Friday, 20 October 2017

बळी वामनाची वास्तवकथा - असत्याचे वस्त्रहरण


धर्माचे पालन, करणे पाषांड खंडन !
हेंचि आम्हा करणें काम, बीज वाढवावें नाम !
तुकोबाराय

सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या पाडव्याच्या नैका: हार्दा: शुभाशया: ! 

एक असत्य सहस्त्रवेळा सांगितले की ते सत्य वाटायला लागते ह्या गोबेल्स तंत्राप्रमाणे एरवी सर्व धर्मेतिहास थोतांड असला तरी हेतुपुरस्सर प्रतिवर्षी दीपावली आली पाडवा आला की बळी वामनावताराची मूळची सूर्याची रुपक कथा, जी पुराणांनी अकारण ऐतिहासिक करून विपर्यस्त केली, त्या कथेंस आपल्या टीपिकल ब्रेकिंग इंडिया प्रक्रियेसाठी फोडा नि झोडा ह्या अनीतीसाठी तिचा विपर्यांस करून ब्राह्मण-विरुद्ध ब्राह्मणेतर, तथाकथित बहुजन, आर्य-अनार्य वाद पेटवित राहणे हे सांप्रतचे धंदे आपणांस समाजमाध्यमांतून तर नेहमीच पहायला मिळतात. त्यावर काहींनी तर म्हणे ग्रंथनिर्मितीही केली आहे.
वस्तुत: ह्या वामनाच्या कथेतल्या बळीराजाचा शेतकर्यांशी काडीमात्र संबंध नसताना तो जोडला जाऊन ह्या कथेतून ब्राह्मण वर्ग हा शेतकर्यांशीच द्रोही आहे असे ठासविण्याचा विकृत हेतु सांप्रत लेखनांतून सतत सुरु आहे. 

शेतकर्याला बळीराजा म्हणायचेच असेल तर त्यांचा संबंध भगवान श्रीकृष्णांचे थोरले बंधु बलराम दादांशी जोडायला हवाय ज्यांच्या हातात आपण सदैव हल म्हणजे नांगर पाहतो. त्यांची गदा हल म्हणजे नांगर ही प्रमुख आयुधे आहेत. पण हेतुपुरस्सर त्याचा संबंध बळी वामनाच्या कथेशी जोडून भेदनीती अवलंबिली जातीय, त्याचे खंडन करण्यासाठी ह्या कथेचा नेमका परामर्श घेण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच ! 

वामनावताराची पुराणांतली कथा ही मूळ वैदिक रुपक कथेचे ऐतिहासिक अलंकारिक रुपांतर आहे.

पुराणांतली कथा आम्ही इथे सांगत बसत नाही ती सर्वांस परिचित आहे. तेंव्हा ही कथा मूळची ऋग्वेदांतली पहिल्या मंडलातली २२ व्या १५४ व्या सूक्तांमधील ऋचेंवरून घेतली आहे, ज्यात तो सूर्य अर्थात विष्णु ह्या तीन गोष्टींना आपल्या तीन पाऊलांत व्यापतो. ज्यात ही तीन पाऊले म्हणजे दिवसाचे तीन सकाळ, सायंकाळ रात्र असे तीन भाग किंवा विश्वाचे पृथ्वी, आकाश पाताळ असे तीन भाग ह्या अर्थाने आहे. ही सूर्यकिकरणांनी व्यापिलेल्या ह्या तीन भागांची रुपक कथा ऋग्वेदामध्ये आहे. ह्या तीन पाऊलांत तो सूर्य अर्थात विष्णु सर्व विश्व व्यापितो. ते मूळ पाच मंत्र पाहुयांत.

अतो॑ दे॒वा अ॑वंतु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे  पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः १६
इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दं  समू॑ळ्हमस्य पांसु॒रे १७
त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः  अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् १८
विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे  इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ १९
तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यंति सू॒रयः॑  दि॒वी॑व॒ चक्षु॒रात॑तं २०
तद्विप्रा॑सो विप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दं २१

