Tuesday, 3 October 2017

रावणाचे उदात्तीकरण कधी थांबणार ???




न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् !
गीता
सर्वप्रथम सर्वांस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
काय विकृती वैचित्र्य आहे आपल्या देशात ! एकीकडे रामायण-महाभारत हे थोतांड आहे, काल्पनिक आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यातलेच काही पात्रे घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी विकृतींचे उदात्तीकरण करायचे ! प्रतिवर्षी दसरा अर्थात विजयादशमी समीप आली की काही लोकांची कोल्हेकुई सुरु होते रावण उदात्तीकरण करण्याची ! एरवी रामायण काल्पनिक बरंका ह्यांनाच ! आणि दुर्दैव हे की सांप्रत समाज माध्यमांवर (सोशल मेडिया) वर तर स्वघोषित ब्रेकिंग इंडिया अभ्यासक आणि संशोधक इतके झाले आहेत की बोलायलाच नको. दुर्दैव हेच की सर्वसामान्य मनुष्य कधीच मूळ साहित्य वाचत नसल्याने तो सहजपणे ह्या भ्रमांस बळी पडतो ! म्हणूनच हा लेखनप्रपंच !
वस्तुत: हे सर्व करण्यामागे एक षड्यंत्र तर आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आर्य-विरुद्ध अनार्य किंवा मूलनिवासी- बाहेरचे असला बालिश नि भंपक नि थोतांड सिद्धांत पुन:पुन: माथी मारून समाजमन भडकविणे व आपली पोळी भाजून घेणे. हेतुपुरस्सर बुद्धिभेद करणे व सामाजिक स्वास्थ्य बिघडविणे हा आपला टीपिकल ब्रेकिंग इंडिया अजेण्डा राबविणे हा सर्वात महत्वाचा हेतु ह्या लोकांचा आहे. असो.
रावणाच्या उदात्तीकरणाची फैशन
म्हणे तो संयमी होता, त्याला पश्चाताप झाला होता, सीतेला त्याने कधीही स्पर्श नाही केला म्हणून तो श्रेष्ठ होता म्हणे, त्याने बहिणीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी कशाचीही पर्वा न करता रामाशी शत्रुत्व घेतले वगैरे (त्याचे भगिनी प्रेम म्हणे). वगैरे वगैरे !
आता शंभरातल्या ९८ वांनी आयुष्यात वाल्मीकि रामायण कधीच मुल संस्कृत आणि अनुवादही वाचला नसल्याने लगेचच असल्या संदेशांवर विश्वास बसतो आणि लोक लगेचच ते गावभर पसरवितात. अर्थात ह्यात त्यांचा दोष जरी नसला तरी म्हणूनच ह्या बुद्धीभेदाचे हा निवारण प्रपंच !

रावणासारखा बलात्कारी व पापी केवळ तोच !
अरण्यकांड अध्याय ३८ मध्ये मारीच राक्षसाने सीतेच्या अपहरणाचा निर्णय अत्यंत घातकी आणि कुलविनाश करणारा आहे असे एकदा सांगितल्यावर रावण परत लंकेस गेला. परंतु शुर्पणखेने त्यांस फूस लावून परत सीतेच्या लोभासाठी तिचे अपहरण परत करायला सांगितले. आणि ४० व्या अध्यायामध्ये पुन्हा तो मारिचाकडे गेल्यावर त्याने पुनश्च एकदा रामचंद्राची महती गाऊन परस्त्रीहरण हे जगातले सर्वोच्च पाप आहे आणि ते संपूर्ण कुलाचा नाश करील हे सांगूनही रावणाने त्याचे ऐकले नाही. अरण्यकांडा मध्ये हे सर्व संवाद आहेत. पण लोक कधीच वाचत नाही. बरं पुन्हा भविष्यात त्याला आजोबांनी, मंत्रींनी, बायकोने आणि सर्व भावांनी सांगूनही तो सीतेचा त्यागच करत नाही ह्याचे काय ??? रावणाने किती स्त्रियांवर बलात्कार केले ह्याची उदाहरणे रामायणात जागोजागी आहेत.
असा मनुष्य संयमी आणि विवेकी असू शकतो का ???

त्याला पश्चाताप झाला होता का ???
सर्वांनी सांगून आणि पुढे युद्धात सर्व हरवून आणि कुलाचा नाश बघूनही त्याला मरेपर्यंत पश्चाताप झालेला नाहीये. तरीही लोक काहीच्या काही फालतू लेख समाज माध्यमांवर फिरवितात. इथे जाताजाता एक सांगणे आवश्यक आहे की तो मृत्युशय्येवर असताना म्हणे रामचंद्राने ज्ञानार्जनासाठी लक्ष्मणांला त्याकडे पाठविले व त्यानेही त्यांस उपदेश केला वगैरे वगैरे कथा निव्वळ भंकप आहे, तद्दन असत्य नि निराधार. कारण एवढीच अक्कल आधी असती तर का ऐकलं नाही? सर्व कुलाचा नाश का केला???
ती कथा कुणीतरी रामचंद्रांचे महिमामंडन करण्यासाठीच घुसडलीय हे सिद्ध आहे. असो.

म्हणे सीतेला त्याने कधीच स्पर्श केला नाही ???
अरे मूर्खांनो, मग तिला त्याने लंकेस नेले कसे ??आपोआप गेली का ती ??? अरण्यकांड ४९वा अध्याय तिला कसे घेऊन गेला ते सांगतो.
वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः ।
ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना ॥ १७ ॥
अर्थ - त्याने डाव्या हाताने कमलनयनी सीतेच्या केसासहित तिचे मस्तक पकडले आणि उजवा हात तिच्या दोन्ही मांड्यांच्या पाठमागून खाली घालून त्या द्वारे तिला उचलले. ॥१७॥
ह्या स्पष्ट वर्णनाविषयी पाठकांनी आम्हांस क्षमा करावी पण सत्य सागणे आवश्यक आहे. ह्या पूर्ण अध्यायांत आणि आधीच्याही अध्यायात रावण किती काममोहित झाला होता हे अनेकवेळा लिहिले आहे. पुढेही पूर्ण रामायणांतच त्यांस अनेकवेळा कामांध म्हटलंय. पण हे लोक त्यांस संयमी म्हणतात ??? काहीही खोटे का पसरविता लोकहो ????

बहिणीवर प्रेम करणारा रावण आदर्श ???
गेली कित्येक वर्षे एक संदेश फिरतोय ज्यात एक मुलगी आपल्या आईला रावणासारखा भाऊ पाहिजे म्हणते. का तर म्हणे त्याने बहिणीच्या प्रेमाखातर हे सर्व केले ??? खरंतर त्याचं आंग्ल भाषेत सविस्तर नि सप्रमाण संवादात्मकच खंडण मी केंव्हाच केलंय. पण अशा पढतमूर्खांना विचारावंसं वाटतं की आपण रामायण कधी वाचले आहे का ? ह्याच रावणाने तिच्या नवर्याचा वध करून तिला विधवा केले होते हे किती जणांना माहिती ??? उत्तरकांडांत हा संदर्भ २३ वा अध्याय १८ वा श्लोक येथे आहे. तलवारीने त्याने तिच्या पतीचा वध केला आणि म्हणे बहिणीवर प्रेम ??? बरं हीच शूर्पणखा पुढच्या २४ व्या सर्गात रावणांला दोष देताना विलाप करते. हे असले बहीणीवरचे प्रेम??? वस्तुत: उत्तरकांड प्रक्षिप्त असले तरीही आधीच्या अरण्यकांडात ती विधवा आहे असे स्पष्ट संदर्भ आहेतच. मग तिला विधवा केलं कुणी???
त्यामुळे हे प्रेम वगैरे काही नसून त्याच्या मनात तिने भरविलेली ती सीतेविषयी ती अभिलाषा आणि वासना कारणीभूत आहे ! तो पूर्ण अध्याय नीट वाचला तरी कळेल. पण वाचणार कधी नि कोण???

रावण हा लंपटच होता हे तो स्वतः मान्य करतो
सीतेच्या अपहरणावेळी तो तिला म्हणतो की मी आजपर्यंत अनेक स्त्रियांचे अपहरण केले आहे. अरण्यकांड - अध्याय ४७
बह्वीनामुत्तमस्त्रीणामाहृतानामितस्ततः ।
सर्वासामेव भद्रं ते ममाग्रमहिषी भव ॥ २८ ॥
अर्थ - मी इकडून- तिकडून बर्याच सुंदर स्त्रियांना हरण करून आणलेले आहे. त्या सर्वांमध्ये तू माझी पट्टराणी बन. तुझे भले होवो. ॥२८॥
ह्याचा अर्थ काय ??? संयम कि लंपटपणा???

