Thursday, 27 April 2017

वेदांतले ऋषी व देवता ही व्यक्तीवाचक नावे किंवा देहधारी व्यक्ती नाहीत.




वैदिक ऋषी ह्या अर्थाबद्दल तीन प्रवाह आहेत

१. ऋषी मंत्राचे उद्गाते आहे अर्थात त्या ऋषींनी ते मंत्र समाधी अवस्थेत ते सत्य पाहिले व ते तत्व किंवा सत्य शब्दबद्ध केलं. थोडक्यात त्यांना ते मंत्र स्फुरले.थोडक्यात ते मंत्रांचे कर्ते आहेत. इथे पाहिले म्हणजे उघड्या डोळ्यांनी नव्हे तर अंत:चक्षूंनी असा अर्थ आहे.

२. मंत्र आधीपासूनच आहेत पण त्यात्या ऋषींनी त्यात्या मंत्राचे समाधी अवस्थेत चिंतन केलं व त्यावर भाष्य केलं किंवा त्या मंत्रांचा अर्थ त्यांस अधिक स्पष्ट झाला. म्हणून ते मंत्रकर्ते नसून मंत्रद्रष्टे झाले. द्रष्टेस्वरुपात ते मंत्र त्यांनी पाहिले व त्यावर भाष्य केलं.

३. मंत्र व त्यांची सुक्ते व त्यांचे ऋषी आधीपासूनच आहेत. परमेश्वरानेच ती नावे त्यात्या सुक्तास आधीच देऊन ठेवली आहेत.

ह्यातला पहिला विचारप्रवाह आम्हांस अजिबात मान्य नाही. अनेक विद्वानांनाही तो मान्य नाही कारण त्याने वेदांची रचना क्रमाक्रमाने झाले असे सिद्ध होते व अपौरुषेयत्वांस बाधा येते.

दुसरा प्रवाह तसा वैदिकांत मान्य आहे पण आम्हांस नाही. कारणे सविस्तर खाली लिहिली आहेत..

तिसरा प्रवाह जास्ती मान्य आहे व तोच आम्हांस अधिक सयुक्तिक वाटतो. कारणे निम्नलिखित!

सविस्तर भूमिका निम्नलिखित स्वरुपांत.

सर्वेषां तु स नामानि कर्माणिच पृथक् पृथक् !
वेदशब्देभ्यः एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे !
मनु - १.२१

अर्थ – सृष्टीच्या आधी परमेश्वराने वेदांतील शब्दावरून चेतन आणि अचेतन अशा सर्वच वस्तूंचे नामकरण केले आणि त्यांचे पृथक म्हणजे भिन्न भिन्न कर्म ठरविले आणि संस्था निर्माण केल्या.

 वेदांच्या अपौरुषेयत्वासंदर्भातला हा संदर्भ व सिद्धांत महत्वाचा असून मनुस्मृती मध्ये तो अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे

आता पुढचा श्लोक बघुयात

ब्रह्मसूत्र भाष्यात १/३/३०

समाननामरूपत्वाच्चावृत्तावप्यविरोधो दर्शनात्स्मृतेश्च।

 ह्या सूत्रावर भाष्य करताना आचार्य शंकर म्हणतात

ऋषीणां नामधेयानि याश्च वेदेषु दृष्टय !
शर्वयन्ते प्रसूतानां तान्येवैभ्यो ददात्यजः !

अर्थ - वेदांमध्ये ऋषींची जी नावे व ज्यादृष्टीने ती आलेली आहेत तीती सर्व नामे आणि त्या सर्व दृष्टी तो अजन्मा परमेश्वर प्रलयाच्या अंती म्हणजेच पुढच्या सृष्टीच्या आरंभी निर्माण केलेल्या ऋषी आणि मानवांना प्रदान करतो !

ह्या दोन श्लोकांवरून खालील निष्कर्ष निघतात

१. वेद हे सृष्टी आरंभी विद्यमान असल्याने यांची रचना कुण्या ऋषींनी केली किंवा त्यांना ते मंत्र स्फुरले किंवा त्यांनी ते रचले असे म्हणणे हे सर्वथा निंदनीय आहे.

२. सर्व मंत्रांवरची जी नावे आहेत ती परम्यात्माने सृष्टीच्या आरंभीच ठेवली आहेत.

३. आणि नंतरच्या काळात जन्माला आलेल्या सर्व ऋषींची नावे ही ह्यात वेदांतील सुक्तांवरूनच ठेवली गेली आहेत.

आता खालील शंका उपस्थित होतात

काही ऋषींची नावे वेदांतल्या सुक्तांच्या वर आढळतात परंतु ती नावे वेदांतल्या मंत्रांमध्ये (संहिता भागात) मात्र आढळत नाहीत असे का?

शंकेचे उत्तर -  परमेश्वर पक्षपाती नाही त्यामुळे तो सर्व ऋषींची नावे स्वतःच ठेवतो. काही ऋषींची नावे स्वतः आणि काही ऋषींची नावे भविष्यांत जन्माला येणार्या सर्व सामान्य मनुष्यांनी ठेवावे असा पक्षपात तो करत नाही.

दुसरे असे की वैदिक सुक्तांवर ही ऋषींची नावे सृष्टीच्या आधीच ठेवली गेलेली आहेत. ती नंतर कुणी त्यांना दिली हा सिद्धांत निराधार आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होणार्या भावी मर्त्य मानवांना, मग भले ते विश्वामित्र, व्यासांसारखे, वाल्मिकिंसारखे कितीही विद्वान असोत, त्यांना ह्या सुक्तांना स्वतःची नावे देण्याचा अधिकार नाही. उलट त्यांची नावे ह्या आधीच्याच सुक्तांच्या ऋषींच्या नावांवरून आणि त्याने प्रकट होणार्या अर्थांवरून घेतली आहेत. ऋग्वेदामध्ये २/३(दोन तृतीयांश) ऋषी असे आहेत की जे त्या मंत्राच्या वरही आहेत आणि त्या मंत्रातही आहेत.

कुर्मपुराणांत पण उपरोक्त सिद्धांतच सांगितला आहे.

कूर्मपुराणम्-पूर्वभागः/सप्तमोऽध्यायः

वेदशब्देभ्य एवादौ निर्ममे स महेश्वरः ।
आर्षाणि चैव नामानि याश्च वेदेषु सृष्टयः ।७.६८

शर्वर्यन्ते प्रसूतानां तान्येवैभ्यो ददात्यजः ।।
यथर्त्तावृतुलिङ्गानि नानारूपाणि पर्यये ।७.६९


लिङ्गपुराणम् - पूर्वभागः/अध्यायः ७०

येथे पण उपरोक्त श्लोकच आहे तसे दिलेले आहेत. थोडक्यात पुराणे पण तीच गोष्ट सांगतात जी मन्वादि स्मृतिकार सांगतात.

त्यामुळे ऋषी मंत्रकर्ता आहेत ह्या सिद्धांताचे खंडन खालील गोष्टींनी होते

१. अनेक सुक्तांना एकापेक्षा अनेक ऋषी आहेत व काही ठिकाणी तर ते सहस्त्र (१,०००) इतक्या संख्येने किंवा त्यापेक्षाही जास्ती आहेत. मग आता ह्या वरून त्या सर्वांनी ते सुक्त द्रष्टे स्वरुपात पहिले किंवा रचले असे ठरवायचे का???स्पष्टपणे नाहीच नाही ! म्हणजेच ते ऋषी कुणी देहधारी मानव नसून परमेश्वराने आधीच ठेवलेली नावे आहेत.

२. काही मंत्र एकाच वेदामध्ये किंवा अन्य वेदामध्ये परत येतात यद्यपि त्यांचा अर्थ वेगळा असतो. त्यामुळे हा पुनरुक्तीचा दोष काही भाष्यकार मानतात पण तो चुकीचा आहे. असो तो स्वतंत्र विषय आहे. स्वतंत्रपणे त्यावर कधीतरी लिहीन. पण तूर्तास एवढेच की अश्या मंत्राचे एकाच वेदांतले भिन्न भिन्न ठिकाणचे ऋषी वेगवेगळे का असतात ??? मंत्र तोच आहे म्हटल्यावर ऋषीही तोच का येत नाही??? थोडक्यात वेद आधीपासूनच आहेत हे स्पष्ट होते.

३. अनेक मंत्रांच्या ऋषींची नावे तरप्-तमप् प्रत्यय लावल्यानेत्यांची रूपे बदलतात जसे इन्द्राचे इन्द्रतम् किंवा कण्व ऋषींचे कण्वतम् असे रूप होते. जर हे ऋषी व्यक्तिवाचक नावे असती तर त्यांची ही अशी रूपे कधीच झाली नसती. थोडक्यात हे ऋषी व्यक्तिवाचक नावे नाहीत.

