त्याज्य आहे, संन्यासही त्याज्य आहे म्हणे,(तरीही सर्व करतातंच हे) अस्पृश्यता वैदिकंच आहे म्हणें, स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकारंच नाही, त्यांनी सती गेलंच पाहिजे आदि आदि अनेक अवैदिक कुप्रथांचं, भ्रांतींचं व अनार्ष ग्रंथांचं आजच्यासारखंच ग्रहण जेंव्हा आपल्या प्राणप्रिय वैदिक धर्माला लागलं होते, तेंव्हा ह्या ग्रहणाच्या मोक्षासाठी आर्षग्रंथाचा उद्धार करण्याच्या हेतुने आर्षज्ञानप्रचंडभानु अशा दयानंद नामक दिवाकराची आवश्यकता होती.


मथुरेच्या पाठशाळेत आर्षज्ञानाची ज्योत प्रज्वलित केलेला हा योद्धा‌ संन्याशी गुरुला गुरुदक्षिणा देता झाला की भारतवर्षाचा उद्धार करण्यासाठी वेद, वेद आणि वेदांचाच प्रचार जीवनभर करीन व जे काही वेदबाह्य ते‌ त्याज्य‌ मानून आर्ष ग्रंथांचा

पुनरुद्धार करत समग्र मानवजातींस वेदांचा मार्ग दाखवीन...! समग्र मानवजातींस...!

आपला हिंदुधर्म हा ईश्वरप्रणीत व ऋषिप्रणीतंच असल्याने आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत ग्रंथांच्या आधारेच ह्या धर्माचा व राष्ट्राचा उद्धार‌ करण्याची विजीगीषु मानसिकता ह्या दयानंद नामक वेदवेत्त्याच्या ह्रदयी गुर्वादेशाने निर्माण झाली व जीवनभर त्या आदेशाचे पालन करण्यासाठी वेदोद्धारक श्रीकुमारिलभट्टपादांप्रमाणेच ह्या वैय्याकरणसूर्याने प्राचीन आर्षपरंपरेला अनुसरून वैदिक ग्रंथरुपी गायीचं दोहन करून वैदिक सिद्धांतांची‌ यथार्थ पुनर्संस्थापना करण्यासाठी ऋग्वेदादिभाष्यभूमिका नि सत्यार्थ प्रकाश र्या ग्रंथद्वयांची निर्मिती केली. ज्यात‌ त्यांनी विशुद्ध वैदिक मताच्या पुनर्संस्थापनेसाठी तत्कालीन प्रचलित सर्व वैदिक नि अवैदिक मतांची‌ चिकीत्सा वेदांच्या आधारेच आपल्या‌ तर्कसंपन्न सुतीक्ष्ण बुद्धीने करून अखिल मानवजातींस आपल्या आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला...! हे करताना काही ठिकाणी अत्यंत कठोर भाषेचा झालेला प्रयोग हा त्या सत्पुरुषाच्या‌ सात्विक‌ संतापाचा साक्षात्कार असला तरी शेवटी ह्या‌ सर्वामागे सत्याचा स्वीकार नि‌ असत्याचा त्याग हेच त्यांचे जीवनविषयक सूत्र होतं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 


*"सत्याचा स्वीकार आणि असत्याचा त्याग हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. मनुष्याचा आत्माही त्याला सत्याकडे अग्रेसर करत असते, परंतु तोच मनुष्य हठधर्मिता, दुराग्रह, अज्ञान, अनभ्यास, अंधाभिमान, पंथाभिमान, संप्रदायाभिनिवेश, लोकापवाद, तीन प्रकारच्या ऐषणा, स्वार्थादिकता या‌कारणांंमुळे सत्याचा‌ स्वीकार करत नाही."*


इति देव दयानंद


*महर्षि दयानंदांचे साहित्य*


उपरोक्त दोन ग्रंथ, ऋग्वेदावर सप्तम मंडल ५२व्या‌सुक्तापर्यंत भाष्य, यजुर्वेदाचं‌ संपूर्ण भाष्य, वेदांग प्रकाश नावाने १६ खंड, पंचमहायज्ञविधी, वेदान्तध्वान्तनिवारण, कैक शास्त्रार्थ, आर्योद्देशरत्नमाला, संस्कारविधी, संस्कृतवाक्यप्रबोध, व्याकरण महाभाष्याचा हिंदी अनुवाद, इतरही अनेक ग्रंथ गुगलवर पहावेत. विस्तारभयास्तव सर्व सूची इथे देत नाही. आपल्या धर्माकडेचे नव्हे तर इतरही मतमतांतरांकडे आपण कसं पहावं हे पाहण्सासाठी हे सर्व ग्रंथ चिंतनीय आहेत.


*महर्षि‌ दयानंदांचे वेगळेपण कशात आहे???*


मला चारही वेदांचे भाष्य करायला चारशे वर्षे‌ लागतील असे दयानंद म्हणाले होते.‌यावरून त्यांची‌ वेदांकडे पाहण्याची दृष्टी काय होती हे लक्ष्यीं येईल. अर्थात वेदभाष्य हा किती अवघड‌ विषय आहे हेहीं कळून येईल. यात‌ काहींना अत्युक्ती वाटेल पण ज्यांना ती परंपरा ज्ञात आहे त्यांना ह्यातलं मर्म कळेलंच. आजकाल कुणीही उठतं व वेदांवर वाट्टेल ते‌ लिहितं व्यक्त होते, अशावेळी दयानंदांचे हे वाक्य महत्वाचं आहे.

शास्त्रार्थाची परंपरा उज्वल करत हिंदुंना वेदांच्या आधारावरंच‌ एकमत करायला लावणं. ह्यासाठी कैक संप्रदाय नि मतप्रणालींचे‌ खंडन करून त्यांचा‌ तळतळाटही त्यांनी भोगला, आजही भोगताहेत. पण यामागे त्यांचा हेतु शुद्ध होता. चार वेदांच्या एकाच छत्राखाली सर्व हिंदुंना एकत्र करण्याचे‌ त्यांचे‌ स्वप्न दिव्यंच‌ होतं ह्यात‌ संदेह नाही. पण हे सर्व करत असताना त्यांची भूमिका ही

*तापाच्छेदाच्च निकषात् सुवर्णमिव पण्डितै:| परीक्ष्य मद्वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्|*

तत्वसंग्रह

*युक्तियुक्तं ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्|*

भास्कराचार्य

या न्यायाने दयानंदांची सर्वच मते ग्राह्य असावीत असा अट्टाहास मूळीच नाही पण तरीही ती विचार करायला लावावीत अशीच होती. हिंदुंना विचारप्रवृत्त करायला लावणारा,‌‌ सत्यासत्यतेची कसोटी प्रत्येकवेळी लावायला लावणारा हा महात्मा म्हणूनंच ब्रिटीशांच्या व काही स्वकीय‌ स्वमतांधांच्या रोषांस कारणीभूत ठरला. त्यांच्या निर्भीड अशा वैदिक डिंडिमाने‌ काही कृपमंडुक संप्रदायाभिनिवेशींना तो‌ त्यांच्या मतमतांतराचा काळ वाटला व म्हणून त्यांचा‌ कायमचा काटा‌ काढण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचा घाट घातला गेला.‌ असे सतरा विषप्रयोग पूर्वी पचवलेला तो ह्या अठराव्या विषप्रयोगाने मात्र जीवनाच्या अंतिम प्रवासाकडे निघाला. 


*महर्षि दयानंदांचे महाप्रस्थान*


*आश्विन वद्य अमावस्या - ३० ऑक्टोबर, १८८३*


*हा माझा अंतसमय जवळ आलाय, उपचार सोडून द्या आता.*


जहाल विषप्रयोगाने शरीरावर आलेल्या फोडांतून होणारा रक्तस्त्राव सहन करत हा महात्मा आधी काही काळ प्रात:काली ११ वाजता शौच-मुखमार्जन करून, दंतधावन करून, क्षौर करून स्नानासाठी उत्सुक असूनही वैद्यांच्या आदेशे ते करु शकला नाही. ओल्या वस्त्राने शरीर स्वच्छ करताच फोडांमधून वाहणाऱ्या रक्ताने श्वास तीव्रगतीने सुरु झाला.


*एका महायोग्याच्या महाप्रस्थानाचा हा आरंभ होता*


आपलं मन, प्राण तथा आत्मा संपूर्णत: एकाग्र करून त्या परब्रह्म परमात्म्यांवर केंद्रित करून हा योगी महानिर्वाणांस निघाला.


एका शिष्याने त्यासमयी पृच्छा केली


*महाराज, आपले चित्त कसे आहे?*


महर्षि दयानंद - *छान आहे. आज एक मासाने आम्हांस विश्रांतीचा समय प्राप्त झाला आहे.*


लाला जीवनदासांचा प्रश्न - *आपण कुठे आहात ?*


महर्षींचे उत्तर - *ईश्वरेच्छेमध्येच !*


त्या प्रभुभक्त संन्याशाने आपले स्वत्व त्या ईश्वरांस अर्पण केलं.


पुढे सायंकाळी साडेपाच वाजता शिष्यांनी आणखी विचारलं की आता आपले चित्त कसंय?त्यावेळी हा ऋषी उत्तरला


*छान आहे. प्रकाश(तेज) आणि अंध:काराचा भाव आहे.*


कुणाला काहीच समजलं नाही. पुढे त्या ऋषीने तिथी नि वार ज्ञात करून वेदमंत्रांचे पठण केलं. संस्कृत भाषेत ईशस्तवन केलं. तत्पश्चात हिंदी भाषेत परमेश्वराचा गुणानुवाद करून श्रेष्ठ अशा गायत्री मंत्रांचा जप करून आपल्या उत्फुल्ल वदनाने प्रिय अशा


*ॐ विश्वा॑नि देव सवितर्दुरि॒तानि॒ परा॑ सुव । यद्भ॒द्रं तन्न॒ आ सु॑व ॥*


ह्या ऋग्वेदातल्या ५.८२.५ येथील प्रिय मंत्रांचा गंभीर स्वरोच्चार केला. अनेकवेळा पुन्हा पुन्हा उच्चार केला. काही वेळ समाधी अवस्थेत जाऊन चित्त एकाग्र केलं नि पुन्हा नेत्र उघडून आपले अंतिम उद्गार त्या ऋषिश्रेष्ठाने उच्चारले ते असे


*हे दयामय सर्वशक्तिमान परमेश्वर, तेरी यही इच्छा है, तेरी यही इच्छा है, तेरी इच्छा पूर्ण हो, अहा तुने अच्छी लीला की ।*


त्यावेळी सरळ झोपलेल्या त्या महात्म्याने एका बाजुंस होऊन एक दीर्घ श्वास घेऊन तो रोखला (कुंभक) नि लगेचच पूर्ण रेचक (श्वास सोडला) केला. तो अमर आत्मा पांचभोतिक देह त्यागून त्या ईश्वरांस प्राप्त झाला. त्याची मानवलीला समाप्त झाली.


*एकोणिसाव्या शतकांतला एक महर्षि, आर्षधर्माचा द्रष्टा, अद्वितीय धर्माचार्य आणि संशोधक, महान समाजोद्धारक, संस्कारक तथा राष्ट्र नि अखिल मानवजातीचा सर्वविधपरिपूर्ण मंगलकामनाकर्ता हा आज महासमाधींस प्राप्त झाला. त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो महात्मा त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. महर्षि मनु, महर्षि व्यास, महर्षि याज्ञवल्क्य, महर्षि जैमिनी, परमहंस भगवान पूज्यपाद श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या प्रोज्वल परंपरेंचा तो प्रतोस्ता ऋषि, भारतीय नवजागरणाचा पुरोधा आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला. सायंकाळी सहा च्या सुमारांस.*


आयुष्यांत एकदा तरी सत्यार्थ प्रकाश व ऋग्वेदादिभाष्यभूमिका हे दोन ग्रंथ हिंदुंनी वाचावेत ही नम्रतेची विनंती...!