ह्या पाचही मंत्रांचा अर्थ सायण नावाच्या भाष्यकारानुसार सांगायचा तर विष्णूने अर्थात सूर्याने ह्या संसारास तीन पाऊलांनी व्यापिलं आहे. इथे सायणाचार्यांचे भाष्य आपण अभ्यासले तर इथे अकारण वामनावताराची मनगढन्त कल्पना केली आहे. वेदांमध्ये कोणत्याही अवताराची कथा नाहीये. पण पुराणांमध्ये ती आलीय. 
आता १५४ वं पूर्ण सूक्त पाहुयांत.
विष्णो॒र्नु कं॑ वी॒र्या॑णि॒ प्र वो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजां॑सि  यो अस्क॑भाय॒दुत्त॑रं स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यः
प्र तद्विष्णुः॑ स्तवते वी॒र्ये॑ण मृ॒गो भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः  यस्यो॒रुषु॑ त्रि॒षु वि॒क्रम॑णेष्वधिक्षि॒यंति॒ भुव॑नानि॒ विश्वा॑
प्र विष्ण॑वे शू॒षमे॑तु॒ मन्म॑ गिरि॒क्षित॑ उरुगा॒याय॒ वृष्णे॑   इ॒दं दी॒र्घं प्रय॑तं स॒धस्थ॒मेको॑ विम॒मे त्रि॒भिरित्प॒देभिः॑
यस्य॒ त्री पू॒र्णा मधु॑ना प॒दान्यक्षी॑यमाणा स्व॒धया॒ मदं॑ति   उ॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वीमु॒त द्यामेको॑ दा॒धार॒ भुव॑नानि॒ विश्वा॑
तद॑स्य प्रि॒यम॒भि पाथो॑ अश्यां॒ नरो॒ यत्र॑ देव॒यवो॒ मदं॑ति । उ॒रु॒क्र॒मस्य॒ हि बंधु॑रि॒त्था विष्णोः॑ प॒दे प॑र॒मे मध्व॒ उत्सः॑
ता वां॒ वास्तू॑न्युश्मसि॒ गम॑ध्यै॒ यत्र॒ गावो॒ भूरि॑शृंगा अ॒यासः॑ अत्राह॒ तदु॑रुगा॒यस्य॒ वृष्णः॑ पर॒मं प॒दमव॑ भाति॒ भूरि॑
ह्या सूक्ताचा संक्षेपांत अर्थ पहायचा म्हटला तर मी त्या विष्णूचे अर्थात सूर्याचे वर्णन करतो ज्याने तीन पाऊलांत समग्र विश्व व्यापिले आहे आकाशांस स्थिर केले आहे. ज्याने पृथ्वी, द्युलोक समस्त भूवनांस धारण करून ठेवलेलं आहे, ज्याने निर्माण केलेल्या औषधी, अन्नादिंनी मनुष्याचे पोषण होते, त्यांस मी वंदन करतो.

इथे विष्णु म्हणजे दुसरे कुणीही नसून तो सूर्य ह्या अर्थाने आहे. सूर्य तीन पाऊलांनी तीन भूवने व्यापितो ह्याचाच अर्थ विष्णूची तीन पाऊले आहेत.

आश्चर्य म्हणा किंवा शोकांतिका म्हणा

ह्या संपूर्ण मंत्रांमध्येच काय पण चारीही वेदांमध्ये कुठेही बलीचा साधा किंवा पुसटसा उल्लेखही नाहीये. नाही म्हणजे ना आणि ही. तरीही पुराणांनी ही मनगढन्त कथा का रचली त्यासाठी व्यासांचा नावाचा बळी अकारण का दिला हेच कळत नाहीये. असो त्यावर कधीतरी सविस्तर भाष्य करुच.

ऋग्वेदांतले आणखी काही मंत्र जिथे जिथे ह्या तीन पाऊलांच्या विष्णु म्हणजे सूर्याच्या तीन पाऊलांच्या कथेचा वामनावताराशी वरवरपाहता अर्थ प्रतिध्वनित होतोय असा भ्रम होतो. ऋग्वेद .११५.,.४९.१३,.१००.४८.१२.२७ ह्या सर्वांत अन्यत्र "उरुगाय", " विचक्रमे", उरुक्रम:, मिमान:,  रजसो विमान:, पार्थिवानि विममे आदि मंत्रांमध्ये देखील हेच विष्णुच्या त्रिपाद विक्रमाचे संदर्भ आहेत. अन्य तीन वेदांतले मंत्रही ह्याच प्रकारचे असून तिथेही विष्णुच्या अर्थात सूर्याच्या किंवा परमेश्वराच्या त्रिपाद विक्रमाचे वर्णन आहे. विस्तारभयास्तव ते वर्णित नाही.

आता भाष्यकारांचे अर्थ पाहुयांत.

स्कंदस्वामी नावाचे ऋग्वेदांवरचे सर्वात प्रथम भाष्यकार ह्याचा मुख्यत: इतिहासपरक गौणत: सूर्यपरक असा दोन्ही अर्थ करतात. इतिहासपरक अर्थ करताना ते  सप्तधाम अर्थात पृथ्वीचे सात द्वीप असा अर्थ करतात. .२७.२० ह्या मंत्राचा अर्थ प्रकट करताना स्कंदस्वामी सूर्यपरक अर्थ करतात त्यात विष्णु हा सूर्य असून जो प्रत्यही विक्रमण करतो उदय, मध्यान्ह अस्त ही त्याची तीन पाऊले आहेत असा रुपक अर्थ प्रकट करतात. ते तीन लोकांची आणखी कल्पना करताना अग्नीरुप पृथ्वीस, विद्युतरुप अंतरिक्षांस सूर्यरुप द्युलोकांस व्यापतो असे रुपक करतात. यजुर्वेदभाष्यकार उव्वट महीधर हे वामनावतारच मानतात. 
वेंकटमाधव हे भाष्यकार ह्या मंत्रांचा अध्यात्मपरक सूर्यपरक अर्थ करतात. त्यांच्या मते विष्णु हे परमपद यज्ञ असून सप्तछंद हे सप्त धाम आहेत, मनुष्यांच्या  कर्मांचे बंधन हे ह्या विष्णूचे खरे कर्म आहे. सूर्यपरक अर्थामध्ये ते विष्णूंस इंद्राचा नियोज्य सखा आकाशांत पसरलेले तेज हे परमपद असा अर्थ घेतात.
मुद्गल नावाचे भाष्यकार ह्याचा अध्यात्मपरक अर्थ करताना ईश्वरांस जगताचा पालक, रक्षक सांगतात. त्रेधा ह्या शब्दांवरून ईश्वर हा कर्ता, धर्ता संहर्ता रुपांत आहे हे सांगतात. गायत्र्यादि सात छंद हे सप्तधाम आहेत असा अर्थ ते करतात.

