Saturday 22 February 2020

#मार्क्सवाद_आणि_भारतीय_इतिहासलेखन #लेखांक_प्रथम




The history of hitherto existing society is the history of class struggle.

Communist Manifesto - Karl Marx and Frederic Engels
London 30th January, 1888

ख्रिस्ती मिशनरी(हे आह्मीं मागेच सिद्ध केलंय) अशा मार्क्सने नि त्याचा साथीदार एंजल्सने त्यांच्या उपरोक्त ग्रंथामध्ये मध्ये अगदी आरंभीच म्हटलं आहे की सर्व मानवजातीचा किंवा समाजाचा इतिहास हा केवळ वर्ग-संघर्षाचा इतिहास आहे. मार्क्सचे हेच वाक्य अगदी प्रमाण मानून पुढे सर्व मार्क्सवाद्यांनी ह्यावरूनंच सर्व विश्वाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही मार्क्सवादी इतिहासकाराची पुस्तके पाहिली तरी हीच मांडणी आपणांस दिसून येते. अगदी ह्या उपरोक्त एंजल्सचे The Origin of the Family, Private Property and the State हा ग्रंथ वाचला तरी हीच मांडणी लक्ष्यी येतें. यद्यपि हा ग्रंथ हेगेल्सच्या ग्रंथांस प्रतिवाद होता. मार्क्सवाद्यांनी हा विश्वेतिहास निम्नलिखित चार अवस्थांमध्ये कोंडून टाकलाय, त्या म्हणजे

१. Primitive Communism - प्रारंभिक साम्यवाद
२. Slavery - गुलामगिरी
३. Feudalism - सामंतशाही किंवा सरंजामशाही
४. Capitalism - भांडवलशाही

सर्व मार्क्सवाद्यांच्या मते सर्व जग किंवा कोणताही मानव-समुह ह्या चार अवस्थांमधून गेलेलाच असतो. आणि म्हणून ह्या चार अवस्थांमधून जगाला बाहेर काढणं व शेवटी साम्यवाद अर्थात Communism कडे वळविणे, हेच त्यांचे उद्दिष्ट असतं. त्यांच्या दृष्टीने साम्यवाद ही आदर्श व्यवस्था असते.

अगदीच एतद्देशीय उदाहरण द्यायचे तर भारतात मार्क्सवादी पक्षाची संस्थापना करणारे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे ह्यांचं India from Primitive Communism to Slavery हा ग्रंथ जिज्ञासूंनी अभ्यासावा. त्यातही डांग्यांनी हीच मांडणी केलेली आपणांस दिसून येते....

आता प्रश्न असा पडतो की भारतीय इतिहासाला ही मांडणी लागु पडते का???

तर उत्तर नाही असे येतं.

कारणमीमांसा निम्नलिखित

मार्क्सने नि एंजल्सने केलेली ही वर्गसंघर्षाच्या इतिहासाची मांडणी भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने कोणत्याही पुराव्याशिवाय व इतिहासाच्या प्रमाण व आधाराशिवाय होती.

अर्थात भारतातल्या नेहरुप्रणीत मार्क्सवाद्यांनीही भारताच्या समग्र इतिहासाची मांडणी करताना ह्याचपद्धतीने मांडणी केलीय. दुर्भाग्य म्हणजे भारतीय इतिहासात ही मांडणी कुठेही बसत नाही. तरीही गेली सत्तर वर्षे हीच इतिहासाची परंपरा आपण वाचतो आहोत व त्याविरुद्ध स्वर उठविण्याचे सामर्थ्यही आपल्यांत नाही. मार्क्सवादी इतिहासकारांनी केलेला इतिहासद्रोह हा विषय यद्यपि विस्ताराचा असला तरी ज्याची सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे असा मनुष्यही त्यांची लेखनशैली समजून घेऊ शकतो. ह्यावर विस्ताराने आह्मीं मागे एक लेख लिहिला होता Marxism and the writing of Indian History नावाने...

सविस्तर पुढील लेखांकात येऊच...

#साम्यवाद_सप्ताह_इतिहासाच्या_पाऊलखुणा

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

No comments:

Post a Comment