आता स्वतः मंदोदरी रावण मेल्यावर त्याविषयी काय म्हणते बघा 👇👇👇
क्रियतामविरोधश्च राघवेणेति यन्मया ।
उच्यमानो न गृह्णासि तस्येयं व्युष्टिरागता ।।
अर्थ - मी तुम्हाला आधीही सांगितले होते कि तुम्ही श्रीरामाशी वैर धरू नका पण तुम्ही माझे ऐकले नाही. आज त्याचेच फल आपणांस मिळाले आहे.
वसुधायाश्च वसुधां श्रियः श्रीं भर्तृवत्सलाम् ।
पतिव्रतायास्तपसा नूनं दग्धो ऽसि मे प्रभो ।।
अर्थ - सीता ही पृथ्वीपेक्षा क्षमाशील, समस्त संपदांची अधिष्ठात्री देवी आणि पतिव्रता स्त्री आहे. हे स्वामी निश्चयच आपण ह्या पतिव्रतेच्या तपाने भस्म झालेले आहात
सर्वथा सर्वभूतानां नास्ति मृत्युरलक्षणः ।
तव तावदयं मृत्युर्मैथिलीकृतलक्षणः ।।
अर्थ - ह्या जगात कुणीही अकारण मरत नाही त्यामुळे ही सीताच आपल्या मृत्यूचे कारण आहे. ह्यापेक्षा आणखी स्पष्टीकरणं हवंय???? पतीव्रतेच्या तपाने हे शब्द काय सांगतात???

काय तर म्हणे सीता रामांस पवित्र मिळाली हे रावणाचे श्रेष्ठत्व म्हणे !

कोण म्हटलं? रावण सीतेंस म्हणतो की जर तु मला प्राप्त झाली नाहीस तर मी तुला खाऊन टाकेन. काय होतो ह्याचा अर्थ??? ही धमकी संयमी पुरुषाची आहे का??? बरं तो नरमांसभक्षक होता हे अनेक ठिकाणी स्पष्ट केलंय. ही राक्षसवृत्तीची सर्व चिन्हे दृष्टिगोचर होतात रामायणांत.

बलात्कारी रावण व त्याचा शाप 👇
युद्धकांडातच १३ व्या सर्गामध्ये बलात्कारी रावणाने आपल्या आधीच्या बलात्काराची घटना व त्याला मिळालेला शाप कसा सांगितलाय ते बघा. रावणाने पुंजिकस्थला अप्सरेशी केलेला बलात्कार व त्याला मिळालेला ब्रह्मदेवाचा शाप
महापार्श्व निबोध त्वं रहस्यं किञ्चिदात्मनः ।
चिरवृत्तं तदाख्यास्ये यदवाप्तं पुरा मया ॥ १० ॥
अर्थ - महापार्श्व ! बरेच दिवस झाले, पूर्वकाळात एक गुप्त घटना घडली होती- मला शाप प्राप्त झाला होता. आपल्या जीवनांतील हे गुप्त रहस्य आज मी सांगत आहे, ते ऐक. ॥१०॥
पितामहस्य भवनं गच्छन्तीं पुञ्जिकस्थलाम् । 
चञ्चूर्यमाणामद्राक्षं आकाशेऽग्निशिखामिव ॥ ११ ॥
अर्थ - एक वेळ मी आकाशात अग्निशिखेप्रमाणे समान प्रकाशित होत असलेल्या पुञ्जिकस्थला नामक अप्सरेला पाहिले जी पितामह ब्रह्मदेवांच्या भवनाकडे जात होती. ती अप्सरा माझ्या भयाने लपत-छपत पुढे जात होती. ॥११॥
सा प्रसह्य मया भुक्ता कृता विवसना ततः । 
स्वयम्भूभवनं प्राप्ता लोलिता नलिनी यथा ॥ १२ ॥
अर्थ - मी बळपूर्वक तिचे वस्त्र उतरविले आणि हट्टाने तिचा उपभोग घेतला. त्यानंतर ती ब्रह्मदेवांच्या भवनात गेली. तिची दशा हत्तीद्वारा तुडवून फेकल्या गेलेल्या कमलिनी प्रमाणे झालेली होती. ॥१२॥
तस्य तच्च तथा मन्ये ज्ञातमासीन्महात्मनः । 
अथ सङ्कुपितो वेधा मामिदं वाक्यमब्रवीत् ॥ १३ ॥
अर्थ - मी समजतो की माझ्याकडून तिची जी दुर्दशा केली गेली होती ती पितामह ब्रह्मदेवांना ज्ञात झाली. यामुळे ते अत्यंत कुपित झाले आणि मला याप्रकारे बोलले- ॥१३॥
अद्यप्रभृति यामन्यां बलान्नारीं गमिष्यसि । 
तदा ते शतधा मूर्धा फलिष्यति न संशयः ॥ १४ ॥
अर्थ - आजपासून जर तू कोणा दुसर्‍या नारीशी बळपूर्वक समागम करशील तर तुझ्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील, यात संशय नाही. ॥१४॥
इत्यहं तस्य शापस्य भीतः प्रसभमेव ताम् । 
नारोहये बलात् सीतां वैदेहीं शयने शुभे ॥ १५ ॥
अर्थ - याप्रकारे मी ब्रह्मदेवांच्या शापामुळे भयभीत आहे म्हणून आपल्या शुभ शय्येवर वैदेही सीतेला बलाने चढवत नाही आहे. ॥१५॥
हा भेकड नि लंपट रावण आहे हे तो स्वत:च मान्य करतोय आणि काही लोक त्याला फार पराक्रमी समजतात. तो स्वत: स्पष्टपणे मान्य करतोय की तो सीतेला उपभोगिल तर त्याच्या मस्तकाचे शंभर तुकडे होतील. ह्या शापानेच तो घाबरला होता. आणि हे येडे लोक्स म्हणतात म्हणे सीतेवर त्याने काहीच अपकृत्य केलं नाही. सुधरा रे !
आणि वर तर स्वतः मंदोदरी रावणाच्या विनाशाचे कारण सीताहरण सांगते आहे. तरीही लोक त्याला संयमी आणि श्रेष्ठ म्हणत असतील अशा मूर्खांना काय म्हणावे ????

श्रीरामचंद्राने सीतेचा त्याग केला होता का???
नाही. कारण उत्तरकांड पूर्ण प्रक्षिप्त सिद्ध असल्याने ह्यावर सविस्तर भाष्य करायची आवश्यकताच नाही. अग्नीपरीक्षाही प्रक्षिप्तच आहे हे आम्ही आमच्या आधीच्या अनेक लेखांत सिद्ध केलंय. कधीतरी सविस्तर भाष्य करेनच. त्यामुळे तूर्तास विराम !
काही स्वयंघोषित ब्राह्मण लोकही सांप्रत रावणाचे तो ब्राह्मण होता म्हणून उदात्तीकरण करताना दिसतात तेंव्हा तर त्यांच्या बुद्धीची कीवच करावीशी वाटते. तो ब्राह्मण वगैरे जरी आधी असला तरी तो नंतर किती लंपट नि राक्षसी प्रवृत्तीचा, स्त्रियांना पळवून आणणारा, नरमांस खाणारा होता. अशा व्यक्तींस ब्राह्मण म्हणून कौतुकायचे??? असो.

रावण अनार्य मूलनिवासी होता म्हणे.
हा शब्द जरी ऐकला नि वाचला तरी खोखो हसायला होतं. कीव येते ह्या लोकांची. पण मूळातच रामायणांत त्याचा उल्लेख आर्य म्हणून आलेला आहेच. तो मेल्यावर त्याच्या अनेक पत्नी त्यांस आर्य म्हणून विलाप करतात. बरं तो स्वत: बिभीषणांस बहिष्कृत करताना अनार्यांची निंदा करतो. जर तो अनार्य असता तर अनार्यांची निंदा का करतो???
तरीही रावणाला अनार्य म्हणजे मूलनिवासी व रामाला आर्य म्हणजे परकीय हे दाखविण्याचे जे षडयंत्र सांप्रत सुरु आहे ते वेळीच हाणून पाडलं पाहिजे. अन्यथा...! असो.

असो तरीही काहींना अद्यापही रावणाचे उदात्तीकरण करायचे असेल तर खुशाल करावे ! शेवटी
नोलुकोप्यवलोकते दिवा किं सूर्यस्य दूषणं ???
किंवा झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला??? असो.

भवदीय,
तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

वेदांचे अपौरुषेयत्व, आद्य शंकराचार्य नि वेदांमध्ये इतिहास - खंडन नि मंडन


वेदांचे अपौरुषेयत्व समजून देण्यासाठी लिहिलेला लेख !

क्या परमहंस आदि श्रीशङकराचार्य वेदोंमे इतिहास मानते है???