जिज्ञासूंनी ह्या तीन्ही भाष्यकारांचे भाष्य निम्नलिखित संकेतस्थलांवरून संग्राह्य करून प्राप्त करावे. करावे. https://archive.org/details/RigVeda31 इथे ते प्राप्त होईल.



वेदहर्षी श्रीमत्स्वामी दयानंदांचा अर्थ 

वेदांवरचे  षड्वेदांगाना अनुकूल असे आजपर्यंतचे सर्वोत्तम भाष्यकार वेदादिधर्मशास्त्राविषयीच्या अनेक भ्रांतींचे निवारण करणारे वेदोद्धारक ऋषिश्रेष्ठ, ज्यांची पुण्यतिथी कालच अमावस्येंस झाली, ते आपल्या ऋग्वेद भाष्यामध्ये उपरोक्त मंत्रांचा अर्थ अध्यात्मिक करतात विष्णुंस संसारांत व्याप्त असण्याने निराकार परमेश्वराचे द्योतक मानतात. ते "त्रेधा निदधे पदम्" ह्या "विष्णुुपद" ह्याचा संबंध सृष्टीरचनेच्या संदर्भात लावताना परमेश्वर आपल्या पायांनी अर्थात प्रकृती, परमाणु आदि सामर्थ्याच्या अंशाने सर्व जगांस तीन स्थानांमध्ये धारण करतो असा व्यापक अर्थ करतात. 

निरुक्तकार यास्कांचा अर्थ 

षड्वेदांगापैकी एक प्रमुख अशा निरुक्तामध्ये विष्णुपद ह्या विषयांवर यास्कमूनीसुद्धा परमेश्वराने सृष्टी बनविताना तीन प्रकारची रचना दाखवितात असा अध्यात्मपरक अर्थच केला आहे. 

वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकर सुद्धा ह्या मंत्रांचा परमात्मपरक अर्थच लावताना परमात्मा सप्तधामांमध्ये अर्थात पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, तन्मात्रा, महत्तत्व ह्या सात तत्वांत व्याप्त होऊन पराक्रम दर्शवितो असा अर्थ प्रकट करतात. सात्विक, राजस तामस ह्या तीन भेदांनी क्रमश: द्युलोक, अंतरिक्ष भूलोक हे तीन पाद अर्थात पाय आहेत असा अर्थ करतात. 

जयदेव शर्मा विद्यालंकार ह्यांनी देखील परमात्मपरक अर्थच केला आहे. जास्ती कशाला अहो परकीय अशा पाश्चात्य भाष्यकार मैक्सम्युलर, मैक्डौनेल, कीथ, ग्रिफीथ हे देखील विष्णूंस सूर्य मानूनच अर्थ प्रकट करताना आपल्याला दिसतात.


मग हे वामनाचे स्वरुप आले कुठून???

तर तैत्तिरीय संहितेमधून ..३१ येथून. ह्यानंतरच सर्व परवर्ती भाष्यकारांनी ह्याचा अर्थ अकारण वामनावताराची जोडला आहे.  अर्थात पुराणांनी अकारण बळीला मध्येच घुसडले आहे जे ह्या आधीच्या उपरोक्त ग्रंथांत कुठेही उल्लेखिलेले नाहीये.


वेदांवरचे व्याख्यानरुपी असे ब्राह्मणग्रंथांतील वर्णन

शतपथ ब्राह्मण ह्या ग्रंथामध्ये ह्याचा अर्थही विस्ताराने वर्णिताना विशुद्ध असा यज्ञपरक केला असून विष्णु हे यज्ञाचे स्वरुप असून यज्ञीय देवता असाही केला आहे. "वामनो हि विष्णुरास:" असे ... येथे शतपथामध्ये म्हटले आहे. "यो वै विष्णु: यज्ञ:" (...) येथे "विष्णुर्वैयज्ञ:" असे ऐतरेय, तांड्य, तैत्तिरीय ब्राह्मण गोपथ ब्राह्मणामध्येही म्हटलेलं आहे. 

निरुक्तामध्ये विष्णु शब्दाचा अर्थ पदार्थांमध्ये व्याप्त प्रविष्ट गुण अशा अर्थाने आहे. त्याची व्युत्पत्ती निम्नलिखित आहे.

