Wednesday, 31 December 2025

इतिहासाचार्यांची स्मृतिशताब्दी...

 


इतिहासाचार्यांचा अपमान यापेक्षा मोठ्ठा असुच शकत नाही पण....

आज इतिहासाचार्य वि का राजवाडे यांचं पुण्यस्मरण! त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षाला आरंभ. इंडियन हिस्टरी काँग्रेस (IHC) म्हणजे नावातच काँग्रेस असलेल्या संस्थेने राजवाड्यांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार ईर्फान हबीब सारख्या वामपंथी इतिहासकाराला देणं यात नवल असं काहीच नाही म्हणा. देश स्वातंत्र्य झाल्यापासून चुकीच्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा कायम राखण्यात आपण तसेही 'उज्ज्वल' आहोत. अर्थात ७७ वर्षात आह्मां उजव्यांना अर्थात राष्ट्रनिष्ठांना अर्थात हिंदुत्वनिष्ठांना शैक्षणिक क्षेत्रातली डाव्यांची मक्तेदारी अद्यापही मोडीत काढता आलं नाही हे आमचं अपयश आहे. आर्यसमाजी विद्वानांची परंपरा सोडली तर उजव्यांना इतक्या वर्षात स्वर्गीय सीता राम गोयलांशिवाय एकही विद्वान इतिहासकार निर्माण करता आला नाही पण याच गोयलांना आडवाणींनी व संघ-भाजपाने काय वागणूक दिली यावर मागे लिहिलंच आहे, त्यामुळे ही शोकांतिका आहेच. हाँ आमचे हिंदुसभाई जीवन कुलकर्णी काही अंशी पाखंड खंडणकर्ते होते पण हे नावही आजच्या बव्हंशी हिंदुत्ववाद्यांना माहिती नसेल, (लवकरंच कळेल ते) पण ते असे दिग्गजही नव्हते. किंबहुना सावरकरांच्या वेळीच संपलेल्या आमच्या हिंदुसभेला जीवनजींना पोसताही आलं नाही. कारण संघ-भाजपाला नावं ठेवण्याशिवाय व गोळवलकरांच्या नावाने विलाप करण्याशिवाय आमच्यातल्या बव्हंशी हिंदू महासभायांना दुसरं जमलंय तरी काय? मीही त्यातलाच म्हणा 🤭 !


एकुणंच अपयश...

देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे होत आली तरी सुद्धा हिंदुत्वनिष्ठ म्हणविणाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविणारा एकही इतिहासकार निर्माण करता आला नाही हे हिंदुत्वनिष्ठांचं अपयश आमच्या स्वत:च्या कधी लक्षात येणार आहे कुणांस ठाऊक? गेली ७८ वर्षे शिक्षणसंस्थांवर मार्क्सवादी वेटोळे घालून बसलेल्या या लाल पावट्या सर्पांची नांगी ठेचणारे प्रा. माख्खन लाल, प्रा. शंकर शरण यांची नावे गेली १५-२० वर्षे व सांप्रतही चर्चेत असली (किती हिंदुत्ववाद्यांना ही नावे माहिती आहेत???) तरीही यांच्या योगदानाचं चीज न होणं हे सरकारी पातळीवर सत्तेत ५६ ईंच असो नाहीतर अन्य कोणी, maintain the status quo हे ठरलेलं असतंच. यातही मास्टरस्ट्रोक असेल म्हणा काहीतरी, कुणांस ठाऊक? माझ्यासारख्या अतिउजव्या हिंदुसभाई अडाण्याला तो काय कळणार?  प्रा. शंकर शरणजींवर मागे लिहिलंय, गेली दोन दशके राष्ट्रीय पातळीवर ते उत्तम लेखन करताहेत पण संघ-भाजपाचे सेक्युलर दोष दाखवत असल्याने त्यांनाही उपेक्षा आहेच. ती पाचवी पुजलीच आहे...

