Friday 15 November 2019

न भीतो मरणादस्मि केवलं दूषितं यश: ।



शुद्रकाच्या "मृच्छकटिक" नाटकांत चारुदत्त वसंतसेनेच्या अपहरणाच्या असत्य आरोपांवर प्रत्युत्तर देताना उपरोक्त श्लोक उच्चारतो. तो म्हणतो

*"वसंतसेनेचा धनाचा अपहरणाचा व हत्येचा आरोप मला असह्य आहे. तो मिथ्या कलंक आहे. अरे मरणाचे ते काय? मला फाशी द्याल ! तोही अपराध मी वास्तविक केलेला नाही. पण हा अपहरणाचा कलंक कसला??? मला दु:ख ते आहे की जीवनांत जे काही सत्व, जे कांही तत्व मी सांभाळले, त्या तत्वावरच हा प्रहार आहे. न भीतो मरणादस्मि केवलं दुषितं यश: ।  मला मरणाची भीती नाही पण माझ्या यशास दोष लागेल किंवा माझी अकारण अपकीर्ती द्वेषापोटी होईल ह्याची आहे."*

आजही हे वाक्य पंडित नथुरामजींच्या त्या गांधीवधाच्या कृत्यांस किती समर्पक आहे हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. ही तुलना अर्थातच सर्वथैव व यथार्थ आहे.  वसंतसेनेला मारले या आरोपावरून चारुदत्तावर अभियोग भरला गेला होता. सुविद्य श्रोते शुद्रकाच्या मृच्छकटिकांत जाऊन पोहोचले ते हसत हसतच. कारण धारा तीनशे दोनचा उल्लेख पंडित नथुरामजींनी चारुदत्ताच्या संदर्भात केला होता.

पंडितजी म्हणाले

*"मी अनेक सभा घेतल्या आहेत, गाजविल्या आहेत. माझ्या गळ्यांत फुलांचे हार मी घेतले आहेत. तितक्यांच सहजतेने फाशीचा दोरही मी स्वीकारीन! या देशावर माझे प्रेम केले आहे. मानवजातीवर प्रेम केले आहे. त्या अत्युत्कट भावनेंतूनच मी हत्या केली आहे. अपेक्षा एकच आहे. माझ्या देशभक्तींला कोणी कलंक लावू नये ! पण तो लावला गेलाच तर चारुदत्ताच्या पुढे एक पाऊल टाकून मला म्हणायचे आहे."*

*"देशभक्ती पापच असेल तर ते पाप मी केले आहे ! गळफास आणि ते पापही मी अंगावर वागवीन. देशभक्तीच्या पापापासून दूर राहा, असे, माझ्या जीवनाचे प्रलोभन दाखवूनही कोणी सांगितले तरी मी विचलित होणार नाही !"*

चारुदत्ताच्या काळात हसत हसत गेलेले ते श्रोते आता रडु लागले ! त्यांचे डोळे गळु लागले, मन आक्रंदु लागले. असहायतेची वेदना प्रत्येकाच्या मनावर वावरत होती. त्यांना वाटले, आम्ही एक नरबळी (नरमेधांत हिंसा नसते बरंका. ती पौराणिकांनी उठविलेली हूल आहे, लिहु कधीतरी सविस्तर त्यावर) करणार आहोत ! या देशभक्ताला आम्ही पापाखाली गाडणार आहोत !

"सुख-दु:खे समे कृत्वा लभालाभौ जयाजयौ" ह्या स्थितप्रज्ञाच्या मनोनिग्रहाने नथुरामजींनी आपले भाषण पुढे ठेवले. म्हणूनच सिमला न्यायपीठावरील एक न्यायमूर्ती जीडी खोसला पंडित नथुरामजींच्या निवेदनाचे परीक्षण करताना म्हणतात.