विष्लृ- व्याप्तौ, विश-प्रवेशने, वि पूर्वक अशूङ्-व्याप्तौ धातु पासून हा विष्णु शब्द सिद्ध होतो. निरुक्तावर भाष्यकरताना दुर्गाचार्य, ज्याचे "निरुक्ताचे मराठी भाषांतर" नावाने भाषांतर इतिहासाचार्य राजवाड्यांचे बंधु वैजनाथ काशिनाथ राजवाड्यांनी केलंय, जे पीडीएफ उपलब्धही आहे, त्यातही सूर्य हाच अर्थ दुर्गाचार्य करतात. भगवद्दत्त रिसर्च स्कौलर शिवनारायण शास्त्री हे निरुक्तभाष्यकारही हाच अर्थ घेतात. 

शौनकाच्या बृहद्देवतेमध्ये सूर्याच्या नावांची व्युत्पत्ती सांगताना 
विष्णातेर्विशतेर्वा स्याद् वेवेष्टेर्व्याप्तिकर्मण: !
विष्णुर्निरुच्यते सूर्य: सर्वं सर्वान्तरश्च : !
.६९
अर्थ - विष्णु हा शब्द व्यापणारा ह्या अर्थाने विष्णूची त्या सूर्यस्वरुपांत व्याख्या केलीय जो सर्व काही सर्वव्याप्त आहे.

उपनिषदांमध्येही व्यापक परमात्मा असा अध्यात्मपरकच अर्थ आहेकाठक संहिता /, मैत्रायणी .२६, .१६, ., तैत्तिरीय .. येथेही हेच वर्णन आहे. म्हणजे उपनिषदे देखील हाच व्यापक अर्थ प्रकट करतात.


आता लौकिक साहित्यातला अवतारपरक अर्थ कुठे कुठे आहे ते पाहुयांत.

रामायणामध्ये, महाभारतामध्ये तीन वेळा, पुराणांमध्ये तर अतिरंजित असा आहे. अर्थातच तो प्रक्षेप आहे हे सिद्ध आहे. विस्तारभयास्तव आम्ही ते सर्व संदर्भ देऊ शकत नाही. जिज्ञासूंनी ते पहावेत. क्षमा. 

ह्या सर्वांच्या विवेचनाचा निष्कर्ष काय????

ऋग्वेदामध्ये कुठेही विष्णुसाठी वामन शब्दाचा प्रयोग नाहीये बळीचे नावही नाहीये ! आम्ही वरही सांगितलंय की बली हा शब्दही चारी वेदांच्या संहितांमध्ये नाही म्हणजे नाहीच. 

वैदिक साहित्यापासून पौराणिक साहित्यापर्यंत ह्या आख्यानाचे अर्थ किती बदललेले आहेत उत्तरोत्तर ते किती विकृत होत गेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच वैदिक मंत्रावरून जे तसा अवतारपरक ऐतिहासिक अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात ते सर्व लोक चूकीच्या दिशेवर आहेत हे सांगण्यांस कोणताही प्रत्यवाय नाहीये. 

वामन हे नाव त्याच्या रुपाची प्रेरणा कल्पना तैत्तिरीय संहिता ब्राह्मणग्रंथ, जे वेदांवरची व्याख्यानरुपी ग्रंथ आहेत हे आम्ही अनेकवेळा सांगत आलोय, त्या ब्राह्मणग्रंथांमध्येदेखील हे सर्व वर्णन केवळ आख्यानस्वरुपाने आलंय. कारण ब्राह्मणग्रंथांची शैली ही मूळातच आख्यानात्मक रुपकात्मक आहे. ती अलंकारिक आहेत्यामुळे त्यामध्ये ह्या वर्णनांत ऐतिहासिक पक्ष सिद्ध होत नाहीच नाही. आमच्या आधीच्या आचार्य शंकराचार्यांच्या लेखातही आम्ही वेदांमध्ये नित्यपक्ष सिद्ध केला आहे.



आर्याक्रमण सिद्धांत सप्रमाण खोडणार्या एका मुख्यमंत्र्यांच्या ग्रंथांचा संदर्भ


डॉ. संपूर्णानंद हे नाव अनेकांनी ऐकलं असेल. ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. अतिशय विद्वान मनुष्य ! त्यांनी
यह आर्योंका आदि देश है 
नावाने जो ग्रंथ लिहिलाय, त्यात पृष्ठ क्रमांक २०३ वर वैदिक आख्यान मांडताना ह्या कथेवर भाष्य करताना
सूर्य का पहिय्या विष्णु के तीन पाद ह्या शीर्षकाखाली ही पूर्ण वेदांतली कथा कशी रुपक कथा आहे पुराणांनी अकारण त्याचे कसे ऐतिहासिक रुपांतर करून विपर्यांस केलाय हे सविस्तर लिहिलं आहे. तो ग्रंथ पीडीएफ उपलब्धही आहे. जिज्ञासूंनी तो वाचावा ही विनंती.