त्या महायोग्याच्या चरणी कोटी अभिवादन...!



भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_दयानंद_सरस्वति_पुण्यतिथी_वैदिकधर्म_सत्यार्थप्रकाश_स्वधर्माचरण_हिंदुत्व

Tuesday 13 September 2022

राष्ट्रीय हिन्दी दिवस पर कुछ चिन्तन...

 



गत कई वर्षोंसे मुख्यरुपसे वैदिक साहित्यका अध्ययन मूलतः संस्कृत एवं हिंदीभाषामें सौभाग्यप्राप्त विषय रहा है। एक समय था मातृभाषा मराठी होनेके कारण जिसकालमें पुणेके सिम्बायोसिस कला एवं वाणिज्य महाविद्यालयमें प्रवेश पश्चात् महाविद्यालयीन अमराठी सहाध्यायीयोंसह हिंदीमें वार्तालाप करनें हम कठिनाईयाँ अनुभव करतें थे। सौभाग्यसे चन्द्रप्रकाश द्विवेदीजीकी चाणक्य नामक धारावाहिकका अवलोकन प्राप्त हुआ उस समयसे हिंदी भाषाके प्रति रुचि निर्माण एवं वृद्धिंगत हुई। हम ऋणी है उस ऋषिश्रेष्ठ यतिवर महर्षि दयानन्द के एवं उनसे स्थापित आर्यसमाज एवं उनके विद्वानोंके जिन्होनें हिन्दीभाषा को पाश्चात्य भाषाओंसे मुक्त कर संस्कृतनिष्ठ मूलस्वरुपता प्रदान करनेका महत्कार्य किया।


आर्यसमाज का हिंदी भाषाको योगदान यह एक स्वतन्त्र विषय है जिसपर किसी एक विदुषीने आचार्यपदप्राप्त हेतु प्रबन्ध का निर्माण किया है। विस्तारसे इस विषयपर भविष्यमें यदि संभव हो तो लेखन करेंगे। *स्वयं स्वातन्त्र्यवीर सावरकरजीने महर्षि के कार्य का गौरव* करते समय लिखा है की 


 "महर्षि दयानन्द द्वारा लिखित सत्यार्थ प्रकाश में जिस हिन्दी के दर्शन हमें प्राप्त हैं, वहीं हिन्दी हमें स्वीकार है। यह सरल, अनावश्यक विदेशी शब्दों से अलिप्त होकर भी अत्यन्त अर्थ वाहक तथा प्रवाही है। महर्षि दयानन्द ही सर्वप्रथम नेता थे, जिन्होंने 'हिन्दुस्तान के अखिल हिन्दुओं की राष्ट्र भाषा हिन्दी है ऐसा उद्घोष व प्रयास किया था."


(सन्दर्भ-वीर वाणी पृष्ठ ६४)


इसका प्रत्यय महर्षीकें ग्रन्थोंका अध्ययन करनेपश्चात् सहजतासे प्राप्त है। उनके पश्चात भारतेन्दु हरिश्चन्द्र, महावीरप्रसाद द्विवेदी, जयशंकरप्रसाद, सुमित्रानन्दन पन्त आदि विद्वानोंको हिन्दी भाषा के विकास एवं वृद्धिकें विषयमें अधिकारी कहना आवश्यक है । 


यहाँ यह कह देना कोई अत्युक्ती नहीं होगी प्रथम वार हम महर्षीके एवं सावरकरजीके कथन से असहमती प्रकट करते है । हम तो संस्कृतभाषा कोही राष्ट्रभाषा का सम्मान प्राप्त करना इच्छुक है, नाकी हिन्दी अथवा अन्य कोई भाषाको । अस्तु वह स्वतन्त्र विषय है । संस्कृतही राष्ट्रभाषा होना आवश्यक है यह डॉ. भीमराव अम्बेडकरजीका भी मन्तव्य था ।


हिन्दी का स्वरुप एवं विकास


पण्डित भगवद्दत्त, रिसर्च स्कॉलर, बीए, उनके "भाषा का इतिहास" इस अभ्यासपूर्ण ग्रन्थमें यह प्रतिपादन करते है की हिन्दीभाषा के ६५% शब्द मूलरुपसे साक्षात संस्कृत अथवा उसके अपभ्रंश रुपसे है। इसकी लिपी देवनागरी जिसमें ५२ अक्षर है, जिसमें १४ स्वर एवं ३८ व्यञ्जन है। गुरु ग्रन्थसाहिब में इस भाषा का नाम बावनी ऐसा लिखा है, हिन्दी नाम पश्चात् का है। इसमें संस्कृत के स्वर स्पष्टरुपसे दर्शित होते है इस कारण हिन्दी का संस्कृतसे घनिष्ट सम्बन्ध स्पष्ट है। यद्यपि हिन्दी भाषापर सबसे अधिक प्रभाव संस्कृत का है तथापि प्राकृत, अपभ्रंश, अवधी, ब्रज, फारसी, तुर्की, अरबी आदि भाषायोंकाभी है। विक्रम संवत १००० से इस भाषा का विनियोग होता आ रहा है। विक्रम संवत १२०० सें इसके साहित्यिक भाषा के प्रमाण प्राप्त होते है। गत दो शताब्दीयोमें इस भाषामें उत्तम परिमार्जन हुआ जिसका श्रेय उपरोक्त विद्वानोंको जाता है।


प्रयास तो यह होना आवश्यक है की हिन्दीभाषामें हुए इन विदेशी एवं भ्रष्ट भाषाओंके आक्रमण को नष्ट कर हिन्दी भाषामें अधिकतम् अधिक संस्कृतोद्भव शब्दोंकाही प्रयोग किया जाएँ। संस्कृतनिष्ठ हिन्दीकाही प्रचार एवं प्रसार हो। 


आज हिन्दीभाषा दिन के उपलक्ष्यमें हम यह दृढ संकल्प करेें की इस भाषा को पुन: उसका गौरव प्रदान करें तथा स्वयं इस भाषा कें संरक्षणमें कृतबद्ध होवें।


हिंदीभाषा भारतवर्ष की सर्वाधिक जनसंख्याकी भाषा होनेके कारण एवं उसका अस्मद् मराठीभाषा के प्रति सहसम्बन्ध के कारण हिंदीभाषामें संवाद करना तथा लेखन करना सौभाग्य का विषय है। जितना संभव हो विशुद्ध संस्कृतनिष्ठ हिंदी का आग्रहही श्रेय है। इसहेतु संस्कृतभाषा का अध्ययनभी हिंदीसह आवश्यक है।


हिंदीभाषा दिनके उपलक्ष्यमें इस राष्ट्रकी सांस्कृतिक एकात्मताहेतु इस भाषा को परकीय भाषाओसें मुक्त करनेका संकल्प हम करें।सांप्रत आङ्ग्ल भाषाके प्रति हो रहा अनाठायी अट्टाहास भारतीय भाषाओंके ह्रास का प्रमुख कारण है। यद्यपि आङ्ग्लभाषाका अध्ययन आवश्यक है, तथापि स्वकीय मातृभाषा एवं संस्कृत तथा तज्जन्य भारतीय भाषाओंके संरक्षण, संवर्धन तथा प्रचार-प्रसार का दायित्व एक भारतीय होनेके कारण प्रत्येक व्यक्तीकें स्कन्धोंपर है।


राष्ट्रीय एकात्मता दृढ करनेहेतु हम संकल्पबद्ध होवें।


भविष्यकालमें इस भाषा की सेवा करनेकी सन्धि ईश्वर हमें प्रदान करें यह प्रार्थना है।


आप सर्व भारतीयोंको हिंदी भाषा दिवस की हार्दिक शुभकामनाएँ।


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#हिंदीभाषादिवस_संस्कृत_अपभ्रंश_सावरकर_हिन्दुमहासभा_आर्यसमाज_राष्ट्रीयएकात्मता_राजभाषा

Monday 12 September 2022

आप्तस्तु यथार्थवक्ता|



*संप्रदायपूर्वक अध्ययन म्हणजे गुरुमुखातून अध्ययन का महत्वाचं आहे???*


कायंय की शास्त्रवचनांवर, ऋषीमुनींच्या वचनांवर आप्त म्हणून दृढ श्रद्धा ठेवण्यासाठी आपल्याही अंत:करणाची तितकी साधनेने सिद्धता व्हावी लागते. अहंकार तसाही आपल्याला हे करु देतंच नाही. आमच्या वेदोक्त धर्माविषयी आमच्या प्राचीन ऋषिमुनींनी जे काही सिद्धांत मांडून ठेवलेले आहेत ते आधी अभ्यासण्याची नि ते‌ समजून-उमजून घेऊन प्रसंगी अत्यंत डोळसपणे नि तर्कशुद्धपणे त्यांची चिकीत्साही करून योग्यवेळी आपल्या साधनेने आपल्याला त्यांची यथार्थता‌ पटायला लागते ही गोष्ट सहजसाध्य नसते. ती योग्यता यायला वेळंच लागतो. मूळात आपल्या शास्त्रामध्ये कुठल्याही गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवायला सांगितलेलाच नाहीये. अरे जिथे गुरुलाही गुरु मानण्यापूर्वी तपासून घ्यायला सांगितलंय व गुरु केल्यावरही त्याच्याकडून आपण सत्शास्त्रांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक ब्रह्मचर्य्यपूर्वक अध्ययन केल्यापश्चात् समजा तो गुरुच शास्त्रविरुद्ध आचरण करु लागला तर‌ त्यालाही त्याची‌ चूक निदर्शनांस आणून देण्याची आज्ञा जिथे‌ सांगितली आहे (उन्मार्गगामिनं श्रेष्ठं अपि वेदान्त पारगं| स्कन्दपुराण) अशा आपल्या प्राणप्रिय वैदिक हिंदु धर्मामध्ये शब्दप्रामाण्यवादांस अतिरेक आहे व बुद्धिप्रामाण्यवादांस नाकारलं आहे असे समजणं हे किती आततायीपणाचे आहे हे सूज्ञाच्या लक्ष्यीं आल्याशिवाय राहणार नाही.


वेद कधी प्रकट झाले, वेदांचा काळ कोणता, वेदांची लिपी कोणती, वेदांची भाषा‌ कोणती, आपला इतिहास नेमका‌ कधीपासूनचा या सर्व प्रश्नांची उत्तरे जिज्ञासुला जेंव्हा पडायला लागतात, तेंव्हा तो आपल्या आपल्या परीने ह्याचे‌ समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. भारतीय इतिहासाचीच‌ नव्हे तर विश्व इतिहासाची चिकीत्सा करताना, जिज्ञासा शमविताना मनुष्याला वेदांकडे वळावेच लागते. हे वेद समजून घ्यायचे असतील तर वर म्हटल्याप्रमाणे संप्रदायपूर्वक म्हणजे गुरुमुखातून अध्ययन आवश्यक आहे. ते‌ केल्याशिवाय वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान होणं असंभव आहे. आता हे असंच का ह्याचे साधं उत्तर हे आहे की ज्या ज्या शास्त्राचे किंवा ज्ञानशाखेचं आपण अध्ययन करतो, त्यात्या ज्ञानशाखेची जी अभ्यासपद्धती आहे तिचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणूनंच भगवान महर्षि पतंजलींनी 


*ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदोऽध्येयो ज्ञेयश्च इति। पातंजल महाभाष्य - पस्पशाह्निकम्*


ब्रह्म म्हणजे वेद जाणण्याची इच्छा करणाऱ्याने असे का असे न विचारता म्हणजेच निष्कारण सहा वेदांगांसहित वेदाध्ययन करावं. 


ही सहा वेदांगे कोणती ह्यांवर आह्मीं आमच्या दोन वर्षांपूर्वीच्या वेद परिचय‌ नामक फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत परिचयात्मक विस्तारपूर्वक विवेचन केलं आहे. तिथे पहावे. छंद, कल्प, शिक्षा, निरुक्त, ज्योतिष आणि व्याकरण..!