आचिनोति च शास्त्रार्थं आचारे स्थापयते अधि !
स्वयं ह्यपि आचरेत् य: तु आचार्य: इति स्मृत: !
वेद अपौरुषेय है यह सर्वानुमतसे वैदिकोंमे सिद्ध है |यहाँ हमने वैदिक शब्दका प्रयोग किया है, साम्प्रत कालके पाश्चात्योंका अन्धानुकरण करनेहारे मूढ विद्वानोंका, पुरातत्ववेत्ताओंका, इतिहासकारोंका नहीं | अस्तु | अत: वेदोंकी अपौरुषेयता पर उठाने जानेहारे आक्षेपोंका खण्डन | हारे शब्दका प्रयोग महर्षि दयानन्दने सर्वप्रथम किया था क्योंकि विशुद्ध संस्कृतनिष्ठ हिन्दी के आग्रहको लेकर | वाले शब्द शुद्ध हिन्दी नही है अत: |

वेदोंकी अपौरुषेयता प्रथम लक्षण तो यह है की उस ग्रन्थ में इतिहास नही चाहिये, क्यौंकि इतिहास तो तब लिखा जाता है जब घटना घटी हो | अत: वेद सृष्ट्यारम्भ से पूर्व होने से, जिसका प्रमाण नासदीय सुक्तसेभी प्राप्त होता है एवं पुरुषसूक्तसेभी एवं और भी मन्त्रोंसे, वे इतिहासग्रन्थ नही हो सकते | दुर्भाग्यसे इस सिद्धांत को न समझनेहारे कुछ लोग वेदोंमें इतिहास सिद्ध करने का व्यर्थ प्रयत्न करते है और उस हेतु आचार्य शङकर के साहित्य का आधार लेके अपना हेतु स्थापित करने का प्रयत्न करते है | इससे वैदिक सिद्धान्त की तो हानी होती ही है अपितु आचार्य के प्रति भी भ्रम प्रसृत होता है | अत: इस भ्रम को दूर करना हमारा कर्तव्य है इस हेतु आचार्य की भूमिका को स्पष्ट करनेहारा यह लेख पाठकोंके सामने प्रस्तुत है |

आक्षेप क्रमांक प्रथम - आचार्य आदि शंकर अपने बृहदारण्यक भाष्य मे कहते है:
"इतिहास इत्युर्वशीपुरुरवसो: संवादादिरुर्वशीहाप्सरा इत्यादि ब्राम्हणेव। पुराणमसद्वाइदमग्र आसिदित्यादि।।"
भावार्थ: उर्वशीनामक अप्सरा व राजा पुरुरवा इनके संवादरूप जो ब्राम्हण ग्रंथोमे वर्णन आया है, वो ब्राम्हणहि इतिहास है। और "यह सर्व जगत सृष्टीपूर्व असदरूप था" इत्यादि प्रकार के जो श्रुतीवाक्य है वहि पुराण है, ऐसा समझना चाहिये।
आचार्य आदि शंकर ने यहा इतिहास व पुराण को बिलकुल स्पष्ट कर दिया है।

समाधान - बलिहारी है आपकी भाई | आपने न तो आचार्य के इन वाक्योंका का ठीकसे अर्थ किया है और तो और नाही उसका संदर्भ ठीकसे दिया | यह द्वितीय बार हुआ है की आपने ठीकसे सन्दर्भभी नहीं दिया बृहदारण्यकोपनिषदका | ठीक है अब हम ही दे देते है |यह वाक्य बृहदारण्यक २.४.१० इस स्थानका है |
स यथार्द्रैंधाग्नेरभ्याहितात् पृथग्धूमा विनिश्चरन्त्येवं वा अरेऽस्य महतो भूतस्य निश्वसितमेतद्यदृग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्वाङ्गिरस इतिहासः पुराणं विद्या उपनिषदः श्लोकाः सूत्राण्यनुव्याख्यानानि व्याख्यानान्यस्यैवैतानि निश्वसितानि ॥
इस पर भाष्य करते हुए आचार्य शङकर कहते है
इतिहास इत्युर्वशीपुरुरवसो: संवादादिरुर्वशीहाप्सरा इत्यादि ब्राम्हणेव। पुराणमसद्वाइदमग्र आसिदित्यादि।।
यहाँ आचार्य स्वयं कहते है की उर्वशी एवं पुरुरवा का संवाद ब्राह्मणग्रन्थ में इतिहास रुपसे है | कौनसा ब्राह्मण? तो वह है शतपथ ब्राह्मण जिसका स्थान ११.५.१ यहाँपर है | इसमें उर्वशी एवं पुरुरवा का पूर्ण संवाद है |यदि आपको देखने की इच्छा है तो वहाँ शोध ले सकते है |हाँ चुँकि आप लोग ब्राह्मण ग्रन्थ को भी वेद माननेके पक्षधर है जो पूर्णत: तर्कहीन एवं असत्य है | जिसका उत्तर हमनें निम्नलिखित गोपथब्राह्मणके सन्दर्भ से दिया है |आप तो इतने हठी है की आचार्य के अर्थ को यथार्थ न समझपर आचार्यपर ही आरोप कर बैठे है | अरे भाई आचार्य के उपरोक्त वचन आचार्य वेदोमें अर्थात् मन्त्रभागमें इतिहास नही मानते, वे ब्राह्मणग्रन्थमें उर्वशीपुरुरवा का इतिहास मानते है और वह सत्यभी है | क्योंकि ब्राह्मणग्रन्थ तो ऋषिकृत होनेसे उनमें अनित्य व्यक्तियोंका इतिहास तो सिद्ध है ही | यह हम कभीभी नकारते नही वरन् हमारें सिद्धांत को यह पुष्टी भी देता है | क्योंकि वेद अर्थात मन्त्रभाग को छोडकें सर्व ग्रन्थ पौरुषेय अर्थात मनुष्य या ऋषिकृत है |तो उनमें इतिहास तो होगाही | किन्तु मन्त्रभाग अर्थात वेदोमें इतिहास नही सिद्ध हो सकता |
अब हम आपको आचार्यकेही स्थानपर आसीन एक शंकराचार्य का संवाद देते है जिससे आद्य शंकराचार्य स्वयं वेदोमें इतिहास नही मानते यह सिद्ध होता है |
उनका नाम है जगद्गुरु श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामीगल, जो शृंगेरी पीठ के ३५ वें आचार्य है |
A series of dialogues where Jagadguru Sri Abhinava Vidyatirtha Swamigal, the 35th Acharya of the Sringeri Sharada Peetham, gives clarifications on a variety of topics concerning Sanatana Dharma. The book is a Publication of Sri Vidyatirtha Foundation, Chennai. (Rs.50)] is reproduced from the Chapter ‘Veda-s’:
//Disciple: We find many stories in the Veda-s. Are they accounts of historical events?
Acharyal: No. The stories do not relate to actual worldly incidents. The Veda-s, which are like the breath of the Supreme Being, have no beginning. As such, they are not the records of the historical events of any age. The Brihadaranyaka Upanishad for instance, contains a discussion between sage Yajnavalkya and king Janaka. This is not the retelling of a dialogue between two individuals who lived in some specific period. An event similar to that narrated could have occurred at some time but it cannot be said that this is what has been cited in the Upanishad. The stories in the Veda-s are meant only as an illustration.
बस इससेही स्पष्ट है की आचार्य स्वयं वेदोमें इतिहास नही मानते और स्वयं उनकेही पीठ पर आसीन एक आचार्य यह कथन कर रहा है | बस इससे और प्रमाणोंकी क्या आवश्यकता है???
पूर्वमेंही हम कह चुके है वेदोमें किसी भी अनित्य व्यक्ती का या वस्तुका या कथाओंका इतिहास नही है, जो भी है वह पश्चातके सर्व ग्रन्थोमें है जेसे ब्राह्मण, उपनिषद, पुराण आदि | वेद नित्य होनेके कारण एवं वे सृष्ट्यारंभ में ही प्रकट होने के कारण उनमें किसी लौकिक व्यक्तीका इतिहास होना केवल असंभवही नहीं वरन् मूर्खता ही है | हाँ जो कुछ भी इतिहास है वह सृष्टीरचना का ही है और वह होना भी चाहिये क्यौंकि सृष्टीरचना जहाँ भी होगी वह उस परमात्मा एवं उसकी प्रकृति सेही उन निश्चित नियमोंसे होगी जो वेद में है | सृष्टिरचना कहींभी एवं कितनी भी बार होगी वह एकही नियमसें होगी इसका प्रमाण आचार्य शङकर ने स्वयं ब्रह्मसूत्रभाष्यमें दिया है


इत्यतो धर्माधर्मफलभूतोत्तरा सृष्टिर्निष्पद्यमाना पूर्वसृष्टिसदृश्येव निष्पद्यते |
अर्थ - इसलिए धर्म एवं अधर्मकी फलभूत जो उत्तरोत्तर सृष्टि उत्पन्न होती जाती है, वह पूर्व सृष्टि केही समान है |
(संदर्भ - पृष्ठ ७०४, अध्याय १, पा ३, शाङकरभाष्य रत्नप्रभा भाषानुवादित सहित, विक्रम संवत १९९३)