४. अनेकवेळा येणारी अलौकिक वर्णने ही मानव रूपांतील देहधारी व्यक्तींची असूच शकत नाहीत. त्यामुळेही वेदांतील देवता वा ऋषी हे सर्व देहधारी जीव असूच शकत नाहीत.

५. असे अनेक सुक्त आहेत ज्यांचे ऋषी हे तिर्यक योनीतील पशु पक्षांची नावे आहेत. ऋग्वेद ८/६७ सूक्ताचे ऋषी हे “जालबद्धाः मत्स्याः’ असे आहेत. मग आता मासा कसा काय ऋषि असु शकेल ???


ऋकसर्वानुक्रमाणिका मध्ये आचार्य कात्यायन हे ऋषी आणि देवता ह्याबद्दल लिहिताना म्हणतात

यस्य वाक्यं स ऋषिः; या तेनोच्यते सा देवता !

ज्याचे वाक्य आहे तो ऋषी आहे आणि ज्याला उद्देश्यून ते म्हटले जात आहे ती देवता आहे.

अगदी साधे उदाहरण आपण यम-यमी सूक्ताचे(ऋग्वेद – १०/१०) घेऊ. ह्या सूक्ताचे अनेक विकृत अर्थ इतिहासाचार्य राजवाडे व पाश्चिमात्य भाष्यकारांनी काढले आहेत. सविस्तर कधीतरी त्यावर लिहीन पण आत्ता जो विषय आहेत त्यात हे सांगणे आवश्यक आहे की ह्या सुक्तामध्ये ज्या ऋचांमध्ये यम बोलतो आहे तिथे तो ऋषी आहे आणि ज्या यमीला तो उद्देश्यून बोलतो ती त्या त्या ऋचेपुरती त्या मंत्राची देवता आहे. आणि जिथे ती यमी बोलते आहे त्या ऋचांची ती ऋषी असून ती ज्या यमाला उद्देश्यून बोलते आहे तो यम त्यात्या ऋचांचा ऋषी आहे.

आता ऋषी शब्दांची व्युत्पत्ती पाहुयांत

ऋषी हा शब्द व्याकरणानुसार तुदादि धातू पासून ईन् प्रत्यय लागून निर्माण होतो. “ऋषति गच्छति, प्राप्नोति, जानाति वा स ऋषिः - गतीचे ज्ञान, गमन आणि प्राप्ती” हे तीन अर्थ होतात. निरुक्तकारांनी “ऋषिर्दर्शनात्” ह्य शब्दाने मंत्राच्या अर्थाचा किंवा गुढार्थ ह्याचा द्रष्टा किंवा प्राप्तकर्ता, साक्षात्कार कर्ता असे अर्थ प्रतिपादून  किंवा “साक्षात्कृतधर्मा”हाच सिद्धांत सांगितला आहे. महर्षी दयानंदांनी “मंत्रद्रष्टा” ह्याबरोबरच “ईश्वर” असाही अर्थ सांगितला आहे. सायणाचार्य “अतीन्द्रियार्थद्रष्टा” असा अर्थ लावतात. यजुर्वेदाचे भाष्यकार उव्वट हे “मन्त्रव्याख्याता” अशी उपमा देतात. मेधातिथी ह्यांनी वेद आणि त्याचा अर्थद्रष्टा दोघांनाही ऋषी मानले आहे.

वेदांच्या प्रत्येक सुक्ताला ऋषी आहेत. काही सुक्तांना तर एकापेक्षा अनेक ऋषी आहेत. मग हे ऋषी म्हणजे नेमके कोण???

गायत्री मंत्र ज्या ऋग्वेदाच्या ३.६४ येथे येतो त्या सुक्ताचे ऋषी विश्वामित्र आहेत. ह्याचा अर्थ विश्वामित्रांनी तो मंत्र स्फुरला असा नाही. कारण काही असे अनेक सुक्त वेदांमध्ये आहेत ज्यांचे एकापेक्षा अनेक ऋषी आहेत. एका सुक्ताला तर सहस्त्र ऋषी आहेत असे सांगितले आहेत. मग त्या सर्वांनी तो मंत्र रचला असे समजायचे का??? त्यामुळे मनुष्यरुपांत ते मंत्रद्रष्टे आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. मग ते नेमके कोण??? ह्याचे प्रमाण खालीलप्रमाणे


अयमेव विश्वामित्र अय जमदग्नि:, इमावेव वसिष्ठकश्यपो, अयमेव वसिष्ठ अयं कश्यप । वागेवात्रिर्वाचा अन्नमद्यते । अत्तिर्हवै नामैतद् यदत्रिरिति ।


अर्थ - इथे दोन कान, दोन नेत्र, दोन नासिका छिद्र, आणि वाणी ह्या सर्वांना गौतम, भरद्वाज, जमदग्नी, वसिष्ठ इत्यादि नावांनी संबोधिले गेले आहे.

पुढचा संदर्भ कण्व ऋषींचा


कण्व इति मेधाविनाम
निघण्टु - ३.१५

अर्थ - कण्व हे नाव मेधाबुद्धिसंपन्न सर्व व्यक्तींच्या साठी आहे.


कण्व ऋषी जरी इतिहासात झाले असले तरी त्यांचा वैदिकऋचांशी काही संबंध नाही. त्यांचे नाव वैदिक ऋचांच्या ऋषीवरून ठेवले गेले आहे हा सिद्धांत इथे मांडण्याचा प्रस्तुत लेखकाचा प्रयत्न आहे.

थोडक्यात ही नावे व्यक्तिवाचक नाहीत. तर ती नित्य नावे आहेत. अनित्य व्यक्तींचा, वस्तुंचा इतिहास वेदांमध्ये नाही.

त्यामुळे वेदांतल्या ऋषी शब्दांवरून एखाद्या व्यक्तीचा बोध घेत असु तर ते चुक आहे.

अर्थात वेदांतील शब्दावरून नंतरच्या काळात इतरांची नावे ठेविली गेलीत हे त्रिवार सत्य आहे.

म्हणजेच वसिष्ठ शब्दांवरून वसिष्ठ ऋषींचे नाव ठेवले गेले. तसेच इतर ऋषींचे ! तेंव्हा आता ऋषी वसिष्ठांनी देहधारणकरून वेदमंत्र द्रष्टेस्वरुपात पाहिले किंवा रचले असे म्हणले तर तेही चुक ठरेल. वेदांतले ऋषी हे व्यक्तिवाचक नावे नसून ते प्राण वगैरे आहेत हे वर स्पष्ट केलं आहेत.

ह्यावरूनच वेदांचे अपौरुषेयत्व सिद्ध होते. कारण वेदांमध्ये इतिहास सिद्धच होऊ शकत नाही. अर्थात वेदांमध्ये इतिहास सिद्ध करण्याचा प्रयत्न काही लोक करतात त्यांनी विशेषकरून ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे.

वेदांतले ऋषींची नावे ही व्यक्तीवाचक नसून ती प्राण, नेत्र वगैरे वाचक आहे.
ह्यांचा संबंध प्रत्यक्ष परमेश्वराशी आहे. कारण वेद ही साक्षात् ईश्वरीय वाणी आहे.

आता देवता शब्दाबद्दल !

वैदिक सिद्धांतामध्ये देवता हा शब्द परमात्मा ह्या अर्थानेच आला आहे. किंवा देव हा शब्द परमात्मा व त्या परमात्म्याच्या विविध शक्ती म्हणजे देवता असा अर्थ आहे. त्यामुळे वेदांमध्ये सुक्तांच्यावर ज्या देवता आहेत त्या प्रत्यक्ष परमेश्वर किंवा त्याच्या शक्ती ह्या अर्थाने आहेत. जसे की इंद्र, अग्नी, मरुत्, मातरिश्वा, ब्रह्म विष्णु, रुद्र वगैरे देवता. ही एकाच परमात्म्याची विभिन्न नामाभिधाने आहेत जसे निम्नलिखित प्रमाण सांगते

ओ३म् इन्द्रं॑ मि॒त्रं वरु॑णम॒ग्निमा॑हु॒रथो॑ दि॒व्यः स सु॑प॒र्णो ग॒रुत्मा॑न् । एकं॒ सद्विप्रा॑ बहु॒धा व॑दन्त्य॒ग्निं य॒मं मा॑त॒रिश्वा॑नमाहुः ॥

ऋग्वेद - १.१६४.४६

अर्थ - इथे अग्नी जो ईश्वराचे प्रकाशरुप आहे, इंद्र जो ईश्वराच्या ऐश्वर्याचे प्रतीक आहे, जो वरुण हा 'वरुणो नाम वर श्रेष्ठ:' असा आहे, प्रकृत्यादि दिव्य पदार्थांमध्ये व्यापून राहिलाय तो दिव्य, ज्याचे उत्तम पालन व कर्म आहेत असा सुपर्णा, ज्याचा आत्मा अर्थात स्वरुप महान आहे, जो वायुसमान बलवान आहे असा मातरिश्वा, जो सर्वांचा मित्र असा इंद्र, अग्नी म्हणजे प्रकाशमान,

स ब्रह्मा स विष्णु: स रुद्रस्स शिवस्सोsक्षरस: परम: स्वराट् ।

स इन्द्रस्स कालाग्निस्स चन्द्रमा: ।

अर्थ - तो सर्व विश्वाला निर्मितो म्हणून ब्रह्म, तो सर्वव्यापक असल्याने विष्णु, तो दुष्टांना दंड देतो म्हणून रुद्र, मंगलमय व सर्वांचा कल्याणकर्ता असल्याने शिव, जो सर्वत्र व्याप्त अविनाशी असा, स्वयं प्रकाशरुप असा विराट् व प्रलयामध्ये सर्वांचा काल असा कालाग्नि असो तो परमेश्वर !