हे एवढं कोण करणार???


करत नाही म्हणूनंच आपली शास्त्रवचनांवर श्रद्धा बसत नाही. आपल्या पूर्वजांची‌ वचने आपल्याला थोतांड वाटायला लागतात. ह्याबाबतीतलं मार्गदर्शक एक द्रष्टव्य उदाहरण म्हणजे आदरणीय लोकमान्यांचे..! 


*लोकमान्यांनी १८९४ मध्ये ओरायन लिहून व पुढे १८९९ मध्ये आर्क्टिक होम लिहून वेदांचा‌ काळ काही सहस्त्रवर्षे‌ मागे नेण्याचा त्यांच्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांचा हेतु शुद्ध होता पण पद्धत का योग्य नव्हती ते पाहुयांत.‌ खरंतर आह्मीं ह्यावर मागे विस्तारपूर्वक हिंदीतून लिहिलं आहे. असो. पुढे‌ ते १९०० मध्ये वाराणसीला परमपूज्य श्रीदक्षिणामूर्ती स्वामी नामक एका सत्पुरुषाला भेटायला गेले, तेंव्हा वेदकालनिर्णय‌ व एकुणंच‌ वैदिक सिद्धांताविषयी त्यांचा स्वामीजींशी संवाद म्हणा शास्त्रार्थ म्हणा झाला. त्यात स्वामींना लोकमान्यांनी वेदांचा काल, त्याची भाषा,‌ त्याची लिपी, त्याचा शब्दनिर्णय, उत्पत्ती वगैरे ज्या काही शंका विचारल्या, त्या‌ सर्वांचे समाधान स्वामींनी करूनही शेवटी लोकमान्य म्हणतें झाले की*


लोकमान्य - *आपण म्हणता त्याप्रमाणें वेदांचें अनादि अपौरुषेयत्व बुद्धींस पटत नाहीं*


स्वामीजी - *संप्रदायपूर्वक शास्त्राध्ययन नाही, हेंच त्याचें कारण*


समग्र लोकमान्य टिळक - खंड ६वा 


हा संवाद काही संक्षेपांत आह्मीं हिंदीमध्ये अनुवादित‌ केला होता. संपूर्ण मूळ मराठी संवाद पुन्हा इथे जोडला आहे...









सांगण्याचं‌ तात्पर्य काय? लोकमान्यांची निंदा करणं? मूळीच नाही. 


मग???


राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्यांसारख्या लोकोत्तर पुरुषाला जर‌ स्वामी असा उपदेश करत असतील‌ तर आपल्यासारख्या अज्ञानी मनुष्याने काय चिंता वहावी? आपण वेदांकडे वळण्यापूर्वी काय करावं?? वेद समजून घेण्यासाठी काय करावं???


गुरुमुखातून अर्थात संप्रदायपूर्वक सहा वेदांगांसहित वेदाध्ययन करावं. पण हे करण्यासाठी न्यूनतम बारा पंधरा वर्षांचा तरी कालावधी लागेल. खरंतर जास्तीच लागेल पण त्यातही न्यूनतम धरलाय. पण मग हे आज संभवंच नसेल तर काय करावं? तर ज्यांनी हे‌ केलंय त्यांनी वेदांविषयी काय लिहून ठेवलंय ते‌ वाचावं. आता असे आप्त नेमके कोण आहेत, त्यांची व्याख्या काय हे पुढे पाहुयांत...!


क्रमश:...


लवकरंच...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#वेदकालनिर्णय_वेदाध्ययन_भाषा_लिपी_उत्पत्ती_संस्कृत_लोकमान्यटिळक

Thursday 1 September 2022

ऋषि॒: स यो मनु॑र्हितो॒| ऋग्वेद - १०|२६|५

 


*ऋषि॒: स यो मनु॑र्हितो॒|*

ऋग्वेद - १०|२६|५


*जो मनुष्याचे हित करतो, तो ऋषि...!*


आज ऋषिपंचमी...! आपला हिंदुधर्म हा जसा ईश्वरप्रणीत आहे, तसा तो ऋषिप्रणीतही आहे. ऋषि कुणांस म्हणावं? शास्त्रकारांनी अनेक व्याख्या दिल्या आहेत.


*ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।*

व्याकरण महाभाष्य


*आजीवन अखंड ब्रह्मचर्य्य पालन करून सहा वेदाङ्गांसहित वेदांचे नि आर्ष ग्रंथांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक अध्ययन करून, पश्चात् योगसाधनेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून, ईश्वरसाक्षात्कार करून वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान झालेला, अविप्लुत ब्रह्मचर्यावस्था प्राप्त असलेला किंवा विवाह करूनही पुढे ही अवस्था प्राप्त केलेला एखादा ऋषि जेंव्हा वेदार्थप्रतिपादनांस तत्पर होतो, तेंव्हा 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः।' ह्या निरुक्तकारांच्या वचनांस तो ऋषि म्हणून सिद्ध होतो.*


*ऋषी हा शब्द व्याकरणानुसार तुदादि धातू पासून ईन् प्रत्यय लागून निर्माण होतो. “ऋषति गच्छति, प्राप्नोति, जानाति वा स ऋषिः - गतीचे ज्ञान, गमन आणि प्राप्ती” हे तीन अर्थ होतात. निरुक्तकारांनी “ऋषिर्दर्शनात्” ह्या शब्दाने मंत्राच्या अर्थाचा किंवा गुढार्थ ह्याचा द्रष्टा किंवा प्राप्तकर्ता, साक्षात्कार कर्ता असे अर्थ प्रतिपादून किंवा “साक्षात्कृतधर्मा”हाच सिद्धांत सांगितला आहे. महर्षी दयानंदांनी “मंत्रद्रष्टा” ह्याबरोबरच “ईश्वर” असाही अर्थ सांगितला आहे. सायणाचार्य “अतीन्द्रियार्थद्रष्टा” असा अर्थ लावतात. यजुर्वेदाचे भाष्यकार उव्वट हे “मन्त्रव्याख्याता” अशी उपमा देतात. मेधातिथी ह्यांनी 'वेद आणि त्याचा अर्थद्रष्टा' दोघांनाही ऋषि मानले आहे.*


*जो स्वत: आत्मज्ञानी होऊन वेदार्थ प्रतिपादन तर करतोच पण सृृष्टीनिर्मितीचं रहस्यही उलगडतो, तोच खरा ऋषी...! जो अभ्युदय‌ नि नि:श्रेयसाचे परममंगल दान देतो तोच ऋषि...! जो पदार्थविद्येचंही दान देतो तो ऋषि...!*


आपला धर्म ऋषिप्रणीत आहे असे आह्मीं वर का म्हटलं?


*कारण सर्व प्राचीन शास्त्रकारांचे मत हे आहे की वेद हे मानवसृष्ट्यारंभी अग्नि, वायु आदित्य आणि अंगिरा या चार ऋषींच्या अंत:करणांत प्रकट झाले. नि तिथून अष्टधा विकतीने सुरक्षित होत कानामात्राचाही भेद न होता अद्यापवावेतो‌ आहेत व भविष्यांतही राहतील. जगातली ही एकमेव ईश्वरीय वाणी, एकमेवाद्वितीय अशी जी ईश्वराने त्या चार ऋषींना दिली, तीच पुढे आपणांस अन्य ऋषींच्या मंत्रव्याख्यानानेही प्राप्त होत राहिली म्हणून हा ऋषिप्रणीत धर्म...! वेद अनेक ऋषींच्या अंत:करणांत प्रकट झालेले नसून केवळ चार ऋषींच्या अंत:करणांत आरंभी प्रकट झाले. ह्यावर कैकवेळा लिहिलंय, पुनरुक्ती नको.*


महाभारतकाळापर्यंत तरी हा धर्म ऋषिप्रणीत होता म्हणूनंच त‌ो विशुद्ध होता. दुर्देवाने महाभारतसमयीच ऋषींचा ह्रास सुरु झाल्याने सहा वेदांगांपैकी एक निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्य आता आह्मांस मार्गदर्शक कोण ठरणार म्हणून चिंता व्यक्त करताना दिसतात.


*को न: ऋषिर्भविष्यति|*


आता आमचा ऋषि कोण?


देव उत्तर देतात


*तेभ्य: एतं तर्कं ऋषिं प्रायच्छन्|*


आता तर्क हाच आमचा ऋषि....!


आमचं सत्यासत्यतेच्या निर्णयाचं, प्रमाणत्वाचे सगळं न्यायशास्त्र ज्या तर्कावर अवलंबून आहे नि 'यस्तर्केणानुसन्धत्ते स वेद धर्म नेतर:' (जो तर्काने जाणता येतो, तोच खरा धर्म जाण, अन्य नाही) असे प्रत्यक्ष श्रीमनुमहाराजांचे वचन आहे, त्या तर्कालाच आह्मीं इतकं विसरलो, तो इतका आह्मांस त्याज्य झाला की ब्रह्मससूत्रांतल्या 'तर्काsप्रतिष्ठानात्' ह्या‌ सूत्राचा अत्यंत विपरीत अर्थ‌ काढत‌ बसलो व आमच्या वैदिक धर्मामध्ये अत्यंत ग्लानीस आरंभ झाली. अनेक वेदविरुद्ध प्रथा, शास्त्रविरुद्ध अशी कर्मकांड, अनेक कुप्रथा, रुढीपरंपरा निर्माण झाल्या नि आमचा घात झाला...!


आमच्या प्राणप्रिय अशा आर्ष‌ म्हणजे ऋषिप्रणीत साहित्याकडेही पाठ फिरवून आह्मीं अनार्ष साहित्याला डोक्यावर घेतलं नि आमचा घात झाला...! आमच्या वैदिक धर्माच्या पतनाचा हा आरंभ होता. महाभारतकालानंतरच्या अडीच सहस्त्रवर्षांंच्या ह्या‌संघर्षापश्चात् भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी त्यांच्या अलौकिक पुरुषार्थाने नि अपार वेदनिष्ठेने वैदिक धर्मांस पुन्हा आर्षदृष्टी प्रदान करण्याचा दिव्य प्रयत्न केला नि त्यात ते यशस्वीही झाले. पण पुढच्या पिढींनी त्यांचे ते‌ कार्य व तो‌ संदेशही विस्मृतीत टाकला व पुढे ब्रिटीशांपर्यंत ह्या भरतभूमींवर आक्रमणे होत राहिली.‌ सहा सोनेरी पाने आपण पाहतोच. संतांचेही कार्य आहेच. यद्यपि पुन्हा त्याच आर्षधर्माचा उद्धार करण्यासाठी महर्षि देव दयानंदांचा जन्म झाला नि त्यांनी हिंदुंना पुन्हा 'वेदांकडे वळा' म्हणत आर्षधर्मोपदेशकाचे कार्य केलं. पण त्यांनाही आह्मीं विस्मृतीत टाकलं...!


*आज ऋषिपंचमीनिमित्त विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप ह्या‌ सप्तव्याह्रतींचे जसं चिंतन आवश्यक आहेच, त्याबरोबरंच पराशर, व्यास, वाल्मीक्यादि महर्षींचेही स्मरण आवश्यक आहे. षड्वेदांगकार ऋषि व षड्दर्शनकार ऋषींचेही चिंतन, स्मरण, पूजन आवश्यक आहेच. सर्वांचेच नामोल्लेख इथे विस्तारभयास्तव संभव नाहीत त्याविषयी क्षमा...! आपला हिंदु धर्म ह्या सर्व ज्ञात अज्ञात ऋषींचाच संपन्न वारसा आहे, जो आपल्याला पुढे न्यायचा आहे...! त्यासाठी आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत साहित्याचे अध्ययन हेच आपलं कर्तव्य आहे तरंच ती खरी ऋषिपंचमी होईल...!*


*आपलं भाग्य हे आहे की आपण आपलं कुल गोत्र सांगतानाही एखाद्या ऋषीशीच ते जोडतो...! ह्यापेक्षा आणखी गौरवाची गोष्ट काय???*


या ऋषिप्रणीत वैदिक धर्मांस व त्याच्या या सर्व ऋषि नामक प्रणेत्यांस कोटी अभिवादन...!