शेष, IHC तशीही पहिल्यापासून डाव्यांचीच आहे, आणि राजवाडेही तसे उत्तरायुष्यात थोडेसे डावीकडे झुकल्यासारखे, भरकटल्यासारखे वाटावेत असे लेखन करतात, पण म्हणून ते डावे ठरत नाहीत हेही तितकंच खरं. विवाहसंस्थेचा इतिहास पाहिला तरी लक्ष्यीं येईल. त्याची कारणमीमांसा स्वतंत्रपणे कधीतरी!

पण ग्रँट डफसारखे इंग्रज व एकूणंच इंग्रज आमच्या इतिहासाचं, त्यातही आपल्या तेजस्वी नि विजीगीषु अशा मराठेशाहीच्या इतिहासाचं पद्धतशीर वाटोळं करत असताना त्यांचे ते षड्यंत्र हाणून पाडणाऱ्या राजवाड्यांचं नाव हे म्हणूनंच आमचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे ह्यावर अन्य कुणी व्यक्त होईल न होईल, आमचं काम आहे. आमच्या शिवरामपंत कार्लेकरांचा लेख दै. सकाळला आलेला आहे सुदैवाने, तो जोडलाय.


साधनसिद्ध इतिहास...

खरंतर इतिहास हा डावा आणि उजवा, हिंदुत्ववादी किंवा मार्क्सवादी, काँग्रेसी किंवा भाजपाई, पू-रोगामी किंवा प्रतिगामी, संघी किंवा हिंदुसभाई, ब्राह्मणी, मनुवादी किंवा ब्रिगेडी असा कधीच नसतो. इतिहास हा इतिहास असतो. पण या बाबतीत उजव्यांची एकुणंच प्रगती विचार करत असताना काही गोष्टी लक्ष्यात येतात

१. उजव्यांचं आंग्ल भाषेवर प्रभूत्व नसणं ही मुख्य घोडचूक
२. उजवेच उजव्यांना पाय घालून पाडताना दिसणं हे तर आजकाल अधिक होतेय
३. उजव्यांना इतिहास संशोधन हे घर जाळून कोळशाचा व्यापार करताना दिसणं - डाव्यांना जसं पोसलं जातं, तसं उजव्यांचं होताना दिसतंच नाही, ना शिष्यवृत्ती ना अन्य काही.
४. हिंदुत्ववादी संघटना किंवा पक्ष असं प्रामाणिक संशोधन करणाऱ्या उजव्यांना कुठल्याही प्रकारची मदत करताना तर अजिबात दिसत नाहीत, व्यासपीठ सुद्धा उपलब्ध करून देत नाहीत, उलट ब्रिगेड्यांना व्यासपीठे मिळताहेत.
५. सर्वात शेवटी, मूलमें भूल हैं।

बाकी जाता जाता...

इतिहास संशोधन हा विषय आजकाल विनोद, छद्म अभिमान व जातीय अभिनिवेशाचा झाला आहे; तो प्रामाणिक जिज्ञासेचा, चिकीत्सेचा नि प्रेरणेचा राहिलाच नाही. आजकाल कुणीही उठतंय, काहीही लिहितंय, कारण इतिहास हे चलनी नाणं आहे. कुठलीही विचारसरणी असो, डावे काय अन् उजवे काय, सगळे एकाच माळेचे मणी झालेत. त्यातून जातीय अभिनिवेश भयंकर वाढत चाललाय. त्यामुळे हा विषय जगासमोर मांडायला तरी आजकाल नकोसा वाटतोय, नकोच. हाँ, व्यक्तिगत अध्ययनासाठी व स्वत:ची ज्ञानपिपासा किंचित् शमविण्यासाठी तो मरेपर्यंत चिंतनीय आहेच पण केवळ स्वत:पुरता, इतिहासाचा प्रामाणिक विद्यार्थी म्हणून काही लेखन करावं व जगासमोर मांडावं असे आजकाल वाटत नाही. तरीही अंत:करणातली उर्मी शांत बसु देत नाही.

