Thursday 2 June 2022

प्रात:स्मरणीय हिंदुपति वीरशिरोमणी महाराणा श्रीप्रतापसिंह...

 




भाद्रपद शुक्लपक्ष‌ विक्रम संवत् १९३९ समयी सत्यार्थ प्रकाश हा आपला अजरामर ग्रंथ 


*'महाराणाजीका उदयपूर'*


या‌ स्थानी रचला असे महर्षि श्रीमद्दयानंद सरस्वतींनी भूमिकेत लिहिलं होते. मूळचे गुजरातचे असलेल्या महर्षींना संन्यासोत्तर 'यद्यपि आमुचा स्वदेश भूवनत्रयामध्ये वास|' असला तरी 'महाराणाजीका उदयपूर' असे शब्द का लिहावेसे वाटले असतील???


वडिलांच्या इच्छेने ७व्या वर्षापासून २१ पर्यंत लंडनमध्ये राहून इंग्रजांपेक्षाही अधिक इंग्रज झालेला अरविंद नावाचा युवक तत्कालीन आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन इकडे भारतात येऊन मातृभूमीच्या विमोचनार्थ जन्मभूमीत येऊन स्वत:ला क्रांतिकार्यात झोकून देतो नि एका खटल्यामध्ये पोलिस पकडायला आले असताना हा सनदी अधिकारी अत्यंत साध्या अशा सतरंजीवर झोपलेला दिसतो, तेंव्हा आश्चर्यचकित झालेल्या त्या आरक्षींना(पोलिसांना) तो अभिमानाने म्हणतो की


*'स्वातंत्र्याच्या‌ काजासाठी पृथ्वीपती असलेला माझा राणा प्रताप हा एकेकाळी राजसुखाचा, सत्तासुंदरीचा त्याग करून गवताच्या शय्येवर निजता झाला, त्याच्या त्यागापुढे माझी ही साधी शय्या काय मोठी?'*


हे ऐकून त्या अधिकाऱ्यांची तळपायाची आग मस्तकांत गेली नसेल कशावरून???


आयुष्यांत कुणाचा अभिमान बाळगावा? आमच्यासमोर आदर्श कोण असावेत?


आज देशामध्ये महापुरुष निर्माण व्हायचे का बंद झाले? स्वातंत्र्यानंतर हे सगळं बंद का झालं???


आमचं बीज इतकं अशुद्ध का झालं???


*कारण महाराणा प्रतापांस नि शिवप्रभुंस वाट चुकलेला देशभक्त म्हणणाऱ्या दुरात्मा गांधींस आह्मीं राष्ट्रपिता म्हणून गौरविलं...! त्याला नोटेवर घेतलं...!*


*ज्याची वीरता, रणकुशलता, कष्टसहिष्णुता नि नीतिमत्ता अत्यंत‌ वंदनीय नि अनुकरणीय होती, अशा क्षत्रियोत्तम सत्पुरुषांस आह्मीं केवळ पुण्यतिथी नि जयंतीपुरतं मर्यादित ठेवलं...!आणि आता तर केवळ मेवाडपुरतं...*


प्रत्यक्ष महाराणांचा नि समस्त राजपुतान्याचा साद्यंत नि साधार इतिहास लिहिणाऱ्या ज्येष्ठ इतिहासकार महामहोपाध्याय श्रीगौरीशंकर ओझांनी म्हटल्याप्रमाणे जो स्वदेशाभिमानी, स्वतंत्रतेचा पुजारी, रणकुशल, स्वार्थत्यागी, नीतिज्ञ, दृढप्रतिज्ञ, सत्यनिष्ठ वीर, उदार क्षत्रिय तथा कवी होता...होय कवी होता...!


*पूर्वजांचा सगर्व अभिमानी...*


अकबरनाम्याचा लेखक अबुलफज़ल लिहितो की महाराणा प्रतापांस आपल्या पूर्वजांचा सगर्व अभिमान होता...


आह्मांला तो आहे का????


*हल्दीघाटीच्या‌ युद्धांत प्रताप विजयीच होता. अकबर त्याला कधीही हारवु शकलाच नाही. ९ वर्षे अकबर त्याच्याशी झटत राहिला पण त्याला कधीच विजय‌ प्राप्त झाला नाही...!*


*त्याचा आदर्श होता की बापा रावळांचा‌ वंशज कधी कुणापुढे मान तुकवणार नाही. स्वदेशप्रेम, स्वतंत्रता नि स्वदेशाभिमान हे ज्याचे मूलमंत्र होते, असो तो महाराणा...*


*उंची मोठी असलेला, विशाल नेत्र असलेला, भारदस्त नि प्रभावशाली मुखमंडल असलेला, पीळदार मिश्या असलेला, रुंद छाती असलेला, विशाल बाहुबल असलेला नि गव्हाळी रंगाचा तो‌ प्रताप तत्कालीन रीतिप्रमाणे दाढी ठेवत नव्हता असे त्याचे‌ व्यक्तिमत्वाचे दर्शनी वर्णन आहे...!*


अशा पुरुषश्रेष्ठाच्या चरणी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


*जन्म - विक्रम संवत १५९७, ज्येष्ठ शुद्ध तृतीया...*


भवदीय,


#महाराणाप्रताप_जयंती_हिंदुपती_मेवाड_राजस्थान_हल्दीघाटी_उदयपूर


No comments:

Post a Comment