Friday 31 January 2020

#गांधींचे_खरे_मारेकरी_कोण??? #पटेल_नेहरु_की_काँग्रेस???



*गांधीवाद त्यादिवशीच संपला, ज्यादिवशी आह्मां ब्राह्मणांच्या सरसकट कत्तली झाल्या नि घरं जाळली गेली, जमिनी गेल्या. माझ्या आजोबांचे घर जाळलंय बरंका. नाही म्हणजे काही गांजेकस आज हे खोटंय म्हणतात म्हणून. पण तो इतिहास आह्मीं विसरलो नि पुढे आलो. विद्रोह करत बसलो नाही की कधी एल्गार पण केला नाही. आह्मीं चोवीस तास ते रेटतही बसलो नाही नि पुढे रेटणारही नाही. असो...*

पण त्या गांधींचा नि गांधीवादाचा खरा मारेकरी कोण हा शोध अद्यापही घेणं आवश्यक आहे.

*अनेक प्रश्न आहेत, जे अनुत्तरित आहेत.*

उदाहरणार्थ...

*अनेकवेळा काँग्रेस विसर्जित करा असं म्हणणारे गांधी काँग्रेसला नकोसे झाले होते का???*

*गांधीवध ही गांधींच्या ५५कोटींच्या हेकेखोरीचाच परिणाम आहे असे कथित सरदार पटेल राजाजींना म्हटल्याचे राजाजींनी गांधींजींवरच्या चरित्रांत स्पष्टपणे लिहिलंय. कपुर कमिटी रिपोर्टमध्येही हा संदर्भ आहेच. आह्मीं मागेही ह्यावर ससंदर्भ लिहिलं होतंच.*

गांधींनी बहुमत असताना पटेलांना डावलून नेहरुंना पंतप्रधानपदावर बसवलं हा घाव पटेलांच्या वर्मी लागला नसेल कशावरून???

पटेलांचा भला मोठा पुतळा गुजराती मानसिकतेतून उभारल्याने पटेलांच्या पडद्यामागच्या चरित्रांकडे पहायला आह्मीं तयारंच नाही आहोत.

*महाराष्ट्रांपूरता विचार करता पटेल हे अत्यंत गुजराती मानसिकतेचे महाराष्ट्रद्वेष्टे होते ह्याचे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. पटेलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या संग्रामांस केलेला प्रखर विरोध तर सर्वांस ज्ञात आहे. पटेलांच्या अंतःकरणांत महाराष्ट्रीय ब्राह्मणांविषयी असलेला रागही अनेकांना ज्ञात नसला तरी तो कागदोपत्रांतून नि त्यांच्या व्याख्यानांतून नि कृतीतून दिसतोच. हिंदुराष्ट्रपती श्रीस्वातंत्र्यवीरांच्या पुढाकाराने आरंभ झालेला नौदल सत्याग्रह दडपून टाकण्यांत पटेलांचा वाटा सर्वांनी एकदा अभ्यासावाच. हे पटेलांचे कृत्य किती घातकी नि नीचपणाचे होते हे सूज्ञ जाणतीलंच.*

*इतकंच काय पण गांधीवधापश्चात श्रीसावरकरांना अकारण कारावासांत डांबणारे सावरकरद्वेष्टे पटेल हे सरदार त्यांच्यासाठीच अर्थात सावरकरद्वेष्ट्यांसाठीच असु शकतात, आमच्यासाठी ते सरदार नाहीतंच नि होऊही शकत नाहीत. अर्थात पटेलांची कुंडली मांडायची ही वेळ नव्हे.* पण पटेल गांधीवधाच्या मागे असतील ही शक्यता नाकारता येत नाही. भले काहींना हे सर्व सत्य जाणून घ्यायची इच्छा नाहीच. कारण आता पुतळा उभारलाय ना???

*गांधींना मारायचे सहा-सात प्रयत्न खरंच झाले होते का???*

काही जण बेंबीच्या देठापासून सतत बोंबलताना दिसतात की म्हणे गांधीवधाचे आधीही प्रयत्न झाले होते. *हे विधान कपुर कमिटी रिपोर्टने पूर्ण असत्य ठरविले आहे, जो स्वतः काँग्रेसने संस्थापिला होता. त्यामुळे ह्यात तथ्य तर काहीच नाही.* पण क्षणभर असे प्रयत्न सत्य मानले तरी प्रश्न निर्माण होतो की मग इतक्या वेळ ही काँग्रेस, नेहरु-पटेलादि गांधीभक्त झोपा काढत होते काय???

एकीकडे गांधींना राष्ट्रपिता म्हणून मिरवायचं नि दुसरीकडे गांधीजींच्या सुरक्षेमध्ये ढिलाई करायची...हा कुठला न्याय???

*गांधीजीको मरने दो, हमें हमारा हक दो अशा घोषणा अनेक गांधीवाद्यांनीच केल्याचा स्पष्टोल्लेख आहे. अगदी सरोजिनी नायडुही गांधींवर चिडल्याचा उल्लेख आहे.*

*बरं ह्या सर्वांत नेहरु काय झोपा काढत होते का ?*

*गृहखाते काय करत होते ? कारण गृहमंत्री तर पटेलंच होते.*

ह्या सर्व गोष्टी कशाचा निर्देश करतात???

आता ह्यातून त्यांचा लाभ नेमका काय होता असा प्रश्न पडतोच...

गांधी काँग्रेस संपवायला निघाले होते, जे पटेल-नेहरुदिंना नको होते. त्यामुळे त्यांचा काटा काढणं आवश्यक होते. त्यामुळे गांधीवधाचे संभाव्य लाभ ह्यांना निम्नलिखित होते.

१. *गांधी गेल्यामुळे काँग्रेस वाचली हा प्रथम लाभ...*

२. *गांधीवधातून हिंदुत्ववादी चळवळ पूर्ण बदनाम करता येईल नि विशेषतः हिंदुसभेला नि संघाला संपविता येईल ही पटेलांची योजना असावीच.* अर्थात पुढे संघानी गोळवलकरांच्या नेतृत्वाखाली सोडवणूक करून घेतली. त्यावर पुन्हा केंव्हातरी...

३. *पटेल ब्राह्मणद्वेष्टे होतेच. त्यामुळे पंडित नथुराम गोडसेंना हाताशी धरून महाराष्ट्रांतली ब्राह्मणद्वेषाची लाट आणखी मोठी करता येईल हा पटेलांचा सूप्त हेतु असु शकतोच. आम्ही वरंच लिहिलंय की पटेलांच्या मनांत महाराष्ट्रीय ब्राह्मण नि त्यातही चित्पावनांविषयी विशेष द्वेष होता.* ह्याचे संदर्भ उपलब्ध आहेतंच.

४. *महाराष्ट्राची प्रतिमा कायमची मलीन करता येईल.*

५. *गांधीवधाच्या सहानुभूतींवर काँग्रेसला सतत सत्तेत राखता येईल..*

आणखीही खूप प्रश्न आहेत. तूर्तांस इतकंच.

विस्ताराने पुढे येऊच.

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#गांधीवध_पटेलनेहरु_काँग्रेस_संगनमत

No comments:

Post a Comment