वेदांमध्ये देवता ही संकल्पना प्रामुख्याने अध्यात्मिक अर्थाने आहे. अध्यात्मिक भाग तो आहे की जो एका जीवाच्या आश्रयाने होत असतो. आपल्या शरीरातल्या विविध अवयवांच्या, आत्मा, मन, इंद्रिये, बुद्धी, हे सर्व अध्यात्मिक ह्या नावाने जाणले जातात.


प्राण हाच रुद्र आहे, वक्तृत्व शक्तीच अग्नी आहे, श्वास आणि प्रच्छवास आश्विनीकुमार आहेत, इंद्र मन आहे, पृथ्वी आप तेज आदि वसु आहेत वगैरे वगैरे.

आता आधिभौतिक भावनेने पाहिले तर ह्या समग्र विश्वात असलेली शक्ती की जो परमात्मा ह्या अर्थाने हा शब्द येतो.

तिसरी अधिभौतिक भाग हा ह्या दोघांवर अवलंबून आहे.

थोडक्यात सांगायचे तर ह्या सर्व वैदिक देवता ह्या सूत्रात्मा आहेत व सुक्ष्म रुप आहेत.

जसे अग्नी - भूलोक, वीर्य, प्राण, मन, आत्मा, पुरुष, ब्रह्म, पर्जन्य, आदित्य, समग्र देवतादि

इंद्र - अंतरिक्षलोक, वीर्य, वाक्, प्राण, ह्रदय, मन, आत्मा, सूर्य, समग्र देवतादि

सोम - चंद्रमा, अन्न, रस, प्राण, क्षत्र, रेतस, इत्यादि

देवता ह्या विषयांवर मी स्वतंत्रपणे चिंतन करेन कधीतरी.

व्यासांनी वेदांचे चार विभाग केले असा थोतांड सिद्धांत मांडणार्यांनी तर इथे विशेष लक्ष द्यावे. पुरुषसुक्तांत स्पष्टपणे चारीही वेदांचा उल्लेख आधीच असताना व्यासांनी महाभारतकाली किंवा नंतर किंवा आधी वेदांचे चार विभाग केले असे म्हणणे बालिशपणाचेच नव्हे तर अतिमूर्खतेचे ठरेल.

अर्थात झोपलेल्याला जागे करता येतं पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नव्हे.

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

© तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Monday, 3 April 2017

ब्रह्मचर्याचा अनुपम नि सर्वोकृष्ट आदर्श – पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण


मूर्खस्य पञ्चचिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा !
क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः !
श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर शंका घेणार्या मुर्खांनी आधी आपली लायकी पहावी !!! अर्थात ज्यांची अंतःकरणे आधीच वासनेने बरबटली आहेत त्यांना कावीळ झाल्याप्रमाणे जग पिवळेच दिसणार. पुराणांतल्या काही विकृत कथांनीही ह्यात भर घातलेलीच आहे म्हणा ! पण ज्यांनी आयुष्यात कधीच महाभारत वाचले नाही त्यांचासाठी हा लेखनप्रपंच !!!

श्रीकृष्णाच्या ब्रह्मचर्याचा आदर्श !!!
महाभारताच्या जितक्या प्रती आज उपलब्ध आहेत त्यापैकी १९६६ ह्या वर्षी आदरणीय राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या करकमलांनी प्रकाशित झालेली भांडारकर इथली सुखटणकर, बेलवलकर आदि विद्वानांनी संपादित केलेली चिकीत्सक अशी संशोधित प्रत आज सर्वमान्य आहे. सुदैवाने ही प्रत आज आंतरजालावर उपलब्धही आहे. जिज्ञासूंनी इथे ती अभ्यासावी http://sanskritdocuments.org/…/mahabh…/mahabharata-bori.html
श्रीकृष्णाच्या रासलीला वगैरे कथांनी भ्रमित होऊन अनेक लोक त्यांच्या चरित्रावर आक्षेप घेऊन मोकळे होतात. आणि स्वतःला अभ्यासक म्हणविणारेही केवळ पुराणांवर विश्वास ठेऊन श्रीकृष्ण चरित्राचे अध्ययन करतात. वास्तविक पाहता कृष्णचरित्राच्या अध्ययनात महाभारताचा अभ्यास केवळ आवश्यकच नाही तर अपरिहार्यही आहे. श्रीमद्भागवतामध्ये रासक्रीडेच्या प्रसंगातच त्यांना “साक्षातमन्मथमन्मथः” असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात कामविकाराचा लवलेशही असणे भागवतानुसार तर संभवत नाही. पण आता महाभारतानुसार पहायचे म्हटले तर सौप्तिक पर्वाततरी श्रीकृष्णाचे ब्रह्मचर्य त्यांच्याच मुखातून स्पष्टपणे सिद्ध झाले आहे. तो पूर्ण प्रसंग खालीलप्रमाणे
अश्वत्थाम्याने पांडववधाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर त्याचे ब्रह्मशिरास्त्र पांडवांचा शेवटचा गर्भ असा उत्तरेचा त्याच्यावर ते सोडले. त्याआधी श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याचा हा अविचार पाहून युधिष्ठिराला भीमाचे संरक्षण करण्यांस सांगितले. त्यावेळी श्रीकृष्णांनी युधिष्ठीराला अश्वत्थाम्याने मला एकदा माझे सुदर्शन चक्र मागितल्याची कथा सांगितली. आपले ब्रह्मशिरास्त्र श्रीकृष्णांनी घेऊन त्यांचे सुदर्शन आपल्यांस द्यावे अशी गळ त्याने घातली पण त्याला ते जागचे हलविताही येईना. तेंव्हा श्रीकृष्णांनी त्याला उत्तर देताना म्हटले की
“अरे माझ्या प्रिय अशा गांडीवधरी अर्जुनाने देखील कधी मला ते मागितले नाही.”
पुढे आपल्या नैष्ठिक ब्रह्मचार्याचे उदाहरण देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात
ब्रह्मचर्यं महद्घोरं चीर्त्वा द्वादशवार्षिकम् |
हिमवत्पार्श्वमभ्येत्य यो मया तपसार्चितः ||२९||
समानव्रतचारिण्यां रुक्मिण्यां योऽन्वजायत |
सनत्कुमारस्तेजस्वी प्रद्युम्नो नाम मे सुतः ||३०||
महाभारत – सौप्तिक पर्व – अध्याय १२
अर्थ - विवाहानंतर हिमालयात जाऊन द्वादश वर्षे मी घोर असे ब्रह्मचर्याचे तप करून आणि माझ्या बरोबर माझ्या पत्नीने म्हणजे रुख्मिणीने देखील तसेच समान ब्रह्मचर्य व्रत आचरून आम्हा दोघांस ह्या तपःसामर्थ्याने सनत्कुमारांसारखा तेजस्वी असा प्रद्युम्न नामक पुत्र प्राप्त झाला.
अशा प्रद्युम्नाने देखील मला कधी माझे सुदर्शन मागितले नाही ? आणि तु मागतो आहेस ???"""
थोडक्यात विवाहानंतरही जे भगवान द्वादश वर्षे पत्नीसह ब्रह्मचर्याचे अतिघोर आणि उत्कृष्ट पालन करतात, त्या श्रीकृष्णासारख्या चारित्र्यसंपन्न पुरुषांवर स्त्रीलंपटपणाचा आरोप करणारे लोक काय लायकीचे आहेत हे आपण सर्व सुज्ञ आता निश्चितच जाणते व्हाल ! सांप्रतकाली विवाहाच्या आधीही ब्रह्मचर्य पालन करण्याची कल्पनाही न करणारे लोक स्वतः किती लायकीचे आहेत ह्याचा विचार करतील का ??? आचरण तर दूरच राहिले!!!