अंतिम निष्कर्ष 

पूर्वोक्त आख्यान हे दोन स्वरुपांत आपणांस पाहता येईल.
. प्रकृतीपरक अर्थात सूर्याच्या स्वरुपांत
. रुपक अलंकांरिक अर्थात परमात्मस्वरुपामध्ये

. ह्यात प्रकृतीपरक अर्थ घेणार्यांमध्ये निम्नलिखित भाष्यकार आणखी सांगता येतील.
अधिकांश भारतीय तथा पाश्चात्य भाष्यकार जसे यास्कमूनी, शाकपूणि, और्णवाभ, मेधातिथी, शौनक, स्कंदस्वामी, वेेंकटमाधव, लोकमान्य टिळक, मैक्सम्युलर, मैक्डोनल, कीथ, ग्रिफीथ, बेर्गेन, !
डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण त्यांच्या "इंडियन फिलॉसॉफी"ह्या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये ४९५ पृष्ठांवर सूर्यच अर्थ घेतात. डॉ. बलदेव उपाध्याय त्यांच्या "वैदिक साहित्य  और संस्कृती" ह्या ग्रंथामध्येही सूर्यच अर्थ घेतात. डॉ. एस एन दासगुप्ता देखील आदित्य असाच अर्थ घेतात (दि हिस्टरी एफ इंडियन फिलॉसौफी भाग द्वितीय, पृष्ठ ५३५). डॉ. रामचंद्र मजुमदार हे नामवंत इतिहासकारही सूर्याचेच प्रतीक असा अर्थ घेतात. 

. अध्यात्मपरक अर्थात परमात्मवाचक अर्थामध्ये महर्षि दयानंद, मुद्गल, जयदेव शर्मा विद्यालंकार, सातवळेकर, महर्षी अरविंदसुद्धा. 


मग आता पुराणांमधल्या वामनावताराच्या कथेचं काय???

तर ही कथा रुपक अर्थाने आहे हे स्पष्ट होत असून त्यात झालेली अत्युक्ती ही त्याज्य असून जरी ती स्वीकारायची म्हटली तरी ती ऐतिहासिक अर्थाने घेता अध्यात्मपरक रुपक अर्थाने घ्यावी हीच विनंती ! 

शेवटचे 

ज्या ब्रेकिंग इंडिया फोर्सेसना ह्यात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, आर्य विरुद्ध अनार्य, बहुजन वगैरे भिकार नि टुकार वाद रंगवायचे असतील त्यांनी ते खुशाल रंगवावेत द्वेष पसरवत राहावा. एरवी सर्व पुराणे, रामायणं महाभारत वगैरे तुम्हाला थोतांड असतं, काल्पनिक असतं. पण ह्याच तुमच्या कल्पनेतल्या कथांचा उपयोग स्वत:च्या विकृत मानसिकतेसाठी वारपण्याची धंदेवाईक कला तुम्हांसच यावी हो. कारण तुम्हाला तसेही काही काम आहेच कुठे??? समाज जोडायचा का की तो तोडायचा हे ठरविण्यांस वाचक सूज्ञ जिज्ञासू आहेत. जास्ती काही लिहित नाही.


तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते 
गुण अवगुण निवाडा, म्हैस म्हैस रेडा रेडा !
हा तो निवाड्याचा ठाव, खर्या खोट्या निवडी भाव !
अंगे उणे त्याचे बसे टाळक्यांत, काय करु म्हणे आम्ही धक्का खवंदासि लागतसे !
जगद्गुरु तुकोबाराय

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
#बळी_वामन_वामनावतार_ब्राह्मण_ब्राह्मणेतर_भेदनीती_वस्त्रहरण

Tuesday, 3 October 2017

रावणाचे उदात्तीकरण कधी थांबणार ???




न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् !
गीता
सर्वप्रथम सर्वांस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
काय विकृती वैचित्र्य आहे आपल्या देशात ! एकीकडे रामायण-महाभारत हे थोतांड आहे, काल्पनिक आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यातलेच काही पात्रे घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी विकृतींचे उदात्तीकरण करायचे ! प्रतिवर्षी दसरा अर्थात विजयादशमी समीप आली की काही लोकांची कोल्हेकुई सुरु होते रावण उदात्तीकरण करण्याची ! एरवी रामायण काल्पनिक बरंका ह्यांनाच ! आणि दुर्दैव हे की सांप्रत समाज माध्यमांवर (सोशल मेडिया) वर तर स्वघोषित ब्रेकिंग इंडिया अभ्यासक आणि संशोधक इतके झाले आहेत की बोलायलाच नको. दुर्दैव हेच की सर्वसामान्य मनुष्य कधीच मूळ साहित्य वाचत नसल्याने तो सहजपणे ह्या भ्रमांस बळी पडतो ! म्हणूनच हा लेखनप्रपंच !
वस्तुत: हे सर्व करण्यामागे एक षड्यंत्र तर आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आर्य-विरुद्ध अनार्य किंवा मूलनिवासी- बाहेरचे असला बालिश नि भंपक नि थोतांड सिद्धांत पुन:पुन: माथी मारून समाजमन भडकविणे व आपली पोळी भाजून घेणे. हेतुपुरस्सर बुद्धिभेद करणे व सामाजिक स्वास्थ्य बिघडविणे हा आपला टीपिकल ब्रेकिंग इंडिया अजेण्डा राबविणे हा सर्वात महत्वाचा हेतु ह्या लोकांचा आहे. असो.
रावणाच्या उदात्तीकरणाची फैशन
म्हणे तो संयमी होता, त्याला पश्चाताप झाला होता, सीतेला त्याने कधीही स्पर्श नाही केला म्हणून तो श्रेष्ठ होता म्हणे, त्याने बहिणीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी कशाचीही पर्वा न करता रामाशी शत्रुत्व घेतले वगैरे (त्याचे भगिनी प्रेम म्हणे). वगैरे वगैरे !
आता शंभरातल्या ९८ वांनी आयुष्यात वाल्मीकि रामायण कधीच मुल संस्कृत आणि अनुवादही वाचला नसल्याने लगेचच असल्या संदेशांवर विश्वास बसतो आणि लोक लगेचच ते गावभर पसरवितात. अर्थात ह्यात त्यांचा दोष जरी नसला तरी म्हणूनच ह्या बुद्धीभेदाचे हा निवारण प्रपंच !