यह आचार्यकाही शारीरिक भाष्य है एवं इसपर जो रत्नप्रभा नामक भाष्य है और गोपीनाथ कविराज नेही इसका अनुवाद हिंदी में किया है | मेरे समीप यह है | यदि आपको इच्छा है तो प्रेषित करदुँगा |
सो इस सूत्रकें प्रमाण सेभी हम सिद्ध करते है वेदोंमें जो सृष्टिरचना का इतिहास है केवल वही है, अन्य नही | अन्य जो कुछ भी वर्णन या कथाएँ पायी जाती है वे सर्व अलङकारिक वर्णन है एवं उनके अर्थ भी योगिक एवं योगारुढ है, लौकिक नहीं | इसका प्रमाण स्वयं निरुक्तकार यास्क तो देते ही है देखियें
ऋग्वेद के १.३२.१० इस मन्त्र पर भाष्य करते हुए जहाँ वृत्र शब्द आया है निरुक्तकार कहता है
तत्को वृत्रो मेघेति नैरुक्ता:, त्वाष्ट्रोsसुर इत्यैतिहासिका: | अपां च ज्योतिपश्च मिश्रीभावकर्मणो वर्षकर्म जायते तत्रोपमार्थेन युद्धवर्णां भवन्ति, अहिवत्तु खलु मन्त्रवर्णां ब्राह्मणवादाश्च |
निरुक्त - २.१६
अर्थ - वृत्र कौन है? मेघ है यह नैरुक्त कहते है, त्वष्टा का पुत्र असूर है यह ऐतिहासिक कहते है | यदि हम वृत्र को मेघ माने तो मन्त्रोंमे जो इन्द्र वृत्र संग्राम का अर्थ क्या होगा? उत्तर है - पानी और ज्योति के मिलने से वर्षा की क्रिया उत्पन्न होती है, जिस पर उपमा के प्रयोजन से युद्ध का वर्णन है | वास्तव युद्ध नही अपितु रुपक अलङकारिक वर्णन है |यहाँ निरुक्तकार स्पष्टरुपसे "उपमार्थेन युद्धवर्णां भवन्ति" ऐसा शब्दप्रयोग करते है भाई, तनिक इसको तो देखो |
अब यहाँ निरुक्तकार इतिहास शब्द का प्रयोग करते है इसका अर्थ यह नही की वेदोंमें इतिहास सिद्ध है, इसका अर्थ तो यह है की वे उन लोगोंकी बात कर रहे है जो वेदोमें इतिहास ढुँढते रहते है | यही प्रमाण सत्य एवं तर्कशुद्ध है | आचार्य का भी वही है |
यही नियम उपरोक्त उर्वशी-पुरुरवा संवाद जिसको आप वेदोंमे इतिहास सिद्ध करनेका प्रयत्न करते हो उससे भी लगता है | हाँ हम ये नही अमान्य करते की उर्वशी या पुरूरवा की कथा घटी ही नही होगी, वह इतिहास हुआ भी होगा | किन्तु वेदोंमे वर्णित जो पुरुरवा उर्वशी का वर्णन है वह ऐतिहासिक न होकर अलङकारिक सिद्ध होता है | कैसे यह हम देखते है |आप यहाँपर इसी आचार्य शङकर का नाम लेके उनको वेदोमें इतिहास माननेका आरोप कर रहे है इसका निराकरण भी स्वयं आचार्यने तो किया ही है | किन्तु आपके सहाय्यार्थ अब हम एक और विद्वान का भाष्य प्रस्तुत करते है जो स्वयं आचार्य वेदोमें इतिहास नही सिद्ध करते यही मन्तव्य प्रकट कर रहा है, देखिये


ब्रह्मवैवर्तपुराण भाग २ भूमिका पृष्ठ २-३ आनन्दाश्रम संस्कृत ग्रन्थावली प्रकाशन
यह ग्रन्थ आपको आंतरजालपर प्राप्त भी हो सकता है आपको इस धागेंपर प्राप्त हो
इसके चित्र हमने जोड दिये है अन्त में |
देखिये यहाँ लेखक भूमिका में यही कह रह है की जो लोग आचार्य के उपरोक्त बृहदारण्यक वचन को लेकर पुराणोंपर भी वेदोंके समान प्रादुर्भाव का अर्थात अपौरुषेयता का आरोप कर रहै एवं आचार्य वेदोंमे उर्वशी पुरुरवा यह अनित्येतिहास मानते है यह आरोप कर रहै, वह सब मिथ्या है | इन लोगों की यह भूल है यही इस लेखक का कहने का तात्पर्य है |आपके हेतु मैने वह संस्कृत मूल भूमिका चित्ररुपसे जोड दियी है, कृपया अवलोकन करें ! विस्तार के कारण उस पूर्ण भूमिका का हम अनुवाद दे नहीं सकते है | आप स्वयं पढ ले | तैत्तिरीय आरण्यक अथवा बृहदारण्यक इन जगहोंपर जहाँ भी पुराण शब्द का वेदोंके साथ उल्लेख आया है उससे पुराण वेदोंके समान नही होते वरन् वे पश्चात्केही प्रकट होते है | यहाँ ध्यान रहे की यह लेखक कोई आर्य समाजी नही है वरन् आचार्य कोही माननेहारा है अपितु अद्वैतीही है | यह द्रष्टव्य है | क्यौंकि आजकल के वैदिक विद्वान वेदोमे इतिहास केवल आर्य समाजी भाष्यकारही नही शोधते इस भ्रम के शिकार है | हमने उपर निरुक्तकार यास्क, स्कंद स्वामी, आचार्य शङकर, उनकेही एक पीठासीन आचार्य इन सबका प्रमाण दिया है | अस्तु |
अत: वेदोमें किसी भी अनित्य मानव का इतिहास होही नही सकता | इसका कारण यही है की वेदोंके सर्व शब्द यौगिक अर्थ के है और नाही लौकिक अर्थ के | वेद सृष्टी के आरम्भ में ही प्रकट हुए हैं इसका प्रमाण स्वयं श्वेताश्वेतर उपनिषद भी देता है
यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै |
अब आप जिस महापुरुष आद्य शङकराचार्य का उदाहरण दे रहे है उन्होनेंही उसका क्या अर्थ किया है यह देखिये आपका समाधान हो जायेगा ! उपरोक्त आनन्दाश्रमकी लेखावली का लेखक उसपर भाष्य करता हुआ उस भूमिका में लिखता है की
"यो ब्रह्माणं विदधाति... (श्वेता. ६.१८)
इत्यादिश्रुतिस्मृतिवचनेभ्यो भगवतो वेदस्यैव प्राकूभावत्वं स्फुटी भवति |न खलु पुराणस्य |
इसमें वह लेखक विद्यारण्य स्वामी एवं अन्तमें आचार्यके उपरोक्त बृहदारण्यकके " पुराणमसद्वा" श्लोकार्ध का उल्लेख करते हुए लिखते है की
"श्रीभगवत्पूज्यपादा अपि बृहदारण्यकोपनिषद्भाष्ये लिलिखु: | एवमन्यत्रापि |"
आपसे विनती है की आप यह पूर्ण संवाद पढे एवं इससे आचार्य भी वेदोंमे इतिहास नही मानते यह ज्ञान करलें |


अब मनुस्मृती का सिद्धांत देखते है 👇
सर्वेषां तु स नामानि कर्माणिच पृथक् पृथक् !
वेदशब्देभ्यः एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे !
मनु - १.२१
इसका अर्थ तो सरल है की
अर्थ - उस परमात्माने निश्चय करके सब के नाम, कर्म और पृथक् व्यवस्थायें आदिसृष्टीमेंही वैदिक शब्दोंसे भिन्न भिन्न निर्माण कीं |
इससे स्पष्ट है की वेदोंके शब्द प्रथम है एवं लौकिक व्यक्तीओंका इतिहास पश्चात का है एवं उन लौकिक व्यक्ती जैसे राम, कृष्ण, उर्वशी, पुरुरवा आदि लोगोंके नाम वेदोंसेही लिए है | किन्तु इससे उनका इतिहास वेदोंमें सिद्ध न हो कर यह नाम प्रत्युत योगिक सिद्ध होते है और नाकी लौकिक | पश्चात में उनके अर्थात ऐतिहासिक व्यक्तिओंके नाम इन वेदोंके योगिक नामों के अर्थोंसे रखे गये है |
अब आप जिस आचार्य शङकर का नाम दे रहे है उन्होनेंही यह सिद्धांत स्वयं उनके ब्रह्मसूत्र भाष्यमें १/३/३० इस सूत्रमें
समाननामरूपत्वाच्चावृत्तावप्यविरोधो दर्शनात्स्मृतेश्च।
इसपर वे आद्य शङकराचार्य कहते है
ऋषीणां नामधेयानि याश्च वेदेषु दृष्टय |
शर्वयन्ते प्रसूतानां तान्येवैभ्यो ददात्यजः ||
अर्थ - ऋषियोंके जो नाम थे और वेदकी जो शक्ति थी, पुन: प्रलयके अन्तमें उत्पन्न होनेपर अजने अर्थात् ब्रह्माने उन्हीं नामों और शक्तियोंको उन्हें दिया |