अश्वमेधिक पर्वातले श्रीकृष्णांचे आणखी एक ब्रह्मचर्याचे उदाहरण
अश्वत्थाम्याने ते ब्रह्मशिरास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडले तेंव्हा जन्माला येणारे मुल जे पुढे परीक्षित नावाने ओळखले गेले ते मृत म्हणूनच जन्माला आले ! तेंव्हा पांडवांचा हा वंश खुंटणार की काय ह्या भीतीने सर्व पांडवपक्षातल्या स्त्रिया विलाप करित असताना द्रौपदी मात्र श्रीकृष्णांच्या आगमनाची वाट पाहत बसली. भगवान तिथे येताच ती त्यांस म्हणाली
“यादवश्रेष्ठ कृष्णा, तु दिलेले वचन पूर्ण करशील ना? तु पराक्रमी, धर्मवेत्ता सत्यप्रतिज्ञ आहेस. त्रिभुवन सारे मृत झाले तरी त्याला जीवित करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. मग भाच्याच्या मुलाला जीवित करण्याचे तुला काय कठीण आहे? तुझे सामर्थ्य ज्ञात असल्यानेच तुझ्यापुढे हे हात जोडून मी मागणे मागत आहे.”
पुढे उत्तरेनेही श्रीकृष्णांची करुणा भाकल्यावर त्यांनी तिला अभय देताना म्हटले.
न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेतद्भविष्यति |
एष सञ्जीवयाम्येनं पश्यतां सर्वदेहिनाम् ||१८||
नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन |
न च युद्धे परावृत्तस्तथा सञ्जीवतामयम् ||१९||
यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ |
तथा मृतः शिशुरयं जीवतामभिमन्युजः ||२२||
महाभारत भांडारकर प्रत – अश्वमेधिक पर्व - अध्याय ६८
अर्थ - “उत्तरे, माझे भाषण अन्यथा कधी होणार नाही; ते सत्यच होईल... मी आजवर कधी थट्टेनेही असत्य भाषण केले नाही, ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन केले आहे, कधी युद्धांत पाठ दाखविली नाही. तरी त्या पुण्याने हा बालक जीवित होवो ! सत्य आणि धर्म जर माझ्या ठायीं असतील तर हा अभिमन्यूपुत्र जीवित होवो !!!”
इथे ब्रह्मचर्य व्रताचे पालन आणि सत्यनिष्ठा हे शब्द सर्व काही सूचित करणारे आहेत. त्यामुळे आणखी काही पुरावे द्यायची आवश्यकता मला तरी वाटत नाही ! वाचक सुज्ञ आहेत !!!


आता ब्रह्मचर्य म्हणजे काय ???
माझ्या हनुमान जयंतीच्या लेखातही मी ब्रह्मचर्य ही संकल्पना स्पष्ट अर्थासहित शब्दबद्ध केली आहे. पुनश्च एकदा स्पष्ट करतो. ब्रह्मचर्य हे दोन प्रकारचे असते
१. उपकुर्वाण ब्रह्मचर्य – आजीवन अखंड ब्रम्हचारी राहणे आणि अष्ट म्हणजे आठ प्रकारच्या मैथूनांपासून सदैव दूर राहून आपले चित्त सदैव सत्कर्मात आणि सद्विचारात मग्न ठेवणे. आता जे आठ प्रकारचे मैथुन कोणते?
 अष्टप्रकार मैथुन-(दक्षस्मृति अ० ७ श्लोणक ३१-३२ ।)
‘श्रवणं स्मरणं चैव दर्शनं भाषणं तथा ।
गुह्यवार्ता हास्यरती स्पर्शनं चाष्टमैथुनम्’ ॥

२. गार्हस्थ्य ब्रह्मचर्य – विवाह करून देखील केवळ स्वस्त्रीशीच व तेही केवळ रतीकाल प्राप्त झाल्यावर केवळ दोन रात्रीच रत होणे. केवळ दोन रात्री कोणत्या ह्यांचे सविस्तर वर्णन महाभारतातच भीष्माचार्यांच्या मुखातून धर्मराज युधिष्ठीर ह्यांनी श्रवण केले आहेत जे शांतिपर्वात आहे ! जिज्ञासूंनी ते वाचावे किंवा मनुस्मृती वाचावी किंवा महर्षी दयानंदांचा ‘संस्कार विधी: हा ग्रंथ वाचावा ही नम्रतेची विनंती !!!

हा ब्रह्मचर्याचा तसाही वरवरचा अर्थ आहे ! मुल अर्थ फार व्यापक आहे. पण विस्तारभयास्तव इथे देत नाही.
आपल्या सभोवतालची जनावरे देखील केवळ रतीकालातच स्त्रीगमन करतात आणि आम्ही मनुष्य मात्र??? बोलायलाच नको !!! 


मग आता पुराणांतल्या कथांचे काय ???
मी वरच सांगितले आहे की मला महाभारत प्रमाण आहे, पुराणे नाहीत ! ह्याचा अर्थ आम्ही पुराणे पूर्णतःच नाकारतो असे नसून ती जितकी उपरोक्त महाभारत वचनांस अनुकूल आहेत तितकीच स्वीकारतो !!! तरीही ज्यांना पुराणातल्या कथांवरून श्रीकृष्ण चंद्रांवर आक्षेप घ्यायचे आहेत त्यांनी पुराणांत वर्णिलेल्या त्यांच्या चमत्काराच्या सर्वच कथा मान्य करायला हव्यात ! अन्यथा केवळ आपल्याया सोयीचे तेवढे उचलणे ही पुरोगामी हिंदुद्वेष्टी आणि शी-क्युलर उचलेगिरी थांबवावी !!! एवढे सांगणे पुरेसे आहे!!!

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्येषु !!!
© तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Monday, 6 February 2017

धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची हत्या - आक्षेप नि खंडण



"इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे. इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे आणि इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे."
प्राचार्य शिवाजीराव भोसले

सध्या महाराष्ट्रात जातीय अस्मिता जन्मांस घालून त्यांस खतपाणी घालण्याचे काम हेतुपुरस्सर केलं जातंय. त्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण करून हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा एक बालिश प्रयत्न सुरु आहे. आपल्या समाजाची जी श्रद्धास्थाने असतात त्यांविषयी मनांत संभ्रम निर्माण करणे हा देखील त्यातलाच एक प्रकार ! असंच एक उदाहरण म्हणजे धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची फाल्गुन वद्य अमावस्येला औरंगजेबाने केलेली निर्घृण हत्या, जिचा संबंध अकारण गुढीपाडव्यासारख्या मंगलमय सणाशी जोडला जाऊन समाजात बुद्धिभेद करण्याचा व जातीवाद पसरविण्याचा प्रयत्न केला जातोय ! त्यास आम्ही दिलेले हे प्रत्युत्तर !!!

मुख्य आक्षेप व आरोप

म्हणे शंभुराजेंची हत्या ही मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांनी फाल्गुन वद्य अमावस्येला केली किॅवा ती औरंग्यास करायला सांगितली व त्याचदिवशी त्यांचं शीर हे ब्राह्नणांनी नाचविलं व त्याच्या दुसर्या दिवसापासून ब्राह्मणांनी तो चैत्र पाडव्याचा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला व आनंदाप्रीत्यर्थ शंभुराजेंच्या शीराचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या व तेंव्हापासून महाराष्ट्रात गुढी पाडवा सुरु झाला. थोडक्यात आजची गुढी उभारायची पद्धत व प्रथा हा शंभुराजेंच्या हत्येशी संबंधित आहे असं ह्या आक्षेपकांचं म्हणणं आहे.

किती नालायकपणाचा कळस आहे पहा ! खरंतर ह्या आरोपांत तथ्य काहीच नसून केवळ निराधार असे हेतुपुरस्सर व तर्कदुष्टपणाने केलेली बालिश विधाने आहेत ! असो !!!

आता गुढी पाडव्याचा इतिहास पाहुयात

गुढी उभारल्याचा उल्लेख आपणांस रामायणात मिळतो हे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे त्याची प्राचीनता आपल्या लक्षात येते.

गुढी शब्दाचा अर्थ

काठी पूजा

काठी पूजा आणि देवक-स्तंभ परंपरा मानवी इतिहासातील प्राचीनतम परंपरांपैकी आहेत. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा तृतीय खंडाचा पृष्ठ क्रमांक ९९८ चा आधार घेतला तर "गुढ्या घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें - प्रला १९" असे उदाहरण येते. यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे चा (अथवा चा ) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते. तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेंसस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.