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

pakhandkhandinee.blogspot.com


#ऋषिपंचमी_ऋषिस्मरण_पूजन_मंत्रद्रष्टा_वेद_शंकराचार्य_दयानंद

Friday 19 August 2022

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ|


 



भगवान योगेश्वराच्या चरित्रांतला हा एकंच प्रसंग...एकंच एकंच...


जो अभ्यासताना, वाचताना, लिहिताना, सांगताना अंत:करणाची काय अवस्था होते हे शब्द धजावंत नाहीत व्यक्त व्हायला. मी मूळ महाभारत पूर्ण संस्कृत संहिता व हिंदी अनुवाद पूर्ण अभ्यासलं जेंव्हा होते, तेंव्हाही हा प्रसंग वाचल्यावर काही क्षण अक्षरश: नि:शब्द झालो होतो.‌ डोळ्यांतून अश्रुपात‌ तर होताच पण कंठही अवरुद्ध झाला होता. त्यावेळी अंत:करण योगेश्वराच्या अलौकिक दिव्य आभेने ज्या प्रकारे व्यापून गेले होते, त्याचं शब्दांत वर्णन करणं माझ्याच्याने तरी संभवंच नाही. मागील वर्षी पूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींच्या (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले उपाख्य अप्पा) 'भगवान श्रीकृष्ण एक दर्शनाचे' चिंतन करतानाही ग्रंथाचा अंतंच पूज्यनीय अप्पांनी ह्याच प्रसंगाने केला असल्यामुळे ह्यावर बोलताना प्रचंड रडलो होतो. अप्पांनी हा प्रसंग काय रंगवलाय बापरे...! अप्पांच्या प्रतिभेंस दंडवत...! अप्पा आज जीवित असते तर मी त्यांच्यासमोर हे वाचत वाचत धाय मोकलून रडलो असतो. चारित्र्यनिर्माण काय असतं, प्रसंग असा आहे...


आत्ता हे लिहितानाही कंठ अवरुद्ध आहे...


अश्वमेधिक पर्वातले श्रीकृष्णांचे आणखी एक ब्रह्मचर्याचे उदाहरण


अश्वत्थाम्याने आपल्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेण्याच्या दृष्टीने द्रौपदीच्या पाच पुत्रांची ते पांडवंच आहेत असे समजून रात्रीच्या वेळी झोपेतंच निर्मम हत्या केली. पण ते पांडव नव्हते हे कळल्यावर त्याचा क्रोध शांत व्हायच्या पेक्षा अधिकंच वाढला नि सुडाग्नीने त्याने पांडवांचा वंशंच नष्ट करायचे ठरवले व त्यासाठी त्याच्याजवळ असलेले ब्रह्मशिरास्त्र नामक अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडले. हे तेच ब्रह्मशिरास्त्र आहे जे‌ त्याने पूर्वी भगवान योगेश्वरांस देऊ केले होते व त्याबदल्यात त्यांचे सुदर्शन मागितले होते. आमच्या आधीच्या‌ कैक लेखांमध्ये तो प्रसंग आह्मीं मांडला आहे तेंव्हा पुनरुक्ती करत नाही. त्या जणु विश्वसंहारक अशा अस्त्राने उत्तरेच्या गर्भावर जाताच त्यातून भविष्यांत जन्माला येणारे मुल जे पुढे परीक्षित (विष्णुरात) नावाने ओळखले गेले, ते त्या अस्त्राच्या प्रभावाने मृत म्हणूनच जन्माला आले. श्रीमद्भगवतामध्ये भगवंतांनी गर्भामध्ये जाऊन त्याचे रक्षण केलं म्हणून त्याचे नाव विष्णुरात पडले अशी कथा आहे पण ती निखालस‌‌ खोटी आहे हेच‌ सिद्ध होते. कारण जर‌ परीक्षितीचे रक्षण भगवंतांनी त्या अस्त्राने गर्भातंच केले असते तर बाहेर आल्यावर ते मृत असायला नकोच होते. व पुढील‌ कथाविस्ताराला महाभारती विपर्यास निर्माण होतो. आणि आह्मांस महाभारत अधिक प्रमाण आहे, भागवत नाही. त्यातही भगवंतांचे प्रत्यक्ष शब्द सर्वोच्च...! असो.


परीक्षित ह्या शब्दाच्या अनेक निरुक्त्या व त्यातून निघणारे अनेकार्थ आहेत, त्यावर सविस्तर कधीतरी. मृत बालकांस जीवित कोण करणार? एवढं सामर्थ्य कुणामध्ये ? तेंव्हा पांडवांचा हा वंश खुंटणार की काय ह्या भीतीने सर्व पांडवपक्षातल्या स्त्रिया विलाप करीत असताना द्रौपदी मात्र योगेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या आगमनाची वाट पाहत बसली. कारण तिला माहिती होते‌ केवळ भगवानंच ह्यातून आपणांस सोडवतील. भगवान तिथे येताच ती त्यांस म्हणाली...


“यादवश्रेष्ठा कृष्णा, अरे तु दिलेले वचन पूर्ण करशील ना? तु पराक्रमी, धर्मवेत्ता सत्यप्रतिज्ञ आहेस. त्रिभुवन सारे मृत झाले तरी त्याला जीवित करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. मग भाच्याच्या मुलाला जीवित करण्याचे तुला काय कठीण आहे? तुझे सामर्थ्य ज्ञात असल्यानेच तुझ्यापुढे हे हात जोडून मी मागणे मागत आहे.”


पुढे उत्तरेनेही भगवान श्रीकृष्णांची करुणा भाकल्यावर त्यांनी तिला अभय देताना म्हटले. हे जे श्लोक आहेत ना ते सुवर्णाक्षरांत नोंदवावेत..! भगवान म्हणतात


न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेतद्भविष्यति |

एष सञ्जीवयाम्येनं पश्यतां सर्वदेहिनाम् ||१८||

नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन |

न च युद्धे परावृत्तस्तथा सञ्जीवतामयम् ||१९||

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ |

तथा मृतः शिशुरयं जीवतामभिमन्युजः ||२२||


महाभारत भांडारकर प्रत – अश्वमेधिक पर्व - अध्याय ६८


अर्थ - उत्तरे, माझे भाषण अन्यथा कधी होणार नाही; ते सत्यच होईल...मी आजवर कधी थट्टेनेही असत्य भाषण केले नाही, ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन केले आहे, कधी युद्धांत पाठ दाखविली नाही. तरी त्या पुण्याने हा बालक जीवित होवो ! सत्य आणि धर्म जर माझ्या ठायीं असतील तर हा अभिमन्यूपुत्र जीवित होवो !!!”


अरे चारित्र्य यापेक्षा वेगळं काय असतं? का नाहीत हे प्रसंग शालेय अभ्यासक्रमांत?? का सांगत नाहीत आमचे कथाकार हे प्रसंग???


इथे ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन आणि सत्यनिष्ठा हे शब्द सर्व काही सूचित करणारे आहेत. त्यामुळे आणखी काही संदर्भ द्यायची आवश्यकता मला तरी वाटत नाही ! वाचक सुज्ञ आहेत !!!


विवाहापूर्वी १२ वर्षे‌ स्वपत्नीसह नैष्ठिक ब्रह्मचर्य‌ हिमालयांत पालन केलेला व पुन्हा आयुष्यभर गार्हस्थ्य ब्रह्मचर्याचे पालन केलेला हा भगवान...!


भगवान हा‌ शब्द प्रत्येकवेळी ईश्वरी अवतारासाठीच‌ वापरला जातो असे नव्हे बरंका...! नाही म्हणजे सांगितलेलं बरं...! नाहीतर पुन्हा आह्मांस शब्दांत पकडायला यायचे‌ काहीजण. असो...


अशा योगेश्वराच्या चरित्राचे चिंतन नि अनुकरण कधी करणार आहोत ?


काय तर म्हणे श्रीकृष्णाचे अनुकरण करु नये, अनुसरण करावं ? का? त्यांनी केलेले ब्रह्मचर्य पालन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले वेदाध्ययन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले आजीवन सत्यवचनाचे व्रत आम्ही नाही आचरु शकत ? 


केवळ श्रीकृष्ण कथा करायच्या, जन्माष्टम्या करायच्या, दहीहंडी नाचवायच्या, पण आचरण ???


जन्माष्टमीच्या‌ निमित्ताने एवढी एक कथा आयुष्यभर चिंतनांस ठेवली तरी पुरेसं...!


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com 


#भगवान_श्रीकृष्ण_योगेश्वर_ब्रह्मचर्य_पुराण_महाभारत_जन्माष्टमी_गोकुळाष्टमी_अश्वत्थामा

Thursday 11 August 2022

संस्कृत दिवस संस्कृतसप्ताह - लेखांक प्रथम

 


आज‌ श्रावण पौर्णिमा, नारळीपौर्णिमा, राखीपौर्णिमा अर्थात संस्कृतदिवस...! परवा म्हटल्याप्रमाणे आजपासून संस्कृत भाषेंवर लेखन आरंभ....

*भाषा कशाला म्हणायचं???*

*स्फुटवाक्करणोपात्तो भावाभिव्यक्तिसाधक:|*
*संकेतितो ध्वनिव्रात: सा भाषेत्युच्यतेबुधै:|*
पद्मश्री डॉ. कपिलदेव द्विवेदी

स्फुट वाणीने बनलेली, भाव अभिव्यक्तीचे साधन असलेली, वैविध्यपूर्ण संकेत नि ध्वनी असलेली अशी जी अभिव्यक्ती, तिला विद्वान लोक भाषा म्हणतात.

नामानि सर्वाण्याख्यातजानीति शाकटायनो नैरुक्तसमयश्च| निरुक्त १|१३

नाम च धातुजमाह निरुक्ते व्याकरणे | व्याकरणमहाभाष्य ३|३|१

संस्कृत भाषेमध्ये कुठलाही शब्द हा आख्यातज म्हणजे धातुपांसून निष्पन्न आहे असे निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्यांचं नि श्रीशाकटाचार्यांचे मन्तव्य आहे. उगाचंच रला र आणि टला ट असा काहीही प्रत्यय‌ किंवा अक्षर लावून संस्कृत भाषेमध्ये कोणताही अशास्त्रीय शब्द तयार होतंच नाही. आह्मीं आजपर्यंत कैकवेळा लिहिलं आहे व बोललोही आहोत की संस्कृत भाषेमधला प्रत्येक शब्द हा धातुज असतो. म्हणजेच‌ विशिष्ट धातुंपासून तो प्रक्रिया होऊन निर्माण होतो. म्हणजेच या सर्व शब्दांची मूल प्रकृती म्हणजे धातु आहेत. आणि हे मत आमचं स्वत:चे नसून वर दिलेलं महर्षि श्रीयास्काचार्य नि भगवान महर्षि पतंजलीसदृश दिग्गजांचं आहे. भगवान महर्षि श्रीपाणिनींनी त्याच धातुपाठाचे‌ संकलन केलं असून त्यावर त्यांची अष्टाध्यायी सर्वांना परिचित आहेच. त्यांनी या‌ धातुंचे एकुण ११ गण केलेलं असून त्यावर भगवान महर्षि श्रीपतंजलींचे व्याकरण महाभाष्यही प्रसिद्ध आहे. त्यातलंच प्रमाण वर दिलं आहे.