पृष्ठ ७०९ - शाङकरभाष्य - रत्नप्रभा - भाषानुवादसहित - भाष्यकार गोपीनाथ कविराज
विक्रम संवत १९९३
आपने आचार्य को भी वेदोमें इतिहास सिद्ध करनेहेतु काम पे लगा रहे है जो उनके स्वयं का मन्तव्य नही है |
कुर्मपुराणमभी उपरोक्त सिद्धांतही कथन किया है
कूर्मपुराणम्-पूर्वभागः/सप्तमोऽध्यायः
वेदशब्देभ्य एवादौ निर्ममे स महेश्वरः ।
आर्षाणि चैव नामानि याश्च वेदेषु सृष्टयः ।७.६८
शर्वर्यन्ते प्रसूतानां तान्येवैभ्यो ददात्यजः ।।
यथर्त्तावृतुलिङ्गानि नानारूपाणि पर्यये ।७.६९
लिङ्गपुराणम् - पूर्वभागः/अध्यायः ७० यहाँभी यही सिद्धान्त है |
हमने तो पूर्वमेहीं स्कन्दस्वामी नामक ऋग्वेदके प्रथम भाष्यकार का सन्दर्भ दे कर कहा था की वेदोमें आये हुए देवापि-शान्तनु आदि शब्द यह यौगिक अर्थ के है जिसमें वे कहते है
देवापि विद्युत | शन्तनुरुदकम् |
किन्तु परवर्ती साहित्य में यह ऐतिहासिक है |हम मानते है की महाभारतमे तो शांतनु भीष्म का पिता है | इसे हम नकारते भी नही कभी | किन्तु आप जैसे लोक वेदोंमे यदि शान्तनु शब्द आया तो उसे भीष्म के पिता के साथ जोडनेका जो यत्न करते है वह अप्रस्तुत तो हैही वरन् वैदिक सिद्धान्तोके विपरीत भी है | इस लिए आपसे विनती है की सत्य का स्वीकर करें |
अब उर्वशी पुरुरवा के सन्दर्भ में अन्तिम सन्दर्भ देते है | आचार्य वररुचि ऋग्वेद के १०.९५.१४ इस मन्त्रमें जहाँ उर्वशी एवं पुरुरवा का संवाद है वहाँ भाष्य करते हुए लिखते है
"नैरुक्तपक्षे तु पुरुखा मध्यमस्थान: वाय्वादीनामेकत्वात्, पुरु रोतीति पुरुरवा: उर्वशी विद्युत् |
अर्थ - नैरुक्तपक्ष में तो पुरुरवा को मध्यमस्थानी एवं उर्वशी को विद्युत कथन किया गया है !
इससे भी सिद्ध होता है की वेदोमें वर्णित उर्वशी-पुरुरवा संवाद ना किसी ऐतिहासिक पक्ष का है अपितु वह यौगिक अर्थसे विद्युत एवं मध्यमस्थानी का है |इससे भी आपके आक्षेप का निवारण होता है |
अत: वेदोमें आचार्य शङकर उर्वशी एवं पुरुरवा का इतिहास सिद्ध करते है यह आपका अर्थ निराधार एवं मूलहीन है | आप व्यर्थही आचार्य पर यह आरोप कर रहे है |
अस्तु !


आक्षेप क्रमांक द्वितीय -
आचार्य आदि शंकरने अपने शारीरीक भाष्य के प्रथम अध्यायके तृतीय पाद के २९वे सूत्रपर अपने भाष्य मे व्यासोक्ती मे एक श्लोक दिया है..
युगांतेsन्तर्हितान वेदान सेतिहासान महर्षयः।
लेभिरे तपसा पूर्वमनुज्ञाता स्वयंभुवा।।
भावार्थ: युगो के अंत मे इतिहास के साथ वेद अदृश्य हो गये थे। किंतु, महर्षीयोने प्रथम ब्रम्हदेवकी आज्ञा प्राप्त कर अपने तपोबलसे वो सेतिहास (स-इतिहास) वेद पुनरपि प्राप्त किये।

समाधान - इसका अर्थ ये तो नही सिद्ध करता की वेदोमें मानव इतिहास होता है | यह तो आपका मनगढन्त अर्थ एवं कल्पना ही है | क्यौंकि हमने आचार्यकेही भाष्य से आचार्य की भूमिका उपरोक्त लेख में स्पष्ट कर दी है | अस्तु |

आक्षेप क्रमांक तृतीय -
अमरकोष आदि प्राचीन कोशों में पुराण के पांच लक्षण माने गये हैं :
सर्ग (सृष्टि), प्रतिसर्ग (प्रलय, पुनर्जन्म), वंश (देवता व ऋषि सूचियां), मन्वन्तर (चौदह मनु के काल), और वंशानुचरित (सूर्य चंद्रादि वंशीय चरित) ।
सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च ।
वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम् ॥
(१) सर्ग – पंचमहाभूत, इंद्रियगण, बुद्धि आदि तत्त्वों की उत्पत्ति का वर्णन।
(२) प्रतिसर्ग – ब्रह्मादिस्थावरांत संपूर्ण चराचर जगत् के निर्माण का वर्णन।
(३) वंश – सूर्यचंद्रादि वंशों का वर्णन
(४) मन्वन्तर – मनु, मनुपुत्र, देव, सप्तर्षि, इंद्र और भगवान् के अवतारों का वर्णन।
(५) वंशानुचरित – प्रति वंश के प्रसिद्ध पुरुषों का वर्णन।

समाधान - आप पुराण शब्द के अर्थ करनेसे उनको वेदोंके समान यदि अपौरुषेय सिद्ध करना चाहते है तो आप हमारे उपरोक्त लेख को पुनश्च पढिये | हम सिद्ध कर चुके है की वेद पहले है एवं उसके आधार पर पुराणोंकी रचना व्यासजीने की है | और वो भी प्रक्षेपोंको छोडकर | और पुराण शब्द का अर्थ इतिहास है और जो जो ग्रन्थ ऐतिहासिक है वह सर्व पौरुषेय अर्थात मनुष्यकृत अथवा ऋषिकृत है |वह कभीभी वेद नही हो सकता |

आक्षेप क्रमांक चतुर्थ - : ऋच: सामानि छन्दांसि पुराणं यजुषा सह।। - अथर्ववेद ११.७.२.
मनु महाराज कहते है:
स्वाध्यायं श्रावयेत पित्रे धर्मशास्त्राणि चैवहि।
आख्यानानीतिहासांश्च पुराणान्यखिलान्यपि।।
अर्थात: (श्राद्ध काल मे) पितरों को वेद, धर्मशास्त्र, आख्यान, इतिहास और सारे पुराण सुनाने चाहिये।
आज के तमोयुगी कली में प्रायः कुछ लोग 'पुराण' शब्द की अपने अपने तर्क को सत्य साबित करने के लिए अलग अलग व्याख्यायें, भावार्थ रखते है।
किंतु; आचार्य आदि शंकर से बड़ा शास्त्रों का ज्ञाता आज के समय मे संभवतः कोई नही। उनसे अधिक शास्त्र का ज्ञान सांप्रत मोहग्रस्त काल मे किसी को नही होगा। सो आचार्य आदि शंकर पुराण व इतिहास इस संबंध में क्या कहते है? वो भी हम अगली पोस्ट में देख ले।
#वेद_पुराण_इतिहास

समाधान - आपको हमने आचार्य के साहित्य का सन्दर्भ देकेही सिद्ध कर दिया है की पुराण शब्द का अर्थ इतिहास है | निरुक्तकार यास्क उसकी "पुरा नवं भवति" यह निरुक्ती देते है | पुराण इतिहास ग्रन्थ है और चुँकि वेदोंमें इतिहास पक्ष का खण्डन हम प्रथम लेख में आचार्य शङकर के साहित्यसेही कर आये है, तो यह आपकी शङका भी निर्मूल है | इस लेखसे आप पुराणोंको भी वेदोंके समान अपौरुषेय दिखाने का जो अट्ट्हास कर रहे है वह आचार्य शङकर एवं वैदिक सिद्धान्तोसे भी विपरीत है | फिर भी हम अन्तमें एक गोपथब्राह्मण का प्रमाण देते है जिससे इस लेखमाला का अन्त कर देंगे |
गोपथब्राह्मण पूर्व २.१०
एवमिमे सर्वे वेदा निर्मिता: सकल्पा: सरहस्या: सब्राह्मणा: सोपनिषत्का: सेतिहासा: सान्वाख्याना: सपुराणा: सस्वरा: संस्कारा: सनिरुक्ता: सानुशासना: सानुमार्जना: सवाकोवाक्या: |
यहाँ ब्राह्मणकार स्वयं कह रहा है की कल्प, रहस्य, ब्राह्मण एवं अन्त तक के सर्व साहित्य आदि ग्रन्थ वेद नही है | अत: वे वेदोंके समान अपौरुषेय तो होही नही सकते | तथा उनमें इतिहास होने के कारण वे वेदोंके समान नही है | इससे भी वेदोमें इतिहास सिद्ध नही होता यह हमारा पक्ष प्रबल होता है अकाट्य प्रमाणों के साथ | अस्तु !
(लेख में दिये गये सर्व सन्दर्भ चित्र रुपसे संलग्न किये गये है, देखिये!)
अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !
©तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Tuesday, 26 September 2017

वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक तृतीय



शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...


वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक तृतीय

मागच्या लेखामध्ये आपण स्त्रियांचा वेदाधिकार ह्यांविषयी संवाद केला. आता ह्या लेखांपासून वेदांमधील स्त्री-दर्शनाचा प्रत्यय घेणार आहोत.
स्त्रियांचे व्यक्तिमत्व स्वरुप व कार्य
दैनंदिन जीवनामध्ये स्त्रियांचे व्यक्तिमत्व चिंतन करताना त्यांच्या एकुण स्वरुपाविषयी व कार्याविषयी आपणांस चिंतन करायचे झाल्यांस अनेक पैलु दृष्टिगोचर होतात. जसे की
१. धर्मनिष्ठा, २. भोजन बनविणे (स्वयंपाक), ३. पशुपालन ४. गृहकार्य, ५. कुटुंबाचे नियंत्रण व नियोजन व व्यवस्था, ६. पवित्रता, ७. पती सेवा, ८. पत्नीचे अधिकार, ९. सम्राज्ञीचे पद, १०. सौभाग्यवतीचे पद ११. दीर्घायुष्य, १२. उत्तम व बलसंपन्न संतती निर्माण, १३. ईश्वरोपासना, १४. यज्ञाधिकार, १५. स्नानसंध्या, १६. आर्थिक नियोजन, १७. शिक्षण व वेदाधिकार १८. बालकांस शिक्षण व संगोपन
इत्यादि गोष्टींतून स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाच्या व कार्याच्या स्वरुपांचे चिंतन वेदभगवानाच्या संदर्भांतून आपणांस करता येईल.


स्त्रीची धर्मनिष्ठा नि वेदचिंतन
स्त्री ही जात्याच धर्मपरायण व एकनिष्ठ असते. तिची लज्जा नि अनुद्धतता ही केवळ पुज्यच आहे सदैव. वेदांमध्ये स्त्रीविषयी जी विशेषणे योजिली आहेत त्यात अनेकानेक विशेषणांचे चिंतन आपणांस करायचे आहे. त्यात प्रामुख्याने
ऋग्वेदाच्या प्रथम मंडलात ३५, ३९, ११६, ११७ आदि सूक्तांमध्ये स्त्रींस वध्रिमती असे म्हटलंय. ह्या शब्दाचा अर्थ सांगताना वध्रि शब्द हा बंधन, इंद्रिय, दोरी आदि वाचक आहे. "प्रशस्ता वध्रिबन्धनम् अस्या अस्तीति वध्रिमती यद्वा प्रशस्ता वध्रय इन्द्रियाणि अस्या: सन्तीति" -जिचे बंधन प्रशंसनीय आहे अर्थात जी स्त्री धार्मिक नियमांनी स्वत:स बाध्य आहे, नियमांस कधीच तोडत नाही, जणु जी धर्मरुपी बंधनांनी किंवा दोरीने बांधली गेली आहे, जितेंद्रिय, धर्म्मपरायण, धर्म्मतत्त्ववेत्री अर्थात जाणणारी आहे तिला इथे "वध्रिमती" असे म्हटलंय. तींस प्रत्यक्ष परमेश्वर अर्थात हिरण्यगर्भ किंवा हिरण्मय पुरुष(परमेश्वरच) सूर्यासारखा तेजस्वी, निष्कलङक, पापांधकारनिवारक पुत्र प्रदान करतो असा भावार्थ आहे.
ह्यांच उपरोक्त सूत्रांमधील मंत्रांमध्ये स्त्रीस वर्त्तिका असे म्हटलंय. तो शब्द धर्मव्रतपरायण स्त्रीसाठी आलाय. "वर्तते धर्म्मस्यानुकूलेन या पुन: पुन: वर्तते सा वर्त्तिका" जी सदा धर्मानुकूल वर्तन करण्यांस पुन: पुन: तत्पर आहे अशी ती स्त्री !


स्त्रियांचे संघटन व विकास
ह्यांविषयी अथर्ववेद ११ व्या कांडात प्रथम अध्यायांत म्हणतो
ओ३म् शु॒द्धाः पु॒ता यो॒षितो॑ य॒ज्ञिया॑ इ॒मा आप॑श्च॒रुमव॑ सर्पन्तु शु॒भ्राः । अदुः॑ प्र॒जां ब॑हु॒लान्प॒शून्नः॑ प॒क्तौद॒नस्य॑ सु॒कृता॑मेतु लो॒कम् ॥
शुद्ध स्वभाव, पवित्र आचरण, पूजनीय, सेवायोग्य, शुभ्र चरित्राची गुणवैशिष्ट्ये असलेल्या ह्या स्त्रिया ज्ञानांस प्राप्त होवोत. ह्यां स्त्रियांपासून आम्हांस उत्तम संतान व बहुविध असे पशु प्राप्त झाले आहेत. इथे स्त्रियांना गौ आदि पशुंची देखभाल ठेवायची अपेक्षा आहे. कारण गौशिवाय दुध व तुप येऊच शकत नाही व त्याशिवाय यज्ञादि कृत्ये होऊ शकत नाहीत.
स्त्रियां उत्तम सुख देणार्या आहेत. त्यांची गुणवैशिष्ट्ये उपरोक्त मंत्रांत वर्णिली आहेत. ह्या संपूर्ण अध्यायांत स्त्रियांचे अतिशय उदात्त वर्णन आहे. स्त्रियांचे संघटन ह्या मंत्रांमध्ये सांगितले असून स्त्रियांनी गुणवती स्त्रीची निवड करावी असे सांगितलंय. स्त्रियांचा संघटनाधिकार इथे अधोरेखित आहे.

नारी ह्या शब्दाचा अर्थ
यजुर्वेदभाष्यामध्ये नारी शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना महर्षी दयानंद सरस्वती म्हणतात
नराणामियं शक्तिमती स्त्री तत्सम्बुद्धौ
यजुर्वेद भाष्य - ५.२६
पुरुषांना शक्ती प्रदान करणारी अशी ती नारी.
पृष्ठ क्रमांक ४३३ - यजुर्वेद भाष्य - महर्षि दयानंद सरस्वती 

गृहकार्य
वेद सांगतो की स्त्रियांनी पवित्र, निर्मळ नि पुजनीय बनून आपल्या गृहकार्यांत संलग्न व्हावे. घरामध्ये पाणी व अन्नाचा उत्तम प्रबंध करावा. भात आदि अन्न तयार करणार्या स्त्रिया ह्या उत्तम कर्म करणार्या लोकांच्या स्थानांस प्राप्त होवोत. ह्यातून स्त्रियांना स्वयंपाकादि गोष्टी करणे हे अतिशय अभिमानास्पद कार्य सांगितले असून त्यानेही स्त्रियांस उत्तम गती प्राप्त होते असा भावार्थ आहे. भोजन हे उत्तम, बलवर्धक गुणकारक व सुस्वादु असावे असे वेद सांगतो.


पशुपालन व सदाचार युक्त मधुर भाषण
हे कार्य केवळ पुरुषांचेच नसून स्त्रियांचेही आहे असे सांगताना अथर्ववेद ११.१.२२ येथे म्हणतो
ओ३म् अ॒भ्याव॑र्तस्व प॒शुभिः॑ स॒हैनां॑ प्र॒त्यङे॑नां दे॒वता॑भिः स॒हैधि॑ । मा त्वा॒ प्राप॑च्छ॒पथो॒ माभि॑चा॒रः स्वे क्षेत्रे॑ अनमी॒वा वि रा॑ज ॥
इथे स्त्रियांनी गौआदि पशुंचे पालन अशा प्रकारे करावं की ते त्यांस अगदी प्रिय होतील.
शिवी, शाप किंवा व्यभिचार तुम्हांस प्राप्त न होवो अशी वेद भगवान इथे स्त्रियांस प्रार्थना करतो. स्त्रिया ह्या सतत मृदुभाषणी, सत्यवचनी व चारित्र्यसंपन्न असाव्यांत अशी वेद अपेक्षा राखतो. जर स्त्रियांस आपल्या पतींस सदैव अनुकूल ठेवायचे असेल तर तिने सतत मधुरभाषण व तेही सत्य तेच सांगावे. सत्यं ब्रुयात् मितं ब्रुयात् हे तत्व पाळावंच. असत्य भाषण कधीच करु नये, भले ते अप्रिय असो.
स्त्रियांना आपले कार्यक्षेत्र विस्तृत ठेवावे अशी वेद अपेक्षा करतो. वेदभगवान स्त्रियांस संकुचित व घरकामी कधीच अपेक्षा ठेवत नाही. चूल नि मूल एवढ्यांचपूरती स्त्रियांची अपेक्षा वेदभगवान करत नाही. तो स्त्रियांस व्यापक दृष्टीने विचार व कार्यप्रवृत्त होण्यांस सिद्ध करायांस सांगतो.