शिशुपाल वधामध्ये गुढीचा उल्लेख सापडतो तो असा

तैवे आत्मा उभितावे गुढी ! रोमांचमिषे !

गुढी का शब्द कौल देणे ह्या अर्थाने पण आहे. जसे देवाला काही प्रश्न विचारायचे झाल्यांस कौल मागणे त्यावेळी गुढी उजवी दिली की डावी दिली असाही संदर्भ आहे.

महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ

. . १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (..१२७५१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय , आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं दोषांचीं लिहिलीं फाडीं सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवीं ५० " ; "ऐकें संन्यासी आणि योगी ऐसी एक्यवाक्यतेची जगीं गुढी उभविली अनेगीं शास्त्रांतरी ५२ "; "माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगें गुढी येरु जीवीं म्हणे सांडीं गोठी यिया ४१० " असे उल्लेख येतात. संत नामदेव (.. १२७० - जुलै , .. १३५०) संत जनाबाई (निर्वाण .. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - .. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३१५९९) धार्मीक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात. आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यासते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्यूनिकेशन टूल) असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणार्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे.

जगद्गुरु तुकोबारायही त्यांच्या अभंगांच्या गाथेत गुढीचे उल्लेख करतात.

तुकारामांची गाथा
अभंग क्र. ३५८३
पाठवाल तेथें गर्जेन पवाडे कायाअ देहाकडे नावलोकीं॥1
ह्मणउनि मागें कंठींचा सौरस पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.
कृपेच्या कटाक्षें निभें किळकाळा येतां येत बळाशीपुढें ॥२॥ तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें जगा होइल सोपें नाम तुझें 3
अभंग क्र. ४५२९
आस निरसली गोविंदाचे भेटी संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥
हाका आरोिळया देउनि नाचती एक सादाविती हरि आले ॥३॥
आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा रूप वेळोवेळां आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥
आधीं चुकी मग घडे आठवण तुका ह्मणे जन परिचयें ॥७॥

संत नामदेवरायांचे गुढीचे अभंग

श्रीराममाहात्म्य - रामजन्म :
फोडा फोडारे भांडारें आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥
उभवा उभवारे गुढी सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥
झाडोनियां टाका खडे घाला केशराचे सडे ॥७॥
नामा ह्मणे भूमंडळा स्वामि माझा पहा डोळा ॥८॥

संत जनाबाईंचे गुढीचे अभंग
संत जनाबाई (निर्वाण:.. १३५०)

ऋषि अभिषेकिती रायाला थोर मनीं आनंदाला ॥७॥
राया प्राप्ती जाला पट गुडी उभवी वसिष् ॥८॥ येथुनी हरिश्चंद्र आख्यान नामयाची जनी म्हण ॥९॥

आणखीही अनेक संतांचे अनेक उल्लेख देता येतील पण विस्तारभयास्तव देत नाही. थोडक्यात संतवांग्मयात हे गुढी उभारल्याचे उल्लेख शंभुराजेंच्या मृत्युच्या शेकडो वर्षे आधीचे आहेत हे स्पष्ट असल्याने गुढी ब्राह्णणांनी शंभुराजेंना मारल्यानंतर उभारली हा आरोप किती तथ्यहीन आहे हे कळते.



दुसर्या आक्षेपाचं खंडण

शंभुराजेंची हत्या मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांनी केली आहे काय ???

उत्तर - धादांत खोटं!

 तुमच्या पढतमूर्खतेची कीव वाटते.
खरंतर मनुस्मृतीचं अध्ययन हा वेगळा विषय असल्याने प्रस्तुत लेखाविषयासंदर्भात एकच सांगु इच्छितो की, शंभुराजेंनी स्वत: त्यांच्या बुधभूषणम् ग्रंथांमध्ये मनस्मृतीतले बावीस श्लोक आहे तसे घेतलेले आहेत, म्हणजे आजच्या भाषेत काॅपी केले आहेत. आहे तसे !!!

ह्याच मनुस्मृतीतले बावीस श्लोक नक्की कोणते हे अभ्यासण्यासाठी जिज्ञासुंसाठी खालील माहिती उपयुक्त ठरेल.

बुधभूषणमच्या दुसर्या अध्यायात शंभुराजेंनी मनुस्मृतीतले खालील श्लोक आहे तसे घेतलेले आहेत. ह्यात प्रथम बुधभूषणममधले श्लोक व नंतर त्याची मनुस्मृतीतली अध्याय व श्लोक संख्या असा माहितीपूर्ण संदर्भ दिला आहे.

श्लोक क्रमांक         मनुस्मृती अध्याय व श्लोक क्रमांक

४१-४२                        ७(६१-६२)
५६९                           ७(८९)
६२८                           ७(१११)
६३०                           ७(११५)
४६५                           ८(३१०)
४६६-४६७                    ८(१२४-१२५)
४६८                            ८(३७९)
४७९                            ८(३३५)
४८३-४८५                      ७(३-५)
२२२                              ७(११६)
२४४-२४७                      ७(१५१-१५४)
२४३                              ७(१४७)
१११                              ७(७४)
११४                              ७(७०)
११७                              ७(७६)


थोडक्यात हे वरील बावीस श्लोक स्वत: शंभुराजेनी स्वत: मनुस्मृतीतून आपल्या बुधभूषणम ग्रंथात आहे तसे घेतले आहेत, हे दोन्ही ग्रंथांची तुलना केल्यावर आपल्या सहज लक्षात येते.
जिज्ञासूंनी अधिक अभ्यासासाठी ह्या दोन्ही ग्रंथांच्या मुळ संस्कृत संहितेचं तुलनात्मक अध्ययन करावे किॅवा डाॅ. गोविॅदराव कदम लिखित बुधभूषणम् भाष्य अभ्यासावे किॅवा डाॅ. वेलणकरांनी संपादित केलेली बुधभूषणम् ची पहिली आवृत्ती अभ्यासावी म्हणजे आमच्या पुराव्यांचा संदर्भ लक्षात येईल. वस्तुत: आम्ही स्वत: दोन्ही ग्रंथ मुळातून अभ्यासले आहेतच हेही सूज्ञांस सांगणे न लगे !


आता मनुस्मृतीनुसार हत्या केलीय काय????

असा आरोप करणारे एकही जण त्यातल्या एकाही श्लोकाचा साधा पुसटसा संदर्भही देत नाहीत. जो काही तथ्यहीन आरोप लावला जातो तो असा की ब्राह्मणेतरांना संस्कृतचा अधिकार नसल्यामुळे व शंभुराजेंनी संस्कृतमधूनच ग्रंथरचना केल्यामुळे ब्राह्नणांनी त्यांची मनुस्मृतीनुसार हत्या केली.
वस्तुत हे धादांत खोटं आहे खालील पुराव्यावरून कळेल.

गागाभट्टांनी आपला संस्कृत ग्रंथ शंभुराजेंनाच अर्पण केलाय

गागाभट्टांनी शके १६०२ म्हणजे इ. स. १६८० साली त्यांचा "समयनय" हा ज्योतिषशास्त्रपर व धर्मशास्त्रपर ग्रंथ साक्षात् श्रीशंभुराजेंनाच अर्पण केलाय. त्यात ते लिहितात

दिनकरतनयेन तेन गागाभिधविबूधेन् निरीक्ष्य सन्निबन्धान् !
रघुवरकृपयाsमुना निबद्ध: समयनय: सुखमेतु शंभुराज: !२६७!

"दिनकराचा पुत्र असणार्या बुद्धिमान अशा गागाभट्टांनी इतर ग्रंथांचं अवलोकन करून श्रीरामचंद्राच्या कृपेने समयनय हा ग्रंथ रचला.
त्याने श्रीशंभुराजे आनंदी होवोत !"


पण त्याआधी एक साधा प्रश्न

औरंगजेब कुराणाचे ऐकेल की मनुस्मृतीचे???
तो काय हिॅदु होता का की त्याने ब्राह्मणांचे ऐकुन शंभुराजेंची हत्या करावी???
जो औरंग्या कट्टर सून्नी मुसलमान होता, ज्याने आपल्या सख्ख्या भावांना व बापालाही मारलं, तो ब्राह्मणांचे कशावरून ऐकेल???
उलट ब्राह्मण हे तर त्याचे एक नंबरचे शत्रु कारण ते हिॅदु! मग तो त्यांचं कसं काय ऐकेल???

पण आक्षेपकांना केवळ विषच पसरवायचं आहे, त्यामुळे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे तंत्र आहे !!! असो !!!

शंभुराजेंची हत्या ही कुराणानुसारच झाली आहे. हे घ्या पुरावे !