*"न्यायालयातील श्रौतृवर्गाला जर न्यायदानाचे काम दिले असते तर प्रचंड बहुमताने त्यांनी नथुरामला निर्दोष घोषित केले असते."*

१९ मे, १९४८ - पंडितजींचा ३९ वा वाढदिवस

*न्यायमूर्ती भंडारींची कन्या पंडितजींना भेटावयांस आली होती.*

कुणी काहीही म्हणेना पण पंडितजींच्या त्या कृत्याची यथार्थता केवळ ह्याच स्त्रीला आकळली. *स्त्रियांना पुरुषापेक्षा बुद्धी कैकपट जास्तीच असते हे चाणक्यवचनही सार्थच आहे.* म्हणूनच ती त्यांच्या आसनांवर गुलाब वाहते झाली. ती नथुरामजींना भेटताच म्हणाली,

*"आम्हा लोकांसाठी तुम्ही प्राण ओवाळून टाकीत आहात याची मला जाणीव आहे. आम्हा सगळ्यांना जाणीव आहे."*

एवढे बोलून ती थांबली व गहिवरली. तेवढ्यांत पंडितजी उद्गारले

*"आपल्याला जाणीव आहे हे माझ्या जिवंतपणीच मला कळते आहे यातच सर्व काही पावले."*

ती मुलगी पंडितजींच्या अभिवक्तव्याला प्रतिदिनी येत असे. जे एका मूलीला कळलं, ते आम्हाला अद्याप कळलेलं नाहीये. असो.

*गांधीवधाचे नागडे सत्य (नेकेड ट्रुथ)*

गोळ्या तीन की चार???

पंडितजी न्यायालयीन वक्तव्यांत म्हणतात

*"Since I was doubtful about the number of bullets, I did not want Gandhiji's legal autopsy to be carried out at Your Honour's table. I also declined to examine the Doctor. So the benefit of doubt may go to the Prosecution and the sentence to me."*

ह्याला स्थितप्रज्ञता नाहीतर काय म्हणायचे???

अर्थात सरकारने पण गांधीजींची हेतुपुरस्सर शवविच्छेदनाची मागणी केली नाही कारण चौथी गोळी कुणी मारली हे कळु नये म्हणूनच. त्यामुळे संशयाची जागा नेहरु, पटेल व तत्कालीन सरकारवर होती व आहे हे स्पष्ट आहेत. गांधीवाद्यांनी कितीही नाकरले तरी हे नागडे सत्य(Naked Truth) आहे.

*गांधीवध हा गांधीजींच्या ५५ कोटींच्या हेकेखोरीचाच परिणाम आहे - इति सरदार वल्लभभाई पटेल*

पटेलांनी हे वाक्य राजाजींना सांगितले आहे व ते राजाजींनी त्यांच्या *"Gandhiji's Teaching and Philosophy"* ह्या ग्रंथात लिहिले आहे ते खालीलप्रमाणे

*"When on 30th January, 1948, Gandhiji was assassinated by Godse, Sardar Vallabhbhai Patel felt that the conspiracy to kill Gandhiji was due to Hindu anger against him on account of this advise of his to pay a huge sum of money to the Pakistan Government when it was organising and carrying out a wicked military campaign against us."*

Page no. 25-26

ह्याचा आणखी पुरावा
*कपुर कमिटी अहवाल - खंड १*

*पटेलांची आमच्या हिंदुमहासभेला व त्याचेच अपत्य असलेल्या संघाला क्लीन चीट* 👇

पटेल नेहरुंना लिहिलेल्या २७ फेब्रुवारी, १९४८ च्या पत्रात म्हणतात.

*"But beyond this, I do not think it is possible, on the evidence which has come before us, to implicate any other members of the RSS or the Hindu Mahasabha."*

संदर्भ - Sardar Patel's correspondence Volume VI- page no. 56-58 - Ahmedabad

आमच्या प्राणप्रिय हिंदुसभेच्या नावाने २४ तास कंठशोष करणार्यांनी कृपा करून हे पटेलांचे नेहरुंना लिहिलेले पत्र लक्षात घ्यावे. पटेलांनी संघाला काँग्रेस मध्ये येण्याचे आवाहन गांधीहत्येपूर्वीच केलं होते. हिंदुसभेला नाही ही गोष्ट महत्वाची आहे. त्यांचे साहसही होणार नाही ही गोष्ट वेगळी.