उत्तम स्वयंपाक घर
ओ३म् ऋ॒तेन॑ त॒ष्टा मन॑सा हि॒तैषा ब्र॑ह्मौद॒नस्य॒ विहि॑ता॒ वेदि॒रग्रे॑ । अं॑स॒द्रीं शु॒द्धामुप॑ धेहि नारि॒ तत्रौ॑द॒नं सा॑दय दै॒वाना॑म् ॥
अथर्ववेद - ११.१.२३
ह्या मंत्रामध्ये स्त्रींस उत्तम स्वयंपांक घराची प्राप्ती होऊदेत अशी प्रार्थना आहे.

स्त्रीही ही कल्याणकारी आहे.
ओ३म् शि॒वा भ॑व॒ पुरु॑षेभ्यो॒ गोभ्यो॒ अश्वे॑भ्यः शि॒वा । शि॒वास्मै सर्व॑स्मै॒ क्षेत्रा॑य शि॒वा न॑ इ॒हैधि॑ ॥
अथर्ववेद - ३.२८.३
ह्या मंत्रामध्ये स्त्रींस कल्याणी होऊदे अशी प्रार्थना आहे. स्त्री ही पुरुषाचेच नव्हे तर जगाचे कल्याण करणारी अशी भावना ह्या मंत्रामध्ये वेदभगवान बाळगतो.
पित्याच्या घरी उत्तम शिक्षा
वेदभगवान स्त्रींस पित्याच्या घरी वेदादि षट्शास्त्रांचे व उत्तम नीतिनियमांचे व पवित्र आचरणांची शिक्षा प्रदान करा अशी आज्ञा देतो. म्हणूनच अथर्ववेद 'ब्रह्मचर्येण कन्या युवानं विन्दते पतीम्' असे म्हणतो.

स्त्री ही पूर्णायु प्राप्त करो
पुत्र आणि नातवंडांच्या समवेत क्रीडा करत स्त्री आनंद प्राप्त करो. ह्यातून वेदभदवान स्त्रींस दीर्घायुष्य चिंतितो.
वेदभगवान तसेही चारशे वर्षांचे आयुष्य ऋग्वेदामध्ये चिंतितोच आहे. अथर्ववेदामध्ये शरद:शतम् आदि मंत्रांमध्येही शंभर वर्षांची आयु सांगितलीच आहे.

पवित्रता
स्त्रीने आपली वस्त्रे पुरुषांस कधीही प्रदान करु नयेंत असे अथर्ववेद १४.१.२० येथे सांगतो.
सुखप्राप्ती साठी तींस सुवर्ण, जलादि सर्व वस्तु प्राप्त होऊन ती पतींसह सुखी होवो अशी प्रार्थना अथर्ववेद १४.१.४० येथे करतो.


स्त्री ही घराची सम्राज्ञी आहे.
अथर्ववेद १४.१.४३ येथील मंत्रामध्ये ज्याप्रमाणे बलवान समुद्राने नदींचे चक्रवर्ती साम्राज्य निर्माण केले आहे तसेच पतीच्या घरात जाऊन स्त्री ही सम्राज्ञी बनु अशी आज्ञा करतो.

ऋग्वेदामध्ये सुद्धा हाच भाव व्यक्त करताना १०.८५.४६ येथे
स॒म्राज्ञी॒ श्वशु॑रे भव स॒म्राज्ञी॑ श्व॒श्र्वां भ॑व ।
ननां॑दरि स॒म्राज्ञी॑ भव स॒म्राज्ञी॒ अधि॑ दे॒वृषु॑ ॥
तु सासर्यांसाठी तुझ्या आचरणाने सम्राज्ञीचे स्थान प्राप्त कर. सासुसाठीही सम्राज्ञी हो. नणंदेसाठीही सम्राज्ञी हो व माझ्या भावांसाठी अर्थात तुझ्या दीरांसाठीही घरात तु सर्वांची सम्राज्ञी हो.
ह्या मंत्रातून ऋग्वेद स्त्रींस किती उच्च स्थान प्राप्त करण्याची आज्ञा देतो हे आपणांस कळते. हे स्थान तिने तिच्या शुद्ध आचरणाने व व्यवहाराने, मृदु भाषणाने प्राप्त करायचे आहे.
हे ऋग्वेदाचे दशम मंडलातले ८५ वं सूक्त हे पूर्ण स्त्री-पुरुष विवाह व त्यांचे भावी आचरणांसंबंधी अतिशय उदात्त चिंतन प्रकट करणारे आहे.

दांपत्यजीवनांचे अत्युत्कृष्ट चिंतन उपरोक्त ऋग्वेद सूक्तामध्ये आहे.
ह्या दांपत्यजीवनामध्ये आकांक्षांचे व वैदिक आर्यांना स्त्रीपासून काय अपेक्षित असावे ह्याचे उत्कृष्ट चिंतन उपरोक्त सूक्तामध्ये ऋग्वेदांत आहे. नवीन गृहात संसारास येणार्या स्त्रींने घरातील लोकांची मने कशी जिकांवीत व तिचे आचरण कसे सम्राज्ञी समान असावे ह्यांचे इतके सुदंर दिग्दर्शन असताना काही मूढ लोक प्राचीन काली आर्यांना विवाहसंस्थेचे ज्ञान नव्हते व ते अतिशय विकृतावस्थेत जगत होते हे मत बाळगतात व त्यावर ग्रंथ लिहितात हे त्यांचे मत किती फोलपणाचे व अज्ञानदर्शक आहे हे इथे सिद्ध होते.

राजवाड्यांच्या विवाहसंस्थेच्या इतिहासाची विकृती
त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगूनही राजवाड्यांनी त्यांच्या उपरोक्त ग्रंथांत उपरोक्त सूत्रांचे एकुणच वैदिक ऋचांचे काढलेले अतिशय घाणेरडे व विकृत अर्थ व त्यावरून भारतीय विवाहसंस्थेचा केलेला एक टिपणात्मक अभ्यास हा किती विकृत आहे हे त्यांच्या अज्ञानमूलकतेचे प्रदर्शक तर आहेतच पण त्यांचा तो ग्रंथ वाचून हिंदुंच्या विवाहसंस्थेविषयी वाट्टेल ते विकृत तर्क करणारे द्वेष्टे लोकही किती अंध आहेत हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. ह्या संपूर्ण सूक्ताचा अभ्यास केला तरी वैदिक आर्यांची दांपत्यजीवनाची कल्पना सर्वसामान्यांस आकळेल. पण काय करणार? पाश्चिमात्यांना बुद्धी गहाण टाकल्यांवर मनुष्य असे विकृत ग्रंथच लिहिणार. असो त्याची समीक्षा स्वतंत्रपणे भविष्यात करणारच आहे. ज्यांना राग येतो त्या राजवाडे भक्तांनी माझे लेख वाचु नयेत. मी स्पष्टवक्ता आहे. वेदांचा अकारण अपमान सहन केला जाणार नाही, मग तो कुणीही करो.
एकमेकांविषयीच्या एकनिष्ठेवाचून खरे सुखी दांपत्य जीवन असू शकत नाही. परस्परांतील द्वैत समूळ नष्ट करून एकात्म प्रेम उत्पन्न करण्याबरोबरच इंद्रियनिग्रह व कर्तव्यनिष्ठा, दक्षता आणि स्वार्थत्याग याही गोष्टींची पूर्ण जाणींव आर्यांस उपरोक्त वेदवचनांवरूनच प्राप्त होती असे म्हणण्यांस कोणताही प्रत्यवाय नाही.
ह्यां स्त्रींस सुपुत्रवती व सौभाग्यवती कर अशी आज्ञा ह्याच सूक्तामध्ये आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही.


सर्वांत उदात्त संकल्पना
इ॒मां त्वमिं॑द्र मीढ्वः सुपु॒त्रां सु॒भगां॑ कृणु ।
दशा॑स्यां पु॒त्राना धे॑हि॒ पति॑मेकाद॒शं कृ॑धि ॥
ह्या मंत्राचे दोन अर्थ वेगवेगळ्या भाष्यकारांनी काढले आहेत. आर्य समाजी भाष्यकारांनी ह्यांत पतींस एकादशावा पुत्रनिर्माण कर असा अर्थ काढला आहे. पण बाळशास्त्री हरदासांनी त्यांच्या "वैदिक राष्ट्रदर्शन" नामक पुण्यातल्या व्याख्यानमालेत, ज्याचे ग्रंथ द्विखंडात प्रकाशितही आहेत, त्याची पीडीएफ हवी असल्यांस देईनच, त्यांनी निम्नलिखित अर्थ काढलाय.
ह्या मंत्रामध्ये दहा पुत्रांस तु जन्म देऊन अकरावा पती कर अशी आज्ञा आहे. म्हणजेच दहा पुत्रांनतर तो पती तिचा एकादश अर्थात अकरावा पुत्र होवो अर्थात तिथे त्यांचे पती-पत्नी संबंध संपुष्टांत येऊन ती त्याचा पुत्रवत सांभाळ करेल. ही इतकी विशुद्ध संकल्पना केवळ वेदच सांगु शकतो.
ऋग्वेदांतील सौभाग्यवती स्त्री !
ह्याच सूक्तामध्ये अनेकवेळा स्त्रींस सौभाग्यवती व उत्तम संतती प्राप्त करणारी असे म्हटलंय.

