Thursday 11 February 2016

वेदांतील गणपती - आक्षेप नि खंडण

वेदांतील गणपती - आक्षेप नि खंडण

आज गणेश प्रकट दिन ! जयंती हा शब्दप्रयोग चुकीचा आहे कारण जे ईश्वरतत्व आहे ते अंत कसे होईल? जे नियम आम्हां मर्त्य मानवांना लागु पडतात ते गणपतीसारख्या ईश्वरांस कसे लागु होतील? त्यामुळे फार तर प्रागट्य असा शब्दप्रयोग अगदी उचितच आहे व त्यास काही प्रत्यवाय नाही. असो तर ह्या पावन दिनी गणरायांवरच्या काही तर्कहीन आक्षेपांचा विचार व त्यांचं खंडण करुयात.

आक्षेप
१. गणपती ही पौराणिक देवता, ती वैदिक नाही म्हणे - एक तर्कहीन व दुष्ट आक्षेप
२. तो विघ्नहर्ता नसून विघ्नकर्ता आहे म्हणे - दुसरा आरोप

पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे भारतीय विद्वानांचीही मतीही कशी गुंग झाली आहे हे ह्याचं उदाहरण ! सर्वसामान्यांचं तर सोडूनच द्या !

पण काही टुकार लेखक आपल्या भिकार बुद्धीमापनाने वेदांचा अभ्यास करतात व स्वत:ला वैदिक पंडित समजतात. अर्थात ह्यामागे त्यांचा स्वार्थ असतो ही गोष्ट वेगळी ! कारण हिंदुधर्माला तसेही शत्रु काही कमी नाहीत ! असो !

खरंतर अगदी साधं अथर्वेदातलं अथर्वशीर्ष पाहिलं तरी लक्षात येतं की ते वेदांतलंच आहे. जे अथर्वशीर्ष रोज म्हटलं जातं, तेच अथर्ववेदांतलं आहेच हे ह्या लोकांच्या कसं लक्षात येत नाही. त्यामुळे गणपती ही पौराणिक देवता आहे व ती वेदांत नाहीच असा जो बालिश तर्क व आक्षेप घेतला जातो तो किती निराधार नि हास्यास्पद आहे हे आपल्याला दिसून येईल. आता आपण प्रत्यक्ष वेदांचीच प्रमाणे पाहुयांत !


ऋग्वेद :- द्वितीय मंडल - २३ वा अध्याय - १ ली ऋचा (२.२३.१) व ५वी, ९वी, ११वी, १७वी व १९ वी ऋचा

ह्या सर्व ऋचा ह्या ब्रह्मणस्पती सुक्तातल्या आहेत. हे ब्रह्मणस्पती सुक्त म्हणजेच गणपतीचं सुक्त आहे.

ही १ली ऋचा खालीलप्रमाणे आहे.
ऋषी - गृत्समद, भार्गव, शौनक
छंद - जगती
देवता - ब्रह्मणस्पती

ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तमम् !
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: शृण्वन्नूतिभि: !

खरंतर हे पुर्ण सुक्त ब्रह्मणस्पती सुक्त नावाने प्रसिद्ध आहे.

हे ब्रह्मणस्पती सुक्त म्हणजेच गणपती सुक्त आहे हे त्यातील शब्दांवरून कळेल.
विशेषत: ह्या पहिल्याच ऋचेत गणपती हा शब्द स्पष्टपणे आलेला आहे एवढं वाचूनही जर अक्कल येत नसेल तर काय म्हणावं???

आता ऋग्वेद अष्टम मंडल, ८वं सुक्त पूर्ण
(ऋचा ८.८१.२ ते ८.८१.९ पुरावे)


आता ऋग्वेद दशम मंडल, ११२ वं सुक्त ऋचा संख्या ९वी व १०वी

ह्या ९व्या ऋचेत गणपतीचा स्पष्ट उल्लेख आहे. तो खालीलप्रमाणे
नि षु सीद गणपते गणेशु त्वामाहुर्विप्रतमं कवीनाम् !
न ऋते त्वत्क्रियते किॅ चुनारे महामर्कं मधुवंचित्रमर्चं !९वी ऋचा)

इथे "नि षु सीद" म्हणजे त्या गणेशाला तु इथे स्तुती ऐकायला येऊन बस असा अर्थ अभिप्रेत आहे.


आता ह्यापेक्षा आणखी काय संदर्भ हवाय???





तरीही गणपती हा वैदिक देव नाही असं ज्यांन म्हणायचं असेल त्यांनी खुशाल म्हणावं ! शेवटी झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नव्हे ! नाही का???


आता दुसर्या आक्षेपाचं खंडण - म्हणे गणपती हा विघ्नहर्ता नसून तो विघ्नकर्ता आहे !