याच धातुपाठामध्ये भ्वादि गण नावाचा एक गण आहे ज्यामध्ये भाषा हा शब्द 'भाष् व्यक्तायां वाचि|' (१|४०७) ह्या धातुपासून निष्पन्न होतो ज्याचा अर्थ आहे 'भाष्यते व्यक्तवागरुपेण अभिव्यंजते इति भाषा| '. व्यकीच्या वाणीरुपाने अभिव्यक्त होणारी, भाषित होणारी ती भाषा...! म्हणजेच भाषा शब्द हा मूळ धातुज असून त्याचा अर्थ काय होतो हे आपण पाहिले.

आता भाषा कशी निर्माण होते असा प्रश्न पडतो. अनेकांनी अनेक प्रकारे ह्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. पण बव्हतांश जणांनी डार्विनच्या विकासवादावर आधारित‌ मते मांडलेली असल्यामुळे ती मते अत्यंत अशास्त्रीय आहेत. नि म्हणूनंच अग्राह्य आहेत. त्यांच्या मते माणुस हा सर्वप्रथम वनामध्ये जनावरांप्रमाणे अत्यंत अप्रगत अवस्थेत राहत होता.‌ त्याला बोलायचं कसं हेदेखील माहिती नव्हतं म्हणे. मग तो हळुहळु आजुबाजुच्या पशुपक्ष्यांची वगैरे भाषा पाहून, आवाज ऐकून स्वत:चे‌ शब्द, हावभाव, संकेत वगैरे विकसित करु लागला व हळुहळु त्याला बोलायला यायला लागलं म्हणे व त्याने त्या बोलीभाषेतून भाषा‌ विकसित केल्या म्हणे. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी भाषेच्या उत्पत्तीसंबंधी इतके हास्यास्पद नि तर्कहीन सिद्धांत मांडून ठेवले आहेत‌ की बास. म्हणूनंच भाषाशास्त्रासंबंधी नि तिच्या विज्ञानासंबंधी आपल्या प्राचीन शास्त्रकारांनी जी मते मांडली आहेत ती अभ्यासणं महत्वाचं आहे. भाषेच्या अध्ययनाच्या दृष्टीने वैदिक नि तत्सम सर्व प्राचीन संस्कृत वाङ्मयाच्या आलोडनाची जितकी आवश्यकता आहे, तितकी अन्य कशाचीच नाही. आणि तीही शुद्ध भारतीय वैदिक दृष्टिकोनातून. स्फोटायन=कक्षीवान् (द्वापराच्या पूर्वीचा काळ), औपमन्यव, औदुंबरायण(विसं ३१००पूर्व) महर्षि यास्क (विसं ३१००पूर्व), महर्षि वेदव्यास (विसं ३०४४पूर्व), व्याडि(२९०० विसंपूर्व), पतंजलि (विसं१५००पूर्व), भर्तृहरि (विसं ८००पूर्व) ह्या सर्वांनीच भाषेच्या उत्पत्तीचा इतिहास अगदी अनविच्छिन्न स्वरुपामध्ये शब्दबद्ध ठेवलेला आहेच मूळातंच, जो एकमात्र सूक्ष्म तर्क-युक्त, सत्य आणि विज्ञानसिद्ध सिद्धांतारुढ आहे. यात विक्रम संवतापासून तितकी वर्षे पूर्व असा अर्थ अभिप्रेत आहे. आता विक्रम संवत कोणतं ते वाचकांना सांगायची आवश्यकता नसली तरी सांगतो. इसवी सन पूर्व ५६ ला जो विक्रमादित्य राजा सिंहासनारुढ झाला, त्याने त्याचे संवत सुरु केलं. आजचं संवत २०७८ सुरु आहे. आपण हिंदु लोक नित्याच्या‌ संकल्पामध्ये हे गातो.

आता हा इतिहास कळायचा कसा?‌ वर नावे तर सांगितली पण साहित्य कोणतं अभ्यासायचं? त्यासंबंधी निम्मलिखित विस्तार

१. समस्त शिक्षाग्रंथ(पाणिनीय शिक्षा, याज्ञवल्क्य शिक्षा वगैरे) आणि त्यांची व्याख्या किंवा त्यावरील भाष्ये
२. समस्त संस्कृत‌व्याकरणशास्त्र तथा त्यावरील व्याख्या
३. मीमांसा ग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
४. निरुक्तग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
५. वैदिक शाखा, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद
६. प्रातिशाख्य आणि त्यावरील व्याख्या
७. भरत नाट्यशास्त्र नि त्यावरील व्याख्या
८. प्राकृत-पालि-अपभ्रंश व्याकरणावरील ग्रंथ नि त्यावरील व्याख्या

संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी, भाषा विज्ञान अभ्यासण्यासाठी इतकं सर्व अभ्यासणं आवश्यक आहे. आमचं दुर्दैव हे आहे की इतकं सर्व साहित्य आमच्याकडे असतानाही आह्मांस‌ ते अभ्यासु वाटत‌ नाही. आमच्या संस्कृत दिनाच्या तीन व्याख्यानांत संक्षेपाने हा विषय आह्मीं मांडला होता मागील वर्षी. भारतीय इतिहासाकडे विशुद्ध भारतीय दृष्टिकोनातून पाहणं आह्मांला जोपर्यंत जमणार नाही, तोपर्यंत आमच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबणार नाहीच.

आता संस्कृत भाषेचं नामकरण...

महत्वाचा प्रश्न पडतो की संस्कृत भाषेला संस्कृत हेच नाव का दिलं गेलं? अनेकांचा असा भ्रम आहे की संस्कृत ही संस्कार होऊन झालेली भाषा आहे म्हणून तिला संस्कृत म्हणतात. म्हणजे वर विकासवादाचे‌ जे मत मांडलं त्यानुसार आधीच्या अनेक बोलीभाषा किंवा अशुद्ध भाषांवर संस्कार होऊन परिशुद्ध झालेली भाषा म्हणजे संस्कृत होय असा अत्यंत हास्यास्पद नि भ्रममूलक‌‌ सिद्धांत बव्हतांश भाषाविद् मांडताना दिसतात. अगदी आरंभीच‌ सांगायचं तर संस्कृत ही‌ संस्कार होऊन निर्माण झालेली भाषा मूळीच नाही. मग तिला संस्कृत‌ हे नाव का दिलं गेलं? त्याचे उत्तर आहे

संस्कृतं नाव दैवी वागन्वाख्याता महर्षिभि:|
आचार्य दंडी - काव्यादर्श

महाकवी दंडी म्हणतात‌ की संस्कृत‌नामक दैवी वाणी जींवर महर्षींनी अनुव्याख्यान केलं. म्हणजे काय? तर इथे दैवी वाणी म्हणजे प्रत्यक्ष‌ वेद जिच्यापासून आपल्या ऋषि-महर्षींनी मानुषी वाणी निर्माण केली. म्हणूनंच तिला संस्कृत‌ हे नाव दिलं गेलं. वेद स्वत: सांगतो की

दे॒वीं वाच॑मजनयन्त दे॒वास्तां वि॒श्वरू॑पाः प॒शवो॑ वदन्ति|
ऋग्वेद ८|१००|११

अर्थ - देव ज्या‌ दिव्य वाणींस प्रकट करतात, तीच साधारण मनुष्य‌ लोक बोलतात...

इथे पशवो वदन्ति असा शब्द आला आहे.‌ पशवो म्हणजे पशु असा अर्थ नसून मनुष्य प्रजा असा आहे. कारण वैदिक साहित्यामध्ये अनेकठिकाणी पशु शब्द हा मनुष्यासाठी वापरला आहे.

अगदी महर्षि वेदव्यासांनीही श्रीमन्महाभारतामध्ये

*अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा|*
*आदौ वेदमयी दिव्या‌ यत: सर्वा: प्रवृत्तय:|*
शान्तिपर्व २३२|२४ - चित्रशाळा प्रेस संस्करण, पुणे

अनादि अशी जी नित्य अशी वाणी जी स्वयंभु म्हणजे ईश्वराने प्रवृत्त केली, ती आद्य अशी वेदवाणी जिच्यापासून सर्व काही प्रकट झाले आहे. मनुस्मृतीमध्ये हेच सांगताना

सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्|
वेदशब्देभ्य: एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे|

वेदांतल्या शब्दांवरूनंच नंतरच्या काळात सर्व वस्तुंची व्यक्तींची ठिकाणांची संस्थांची नावे दिली गेली कारण वेद हेच सर्वात आरंभीचे ज्ञान आहे. पृथ्वीला पृथ्वी हे नाव वेदांतल्या शब्दांवरूनंच दिलं गेलं. मानवाला मनुर्वभ ह्या वेदमंत्रावरूनंच मानव हे नाव दिलं गेलं इत्यादि. ज्यांना वेदांचा दु:स्वास आहें असात्म्य(एलर्जी) आहे, स्वत:ला मानव म्हणणं बंद करावं.

सर्व प्राचीन ऋषि-महर्षि, शास्त्रकार भाष्यकार सर्वांची एकमुखाने संमती आहे की वेद हे अनादि अपौरुषेय‌ तथा नित्य आहेत.‌ मानवसृष्ट्यारंभी ईश्वराने चार ऋषींच्या अंत:करणांत दिलेलं ज्ञान म्हणजे वेद...! जर वेद सर्वात पहिलं ज्ञान असेल तर स्वाभाविक आहे वेद ज्या भाषेत‌ असतील तीच मानवाची आद्यभाषा असणार. पण विकासवादी हे मानत नाहीत कारण त्यांना हे सत्य स्वीकारायचं साहस‌ नाही. आणि त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीयही हे मान्य करत नाहीत. कारण बव्हतांशांना असं वाटतं की हे मान्य केलं तर आपलं हसु होईल. म्हणजे 

तुज आहे तुजपाशी, परि तु जागा भूललासीं|

हीच आपली अवस्था आहे. विकासवाद का खोटा आहे हे हळुहळु आह्मीं दाखवुच. अस्तु प्रथम लेखांकात इतकंच...!

पुढील लेखासाठी क्रमश:

#संस्कृतभाषा_इतिहास_निर्मिती_वेद_भाषाविज्ञान_विकासवाद_डार्विन_व्याकरणशास्त्र


Sunday 7 August 2022

सचि॒विदं॒ सखा॑यं॒...! ऋग्वेद

 




आधी जे मित्र कमावलेत ते‌ टिकवायला शिका...


एकेकाळी अत्यंत प्रगाढ मैत्रीत असलेले लोक पुढे जाऊन एकमेकांना अंतरतात. मला खरंतर काहीवेळा हसु येतं ह्या लोकांचं आणि काहीवेळा कीवही येते व काहीवेळा आश्चर्यही वाटतं. अर्थात ह्याला तशी कारणं असुही शकतात, नाही असं नाही. पण बव्हतांश वेळाच अगदी क्षुल्लक कारणांवरून लोकांची मैत्री तुटते. केवळ संवादाचा अभाव, अहंकार नि तज्जन्य परस्परांविषयीची अंतराची भावना हीच मैत्री तुटायला कारणीभूत असते. यात‌ संवादाचा अभाव हे मुख्य कारण असतं...


एकमेकांच्या एखाद्या किंवा अनेक गोष्टी न पटायला सुरुवात झाली की संवाद‌ तुटतो व तिथून मैत्री‌ संपत जाते. मूळात एखाद्या‌च्या सर्वच गोष्टी आपल्याला पटायलाच हव्यात हा अट्टाहास‌ तरी का? स्वभाववैचित्र्य असतंच तसं आचारवैचित्र्यही मान्य करावंच लागेल. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना:...! अगदी एकमेकांवर अत्यंत प्रेम असलेले नवरा-बायकोही एकमेकांच्या सर्वच गोष्टी पटणाऱ्या स्वभावाच्या असतात असेही नव्हे पण तरीही त्यांचा‌ संसार होतोच ना? समजून घेणे हा प्रकार असतोच ना?