संतती कशासाठी तर अमरत्वासाठी!
संतती प्राप्तीचा हेतु हा त्या संततीने विलक्षण कर्तृत्व करून तींस व सर्व कुटंबांस आपल्या कीर्तीने व कर्तृत्वाने अमरत्व प्राप्त करून द्यावे अशी अपेक्षा ऋग्वेद ५.४.१० येथे व्यक्त करतो.

उत्तम व पराक्रमी संततीची अपेक्षा
अथर्ववेदामध्ये वैदिक गृहिणीने आपली मूलें ही शत्रुंचा नि:पात करणारी, तेजस्वी असावीत अशी प्रार्थना आहे. ती स्वत: तेजस्वी व सौभाग्यशाली असावी व पतीची कीर्ती सर्वत्र पसरावी.
अनेकांच्या विवाहामध्ये ऋग्वेदांतले उपरोक्त हेच मंत्र म्हटले जातात. जिथे घाई गडबड नसते तिथेच अर्थात ! असो.

स्त्रीने ज्ञानप्राप्ती करायची आहे.
अथर्ववेदामध्ये १४.१.६४ येथे स्त्रींस सर्व प्रकारचे म्हणजे भूत, भविष्य व वर्तमान असे तीन्ही प्रकारचे ज्ञान प्राप्त करुन पतीसेवेंत रुजु होण्यांस सांगितलेय. वेद हा तीन्ही काळात असल्यामुळे त्यांचे अध्ययन इथे तींस अपेक्षित आहे.


ब्रह्मचर्य पालनाचा अधिकार व वेदग्रहण 
यजुर्वेदामध्ये ३४.१० येथे स्त्रींस विवाहपूर्व ब्रह्मचर्य पालन करून वेदादि षट्शास्त्रांचे अध्ययन करून उत्तम पतींस प्राप्त करण्यांचा आदेश आहे. जर योग्य पती प्राप्त न झाल्यांस तिने आजीवन अविवाहित राहावे व ब्रह्मचर्याचे पालन करावे पण अयोग्य पतींस वरु नये अशी वेदभगवान इथे आज्ञा देतो.
मनुस्मृतीतही "काममरणादिगच्छेद" येथे हाच अर्थ अभिप्रेत आहे. असो त्यांवर सविस्तर लेखामाला भविष्यांत येईलच.


सूर्यदर्शन दीर्घायुसाठी
स्त्रियांनी सूर्याचे दर्शन सतत घेतले पाहिजे व स्वच्छ सूर्यप्रकाशात विचरण केले पाहिजे अशी वेदांची आज्ञा अथर्ववेदांत १४.२.५ येथे आहे. सूर्याची किरणे ही शरीरांस आरोग्यदायक आहेत हे वेदभगवान किती तरी आधीच सांगून ठेवतो, जे आधुनिक विज्ञान आज आम्हांस सांगते. असो..थोडक्यांत स्त्रियांनी स्वच्छ प्रकाशांत राहायला हवं. कोंडून घेता कामा नये. वेदांमध्ये सूर्य-रश्मी चिकीत्साही स्वतंत्रपणे आहेच आहे. कारण सूर्यकिरणांनी अनेक जंतु व कृमी नष्ट होतात असे वेदभगवान स्पष्टपणे अथर्ववेद २.३२.१ येथे सांगतो व रोग नष्ट होतात हे ६.३.८ येथे सांगतो ..म्हणून स्त्रियांनी स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आस्वाद घेतलाच पाहिजे हे आरोग्यदायक सूत्र वेदभगवान सांगतो.

विवाह हा केवळ संतानोत्पत्तीसाठी, शरीरोपभोगासाठी नव्हे.
विवाहाचा दिव्य उद्देश्य वेदांमध्ये केवळ कामवासनेच्या तृप्तीसाठी नसून उत्तम संतान प्राप्ती जी राष्ट्रनिष्ठ व धर्मनिष्ठ असावी, ज्याचे वर्णन वरही केलंय, ह्यासाठीच आहे. स्त्री-पुरुषांनी केवळ ऋतुगामी व्हावं म्हणजे ऋतुकालातच समागम करावी अशी स्पष्ट आज्ञा वेदभगवान देतो. विवाह म्हणजे अनियंत्रित संभोगांचे लायसन्स नाहीये. इंद्रियसंयम हवाच. हा विवेक वेदभगवान सांगतो.

सुखदायिनी सर्वांसाठीच
स्त्री ही सर्व कुटुंबासाठीच सुखदायिनी, सुमंगला, घराची वृद्धी करणारी, सासर्यांस शांति प्रदान करणारी व सासूंस आनंद देणारी व्हावी असे अथर्ववेद १२.२.२६ व १४.२.२७ येथे सांगतो. घरातल्या सर्व नियमांचे उत्तम पालन करणारी अशी होवो.

ईश्वरोपासक स्त्री (अग्निहोत्रादि संध्यादि कर्मे)
अथर्ववेदामध्ये स्त्रींस १४.२.२४ येथे अग्नीची अर्थात ईश्वराची उपासक म्हटलंय. ह्यावरूनच स्त्रींस यज्ञाधिकार व वेदाधिकार स्पष्टय हे सिद्ध आहे. माझ्या द्वितीय लेखांकातही मी तो सिद्ध केलेलाच आहे. विस्तार करत नाही. पण ह्यातून तिलाही ईश्वरोपासनेचा अधिकार स्पष्ट होतो. अग्निहोत्र, संध्यादि कर्मे नित्य करायला हवीत. ह्या अर्थाचे स्पष्ट मंत्र वेदांमध्ये आहेत, विस्तार करत नाही.

सदा आनंदी राहणे
वेदभगवान अथर्ववेदामध्ये १४.२.४३ येथे स्त्रींस सतत आनंदी राहण्याची आज्ञा देतो.

स्त्रियांची भूमिका
ऋग्वेदामध्ये १०.१५९.२ येथे स्त्रींस
अ॒हं के॒तुर॒हं मू॒र्धाहमु॒ग्रा वि॒वाच॑नी ।
ममेदनु॒ क्रतुं॒ पतिः॑ सेहा॒नाया॑ उ॒पाच॑रेत् ॥
मी ज्ञानवती, घराची मुख्याधिकारी, धैर्यशाली व्याख्याती आहे. शत्रुंचा नाश करणारी आहे म्हणून पतीने माझ्या अनुकूल आचरण करावे.
इथे स्त्रीच्या अनुकूल पतीने आचरण करावे अशी स्पष्ट आज्ञा दिलीय. म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या अनुकूल आचरण करायला हवं हेच सर्वत्र स्पष्ट होते.
पुढच्या मंत्रांमध्ये तिचा पुत्र शत्रुनाश करणारा, तिची पुत्री तेजस्विनी व ती स्वत: तेजस्विनी असा आशय आहे.


विवाहाचे वय
आ धे॒नवो॑ धुनयंता॒मशि॑श्वीः सब॒र्दुघाः॑ शश॒या अप्र॑दुग्धाः ।
नव्या॑नव्या युव॒तयो॒ भवं॑तीर्म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेकं॑ ॥
ऋग्वेद - ३.५५.१६
वेदांविषयीच्या स्त्री चिंतनाचा महत्वाचा विषय म्हणजे स्त्रियांच्या विवाहाचे वय ! वेदभगवान स्त्रींस संपूर्ण यौवनावस्था प्राप्त केल्यांवरच विवाहांस पात्र समजतो, आधी नाही. मनुस्मृतीतही "त्रीणि वर्षाण्युदीक्षेत्" ह्या श्लोकांतही मासिक धर्म प्राप्त झाल्यानंतर तीन वर्षांनंतर विवाह करायची आज्ञा आहे. ह्यांस सुश्रुतस्थानाचेही प्रमाण आयुर्वेदांतले आहेच आहे. त्यांवर सविस्तर कधीतरी लिहीनच. पण तूर्तांस बालविवाह निषेध ऋग्वेद तरी करतोच करतो हे सांगणे न लगे. स्त्रींस योग्य यौवनावस्था प्राप्त झाल्यांवरच तिने विवाह करावा व तोही योग्य पतीशींच.
थोडक्यांत उपरोक्त लेखनांतून स्त्रियांविषयीचे धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, पराक्रमी, शूर, पतीचे हित करणारी, सम्राज्ञी पदाची पात्रता धारण करणारी, ईश्वरोपासक, संध्यादि कर्मे नित्य करणारी, पवित्रता प्राप्त असलेली, सौभाग्यवती, सर्वांचे कल्याण करणारी, ब्रह्मचर्य पालन करणारी इंद्रियसंयमी, सदाचारयुक्त भाषणादि आचार संपन्न अशी, संघटन कुशल अशी, ज्ञानवती, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे गुणवैशिष्ट्यांचे चिंतन आपणांस प्राप्त झालेले आहे.
पुढील लेखांत आणखी सविस्तर चिंतन करुच.
तूर्तांस लेखणींस विराम !
भवदीय,
तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#स्त्रीदर्शन