ज्यांनी आयुष्यात एकदा तरी कुराणाचा अभ्यास केला असेल, त्यांना कुराणात काफीरांसाठी अर्थात हिॅदुंसाठी काय शिक्षा आहेत हे लक्षात येईल तरीही जिज्ञासुंसाठी आम्ही खालील संदर्भ देतो !


औरंगजेबाने भीमा कोरेगावच्या छावणीमध्ये त्यांना हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांचा प्राण गेल्यावरही मुसलमान सरदारांनी त्यांचा देह छिन्नविच्छिन्न करून विटंबना केली व आपली इस्लामी क्रूरता दाखवली आणि ही क्रूरता दाखविण्याचे मूळ मनुस्मृतीमध्ये नव्हे तर कुराणामध्ये दडलेले आहे. कारगिलच्या युद्धानंतर आपल्या भारतीय सैन्याची विटंबना पाकड्यांनी कशी करून पाठविली होती, हे सर्वांस माहिती आहे.

शेवटी औरंगजेब हा सतत कुराणाचे पठण करणारा कट्टर मुसलमान होता. संभाजीराजांची हत्या ही कुराणाच्या खालील आज्ञांप्रमाणे झाली.

१)
ﻭَﻗَﺎﺗِﻠُﻮﻫُﻢْ ﺣَﺘَّﻰٰ ﻟَﺎ ﺗَﻜُﻮﻥَ ﻓِﺘْﻨَﺔٌ ﻭَﻳَﻜُﻮﻥَ
ﺍﻟﺪِّﻳﻦُ ﻟِﻠَّﻪِ ۖ ﻓَﺈِﻥِ ﺍﻧْﺘَﻬَﻮْﺍ ﻓَﻠَﺎ ﻋُﺪْﻭَﺍﻥَ ﺇِﻟَّﺎ ﻋَﻠَﻰ
ﺍﻟﻈَّﺎﻟِﻤِﻴﻦ
َ
Fight against them until there is no
more disorder and Allah's supremacy is established. If they
desist, let there be no hostility except against the oppressors.

उनके खिलाफ (गैर मुस्लीम, मूर्तिपूजक, हिंदू) तब तक लडते रहो जब तक मूर्तीपूजा खत्म न हो जाये और अल्लाह का मजहब सबपर हावी न हो जाये|
(सुरा २, अल -बकरा, आयात १९३)

२)
ﻓَﺈِﺫَﺍ ﺍﻧْﺴَﻠَﺦَ ﺍﻟْﺄَﺷْﻬُﺮُ ﺍﻟْﺤُﺮُﻡُ ﻓَﺎﻗْﺘُﻠُﻮﺍ ﺍﻟْﻤُﺸْﺮِﻛِﻴﻦَ ﺣَﻴْﺚُ ﻭَﺟَﺪْﺗُﻤُﻮﻫُﻢْ ﻭَﺧُﺬُﻭﻫُﻢْ
ﻭَﺍﺣْﺼُﺮُﻭﻫُﻢْ ﻭَﺍﻗْﻌُﺪُﻭﺍ ﻟَﻬُﻢْ ﻛُﻞَّ ﻣَﺮْﺻَﺪٍ ۚ ﻓَﺈِﻥْ ﺗَﺎﺑُﻮﺍ ﻭَﺃَﻗَﺎﻣُﻮﺍ ﺍﻟﺼَّﻠَﺎﺓَ ﻭَﺁﺗَﻮُﺍ ﺍﻟﺰَّﻛَﺎﺓَ ﻓَﺨَﻠُّﻮﺍ ﺳَﺒِﻴﻠَﻬُﻢْ ۚ ﺇِﻥَّ ﺍﻟﻠَّﻪَ ﻏَﻔُﻮﺭٌ ﺭَﺣِﻴﻢ
ٌ
Then, when the sacred months have
passed, slay the idolaters wherever
ye find them, and take them (captive), and besiege them, and
prepare for them each ambush. But if they repent and establish
worship and pay the poor due, then
leave their way free. Lo! Allah is Forgiving, Merciful.

पवित्र महिनो के खत्म होने के बाद मुर्तीपुजको को जहां कही वे मिले कत्ल करो, उन्हे
गिरफ्तार करो, उनकी घेराबंदी करो|
(सुरा ९, अल-तौबा, आयात ५)

३)
ﻭَﺇِﻥْ ﻧَﻜَﺜُﻮﺍ ﺃَﻳْﻤَﺎﻧَﻬُﻢْ ﻣِﻦْ ﺑَﻌْﺪِ ﻋَﻬْﺪِﻫِﻢْ
ﻭَﻃَﻌَﻨُﻮﺍ ﻓِﻲ ﺩِﻳﻨِﻜُﻢْ ﻓَﻘَﺎﺗِﻠُﻮﺍ ﺃَﺋِﻤَّﺔَ ﺍﻟْﻜُﻔْﺮِ ۙ
ﺇِﻧَّﻬُﻢْ ﻟَﺎ ﺃَﻳْﻤَﺎﻥَ ﻟَﻬُﻢْ ﻟَﻌَﻠَّﻬُﻢْ ﻳَﻨْﺘَﻬُﻮﻥ
َ
And if they break their pledges after their treaty (hath been made
with you) and assail your religion, then fight the heads of disbelief Lo!
they have no binding oaths in order
that they may desist.

उनका (मुर्तीपुजको) अंग काटो, सर धड से अलग कर दो! याह हत्याकांड तब तक चलना चाहिये, जब तक अंतिम काफिर खत्म न हो जाये|
(सुरा ९, अल-तौबा, आयात १२)

Surah 8: ayat 12
I shall cast terror into the hearts of the infidels.  Strike off their heads, maim them in every limb

मी श्रद्धाहीनांमध्ये (काफीरांमध्ये) दहशत पैदा करेन व त्यांचे शीर कलम करेन व त्यांचे सर्व अवयव पंगु करेन !
1.
2. 
Surah 69: ayats 30-33
We shall say, Lay hold of him and bind him.  Bum him in the fire of Hell, then fasten him with a chain seventy cubits long.  For he did not believe in Allah, the Most High.

3.
4. 
आम्ही तर त्यांना (श्रद्धाहीनांना) पकडायला सांगतो व बांधायला सांगतो ! त्यांना नरकाग्नीत जळूद्या, नंतर त्यांना सत्तर घनफुट लांब अशा साखळीने बांधून टाकू ! कारण त्यांनी आल्लाह, जो सर्वोत्तम आहे, त्याच्याशी द्रोह केला !

5. 
असे अनेक पुरावे कुराणातले देता येतील.

6. 
वरील आयतींत शीर कलम करा व अवयव पंगु करा अशी स्पष्ट आज्ञा आहे. तेंव्हा हत्या ही कुराणानुसारच हे स्पष्ट आहे.

7.
8. 
आता तत्कालीन मुसलमानी संदर्भ काय म्हणताहेत ते पाहुयात !


ह्या तत्कालीन संदर्भात आम्ही औरंग्याचे म्हणजेच त्याच्या तत्कालीन मुसलमान सरदारांचेच व इतिहासकारांचेच संदर्भ देणार आहोत.
ह्यात काही हिॅदु इतिहासकारांचाही संदर्भ देणार आहोत.

१. मासिर इ आलमगिरी - लेखक साकी मुस्तैदखान!  हा मोंगलाच्या सेवेत मुश्रीफ अर्थात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने ह्या ग्रंथात शंभुराजेंची कैद, धिॅड, हत्या ह्या गोष्टी सविस्तर लिहिल्या आहेत, ज्या पुराव्याच्या दृष्टीने अतिशय अभ्यसनीय आहेत. मुळ फार्सी ग्रंथांचा आंग्ल अनुवाद जदुनाथ सरकार व मराठी अनुवाद ग ह खरेंनी व सेतुमाधवराव पगडींनी ह्याचा अनुवाद "औरंगजेब व मराठे" ह्या ग्रंथात मराठीत केला आहे.


२. ऐतिहासिक फारसी साहित्य खंड सहावा - औरंग्याच्या राज्यकारभाराची पत्रे जी मराठीत महाराष्ट्र राज्य साहित्य नि सांस्कृतिक महामंडळाने "मोंगल दरबारची बातमीपत्रे" म्हणुन प्रसिद्ध केली आहेत.

३. फतुआते आलमगिरी - मुळ फार्सी ईश्वरदास नागर नावाच्या लेखकाने केलेला ग्रंथ. मराठी अनुवाद सेतुमाधवराव पगडी !

३. तारीखे दिलकुशा - इ स १६८५ ते १७०९ ह्या काळातील घटनांच्या आठवणी भीमसेन सक्सेना नावाच्या मोंगल सरदाराने लिहिलेला ग्रंथ. मराठी अनुवाद सेतुमाधवराव पगडी !