रावणासारखा बलात्कारी व पापी केवळ तोच !
अरण्यकांड अध्याय ३८ मध्ये मारीच राक्षसाने सीतेच्या अपहरणाचा निर्णय अत्यंत घातकी आणि कुलविनाश करणारा आहे असे एकदा सांगितल्यावर रावण परत लंकेस गेला. परंतु शुर्पणखेने त्यांस फूस लावून परत सीतेच्या लोभासाठी तिचे अपहरण परत करायला सांगितले. आणि ४० व्या अध्यायामध्ये पुन्हा तो मारिचाकडे गेल्यावर त्याने पुनश्च एकदा रामचंद्राची महती गाऊन परस्त्रीहरण हे जगातले सर्वोच्च पाप आहे आणि ते संपूर्ण कुलाचा नाश करील हे सांगूनही रावणाने त्याचे ऐकले नाही. अरण्यकांडा मध्ये हे सर्व संवाद आहेत. पण लोक कधीच वाचत नाही. बरं पुन्हा भविष्यात त्याला आजोबांनी, मंत्रींनी, बायकोने आणि सर्व भावांनी सांगूनही तो सीतेचा त्यागच करत नाही ह्याचे काय ??? रावणाने किती स्त्रियांवर बलात्कार केले ह्याची उदाहरणे रामायणात जागोजागी आहेत.
असा मनुष्य संयमी आणि विवेकी असू शकतो का ???

त्याला पश्चाताप झाला होता का ???
सर्वांनी सांगून आणि पुढे युद्धात सर्व हरवून आणि कुलाचा नाश बघूनही त्याला मरेपर्यंत पश्चाताप झालेला नाहीये. तरीही लोक काहीच्या काही फालतू लेख समाज माध्यमांवर फिरवितात. इथे जाताजाता एक सांगणे आवश्यक आहे की तो मृत्युशय्येवर असताना म्हणे रामचंद्राने ज्ञानार्जनासाठी लक्ष्मणांला त्याकडे पाठविले व त्यानेही त्यांस उपदेश केला वगैरे वगैरे कथा निव्वळ भंकप आहे, तद्दन असत्य नि निराधार. कारण एवढीच अक्कल आधी असती तर का ऐकलं नाही? सर्व कुलाचा नाश का केला???
ती कथा कुणीतरी रामचंद्रांचे महिमामंडन करण्यासाठीच घुसडलीय हे सिद्ध आहे. असो.

म्हणे सीतेला त्याने कधीच स्पर्श केला नाही ???
अरे मूर्खांनो, मग तिला त्याने लंकेस नेले कसे ??आपोआप गेली का ती ??? अरण्यकांड ४९वा अध्याय तिला कसे घेऊन गेला ते सांगतो.
वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः ।
ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना ॥ १७ ॥
अर्थ - त्याने डाव्या हाताने कमलनयनी सीतेच्या केसासहित तिचे मस्तक पकडले आणि उजवा हात तिच्या दोन्ही मांड्यांच्या पाठमागून खाली घालून त्या द्वारे तिला उचलले. ॥१७॥
ह्या स्पष्ट वर्णनाविषयी पाठकांनी आम्हांस क्षमा करावी पण सत्य सागणे आवश्यक आहे. ह्या पूर्ण अध्यायांत आणि आधीच्याही अध्यायात रावण किती काममोहित झाला होता हे अनेकवेळा लिहिले आहे. पुढेही पूर्ण रामायणांतच त्यांस अनेकवेळा कामांध म्हटलंय. पण हे लोक त्यांस संयमी म्हणतात ??? काहीही खोटे का पसरविता लोकहो ????