६ जानेवारी, १९४८ च्या लखनौ मधल्या एका सभेत पटेलांनी

*"I invite the RSS to join the congress... I realise that they are not actuated by selfish motives but the situation warrants that they should strengthen the hands of the Government."*

संदर्भ - Speeches of Sardar Patel - 1947-50, Publications Division, Government of India, Page no. 56

अर्थात गुरुजींनी हे धुडकावून लावले. गुरुजींचे ते कृत्य योग्यच होते. असो.

*काही षंढ मानसिकतेचे स्वयंघोषित हिंदुत्ववादी मात्र नथुरामजींच्या त्या कृत्याचा धिक्कार करतात. त्यात उजवे समाजवादी आघाडीवर आहेत ही गोष्ट वेगळी सांगायला नको. असों सविस्तर कधीतरी तो विषय घेऊ !*

पण एवढे मात्र खरे की

गांधीहत्येनंतर ब्राह्मणांची सरसकट कत्तल करणार्या व किलोकिलोने जानवी मारणार्या गांधीवाद्यांनी कितीही अहिंसेचा टेंभा मिरवला व पंडितजींना शिव्या घातल्या, तरीही आमच्या ह्रदयांत त्यांचे म्हणजे पंडितजींचे स्थान कायम परमवंदनीयच राहील. त्या आधुनिक दधीचीप्रमाणेच, ज्याने आपल्या अस्थी देवासूरसंग्रामासाठीच अर्पण केल्या होत्या.

माझ्या आजोबांचे घर तर गांधीवाद्यांनी त्याकाळीच जाळले होतेच. शेतीही गेलीच. प्राणप्रिय सिंधु नदी अखंड हिंदुस्थानात यायची ही प्रतिज्ञा आम्ही पूर्ण करण्यांस कटिबद्ध आहोत. आम्हांसा कुणी वेडे म्हणो किंवा अन्य काही !!! कारण वेड लागल्यांशिवाय इतिहास घडतच नाही व वेडी माणसेंच इतिहास निर्माण करतात.

*ज्यांना सावरकर व गांधी ही दोन टोके एकाचवेळी प्रमाण वाटतात, अशा वैचारिक गोंधळ झालेल्या कुणीतरी लिहिलेली मोठी-मोठी पुस्तके वाचून अखंड हिंदुराष्ट्र नाकारणार्यांची कीव करावीशी वाटते. असो.*

सांप्रत हा भ्रम सतत प्रसृत केला जातोय की

*म्हणे गांधी आपल्या मरणाने मरत होते तर त्यांना मारून का मोठ्ठं केल? किंवा गांधीहत्येने हिंदुत्ववादी चळवळ चाळीस वर्षे मागे गेली. इति इति*

ह्यावर सविस्तर काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे द्यावीत सर्वांनी. येत्या काही दिवसांत ती विचारेन.

ज्यांना गांधीच समजले नाहीत, त्यांना गांधीवाद व नथुरामही समजणार नाहीत. त्यातून आजची प्रा. शेषराव मोरेंसारखी मंडळीही त्यांच्या पद्धतीने फाळणीची मीमांसा केल्यामुळे ते ग्रंथ वाचले की मनुष्य फाळणी योग्य मानतो. मूळ विषय आहे गांधीवाद. अनेकांचा भ्रम आहे की नथुरामजींनी केवळ फाळणी डोळ्यांसोमर ठेऊन ते कृत्य केलं. पण हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. एकमेव कारण नाहीये.