काही टुकार लेखक असं प्रतिपादन करतात की वेदांमध्ये अशा काही ऋचा आहेत की त्यात गणपती हा यज्ञांमध्ये विघ्न आणतो म्हणून त्याला दूर ठेवा असं प्रतिपादन आहे. खरंतर अशी एकही ऋचा आहे आम्हांस एकाही वेदांत आढळळेलं नाहीये. तरीही काही दीडशहाण्यांना फारच उत्साह असेल तर त्यांनी तशी मुळ ऋचा द्यावी ही विनंती व अकलेचे तारे तोडावेत !


काहीजण महर्षी दयानंदांचा संदर्भ देतात

ह्याला म्हणतात स्वार्थी प्रवृत्ती किॅवा पढतमूर्खता ! एरवी दयानंदांचं भाष्य ह्यांना अजिबात मान्य नसते कारण दयानंदांनी वेदांवरच्या सर्व विकृत आक्षेपांचं, अगदी सायणाचार्यांपासून ते मॅक्सम्युलरपर्यंतच्या सर्व आक्षेपांचं साधार नि सप्रमाण खंडण नि मंडण केलंय. गोमांसभक्षण, सोमरस म्हणजे मद्य ह्या नि असल्या टुकार आक्षेपांचं खंडण दयानंदांनी १५० वर्षांपूर्वीच केलंय ! पण एरवी दयानंदांना प्रमाण न मानणारे लोक इथे मात्र दयानंदांना लगेचच पुढे करतात.

आता दयानंद नक्की काय  म्हणताहेत ते पाहु

दयानंदांचा विरोध गणपतीच्या मूर्तीपुजेला आहे पण गणपती देवतेला नाही. गज म्हणजे हत्तीच्या रुपातल्या गणेशाला किॅवा कोणत्याही साकार रुपाला दयानंद विरोध करतात.

दयानंदांनी मूर्तीपुजा अर्थात साकार नि सगुण पुजा नाकारली व अनेकेश्वरवाद नाकारून वेदांमध्ये एकेश्वरवाद आहे असं प्रतिपादन केलंय हे खरंय ! पण ह्याचा अर्थ अगदी शब्दश: घ्यायचा म्हटला तर ह्याच वेदांत "एकं सत्विप्रा: बहुधा: वदन्ति" अश्या ऋचा आढळतात. त्यामुळे ईश्वरतत्वाला अनेक स्वरुपात जाणणं किॅवा पाहणं हे काही वेदविरुद्ध होत नाही. अगदी साकार रुपात पाहणंही काही निंदनीय नाही.

खरंतर मूर्तीपुजेच्या बाबतीत आमच्या महाराष्ट्रीय संतांनी केंव्हाच सिद्धांत मांडले आहेत

"सगुणाचेनि आधार निर्गुण पाविजे" असं म्हणणारे किॅवा "तुज सगुण म्हणु की निर्गुण रे ! तु सगुण निर्गुण गोविॅदु रे" असं म्हणणारे आमचे संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय असतील किॅवा "वेद अनंत बोलिला ! अर्थ इतुकाचि घेतला ! विठुरायांसी शरण जावे !" असं म्हणणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय असोत ! संताना वेद महिमा कळला नव्हता असं का आपणांस वाटतं??? जर नसता तर त्यांनी इतक्या ठामपणे हे का प्रतिपादन केलं असतं??? त्यांना निर्गुण निराकार-सगुण साकार कळत नव्हतं का???

त्यामुळे मूर्तीपुजेत काहीच दोष नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

त्यामुळेच गणरायांवरच्या ह्या टुकार आक्षेपांचं खंडण इथे संपलं !

विनंती एकच आहे की ह्याच आक्षेपकांनी ह्याच बुद्धीच्या देवतेला शरण जाऊन आपली बुद्धी सुधरावी !

कारण तो गणराय आपणांस नक्कीच सद्बुद्धी प्रदान करेल !

तेंव्हा आपणांस गणेश प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

गणपत्ती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ता मोरया !!!



2 comments:

  1. Ishwarala ant ka nahi. Mala vatate sir ishwar ani parmeshwar wegle ahet. Parmeshwar anadi anant ahe. Pan ishvar ha parmeshwarachach ansh ahe jase apan ahot fakt tya kalatil tya pragat lokanni manavasathi khup kahi kele mhanun tya devata manalya manasane. Jar tyana ant nahi tr mag ata kuthe ahet tya asa prashn yetoch. Mhanje mi yakade ek itihas mhanun pahtoy. Adhyatm vagere mhanun nahi.

    ReplyDelete
  2. Ishwarala ant ka nahi. Mala vatate sir ishwar ani parmeshwar wegle ahet. Parmeshwar anadi anant ahe. Pan ishvar ha parmeshwarachach ansh ahe jase apan ahot fakt tya kalatil tya pragat lokanni manavasathi khup kahi kele mhanun tya devata manalya manasane. Jar tyana ant nahi tr mag ata kuthe ahet tya asa prashn yetoch. Mhanje mi yakade ek itihas mhanun pahtoy. Adhyatm vagere mhanun nahi.

    ReplyDelete