बहिणीवर प्रेम करणारा रावण आदर्श ???
गेली कित्येक वर्षे एक संदेश फिरतोय ज्यात एक मुलगी आपल्या आईला रावणासारखा भाऊ पाहिजे म्हणते. का तर म्हणे त्याने बहिणीच्या प्रेमाखातर हे सर्व केले ??? खरंतर त्याचं आंग्ल भाषेत सविस्तर नि सप्रमाण संवादात्मकच खंडण मी केंव्हाच केलंय. पण अशा पढतमूर्खांना विचारावंसं वाटतं की आपण रामायण कधी वाचले आहे का ? ह्याच रावणाने तिच्या नवर्याचा वध करून तिला विधवा केले होते हे किती जणांना माहिती ??? उत्तरकांडांत हा संदर्भ २३ वा अध्याय १८ वा श्लोक येथे आहे. तलवारीने त्याने तिच्या पतीचा वध केला आणि म्हणे बहिणीवर प्रेम ??? बरं हीच शूर्पणखा पुढच्या २४ व्या सर्गात रावणांला दोष देताना विलाप करते. हे असले बहीणीवरचे प्रेम??? वस्तुत: उत्तरकांड प्रक्षिप्त असले तरीही आधीच्या अरण्यकांडात ती विधवा आहे असे स्पष्ट संदर्भ आहेतच. मग तिला विधवा केलं कुणी???
त्यामुळे हे प्रेम वगैरे काही नसून त्याच्या मनात तिने भरविलेली ती सीतेविषयी ती अभिलाषा आणि वासना कारणीभूत आहे ! तो पूर्ण अध्याय नीट वाचला तरी कळेल. पण वाचणार कधी नि कोण???

रावण हा लंपटच होता हे तो स्वतः मान्य करतो
सीतेच्या अपहरणावेळी तो तिला म्हणतो की मी आजपर्यंत अनेक स्त्रियांचे अपहरण केले आहे. अरण्यकांड - अध्याय ४७
बह्वीनामुत्तमस्त्रीणामाहृतानामितस्ततः ।
सर्वासामेव भद्रं ते ममाग्रमहिषी भव ॥ २८ ॥
अर्थ - मी इकडून- तिकडून बर्याच सुंदर स्त्रियांना हरण करून आणलेले आहे. त्या सर्वांमध्ये तू माझी पट्टराणी बन. तुझे भले होवो. ॥२८॥
ह्याचा अर्थ काय ??? संयम कि लंपटपणा???

आता स्वतः मंदोदरी रावण मेल्यावर त्याविषयी काय म्हणते बघा 👇👇👇
क्रियतामविरोधश्च राघवेणेति यन्मया ।
उच्यमानो न गृह्णासि तस्येयं व्युष्टिरागता ।।
अर्थ - मी तुम्हाला आधीही सांगितले होते कि तुम्ही श्रीरामाशी वैर धरू नका पण तुम्ही माझे ऐकले नाही. आज त्याचेच फल आपणांस मिळाले आहे.
वसुधायाश्च वसुधां श्रियः श्रीं भर्तृवत्सलाम् ।
पतिव्रतायास्तपसा नूनं दग्धो ऽसि मे प्रभो ।।
अर्थ - सीता ही पृथ्वीपेक्षा क्षमाशील, समस्त संपदांची अधिष्ठात्री देवी आणि पतिव्रता स्त्री आहे. हे स्वामी निश्चयच आपण ह्या पतिव्रतेच्या तपाने भस्म झालेले आहात
सर्वथा सर्वभूतानां नास्ति मृत्युरलक्षणः ।
तव तावदयं मृत्युर्मैथिलीकृतलक्षणः ।।
अर्थ - ह्या जगात कुणीही अकारण मरत नाही त्यामुळे ही सीताच आपल्या मृत्यूचे कारण आहे. ह्यापेक्षा आणखी स्पष्टीकरणं हवंय???? पतीव्रतेच्या तपाने हे शब्द काय सांगतात???

काय तर म्हणे सीता रामांस पवित्र मिळाली हे रावणाचे श्रेष्ठत्व म्हणे !

कोण म्हटलं? रावण सीतेंस म्हणतो की जर तु मला प्राप्त झाली नाहीस तर मी तुला खाऊन टाकेन. काय होतो ह्याचा अर्थ??? ही धमकी संयमी पुरुषाची आहे का??? बरं तो नरमांसभक्षक होता हे अनेक ठिकाणी स्पष्ट केलंय. ही राक्षसवृत्तीची सर्व चिन्हे दृष्टिगोचर होतात रामायणांत.