मग मैत्रीत हे का होत नाही? एखाद्याची एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर त्याला तसं सांगावं पण ते‌ सांगतानाही कळकळ असावी, अहंकार नसावा. भाषा सौम्य असावी व त्यातून त्याला आपली चुक उमजेल हा हेतु असावा. यात भाषा फार महत्वाचं काम करते. पण तरीही काहीवेळा समोरचा खरंच चुकत असेल व त्याच्या भल्याकरिता आपण त्याला तो किंवा ती चुकतोय‌ किंवा चुकतेय हे त्याला प्रामाणिकपणे सांगितलं तरी तो ऐकत नाही. मग ह्यातून दुरावा वाढतो व मैत्रीत अंतर येते.


मग हे थांबवायचं तरी कसं? 


काहीवेळा खरंच‌ पर्याय‌ नसतोच कारण समोरचा ऐकूनंच घेत नसेल तर विषय‌ संपतोच. अशावेळी स्वत: जमत नसेल तरी दुसऱ्याकडून सांगून पहावं पण तरीही जमत नसेल तर मग विषय‌ सोडून द्यावा. पण जर काही उपाय असेल, आशा असेल तर प्रयत्न करून पहावा. आणि ते संवादाच्या अभावाने जमणार नाही. अहंकाराने तर नाहीच. मी का बोलु हा अहंकार मैत्रीत चालत नसतो. तो आला की मैत्री तुटते. बोलायला हवं, स्पष्ट बोलायला हवं पण भाषा मृदु हवी. भले आपली चूक नसली तरी काहीवेळा माघार घ्यायला हवी. तरंच मैत्री टिकु शकते...!


तुट वाद संवाद तो हितकारीं|

समर्थ उगाचंच म्हणत नाहीत.. 


अहंकार हा सर्व गोष्टींचा मारक आहे. शहाणा माणुस त्याला दूरंच ठेवतो. 


ह्यात आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे नि:स्वार्थता...! मैत्रीत‌ स्वार्थ आला की ती फार काळ टिकत नाही. स्वार्थ संपला की ती‌ संपते. मूळात अशा मैत्रीस मैत्री म्हणावं का असा प्रश्न येतो. भले काहीवेळा स्वार्थाने केलेली मैत्रीही टिकत असेलही. पण ते फार अपवादात्मक...! पण भले स्वार्थाने एकत्र आलाही असाल तरीही स्वार्थ‌ संपल्यावर पुढे नि:स्वार्थी मैत्री टिकायला हवी.‌ तरंच त्याला अर्थ आहे...


हेतु कोणताही असो, मैत्री टिकवता आली पाहिजे. त्यासाठी मैत्रीची भावना शुद्ध हवी....!




महाभारतांत वनपर्वामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनांस म्हणतात


ममैव त्वं तवैवाहं ये मदीयास्तवैव ते|


तु माझा आहेस नि मी तुझा आहे.. जे माझं आहे ते तुझं आहे व तुझं ते माझं आहे...


भवदीय...


#मैत्रीदिन_मित्र_सखा_संवाद_भगवान_श्रीकृष्ण_सुदामा_अर्जुन_महाभारत

Tuesday 26 July 2022

नाम बरवें, नामदेव बरवा| एकत्व बरवा परमात्मा| श्रीपरिसा भागवत

 




भक्तशिरोमणी, भक्ताग्रणी, नामयोगाचा मेरु, नामचिंतामणी, प्रल्हाद-अंगद-उद्धवाचा पुनर्जन्म, श्रीविठ्ठलाचे प्रेमभांडारी संतश्रेष्ठ श्रीनामदेवराय ६७२ वा संजीवन समाधी‌ सोहळा...! 


आषाढ वद्य त्रयोदशींस आजच्यांच‌ तिथींस ६७२ वर्षांपूर्वी श्रीनामदेवरायांसंहित त्यांच्या घरातल्या १५ जणांनी जिवंत समाधी घ्यावी...! संत श्रीजनाबाईही त्यांत होत्या. म्हणजे इतिहासांत श्रीभीष्माचार्यांस त्यांच्या आजीवन अखंड ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेने नि पित्याविषयीच्या निष्ठेने पित्याने त्यांस इच्छामृत्युचं वरदान दिलं होते. त्यापश्चात् प्रत्यक्ष कैवल्यचक्रवर्ती‌ संतसम्राट श्रीज्ञानोबारायांनीही संजीवन समाधी घेऊन जगाचें डोळे दिपविले...! त्याच श्रीज्ञानोबारायांना संजीवन समाधींस घेऊन जाणारे आमचे भक्तशिरोमणी श्रीनामदेवराय त्यांच्याच‌ कुटुंबासहित आमच्या‌ पंढरीत त्या परमात्मा पंढरीशाच्या समोरंच समाधी घेतात...!


शारीरिक व्याधींनी गांजलेले लोक अगदी मरणासन्न असताना मृत्युच्या‌ त्या असह्य वेदना सहन न होऊन अंतिमत: मृत्यु यावा व ह्यातून सुटका तरी व्हावी म्हणून काहीवेळा तळमळताना दिसतात पण‌ तरीही भोग भोगायचे म्हणून त्यांना मृत्यु येत‌ नाही नि त्यांची वेदना तशीच राहते. चांगल्या स्थितींत मृत्यु येणं तर भाग्यवंताचंच‌ लक्षण...!


पण या‌ एकाच‌ कुटुंबातल्या १६ जणांनी एकाचवेळी देहत्याग करावा. श्रीनामदेवरायांचा अधिकार जगाला माहिती आहेच पण कुटुंबांतलेही..? ते इतर १४ जण कोण ह्याची‌ सूची जोडली आहे ती पहावी...!



ते‌ 'संतांचे ते आप्त नव्हे ते‌ संत' हे संतवचन इथेच खोटं ठरावं ह्यापेक्षा आश्चर्य काय? खरंतर संतवचनं कधी खोटी ठरत नाहीत पण अपवाद असे...!


इच्छामृत्युचं वरदान यापेक्षा काय भिन्न असावं?मृत्युवर विजय‌ ह्यापेक्षा वेगळा काय असावा? संतांचा अधिकार ह्यापेक्षा वेगळा काय प्रत्ययांस‌ यावा???


आणि त्यांनी हे सर्व साध्य केलं ते केवळ अनन्यशरण भक्तीच्या सामर्थ्यावर, नामचिंतनाच्या बलावर...!


म्हणूनंच‌ श्रीपरिसा भागवत म्हणतात


कलियुगीं नामा संत‌ साकार, न कळें तो पार ब्रह्मादिक|


श्रीनामदेवराय नि त्यांच्या कुटुबीयांच्या चरणी कोटी प्रणाम...! आमचं भाग्य इतकंच की आमचं घर श्रीनामदेवरायांच्या मंदिरांस चिकटून...! 


पुनरपि जननं पुनरपि मरणं श्रीमन्नामदेवरायमन्दिरसमीपे निवासं| 🙏😇


श्रीनामदेव पायरीचे आजचे छायाचित्र साभार - आमचे बंधु श्री Mahesh Kale 


भवदीय...


#श्रीनामदेव_संजीवनसमाधी_सोहळा_नामदेवपायरी_पंढरपूर

Thursday 14 July 2022

श्रीगुरुपौर्णिमा चिंतन

जो स्वत: मुक्त नाही तो आपल्याला काय मुक्त करणार???


नानक देवांची एक कथा आहे. ते एका राजाकडे गेले. तो‌ राजा साधुसंतांचे आदरातिथ्य करणारा सत्शील राजा होता. त्यावेळचे राजे तसेच होते. तर त्याने नानकदेवांना विचारलं की आपल्यासारखा सत्पुरुष‌ माझ्या राजप्रासादी आला. माझं भाग्य! काय हवं ते मागा. नानकदेव म्हणाले मी मागेल ते तु देऊ शकणार नाहीस. तरीही आग्रह केल्यावर ते म्हणाले मला तुझं राज्य दोन तासांसाठी दे. राजाने नानकांना राज्य देऊन टाकलं.‌ राज्य घेतल्या घेतल्या त्यांनी राजाला बंदी बनवलं व त्या राजाच्या गुरुलाही, पुरोहितालाही सर्वांना बंदी बनवलं. राजाला आश्चर्य वाटलं हे काय घडतंय. नानक देव म्हणाले आता तुझ्या गुरुला तुला सोडवायला‌ सांग. राजा गुरुकडे गेला पण पण तो गुरुच मूळात बद्ध होता, अडकला होता. तो काय मुक्त करणार राजाला?


राजाला बोध प्राप्त झाला. त्याने नानकांचे पाय धरले. 


तात्पर्य काय???


गुरु स्वत: जीवनमूक्त असेल, अधिकारी असेल, तर तो आपल्याला मुक्त करेल. तोच बद्ध असेल तर आपला काय उद्धार व्हायचा???


गुरु कशासाठी करायचा??? 


उत्तर - मोक्षासाठी अर्थात ईश्वरप्राप्तीसाठी. अर्थात जन्म-मृत्युच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी, आत्मज्ञानासाठी...!


आयुष्यांत गुरु अनेक असतातही लौकिकार्थाने. पण परमार्थामध्ये मोक्षगुरु हा मात्र आयुष्यांत एकंच असतो, ज्याला आपण सद्गुरु म्हणतो. आणि हा सद्गुरु कोण तर ईश्वर प्राप्त करून देतो तो. श्रीएकनाथांनी एका ठिकाणी म्हटलंय


मंत्रतंत्र उपदेशितें घरोघरी गुरु आईटें|

जो शिष्यांस मिळवितों सद्वस्तुतें,

सद्गुरु तयातें श्रीकृष्ण मानीं|


गुरु तसे पुष्कळ असतात मंत्र तंत्र देणारे. पण शिष्याला सद्वस्तु प्राप्त करून देतो तोच खरा गुरु, सद्गुरु...! 


आता‌ सद्वस्तु म्हणजे ईश्वर...!


आता असा गुरु जो स्वत: ईश्वरप्राप्ती केलेला असेल तरंच तो आपल्याला प्राप्त करून देईल ना? तोच अडकलेला असेल तर तो आपल्याला काय मूक्त करणार??? म्हणूनंच उपनिषदं म्हणतात


तद्विज्ञार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम्|


श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु करावा..!


म्हणूनंच ईश्वरप्राप्तीसाठी गुरु निवडताना मात्र तो अत्यंत चाणाक्षपणे निवडला पाहिजे. विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांना साडेतीनवर्षे तपासलं नि मगच गुरु म्हणून स्वीकारलं. कारण त्यांना मोक्ष‌ हवा होता, ईश्वर हवा होता आणि तेच योग्य आहे. इथे भोळेपणा चालत नाही. नाहीतर हानीच होते. नाहीतर आपण काय करतो? आपल्याला हा विवेकंच राहिलाच नाहीये. 


कारण आपणंच मूळात मोक्षहेतुने गुरु करतंच नाही. भौतिक लाभासाठी करतो. मला हे हवं, ते हवं. ते लोक लुच्चेगिरीने नवससायास करतात तसंच आपलं झालंय. आणि नेमकं इथेच चुकतो आपण...! 


दुर्दैवाने आजकालही सर्वत्र गुरुत्वाचे स्तोम माजलंय. अक्षरश: ह्याची माळ घाल, त्याची माळ घाल...आणि ती सुद्धा प्रतिष्ठेसाठी. अरे टिंगल वाटते का गुरु-शिष्य परंपरा म्हणजे???


