Wednesday 28 December 2022

उरीं राष्ट्रभक्ती रविवत् ज्वलंत, न यें भीती चित्तीं जरीं ये कृतांत - श्रीभिडेगुरुजी

 





काल लव्ह जिहाद नि धर्मांतरणाच्या विरोधांत केज इथे सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदुधर्मरक्षण मोर्चा काढण्यांत आला होता तन्निमित्तची ही क्षणचित्रे. श्रीभवानी माता मंदिर ते श्रीछत्रपति शिवाजी महाराज‌ चौक हा दोन अडीच किमीचा मार्ग ! तीन चार सहस्त्रांच्या संख्येसमोर ऐन माध्यान्ही सूर्य डोक्यावर आला असताना अत्यंत कमी अशा वीसेक मिनीटांत विषय‌ मांडण्याचं सौभाग्य लाभलं. चित्रफीत उपलब्ध झाली की इथे पाठवतोच. त्याचा गोषवारा...

"सर्वप्रथम इतक्या बहुसंख्येने राष्ट्रप्रेमी, हिंदुसमाजप्रेमी, संविधानप्रेमी हिंदु समाज एकवटल्याहेतु सर्वांच्या चरणी नतमस्तक! आपण एक अब्ज ९६ कोटी इतकी वर्षे या पृथ्वीवर आर्य्य किंवा हिंदु किंवा भारतीय म्हणून विराजमान आहोत. भारत हा शब्द ऋग्वेदांतला आहे. आपल्या संविधानाचा आंरभही India that is Bharat असा आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकंच महिन्यापूर्वी आश्विनी उपाध्यायांच्या याचिकेत धर्मांतराच्या गंभीर विषयी सर्व राज्यांनी माहिती द्यावी असा आदेश दिला आहे,  धर्मांतर हे संविधानविरोधीच आहे, १४०० वर्षांपूर्वी कुणी मुसलमान नव्हता, २००० वर्षांपूर्वी कुणी ख्रिस्ती नव्हता, २५०० वर्षांपूर्वी पारशी नव्हता, सर्वधर्मसमान नाहीतंच, जर समान आहेत तर धर्मांतरणं व लव्ह जिहाद का, जर संविधानासमोर सर्वंच समान आहेत तर मग समाननागरी विधेयक का नको, वेगवेगळे कौटुंबिक निर्बंध का(फैमिली लॉ, पर्सनल लॉ), १९८५ मध्ये अखिल भारत हिंदुसभेच्या‌ वतीने लॉ कमिशनसमोर दाखल झालेले समाननागरी विधेयक, लोकसंख्या विस्फोटीचा प्रश्न सर्वांनाच डोकेदुखी ठरेल, Planting the Cross in Asia सगळा आशिया ख्रिस्तमय करण्याचं स्वप्न, इस्लाममय करण्याचे मुस्लिमांचे स्वप्न आणि आह्मीं हिंदु भोळसट आहोत सर्वधर्मसमभावाच्या गप्पा हाणतो, छत्रपति शिवरायांच्या चरित्राचे इस्लामीकरणाचं षड्यंत्र, माता-भगिनींचे सोशल मीडिया अकाऊंट्स तपासा, घरा-घरांमध्ये नित्योपासना हवीच, हिंदुंमध्ये सामुहिक उपासनाच नसल्याने संघटन होत नाही, निदान चहा प्यायला, गप्पा मारायला तरी एकत्र या, आर्थिक नाडी भक्कम करा, केवळ हिंदुंचा हिंदुंशीच व्यापार, चीन-पापस्तानाकडून कुरघोडी सुरुच, राज्यसभेत संविधान फाडलं जातं तरी सगळे गप्प, कारण फाडणारा हिंदु नाही त्यातही ब्राह्मण नाही, फाडणारा मुसलमान, आता संविधानाचा अपमान होत नाही, संविधानाचे खरे शत्रु कोण आहेत ओळखा, तुम्ही हिंदु-मुसलमान-ख्रिस्ती कुणीही असा, भारतीय ही आपली एकंच ओळख का होऊ शकत नाही, लैंड जिहादचा प्रश्न आहे, आपली विधीज्ञांची चमु(टीम) हवी, शिवाजी जन्माला यावेत ते शेजारच्या घरात हे किती दिवस, रक्त सळसळुद्या पण डोकं शांत ठेवा, आपण निदान मावळे तरी होऊयांत, या सगळ्याला रोखायचं असेल तर आपलं संघटन व निर्बंध(कायदा) व संविधान हीच आपल्या हातीं असलेली मोठी ताकद आहे, देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर हिंदु बहुसंख्य राहिले पाहिजेत...आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जागे व्हा...!"




खरंतर वेळ फारंच कमी लाभल्याने फार संक्षेपांत मला हा विषय मांडावा लागला. पण तरीही केजच्या समस्त हिंदु जनतेचे आभार व विशेषत: आमच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी बांधवांचे ज्यांच्या प्रेरणेने व हेतुने हे सर्व आयोजित झालं. अन्य हिंदुत्वनिष्ठ‌ संघटनांचेही तितकेच आभार व अभिनंदन...! विशेषत: आमचे धारकरी बंधु श्री शाहुराजे गुंड व सर्व धारकरी बंधु यांचे अभिनंदन व ऋणी आहे. 

हिंदुंनो रात्र वैऱ्याची आहे, जागे व्हा...! लव्ह जिहाद हे फार मोठ्ठं संकट हिंदुपुढे आहे. धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे...


संपूर्ण कार्यक्रमाची संक्षिप्त चित्रफीत जोडली आहे.‌ माझ्या चिंतनाची करतोच. आमचे बंधु ⁨शिवम जवंजाळ⁩ यांचे विशेष आभार..! 


भवदीय...


#धर्मांतरण_लव्हजिहाद_इस्लाम_ख्रिस्ती_सर्वोच्चन्यायालय_संविधान_हिंदुधर्मरक्षण_उपासना_काश्मीर_पाकिस्तान

No comments:

Post a Comment