बलात्कारी रावण व त्याचा शाप 👇
युद्धकांडातच १३ व्या सर्गामध्ये बलात्कारी रावणाने आपल्या आधीच्या बलात्काराची घटना व त्याला मिळालेला शाप कसा सांगितलाय ते बघा. रावणाने पुंजिकस्थला अप्सरेशी केलेला बलात्कार व त्याला मिळालेला ब्रह्मदेवाचा शाप
महापार्श्व निबोध त्वं रहस्यं किञ्चिदात्मनः ।
चिरवृत्तं तदाख्यास्ये यदवाप्तं पुरा मया ॥ १० ॥
अर्थ - महापार्श्व ! बरेच दिवस झाले, पूर्वकाळात एक गुप्त घटना घडली होती- मला शाप प्राप्त झाला होता. आपल्या जीवनांतील हे गुप्त रहस्य आज मी सांगत आहे, ते ऐक. ॥१०॥
पितामहस्य भवनं गच्छन्तीं पुञ्जिकस्थलाम् । 
चञ्चूर्यमाणामद्राक्षं आकाशेऽग्निशिखामिव ॥ ११ ॥
अर्थ - एक वेळ मी आकाशात अग्निशिखेप्रमाणे समान प्रकाशित होत असलेल्या पुञ्जिकस्थला नामक अप्सरेला पाहिले जी पितामह ब्रह्मदेवांच्या भवनाकडे जात होती. ती अप्सरा माझ्या भयाने लपत-छपत पुढे जात होती. ॥११॥
सा प्रसह्य मया भुक्ता कृता विवसना ततः । 
स्वयम्भूभवनं प्राप्ता लोलिता नलिनी यथा ॥ १२ ॥
अर्थ - मी बळपूर्वक तिचे वस्त्र उतरविले आणि हट्टाने तिचा उपभोग घेतला. त्यानंतर ती ब्रह्मदेवांच्या भवनात गेली. तिची दशा हत्तीद्वारा तुडवून फेकल्या गेलेल्या कमलिनी प्रमाणे झालेली होती. ॥१२॥
तस्य तच्च तथा मन्ये ज्ञातमासीन्महात्मनः । 
अथ सङ्कुपितो वेधा मामिदं वाक्यमब्रवीत् ॥ १३ ॥
अर्थ - मी समजतो की माझ्याकडून तिची जी दुर्दशा केली गेली होती ती पितामह ब्रह्मदेवांना ज्ञात झाली. यामुळे ते अत्यंत कुपित झाले आणि मला याप्रकारे बोलले- ॥१३॥
अद्यप्रभृति यामन्यां बलान्नारीं गमिष्यसि । 
तदा ते शतधा मूर्धा फलिष्यति न संशयः ॥ १४ ॥
अर्थ - आजपासून जर तू कोणा दुसर्‍या नारीशी बळपूर्वक समागम करशील तर तुझ्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील, यात संशय नाही. ॥१४॥
इत्यहं तस्य शापस्य भीतः प्रसभमेव ताम् । 
नारोहये बलात् सीतां वैदेहीं शयने शुभे ॥ १५ ॥
अर्थ - याप्रकारे मी ब्रह्मदेवांच्या शापामुळे भयभीत आहे म्हणून आपल्या शुभ शय्येवर वैदेही सीतेला बलाने चढवत नाही आहे. ॥१५॥
हा भेकड नि लंपट रावण आहे हे तो स्वत:च मान्य करतोय आणि काही लोक त्याला फार पराक्रमी समजतात. तो स्वत: स्पष्टपणे मान्य करतोय की तो सीतेला उपभोगिल तर त्याच्या मस्तकाचे शंभर तुकडे होतील. ह्या शापानेच तो घाबरला होता. आणि हे येडे लोक्स म्हणतात म्हणे सीतेवर त्याने काहीच अपकृत्य केलं नाही. सुधरा रे !
आणि वर तर स्वतः मंदोदरी रावणाच्या विनाशाचे कारण सीताहरण सांगते आहे. तरीही लोक त्याला संयमी आणि श्रेष्ठ म्हणत असतील अशा मूर्खांना काय म्हणावे ????

श्रीरामचंद्राने सीतेचा त्याग केला होता का???
नाही. कारण उत्तरकांड पूर्ण प्रक्षिप्त सिद्ध असल्याने ह्यावर सविस्तर भाष्य करायची आवश्यकताच नाही. अग्नीपरीक्षाही प्रक्षिप्तच आहे हे आम्ही आमच्या आधीच्या अनेक लेखांत सिद्ध केलंय. कधीतरी सविस्तर भाष्य करेनच. त्यामुळे तूर्तास विराम !
काही स्वयंघोषित ब्राह्मण लोकही सांप्रत रावणाचे तो ब्राह्मण होता म्हणून उदात्तीकरण करताना दिसतात तेंव्हा तर त्यांच्या बुद्धीची कीवच करावीशी वाटते. तो ब्राह्मण वगैरे जरी आधी असला तरी तो नंतर किती लंपट नि राक्षसी प्रवृत्तीचा, स्त्रियांना पळवून आणणारा, नरमांस खाणारा होता. अशा व्यक्तींस ब्राह्मण म्हणून कौतुकायचे??? असो.

रावण अनार्य मूलनिवासी होता म्हणे.
हा शब्द जरी ऐकला नि वाचला तरी खोखो हसायला होतं. कीव येते ह्या लोकांची. पण मूळातच रामायणांत त्याचा उल्लेख आर्य म्हणून आलेला आहेच. तो मेल्यावर त्याच्या अनेक पत्नी त्यांस आर्य म्हणून विलाप करतात. बरं तो स्वत: बिभीषणांस बहिष्कृत करताना अनार्यांची निंदा करतो. जर तो अनार्य असता तर अनार्यांची निंदा का करतो???
तरीही रावणाला अनार्य म्हणजे मूलनिवासी व रामाला आर्य म्हणजे परकीय हे दाखविण्याचे जे षडयंत्र सांप्रत सुरु आहे ते वेळीच हाणून पाडलं पाहिजे. अन्यथा...! असो.

असो तरीही काहींना अद्यापही रावणाचे उदात्तीकरण करायचे असेल तर खुशाल करावे ! शेवटी
नोलुकोप्यवलोकते दिवा किं सूर्यस्य दूषणं ???
किंवा झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला??? असो.

भवदीय,
तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com