निदानभूत: इति ह एवमासीत् इति य उच्यते सेतिहास:।
निरुक्त

इतिहास पुराणं च पंचमो वेदोच्यते।
श्रीमद्भागवत

पुराणमितिवृत्तमाख्यायिकोदाहरणं धर्मशास्त्रमर्थशास्त्रं चेतीतिहास:।
कौटिल्य

धर्मार्थकाममोक्षाणामुपदेशसमन्वितम्। पूर्ववृत्तंकथायुक्तमितिहासम् प्रचक्षते।

आमच्या शास्त्रकारांनी इतिहास हा पांचवा वेद सांगितल्याने या वेदोनारायणाची सेवा करणं हे आमचं कर्तव्य असल्याने...

बुडतें हे जन देखवेना डोळां।

असो!

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#इतिहासाचार्य_विकाराजवाडे_पुण्यस्मरण_स्मृतिशताब्दी_इतिहासलेखन_मार्क्सवादी_डावे_हिंदुत्ववादी


Thursday, 25 December 2025

ख्रिसमस साजरा करणाऱ्या हिंदुंसाठी...

 

जो येशु ख्रिस्त मूळात अस्तित्वात नव्हता, ज्या ख्रिसमसवर युरोपमध्ये बंदी घातली गेली होती, ज्या ख्रिस्त्यांनी आपल्या पूर्वज हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याच्या शुभेच्छा??? नोव्हेंबर, १९९९ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय भारतभेटींस येतो व Planting The Cross in Asia म्हणजे संपूर्ण आशिया ख्रिस्तमय करायचा आहे असे जाहीर बोलतो. मागे यावर सविस्तर लेख लिहिला आहे. 

आता कुणीतरी म्हणेल अहो हा सगळा इतिहास कशाला उकरून काढता? याने समाज बिघडेल. 

हो का? मग तथाकथित ब्राह्मणांनी तथाकथित बहुजन समाजावर हजारो वर्षे अत्याचार केले हा धादांत खोटा, समाजविघटनकारी आणि फेक नेरेटिव्ह गेली दोनशे वर्षे २४ तास सातत्याने मांडत असताना लाज वाटत नाही का? याने समाज बिघडत नाही का?? मनं कलुषित होत नाहीत का??? 

या उलट शुद्र जेंव्हा राजे झाले, तत्कालीन गुणकर्माधिष्ठित वर्णव्यवस्थेनुसार सत्ताप्राप्त कर्ते झाले, तेंव्हा ब्राह्मणांची कुठलीही चूक नसताना या शुद्रांनीच ब्राह्मणांवर अत्याचार केले म्हणून ब्राह्मणांनी त्यांचे उपनयन बंद केलं असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांच्या शुद्र कोण होते या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये स्पष्टपणे मान्य केलेलं आहे. या ग्रंथामध्ये इतरही अनेकदा म्हणजे दोन ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे हेच मान्य केलेलं आहे. दुर्दैवाने आजकाल एकही आंबेडकरवादी किंवा आमचे हिंदुत्ववादीही ही गोष्ट सांगत नाहीत, कारण सामाजिक समरसता धोक्यात येते ना. असो, आजचा हा विषय नसल्याने मूळ विषयाकडे वळु. 

कुठलाही धर्म नष्ट करायचा असेल तर त्या धर्माचा पुरोहित वर्ग पहिल्यांदा नष्ट करावा लागतो हे साधं सोपे गणित ख्रिस्त्यांना कळलं होतं म्हणून तर महाराष्ट्रात आणि पर्यायाने हिंदुस्थानात ब्राह्मणद्वेषाचं मूळ याच ब्रिटिशांनी म्हणजेच ख्रिस्त्यांनी रोवलं, जे आजही घट्ट होऊन उभं आहे. ब्राह्मण तो बहाना हैं, हिन्दु धर्म असली निशाना हैं असे आमचे विवेकानंदांच्या व्याख्येतले बौद्धिक क्षत्रिय (Intellectual Kshatriya) धर्मबंधु सचिन पाटील जे म्हणतात, ते त्रिवार सत्य आहे. Divide & Rule...! 