४. मुन्तखबुललएबाबए महंमदशाही  - मुळ फार्सी लेखक खाफीखान मराठी अनुवाद सेतुमाधवराव पगडी मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध ह्या ग्रंथात

हे सगळे मोंगल व फार्सी ग्रंथच आहेत ह्याच्या अनुसारच आपण आता शंभुराजेंची कैद व त्यांची धिॅड व त्यांचे अनन्वित हाल व शेवटी मृत्यु हे सर्व अभ्यासणार आहोत.

शंभुराजेंची कैद

मुकर्रबखानाने संगमेश्वरी शंभुराजेंस व कवी कलशांस पकडिले दिनांक ३ फेब्रुवारी, १६८९ !

मातबरखानाचे पत्र फेब्रुवारी, १६८९
"आल्लाहच्या कृपेने त्या मुकर्रबखानाने संगमेश्वरांस पोहोचून दुष्ट संभाजीस जिवंत पकडले आहे"

इथे दुष्ट हा शब्द त्यांचा म्हणजे मातबरखानाचा आहे, माझा नाहीये!

जेधे शकावलीतीली नोंद - विभव नाम संवछरे शके १६१० माघ वद्य ७ शुक्रवारी

बादशहांस बातमी

औरंग्या त्यावेळी अकलुज येथे होता. त्याला ती बातमी कळताच त्याने आपला मुक्काम हलवण्याची व कैद्यांना बहादुरगडावर आणायची आज्ञा केली. १५ फेब्रुवारी, १६८९ ला औरंग्या अकलुजहून बहादुरगडास पोहोचला.

बादशहाच्या आज्ञेप्रमाणे शंभूराजांना बहादूरगड येथे आणण्यात आले. शंभूराजांसोबत कवी कलश आणि इतर अनेकांना अटक करुन साखळदंडाने बांधले होते. हा सर्व लवाजमा १५ फेब्रुवारी १६८९ रोजी औरंगजेबाच्या छावणीत पोहोचला .
शंभूराजांच्या अंगावरील राजवस्त्रे उतरवून त्यांना इराणात गुन्हेगारांच्या अंगावर घालतात, तसा विदुषकी अंगरखा व लाकडी उंच टोपी (तख्ताकुलाह) चढवून इतरांनाही तसाच पोशाख चढवून सर्वाँची धिँड छावणीच्या परिसरात ११ मैलपर्यँत काढण्यात आली. शंभूराजांना उंटावर उलटे बसविण्यात आले आणि पुढे ढोल, कर्णे वाजवीत, लष्करातून मिरवीत नंतर औरंग्याच्या दरबारात आणण्यात आले.

संदर्भ - मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अर्थात मासिरे ए आलमगिरी लेखक साकी मुस्तैदखान


शंभुराजेंची अपमानास्पद धिॅड औरंग्याच्या आदेशानुसारच काढलेली होती

शंभुराजेंना आसनरहित अशा उंटावर बसविण्यात आले व दोराने घट्ट बांधले व त्यांच्या तख्ताकुलाहला घुंगरं खुळखुळे बांधण्यात आले व कर्णे, शिॅगे व ढोल वाजवत धिॅड काढण्यात आली.
 छावणीतल्या मुसलमानांना तो दिवस ईदच्या सणासारखा वाटला. शंभूराजांची अशी घोर विटंबना करण्यात आली. वाटेत कुणी उंटाला टोची, कुणी दगड मारी, तर कुणी शंभूराजांना अपशब्द ऐकवीत.

साकी मुस्तैदखान ह्या दृश्यांस मनोरंजन म्हणतो तर खाफीखान विजयसूचक व नगार्यांचा सुचक
म्हणतो.


अखेर दोन्ही कैद्यांना दरबारात आणले गेले .

 त्यांना पाहताच औरंगजेब तख्तावरुन खाली उतरला, अल्लाच्या कृपेनेच हा विजय आपल्याला लाभला या कृतज्ञभावनेने औरंग्याने बिछायतीच्या खाली येऊन जमिनीवर डोके टेकून अल्लाचे आभार मानू लागला .

 'मसिरे ए आलमगिरी'चा लेखक साकी मुस्तैदखान त्यावेळी तिथे उपस्थित होता. हा प्रसंग पाहून त्याने पुढील काव्यपंक्ती औरंग्याबद्दल लिहिल्या....

 "कुलाह गोशा बर आसमाने बरीन,
 हनूज अज तवाजो सरश बर जमीन"

 त्याचा अर्थ असा-
 ज्याच्या मुकुटाचे टोक आकाशापर्यंत पोहचले आहे. पण त्याचे मस्तक मात्र परमेश्वराच्या आराधनेत जमिनीवर टेकले आहे असा औरंग्या

 हे पाहताच शंभूराजे आणि कवी कलश यांनी एकमेकांकडे पाहिले. त्या जखडलेल्या स्थितीत शीघ्रकवी कवी कलश याने या प्रसंगी एक कवन रचून शंभूराजांच्या चरणी अर्पण केले .

 " यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग ।
 लहू लसत सिँदूरसम खुब खेल्यो रनरंग ॥
 जो रवि छवि लछत ही खद्योत होत बजरंग ।
 त्यो तुव तेज निहारी ते तख्त तज्यो अवरंग ॥

 अर्थ-
 ( रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते, त्याप्रमाणे शंभूराजास औरंगजेबासमोर बांधून उपस्थित करण्यात आले आहे. हनुमंताच्या अंगाला शेँदूर शोभून दिसतो तसे घनघोर युध्दामध्ये रक्ताने अंग माखल्याने,  हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सुर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिँहासनाचा त्याग केला आहे . )

औरंग्यापुढे उभे करण्यात आल्यानंतर इखलासखानाने मुजरा करण्यात सांगूनही शंभूराजांनी यत्किंचितही मान लवविली नाही . उलट संतप्त नजरेने औरंग्याकडे पहात होते . संतापलेल्या औरंग्याने त्यांना कैदेत टाकण्याचा हुकूम दिला .

 हालअपेष्टानंतरही शंभुराजेंचे ते अलौकिक रुप पाहून तो औरंग्या सिॅहासनावरून खाली उतरला व त्याने आमच्या धाकल्या धनींचे हे अलौकिक रुप पाहून त्यांना ताजीम दिली !

तेंव्हा त्या मृत्यु समोर असलेल्या अवस्थेतही कवी कलशांस वरील ओळी सुचल्या

त्या ऐकुन आमचे शंभुराजे सुद्धा आनंदित झाले असतील व म्हणाले असतील

"वाह, कविराज वाह ! काय तुमची प्रतिभा !

समोर मृत्य असूनही मराठे कधी झुकले नाहीत !

काय म्हणावं ह्या असीमित शौर्याला, त्यागाला नि पराक्रमाला !!!

मृत्यु समोर असूनही त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटताहेत ! ह्यालाच मराठ्यांचे तेज म्हणतात !!!

हा आहे आमचा पराक्रम व परमोज्वल इतिहास !!!

शंभुराजेंच्या स्वत:च्याच शब्दांत सांगायचं झालं तर

जीवितम् मृतकम् मन्ये देहिनां धर्मवर्जितं।
मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी भविष्यति।।
~धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज..
बुधभूषणम अध्याय २ श्लोक ६११

अर्थ~धर्म सोडलेल्या माणसाचे शरीर जिवंत असून मृतवत् मानावे तर धर्मासह मृत्यु पत्करणारा मृत्यु होउनही चिरंजीव होतो !

 दोन दिवसांनी औरंग्याने रहुल्लाखानामार्फत शंभूराजांना दोन प्रश्न विचारण्यात आले . ' तुझे खजिने , जडजवाहिर कोठे आहे ? बादशाही सरदारांपैकी कोणी कोणी तुझ्याशी संपर्क ठेवला होता ?' शंभूराजांनी या प्रश्नांना उत्तर न देता औरंग्याला शिवागीळ केली .
 औरंग्याला हे कळताच तो संतापला , त्याने आज्ञा केली की , 'यांचे डोळे फोडा , जीभ कापून टाका '

 डोळे फोडा व जीभ कापा ही आज्ञा औरंग्याची आहे. ब्राह्मणांची नव्हे !

शंभूराजांच्या आणि कविकलशाच्या डोळ्यात तापलेल्या सळ्या फिरवून त्यांचे डोळे फोडण्यात आले आणि नंतर त्या दोघांच्या जीव्हा कापण्यात आल्या . त्या दिवसापासून त्या दोघांनी अन्नपाणी वर्ज्य केले .

 मुसलमानी सत्तांच्या परंपरेमध्ये यात नवीन काहीच नव्हते . त्यांच्या धर्मग्रंथात 'कुराणात' अत्यंत क्रूर व निर्दय पध्दतीने शत्रूंचा नायनाट करण्याची त्यांना धर्माज्ञाच आहे .