म्हणूनंच गुरुचं नाव घेऊ नये असे‌ सांगताना शास्त्रकार सांगतात की


*आत्मनामगुरोर्नाम नामातिकृपणस्य च|*

*श्रेयस्कार्यो न गृह्णय्यात् ज्येष्ठापत्य कलत्रयो:|*


आत्मनाम म्हणजे मीमी म्हणु नये, गुरुचं नाव घेऊ नये. का? तर मी त्या गुरुचा‌ शिष्य म्हणून माझी लायकी नसतानाही उगाचंच मला प्रतिष्ठा नको व माझ्याहातून काही वाईट घडलं तर माझ्या गुरुंस माझ्या अपकृत्यामुळे अप्रतिष्ठा नको. अतिकंजुस माणसाचं नाव घेऊ नये, थोरल्या मुलाचं नाव घेऊ नये नि बायकोने नवऱ्याचे व नवऱ्याने बायकोचं नाव घेऊ नये...! असं शास्त्र सांगतं. आता असं का इतर‌ स्पष्टीकरण देत बसत‌ नाही. पुन्हा केंव्हातरी...


मग आता प्रश्न असा पडेल की मग हा अधिकारी मोक्षगुरु भेटायचा कसा? असा जीवनमूक्त पुरुष किंवा स्त्री भेटणार कशी? बरं त्याला ओळखायचा कसा??? कारण त्याला ओळखायची आपलीही योग्यता हवी ना...! 


कारण ह्यात फसवणुकही होतेच...!


माझ्यासारख्या सर्वसामान्य मनुष्याला हा प्रश्न पडणं स्वाभाविकंच आहे.  कारण असा जीवनमुक्त पुरुष‌ समजा सभोवताली असला तरी आपण त्यांस ओळखायचं कसं???


कारण आपण काही विवेकानंद नाही आहोत..


मग ह्याचं उत्तर काय??


तर आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण अखंड करत राहणे...


अशाने काय होते???


योग्यवेळ आली की वास्तविक असा जीवनमुक्त गुरुच आपल्याला शोधत येतो...हो...!


अर्थात हा प्रत्येकाच्या अनुभूतीचा विषय आहे. 


आता प्रश्न असा पडेल की आपण एखादा गुरु केलाच असेल नि तो असा जीवनमुक्त नसेल तर? आपली निवड चुकली म्हणून निराश व्हायचं कारणंच नाही. ह्या आधीच्या गुरुने सांगितलेली उपासना निष्ठेने केली तरी योग्य मार्ग मिळु शकतो...


काहीजण म्हणतील की भले आपला तो आधीचा गुरु मुक्त नसेल पण तरीही आपण त्याने दिलेल्या नामावर दृढ श्रद्धा ठेऊन साधना केली तर...?


तरीही वर म्हटल्याप्रमाणे पुढे आपोआप मार्गदर्शन भेटत जाते...!


इथे जाता जाता एक सांगणं...


कैवल्यचक्रवर्ती श्रीमाऊली तर गुरुशिष्याचे हे नाते‌ सांगताना म्हणते 


माझा गुरु माझाच, इतर कुणाचा नाही..


म्हणजे पातिव्रत्यभाव असावा. म्हणजे एकावेळी एकंच गुरु नि एकंच शिष्य. म्हणजे माझ्या गुरुला मी एकंच शिष्य असायला हवा. व मलाही तो एकंच गुरु...! अर्थात हे तोपर्यंतंच जोपर्यंत शिष्य आत्मस्थिती प्राप्त करत नाही तोपर्यंतंच...! हा स्वतंत्र विषय...! अस्तु|


कालच्या गुरुपौर्णिमेनिमित्त काल सहज केलेलं हे चिंतन...! जे सुचलं ते लिहिलं...


#श्रीगुरुपौर्णिमा


भवदीय...

Tuesday 21 June 2022

हिरण्यगर्भो योगस्य वक्ता नान्य: पुरातन:। महाभारत १२|३४९|६५


 



*आज आंतरराष्ट्रीय योग दिवस...!*


श्रीमन्महाभारतामध्ये योगदर्शनाचा प्रवक्ता हा साक्षात् हिरण्यगर्भ आहे असे म्हटलंय. इथे हिरण्यगर्भ म्हणजे कोण???


ऋग्वेदाच्या दशम मण्डलाच्या १२१व्या सूक्ताचा आरंभंच


*हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सम॑वर्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ आसीत्। स दा॑धार पृथि॒वीं द्यामु॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम।*


*हिरण्यो हिरण्यमयो [निरु० १०।२३]*


इथे हिरण्यगर्भ शब्दाने नेमकं काय अभिप्रेत असावं???


प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा अर्थात तो ईश्वर...! कशावरून???


*हिरण्यमय म्हणजे सुवर्णासमान चमचमणारा गर्भ-मध्यवर्त्ती गर्भसदृश भूवन ज्याचा आहे अथवा हे हिरण्य-प्रकाशमान सूर्यादि पिंड ज्याच्या मध्यभागी आहेत, तोच हिरण्यगर्भ-परमात्मा...*


(भाष्यकार - ब्रह्ममूनि परिव्राजक)


*ज्या ईश्वरानेच ही चराचर सृष्टी निर्माण केली, तोच हिरण्यगर्भ ह्या योगदर्शनाचा आद्य प्रवक्ता असून अन्य कोणताही पुरातन वक्ता नाहीच असे महाभारतकारांचे वचन आहे.*


ह्याचे नेमकं तात्पर्य काय???


*योगदर्शन यद्यपि भगवान महर्षि श्रीपतंजलीप्रोक्त सूत्रांमध्ये आपणांस प्राप्त होणारं असलं तरी त्याचा मूळ प्रवक्ता हा साक्षात् ईश्वर आहे. पण ईश्वर तर निर्गुण निराकार आहे, मग तो कसा प्रवक्ता? इथे तो प्रवक्ता आहे म्हणजेच त्यावरून त्याची वाणी म्हणजेच चतुर्वेदभगवान हेच त्याचे प्रवक्तेपण अभिप्रेत आहे...*


*म्हणजेच योगदर्शनाचे मूल हे वेदंच असल्यामुळे वेदांमध्ये असलेली योगविद्या हीच योगदर्शनाची सैद्धांतिक भूमिका आहे. पुढेच भगवान महर्षि श्रीपतंजलींनी त्याच योगविद्येंस सूत्ररुपांत‌ रचून आज आपणांस ते‌ योगदर्शन म्हणून षट्दर्शनापैंकी एक असे प्राप्त करून दिलं. पुढे त्यावर त्यांनी स्वत:च विस्तृत असे भाष्य (व्यासभाष्य) केलं असावं किंवा महर्षि वेदव्यासांनी ते‌ केलं असावं, म्हणून त्यांस वेदभाष्य म्हटलं गेलं असावं. त्यांस आर्ष अर्थात ऋषिप्रणीत भाष्य म्हणतात.‌ सुदैवाने आज हे उपलब्धही आहे. इतकंच काय तर ह्याच व्यासभाष्यांवर राजा भोजासहित अन्य पाच (एकुण ६) वृत्तीही उपलब्ध आहेत. यावर सविस्तर कधीतरी. यद्यपि इतिहासांत अनेक पतंजली होऊन गेलेले असले तरी विद्यमान योगदर्शनाचे प्रवक्ते भगवान महर्षि श्रीपतंजली हेच आहेत नि त्यांचा‌ काळ श्रीमन्महाभारताच्या‌ समीपचाच आहे.*


म्हणजेच‌ योगदर्शन हे प्रत्यक्ष‌ वेदप्रणीतंच असल्याने ते आस्तिक दर्शन अर्थात वेदांना व ईश्वरांस‌ मानणारंच आहे.‌ *सांप्रत‌ दुर्दैवाने काही लोक आस्तिक म्हणजे वेद मानणारा पण ईश्वर मानणारा असेलंच असे नव्हे असा अत्यंत‌ हास्यास्पद तर्क मांडतात. म्हणजे ह्यांच्या‌ मते आस्तिक म्हणजे वेद मानणारा असला तरी ईश्वरांस मानणारा असेलंच असे नव्हे. म्हणजे आस्तिक परंतु निरीश्वरवादी म्हणे. म्हणून ते योगदर्शनांस आस्तिक परंतु निरीश्वरवादी असे म्हणताना दिसतात.‌ सांख्यदर्शनाच्या बाबतीतही हेच विधान अनावधानाने केलं जातं. हे अत्यंत दुर्दैवी आहे....!*


*या‌ भ्रमांस सर्वांस कारणीभूत मधील काळांतली अनार्ष भाष्ये जरी असली तरी आपण निरीश्वरवाद ह्या शब्दाचा अर्थ‌ प्रथम जाणून घेऊयांत. जगत्सृष्ट्यत्वामध्ये ईश्वर हा निमित्त कारण की उपादान कारण हा प्रश्न असल्याने ह्याचा नीटसा अर्थ‌ न आकळल्यानेही हा गोंधळ झालेला आहे. इथे निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारा असे कदापिही नसून तो जगताच्या‌ निर्मितीमध्ये निमित्त की उपादान कारण इतकाच चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून सांख्य किंवा योगदर्शनांस अगदी आस्तिक पण निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारा असे म्हणण्यापर्यंत‌ काही लोकांची‌ लेखणी धजावते हे पाहून अत्यंत खेद होतो. मूळात‌ षट्दर्शनापैकी एकही दर्शन हे निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारे तर नाहीच. त्यामुळे सांप्रत समाजमाध्यमांवर अनेक जण कुणाचं तरी वाचून‌‌ मूळ सैद्धांतिक भूमिका न जाणून घेता किंवा पारिभाषिक शब्दावली न आकळून घेता षट्दर्शनांना निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारे असे रेटत बसतात, अशांपासून सावध रहावे ही विनंती...! सविस्तर कधीतरी पुन्हा ह्यावर येऊच...*


योगदर्शनाचा मूळ हेतु काय???


अष्टांग योगदर्शन हे क्रियात्मक नि अनुभवसिद्ध शास्त्र आहे. त्याचा मूल हेतु मनुष्यांस आत्मज्ञान प्राप्त करून मोक्ष देणं हाच आहे. त्यापासून विभूतिपादातून प्राप्त होणारे लाभ यद्यपि भौतिक स्वरुपाचे असल्या तरी ते काही अंतिम नसून अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार हेच आहे. 


*सांप्रत काही भारत विखंडन शक्ती भगवान महर्षि श्रीपतंलजी हे बौद्ध होते असा मिथ्या तर्क मांडताना दिसतात. या मागे जितके डावे सक्रिय आहेत, तितकेच‌ काही हिंदुद्वेष्टे नवबौद्धही(सर्व नवबौद्ध असे नाहीत). इतकंच काय तर काही लोक योगदर्शन हे शैव किंवा रुद्रापासून प्रणीत असून तो अवैदिक देव असून वैष्णव अर्थात विष्णु आदि देव वैदिक आहेत असाही भ्रममूलक प्रचार सुरु आहे. म्हणजेच योगदर्शन हे अवैदिक आहे असा अपप्रचार नेटाने सुरु आहे. जिज्ञासूंनी ह्यांपासून सावध रहावे ही विनंती...! आणि हो काही‌ लोक योग हा सेक्युलर आहे असाही भ्रममूलक प्रचार करताना दिसतात, सबका साथ, सबका विकासचा‌ विपरीत अर्थ काढत...! त्यापासूनही सावधान...!*


आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त हा संक्षिप्तसा लेखनप्रपंच...!


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#आंतरराष्ट्रीय_योग_दिवस_योगदर्शन_पतंजली_योगविद्या_आस्तिक_नास्तिक_निरीश्वरवादी

Thursday 2 June 2022

प्रात:स्मरणीय हिंदुपति वीरशिरोमणी महाराणा श्रीप्रतापसिंह...

 




भाद्रपद शुक्लपक्ष‌ विक्रम संवत् १९३९ समयी सत्यार्थ प्रकाश हा आपला अजरामर ग्रंथ 


*'महाराणाजीका उदयपूर'*


या‌ स्थानी रचला असे महर्षि श्रीमद्दयानंद सरस्वतींनी भूमिकेत लिहिलं होते. मूळचे गुजरातचे असलेल्या महर्षींना संन्यासोत्तर 'यद्यपि आमुचा स्वदेश भूवनत्रयामध्ये वास|' असला तरी 'महाराणाजीका उदयपूर' असे शब्द का लिहावेसे वाटले असतील???