ख्रिस्त्यांनी आपल्यावर किती अत्याचार केले याला गणनाच नाही, तरीही वानगीदाखल काही पाहुयांत. ज्या कुणाला हे सर्व खोटं वाटतंय त्यांच्यासाठी निम्नलिखित माहिती 👇👇👇

तथाकथित येशू खिस्ताच्या मृत्युनंतर त्याच्या काही शिष्यांनी युरोपात स्थलांतर केले व युरोपमध्ये आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न चालू केला. ज्यू लोकांना बाटविण्यासाठी त्यांचा छळ करणे इ. गोष्टी इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांमध्ये सुरू झाल्या. पुढे या गोष्टी पोर्तुगालमधून हिंदुस्थान व गोव्यात आल्या. ७ मे, १४९८ ला पोर्तुगीज गोव्यात आले व त्यांनी सन १९६१ पर्यत हिंदुस्थानात चाचेगिरी निर्भयपणे केली. अल्फान्सो अल्बुकर्क याने सप्तकोटेश्वराचे देऊळ पाडून तेथे चर्च उभे केले. अनेक अन्यायकारक गोष्टी घडत गेल्या. गोव्यातील हिंदू बांधवांनी त्याला फार सोशिकपणाने तोंड दिले. पुढे पोर्तुगीजांनी वसई, ठाणे, तारापूर, वांद्रे, माहीम, मुंबई येथे सत्ता स्थापन केली. दीव घेतले. दमण घेतले. गोवा, दीव, दमण यांवर त्यांची सत्ता आली. इन्क्विझिशनचा छळवाद संपूर्ण जगात चालू होता. हिंदु-नवख्रिस्ती लोकांवर अनेक निर्बंध लादले गेले. त्याविरुद्ध तक्रार ऐकली जात नसे. इ.स.१८२१ पर्यंत हा “'छळवाद' चालू होता. मराठी व संस्कृत ग्रंथांची यामुळे राख झाली. पोर्तुगीज भाषेची सक्ती झाली. पाद्री लोकांचे साम्राज्य झाले.




या ख्रिस्ती पोर्तुगीज राजकर्त्यांचे खालील हुकूम वाचले म्हणजे ख्रिस्ती पोर्तुगीजांचे जुलूम हे किती तीव्र होते हे लक्षात येईल.

इ.स. १५४६ - गोव्यातील पाखंडमत नष्ट करा. देवळे व मशिदी नष्ट करा. लाकूड, माती, धातूच्या मूर्ती करण्यास बंदी. असे करणाऱ्यास कडक शासन करा. (पोर्तुगालचा राजा दो जुवांव याचा आदेश) 

इ.स, १५४८ - हिंदूंची धार्मिक पुस्तके फाडून टाका. 

इ.स. १५५७ - हिंदूंची सरकारी नोकरीतून हकालपट्टी. 

इ.स. १५५९ - हिंदूंच्या व त्यातही ब्राह्मणांच्या वतीने कामे करू नयेत. मृत हिंदूंच्या स्रियांच्या वारशांना ख्रिस्ती झाल्यास वारसा मिळावा.

इ.स. १५६० - ब्राह्मणांना हद्दपारीचा हुकूम. स्थावर मालमत्ता ख्रिस्त्यांना विकून १० दिक्सांच्या आत बहेर जा. 

इ.स. १५६१ - लोकांना परत येण्याचा हुकूम. 

इ.स. १५६३ - परत हद्दपारीचा कायदा जारीने अंमलात आणण्याचा हुकूम. 

इ.स. १५६६ - कुलकर्णीपण हिंदूंकडे नसावे. वतने ख्रिस्त्यांना विकावी. 

इ.स. १५६७ - हिंदुंना धर्मपुस्तके बाळगण्यास बंदी. नवख्रिस्ती प्रार्थनेला न आल्यास त्यांच्या तळहातावर मारण्याचा पाद्र्यांना अधिकार. 

इ.स. १५६९ - बारदेश प्रांतातील देवळांचा समूळ नाश करण्याचा आदेश. 