हत्येची आज्ञा

तीन मार्च ह्या दिवशी औरंग्याच्या मंचकारोहणाचे बत्तीसावे वर्ष होते व त्याच दिवशी शंभुराजेंचे वयही बत्तीसच होते ह्याच दिवशी औंरग्याने शंभुराजेंस व कली कलशांस हालहाल करून मारण्यांची आज्ञा दिली

शंभुराजेंचे डोळे काढले जीभ उपटली
कवी कलशाचीही जीभ उपटली

जीभ उपटण्याची व डोळे काढायची आज्ञा औरंग्याने बहादुरगड येथे पंधरा फेब्रुवारी लाच दरबारात दिली होती

शंभुराजेंचा दुर्दायक अंत दाहक भीषण नि भयंकर दृश्य (A dire scene of Horror)

विभव नाम संवत्सर शके १६१० फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च, १६८९ ह्या दिवशी त्या दोघांचे प्राण अनंतात विलीन झाले

मुसलमानी इतिहासकार त्यांचं वर्णन खालील निंदनीय शब्दात करतात

"काफर बच्चा जहमी रफ्त"

म्हणजे संभा नरकात गेला

असं त्यांच्या मुस्लीम लेखकांचे वर्णन आहे

औरंग्याने शंभूराजेंस धर्मांतराची आज्ञा दिली की नाही ह्याबद्दल वाद करण्यांचं कारणच नाही कारण तो त्याच लायकीचा होता कारण तो धर्मांध म्हणूनच चिटणीस बखर सांगते की धर्मांतराची आज्ञा दिल्यावर शंभुराजेंनी उलट उत्तर स्वाभिमानाने व बाणेदारपणे दिले

ते म्हणाले
"बाटा म्हणता तरी ही गोष्ट घडावयाची नाही
ज्या अर्थी ह्या कैदेत आलो, तेंव्हा वाचणे ते काय ?? तुमचे विचारांस येईल ते करावे!
तुमची बेटी द्यावी म्हणजे बाटितो"

इथे बेटी द्यावी असे औरंग्यास महाराज म्हणताहेत ह्याचा अर्थ हे त्यांस निॅदास्पद रीतीने बोलण्याचे व शिवी दर्शक आहे हे सुज्ञांस कळेलच. ह्यावरून जर कुणी त्यावर स्त्रीलंपटपणाचा आरोप करेल तर तो मूर्खच असेल. कारण कुठल्याही बापाला मुलगी मागणं व ते औरंग्यासारख्या शत्रुला मागणं हे अपमान करण्याचंच लक्षण आहे हे लहान पोराला देखील कळेल.

ईश्वरदास नागर हा इतिहासकार लिहितो
की त्यांचे कुर्हाडीने ह्रदय फोडले, शरीराचे तुकडे केले व कोल्ह्या कुत्र्यांना खायला घातले

आणि हे शक्यही आहे कारण औरंग्या इतका नालायकच होता कारण तो कट्टर जिहादी मुसलमान होता

ह्या सर्वांचं मुळ आहे ते कुराणात हे वर आपण पाहिलेलंच आहे.

जाॅर्ज बर्नार्ड शाॅ एकेठिकाणी ह्या अशाच एका क्रूरतेचे वर्णन करताना म्हणतो

A dire scene of Horror which no pen can trace nor rolloging years from the memories of ages efface.

असा दाहक भीषण नि भयंकर दृश्य की कोणतीही लेखणी ती आपल्या सामर्थ्याने टिपु शकणार नाही
स्मृतीची पानेही अशी की कितीही वर्षे झाली तरी ती पुसली जाणार नाहीत

आता औरंग्याच्या अशाच शिक्षांचा इतिहास

औरंग्याने अशाच प्रकारच्या अमानवी व नृशंस हत्या व अत्याचार आधीही अनेकांवर केलेले आहेत. औरंग्याने अशाच शिक्षा आधी तिघांना केल्या होत्या व त्याही कुराणानुसार हे स्पष्ट आहे

शीखगुरुंना दिलेल्या अतिक्रूर शिक्षा

औरंग्याने शीखांचे गुरु तेगबहाद्दुर ह्यांचे दिवाण मतिदास, भाऊ सतिदास, दयालदास व गुरु दिता ह्यांना पकडले व ९ नोव्हेंबर, १६७५ रोजी सर्वांना शिक्षा देण्यात आंली

भाई मतिदासाला चांदणी चौकात आणण्यात आले व लाकडी फळ्यांची रचना मांडली व त्यावर त्यांना झोपविलं. त्यानंतर त्यांना लाकुड कापता, त्याप्रमाणे करवतीने डोक्यापासून पायापर्यंत कापण्यात आले व शरीराचे तुकडेतुकडे केले

दुसर्या दिवशी दयालदासाला तापत्या तेलाच्या कढईत टाकण्यात आले व प्राण जाईपर्यंत मारण्यात आले व त्यांचे प्रेत चांदणीचौकात फिरविण्यात आले.

ह्याच्यासंदर्भात एका शीख ग्रंथात म्हटलंय

मतिराम चिराया फाड्या
दयाला देगविच साड्या

अर्थ - मतिरामला चिरलं व फाडलं
व दयालदासला तापत्या तेलात जाळलं !

तिसर्या दिवशी सतिदासालाही एका तुळईस हात बांधून ठेवले व पाय घट्ट बांधले व पुढे एक वाघनघा घेतलेला माणूस व मागे वाघनखे घेतलेला माणुस असं करून चालत असताना त्यांची कातडी त्या वाघनख्यांनी सोलण्यात आली, मांस ओरबाडण्यात आले, रक्ताची कारंजी उडाली !

काय अनंत यातना झाल्या असतील ! किती अनन्वित अत्याचार हा ! कल्पना तरी करवते काय???

गुरुतेगबहाद्दुरांचीही अशीच हत्या

शेवटी नोव्हेंबरला गुरु तेगबहाद्दुरांनाही असंच ठार करण्यात आलं. त्यांना विचारण्यात आलं की मुसलमान होताल काय?

तेंव्हा त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिले की

"मति मलीन मुरखमति जोई
इसको त्यागोही पामर तो सोई

म्हणजे हिॅदुधर्माचा त्याग करणारा मनुष्य हा सामान्य व मुर्ख आहे !

ह्याला म्हणतात स्वधर्माभिमान नि अतुलनीय स्वधर्मनिष्ठा !

स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: !
ह्या आमच्या गीतेतले तत्वज्ञान तर हेच सांगते

आता कुठे कुठे गेले ते सर्वधर्मसमभाववाले

आता बोला की सर्वधर्मसमभाव आहे म्हणून

इतकी क्रूर नि अमानवी नि नृशंस हत्या कुणी स्वप्नात तरी करेल काय? पण मुसलमान ते करणारच कारण त्यांचे कुराण ते करायला सांगतं.

पण मुसलमान ते करतीलच व करताहेत.

ईसिसची चलतचित्रे म्हणजे व्हिडिओ आपण पाहिल्याच असतील व्हाॅट्सप फेसबुक ह्या समाजमाध्यमांवर व आंतरजालांवर
ते कशा प्रकारे हत्याकांड करताहेत हे पाहतो आहोत आपण नेहमीच.

तरीही शंभुराजेंची हत्या आता कुणी मनुस्मृतीनुसार व ब्राह्मणांनी केली असं म्हणत असेल तर त्याला काय म्हणावं???

शेवटी जाता जाता शंभुराजेंचेच ब्राह्नणाबद्दलचे बुधभूषणममधले श्लोक देतो.


शंभुराजेकृत बुधभूषणम् आणि ब्राह्मण

ब्राह्णण समाजाचा द्वेष करणार्यांना शंभुराजे स्पष्ट पणे बुधभूषणम मध्ये खालीलप्रमाणे सांगतात

अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत: !
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्नणश्चैव विरुद्ध्यते !

(खालील) ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किॅवा त्यांच्या कडून अडविला जातो,

ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति !
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति !

३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिॅसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.

नैतान्स्मरन्ति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति !
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत् !

७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.

बुधभूषणम् - ३ रा अध्याय - १२ ते १४ श्लोक

दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च !
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च !

दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी, आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवाव.


ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु: !
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता !

ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादि स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.....


इति श्रीशंभुराजे

शेवटी त्या परमश्रद्धेय धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजेंस व त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र प्रणाम करून लेखणीला विराम देतो !!!

धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज की जय !
छत्रपती शिवाजी महाराजकी जय !!
हिॅदुधर्म कीजय !!!
भारतमाता की जय !!!

© तुकाराम चिंचणीकर
Pakhandkhandinee.blogspot.com