वडिलांच्या इच्छेने ७व्या वर्षापासून २१ पर्यंत लंडनमध्ये राहून इंग्रजांपेक्षाही अधिक इंग्रज झालेला अरविंद नावाचा युवक तत्कालीन आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन इकडे भारतात येऊन मातृभूमीच्या विमोचनार्थ जन्मभूमीत येऊन स्वत:ला क्रांतिकार्यात झोकून देतो नि एका खटल्यामध्ये पोलिस पकडायला आले असताना हा सनदी अधिकारी अत्यंत साध्या अशा सतरंजीवर झोपलेला दिसतो, तेंव्हा आश्चर्यचकित झालेल्या त्या आरक्षींना(पोलिसांना) तो अभिमानाने म्हणतो की


*'स्वातंत्र्याच्या‌ काजासाठी पृथ्वीपती असलेला माझा राणा प्रताप हा एकेकाळी राजसुखाचा, सत्तासुंदरीचा त्याग करून गवताच्या शय्येवर निजता झाला, त्याच्या त्यागापुढे माझी ही साधी शय्या काय मोठी?'*


हे ऐकून त्या अधिकाऱ्यांची तळपायाची आग मस्तकांत गेली नसेल कशावरून???


आयुष्यांत कुणाचा अभिमान बाळगावा? आमच्यासमोर आदर्श कोण असावेत?


आज देशामध्ये महापुरुष निर्माण व्हायचे का बंद झाले? स्वातंत्र्यानंतर हे सगळं बंद का झालं???


आमचं बीज इतकं अशुद्ध का झालं???


*कारण महाराणा प्रतापांस नि शिवप्रभुंस वाट चुकलेला देशभक्त म्हणणाऱ्या दुरात्मा गांधींस आह्मीं राष्ट्रपिता म्हणून गौरविलं...! त्याला नोटेवर घेतलं...!*


*ज्याची वीरता, रणकुशलता, कष्टसहिष्णुता नि नीतिमत्ता अत्यंत‌ वंदनीय नि अनुकरणीय होती, अशा क्षत्रियोत्तम सत्पुरुषांस आह्मीं केवळ पुण्यतिथी नि जयंतीपुरतं मर्यादित ठेवलं...!आणि आता तर केवळ मेवाडपुरतं...*


प्रत्यक्ष महाराणांचा नि समस्त राजपुतान्याचा साद्यंत नि साधार इतिहास लिहिणाऱ्या ज्येष्ठ इतिहासकार महामहोपाध्याय श्रीगौरीशंकर ओझांनी म्हटल्याप्रमाणे जो स्वदेशाभिमानी, स्वतंत्रतेचा पुजारी, रणकुशल, स्वार्थत्यागी, नीतिज्ञ, दृढप्रतिज्ञ, सत्यनिष्ठ वीर, उदार क्षत्रिय तथा कवी होता...होय कवी होता...!


*पूर्वजांचा सगर्व अभिमानी...*


अकबरनाम्याचा लेखक अबुलफज़ल लिहितो की महाराणा प्रतापांस आपल्या पूर्वजांचा सगर्व अभिमान होता...


आह्मांला तो आहे का????


*हल्दीघाटीच्या‌ युद्धांत प्रताप विजयीच होता. अकबर त्याला कधीही हारवु शकलाच नाही. ९ वर्षे अकबर त्याच्याशी झटत राहिला पण त्याला कधीच विजय‌ प्राप्त झाला नाही...!*


*त्याचा आदर्श होता की बापा रावळांचा‌ वंशज कधी कुणापुढे मान तुकवणार नाही. स्वदेशप्रेम, स्वतंत्रता नि स्वदेशाभिमान हे ज्याचे मूलमंत्र होते, असो तो महाराणा...*


*उंची मोठी असलेला, विशाल नेत्र असलेला, भारदस्त नि प्रभावशाली मुखमंडल असलेला, पीळदार मिश्या असलेला, रुंद छाती असलेला, विशाल बाहुबल असलेला नि गव्हाळी रंगाचा तो‌ प्रताप तत्कालीन रीतिप्रमाणे दाढी ठेवत नव्हता असे त्याचे‌ व्यक्तिमत्वाचे दर्शनी वर्णन आहे...!*


अशा पुरुषश्रेष्ठाच्या चरणी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


*जन्म - विक्रम संवत १५९७, ज्येष्ठ शुद्ध तृतीया...*


भवदीय,


#महाराणाप्रताप_जयंती_हिंदुपती_मेवाड_राजस्थान_हल्दीघाटी_उदयपूर


Monday 16 May 2022

काश्यां हि काशते काशी काशी सर्वप्रकाशिका|

 




*काश्रृ दीप्तौ इति धातोः काशते निर्माणमार्गे स्वतेजसा या सा अथवा काशते विराजते शिव: अनिर्वचनीयज्योतिषा यत्र सा काशी|*


काश्रृ दीप्तौ ह्या संस्कृत धातुपासून काशी हा शब्द‌ तयार होतो, ज्याचा अर्थ आहे जी स्वतेजाने प्रकाशते, चमकते अशी किंवा जिथे प्रत्यक्ष शिवाचा निवास आहे, जिथे अनिर्वचनीय ज्योती विराजमान आहे अशी ती काशी...!


*अविमुक्त, वाराणसी, काशी, महाश्मशान, आनंदकाननरुद्रावास आदि शब्दांनी संबोधित असलेली ही काशी आज मूक्त होण्याच्या मार्गावर...! पावणे नऊ लाख वर्षांपूर्वीच्या महर्षी श्रीमद्वाल्मीकिंच्या रामायणकालापासून काशीचं असलेलं महत्व आह्मां हिंदुंना वेगळं सांगायची आवश्यकता नाही. परवर्ती वैदिक साहित्यामध्येही, वेदांच्या‌ संहिता नव्हे बरंका तर वेदांवरचे व्याख्यानरुपी ग्रंथ असे शतपथगोपथादिंमध्ये काही ठिकाणी काशीचा ऐतिहासिक उल्लेख आढळतोच. महाभारतीही व अगदी जैन बौद्ध ग्रंथांमध्येही. पुराणांमध्ये तर बोलायलाच नको. स्कंदपुराणांध्ये काशी खंडामध्ये ज्ञानवापीवर स्वतंत्र ५२ वा अध्यायंच आहे. विस्तारभयास्तव इथे देऊ शकत नाही क्षमस्व...!*


त्यामुळे इस्लामांध जिहादी पाशवी आक्रमणामुळे उध्वस्त झालेली हिंदु मंदिरांच्या विध्वसांची परंपरा कुठेतरी खंडित होतेय हा अभिमानाचा क्षण सर्व हिंदुंसाठीच आहे.


*औरंग्याने ८ एप्रिल, १६६९ मध्ये काशी विश्वेश्वर पाडायचा आदेशच दिला होता. त्याचे फर्मानंच आहे तसं.*


संदर्भ मआसिर-ए-आलमगिरी - आंग्लानुवाद श्रीजदुनाथ‌‌ सरकार. सोबत जोडला आहे. असे ढीगभर संदर्भ आहेत...





*हिंदु(जैन-बौद्धही) मंदिरांच्या विध्वंसाचा मुस्लीम इतिहासकारांनी सांगितलेला समकालीन दुर्दांत दाहक ज्वलंत इतिहास*


*मूस्लीम इतिहासकारांनी अगदी प्रामाणिकपणे नि अभिमानाने हिंदु मंदिरांच्या, ज्यामध्ये जैन नि बौद्ध‌ दोघेही आलेत(संविधानानुसारही हीच‌ व्याख्या आहे बरंका) विध्वंसाचा इतिहास अगदी सप्रमाण नि साधार शब्दबद्ध करून ठेवला आहे. मूळ पर्शियन नि उर्दुमध्ये असलेला हा समग्र इतिहास जो एलिएट आणि डॉसन(Elliot & Dawson) नावाच्या‌ दोन पाश्चात्य इतिहासकारांनी 'History of India as told by it's Own Historians' नावाने आठ‌ खंडांमध्ये प्रकाशित केलेला आहे. गुगल करून कुणीही वाचावा.*


*त्याचा‌ इतिहास संक्षेपामध्ये ज्येष्ठ इतिहासकार स्वर्गीय सीता राम‌ गोयलांनी "Hindu Temples - What happened to them" नावाने द्विखंडात्मक प्रकाशित केला आहे तोही वाचायसाठी उपलब्ध आहे.‌ विकतही घेऊ शकता.* त्याची‌ पीडीएफ लिंक


* *Hindu Temples: What Happened to Them? Vol. I* (Sitaram Goel)


https://drive.google.com/file/d/1pNO3PLf4hmlP_BuNfxh8ZeoebXm3rcLD/view?usp=drivesdk


* *Hindu Temples: What Happened to Them? Vol. II* (Sitaram Goel)


https://drive.google.com/file/d/1pOmAA7Ot16LyOcsTqVI4DGwk3mgeXBsN/view?usp=drivesdk


*ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी निदान ह्यातला पहिला खंड अभ्यासावा ज्यात‌ स्व. सीता राम गोयलांनी भारतातल्या कुठल्या जिल्ह्यातली कुठल्या तालुक्यातली कुठली मशीद कोणत्या नि किती मंदिरांना पाडून बांधली आहे हे मुस्लीम इतिहासकारांचे‌ संदर्भ देऊनंच मांडलं आहे. मागे आह्मीं स्व. सीता राम गोयलांवर जो लेख लिहिला होता त्यात‌ ह्याविषयी लिहिलं होते. असो...*


हिंदुंना खरंच इस्लाम काय कळून घ्यायचा असेल स्व. सीता राम गोयलांची ही पुस्तके वाचायलाच हवीत...! *सुदैवाने यंदाचे‌ वर्ष‌ हे त्यांचे‌ जन्मशताब्दीचे वर्ष आहे. पण हिंदुत्वाद्यांमधल्या एकालाही ह्याची‌ पुसटशीही जाण नाही. असो‌ हरकत नाही...!*



सांगण्याचे तात्पर्य इतकंच की मुस्लिमांनी स्वत: त्यांच्या कृत्यांचा इतिहास शब्दबद्ध करून ठेवलेलाच आहे. तो निदान वाचण्याचे‌ कष्ट तरी आपण घेऊयांत...! 


*श्रीशिवछत्रपतींचा आदेश...*


*शेष, आजच्या निर्णयाने सर्वात जास्त आनंद नि समाधान कुणांस झालं असेल तर ते पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंना, पृथ्वीवरचे‌ तत्कालीन ब्रह्मदेव असे श्रीगागाभट्टांना ज्यांनी काशीच्या‌ विश्वेश्वराचा विध्वंस प्रत्यक्ष‌ पाहिला होता ज्यानंतरंच ते शिवप्रभुंना भेटायला आले होते, श्रीनानासाहेब पेशव्यांना, श्रीनाना फडणवीसांना, थोरल्या श्रीमाधवराव पेशव्यांना...! ह्या‌ सर्वांनी काशी मूक्त करा असे टाहो फोडून सांगितलं होते...! सर्व संदर्भ उपलब्ध आहेत...!*


शीघ्रातिशीघ्र त्यांचे‌ ते‌ स्वप्न पूर्ण होईलंच...!


आणखी खूप काही व्हायचं आहे. ही तर केवळ सुरुवात आहे...!


आरंभ हैं प्रचंड...!


भवदीय...!


पाखण्ड खण्डिणी

pakhandkhandinee.blogspot.com


#काशी_वाराणसी_काशीविश्वेश्वर_ज्ञानवापी_रामायणमहाभारत_जैनबौद्धसाहित्य_शिवाजीमहाराज_पेशवे_इस्लामीजिहाद_ मंदिरविध्वंस