इ.स. १५७१ - हिंदूंवर होणाऱ्या जुलमांची चौकशी करण्याचा हुकूम. 

इ.स. १५७४ - ब्राह्मण पंडितांना घोड्यावरून, डोलीतून, पालखीतून जाण्यास बंदी, त्याकरिता दंडाची योजना. 

इ.स. १५७५ - इतरांनासुद्धा वरील बाबींची बंदी. 

इ.स. १५८७ - हिंदूंना जानवे घालण्यास बंदी, विवाहसंस्कार बंद. 

इ.स. १५९२ हिंदू न्हाव्यांकडून ख्रिस्त्यांना हजामत करण्यास व हिंदू नोकर ठेवण्यास बंदी. 

इ.स. १५९५ जुलमाचा कळस झाला. शेती-व्यवसाय बंद पडला. 

इ.स. १५९८ हिंदू कारागीरांनी ख्रिस्त्यांना शिकविण्यास बंदी. 

इ.स. १६६० फिलीप राजाचे पत्र - हिदूंना न्यायसत्तेचा फायदा नाही. त्यांनी गोव्यात किंवा आसपासच्या मुलुखात आल्यास सर्वनाशाची शिकवण. 

इ. स. १६७८ - गोव्यात हिंदूंना विवाह करण्यास परवानगी दिली. पंरतु होमहवन करण्यास बंदी. विवाहसमारंभात कडक पहारा. 

इ.स. १६८१. पोरक्या मुलांचा ताबा घेऊन त्यांचे सक्तीने धर्मांतर. 

इ.स. १६८४ पोतुगीज भाषेची सक्ती. पोर्तुगीज शिकण्यास वर्षांची मुदत. या मुदतीत भाषा न आल्यास शिक्षा. कलावंत स्त्रियांवर बंदी. 

इ.स. १७०५ शेंडी-कर म्हणजे शेंडी ठेवल्यांस त्यावर कर

इ.स. १७१५ भोयांना हिंदुंचे मचवे चालविण्यास बंदी. 

साष्टीमधील रायतूरच्या चर्चमध्ये असलेल्या किल्लेदाराच्या थडग्यावरील खालील मृत्युलेख आढळतो - रायतूरचा किल्लेदार दि योग रूद्रिगिश, ज्याने ह्या प्रांतातील सारी देवळे पाडून टाकली, त्याचे हे कबरस्थान आहे. (२१ एप्रिल, १५६७)

ही केवल गोव्यातली काही वानगीदाखल उदाहरणे आहेत. केरळचा उल्लेख तर मी केलाच नाही. इतर प्रांतातला तर नाहीच... 

असो! सर्वधर्मसमभाव पाळायला आह्मीं काही मूर्ख नाही आहोत. तो आह्मांला कुणी शिकवुही नये! 


संदर्भग्रंथ 


१. गोमांतक परिचय - बाबा सावर्डेकर - पीडीएफ 

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/bd/%25E0%25A4%2597%25E0%25A5%258B%25E0%25A4%25AE%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A4%25E0%25A4%2595_%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BF%25E0%25A4%259A%25E0%25A4%25AF.pdf&ved=2ahUKEwiw8pPtidiRAxXXyDgGHcA-FFkQFnoECCYQAQ&usg=AOvVaw02mgU27GzygB5tAjnjgWd8


२. शुद्र कोण होते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर - पीडीएफ उपलब्ध 👇👇👇

https://www.banaengp.com/contact-us/

आंबेडकर साहित्य मराठी नागपूर प्रबुद्ध भारत प्रकाशन


३. Planting the cross in Asia 👇👇

https://www.vatican.va/content/john-paul-ii/en/apost_exhortations/documents/hf_jp-ii_exh_06111999_ecclesia-in-asia.html


४. ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिवराव शिवदे 


भवदीय... 

पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#येशुख्रिस्त_ख्रिश्चनिटी_ख्रिसमस_बायबल_नाताळ_हिंदुधर्मांतर_गोवा