प्रश्न गांधीवाद अभ्यासणे हा आहे, त्यानंतर गांधीहत्या किंवा वध योग्य की अयोग्य ह्याचा विचार  करता येईल. त्यानंतर मग संघाच्या मताप्रमाणे हिंदुत्ववादी चळवळीचे झालेले तथाकथित नुकसान ह्याची सविस्तर मीमांसा करता येईल.शेष संघवाल्यांविषयी बोलायचं तर मी आधीही दोन तीनदा लिहिलं होतं की

*"पतत्वेष कायो" म्हणून प्रत्यही भगव्या ध्वजासमोर नित्यप्रार्थना करणारे संघवाले किंवा तत्सम लोक एकीकडे अखंड हिंदुराष्ट्राची स्वप्ने पाहतात, त्याविषयी उत्सव करतात, पण ह्याच अखंड हिंदुराष्ट्रासाठी "ददाम्येष कायो" म्हणून प्रत्यक्ष देह त्यागणारे पंडित नथुरामजी व आपल्या अस्थी सिंधुसाठी तशाच अविसर्जित ठेऊन आपला आत्मा तसाच ठेवणारे पंडित नथुरामजी ह्याच लोकांना माथेफिरु वाटतात.*

त्यामुळे आधी गांधीवाद व त्यानंतर नथुरामजींचे कृत्य ह्याची चिकीत्सा हवी. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे व मूळ वाक्य एका तत्कालीन मूस्लीम पुढार्याचेच असल्याप्रमाणे

*ज्यादिवशी पहिल्या मूसलमालाने ह्या देशांवर पाय ठेविला, त्यांच दिवशी इथली पाकिस्तानची भेदाची बीजे रोविली गेली.*

* पंडित नथुरामजी व डॉ. आंबेडकर*

देशाला स्वातंत्र्य मिळाले ते सावरकरांच्या, सुभाष बाबुंच्या सैनिकीकरणामुळे. माऊंटबैटनचे अंतिम वाक्य सूचक आहे. *पण नथुरामजींना माथेफिरु म्हणणार्यांनी त्यांनी केलेलं हिंदुसंघटन व त्यांनी तात्यारावांच्या आदेशानुसार केलेले शस्त्रसंपन्नतेचे व सैनिकाकरणाचे प्रसाराचे कार्य हे पाहून स्वत: आंबेडकरही भारावले होते. म्हणूनच ते गांधीहत्येचे समर्थक होते व नथुरामजींचे विधीज्ञपत्र घ्यावयांस उत्सुक होते. ही गोष्ट सिंधुताईंना आंबेडकरांच्या स्वीय सचिवांनीच सांगितलीय.*
अर्थात ही गोष्ट आता अनेकांना मान्यही होणार नाही. सविस्तर संदर्भ मी देईनच. कारण

*नामूलं लिख्यते किंचित् नानपेक्षिपतमुच्यते !*

बाकी गांधींजींच्या एकुणच व्यक्तिमत्वाविषयी तत्कालीन सर्व राष्ट्रपुरुषांनी व अगदी काँग्रेसच्या नेत्यांनीही केलेली *औरंग्याचा द्वितीय अवतार* ही वाक्ये वाचली की शंकेस वाव राहत नाही. मग ते ना भा खरे असोत अन्यथा डॉ. मुंजे अथवा पुण्याचे संत शंकरमहाराज असोत.

आधी नास्तिक व पूर्ण ब्रिटीशनिष्ठ वरवरपाहता वाटणारे किंवा तत्समच आचार विचार असणारे पण नंतर कट्टर सशस्त्र क्रांतिकारक व  कारावासातल्या श्रीकृष्णाच्या साक्षात्कारानंतर पुदुच्चैरीत(पाँडेचरी) पूर्ण चाळीस वर्षे साधना करून महायोगी बनलेले महर्षि अरविंदही गांधीजींविषयी काय लिहितात ते पाहणं आवश्यक आहे. 👇

*Many educated Indians consider Gandhi a spiritual man. Yes, because the Europeans call him spiritual. But what he preaches is not Indian spirituality but something derived from Russian Christianity, nonviolence, suffering, etc. The gospel of suffering that he is preaching has its roots in Russia as nowhere else in Europe -  other Christian Nations don't believe in it.*

*परमवंदनीय अमर हुतात्मा पंडित नथुरामजी गोडसे अमर रहे !*
*हिंदुराष्ट्र अजेय व अखंड हो !!*
*जय माँ भारती !!!*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#पंडितनथुराम_गांधीवध_अखंडहिंदुस्थान_छद्महिंदुत्व

No comments:

Post a Comment